देवेंद्रजी, आपला बाप कोण असेल हे हातात नाही पण आपण कोणाचे
बाप असूत हे तर आपल्या हातात आहे ना
प्रशांत परिचारकचा
कोथळा काढणार का?
-गणेश सावंत-9422742810
पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सिमेवर लढत असतो.
आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे
वाटतो,’ असं राजकारणाचं झालय. इति- आ. प्रशांत परिचारक
सत्तेच्या मदमस्तीत असलेल्या भाजपाच्या सग्यासोयर्यांना लाज नावाची चिज राहिली नाही. प्रशांत परिचारक या विधान परिषदेमध्ये बसणार्या बुद्धिवादी बुद्धुने जेंव्हा असं वक्तव्य केलं तेंव्हा नमो रुग्णांचा गोतवाळा टाळ्या वाजवून खिदीखिदी असताना दिसून आला. असं वाटलं, पायतान काढावं आधी नमो रुग्णांच्या गोतवाळ्याला आणि नंतर विधान परिषदेमध्ये गेलेल्या आ. प्रशांत परिचारक याला बदडून काढावं, जेंव्हा प्रशांत परिचारककडून असं वक्तव्य आलं तेंव्हा प्रशांत परिचारकची माय म्हणाली असेल,
देखुनी हरखली अंड । पुत्र झाला म्हणे रांड ॥
तव जाला भांड । चहाड चोर शिंदळ ॥
जाय तिकडे पिढी लोकां जोडी भांडवल थुंका ॥
तिला संताप आला असेल आपल्या उदरातून अशा रावबहादुराचा जन्मच कसा झाला? ज्या सैनिकांच्या दिवसरात्र संरक्षणातून तुम्ही-आम्ही इकडे शांतचित्तेने झोपतोत, आपल्या आया-बहिणी त्या सैनिकांच्या पहार्यामुळे सुरक्षित राहतात, बाहेर फिरू शकतात, त्या सैनिकांच्या माता-भगिनींबाबत आ. प्रशांत परिचारकाने जी काही बुद्धीची दिवाळखोरी दाखवून दिली ती एखादी नरकडी करणारी व्यक्तीच करू शकते. छिनाल झालेलं राजकारण यांना दाखवायचंच होतं तर राजकारण्यांच्या भ्रष्टाचारापासून त्यांच्या बिछाण्यापर्यंतचे अनेक उदाहरणे द्यायला हवे होते, परंतु असे न करता सैनिकांच्या अब्रूचे लचके तोडण्याचा जो प्रयत्न परिचारक यांच्याकडून झाला तो महाराष्ट्राच्या मातीला रुचणारा नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मते मागतायत त्या फडणवीसांना आमचा जाहीर सवाल आहे, खरेज जर आज छत्रपती असते तर या प्रशांत परिचारकचे काय झाले असते. अरे जिथं जावळीच्या खोर्यातल्या मोरेंना क्षमा केली नाही, रांजेगावच्या पाटलाचे हात-पाय तोडले, किल्लेदार सावित्रीबाई देसाई यांच्याशी अभद्र वर्तवणूक करणार्या सखुजी गायकवाडचे डोळे बाहेर काढले, मग फडणवीस तुम्ही प्रशांत परिचारकचा कडेलोट करणार का? आम्ही स्वतंत्र भारताच्या संविधानानुसार कडेलोट करा म्हणून, छत्रपतींच्या काळामध्ये अशा जिभ वळवळ करणार्या मंत्र्यांचं थडगं बांधलं असतं, तुम्ही याचा कडेलोट विधान परिषदेमधून तरी करणार आहात का? केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करायचं, मतं मागायचे आणि सत्तेत आले की बेलगाम होत रयतेलाच नव्हे तर आता थेट स्वराज्याचं रक्षण करणार्या सैनिकांच्या आया-बहिरींनाही टाचाखाली रगडायचं, हा संताप नाही का? देवेंद्र फडणवीस तुम्ही खरेच महाराष्ट्रातले आहात का? छत्रपती शिवाजी महारांचे पायीक आहात का? असाल तर मग तुमचं रक्त एवढं थंड कसं ? की केवळ राजकीय फायद्यासाठी आणि सत्तेच्या धोरणासाठी नुसतं बडबडच करणार आहात का? फडणवीसजी सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीत तुमची भाषणं ऐकली आणि या भाषणात भ्रष्टाचारार्यांचे कोथळे बाहेर काढू, असंही तुम्ही म्हणालात.
परिचारकचा कोथळा कोण काढणार?
प्रशांत परिचारक या विधान परिषदेच्या आमदाराने जे काही बेजबाबदार वक्तव्य केले ते वक्तव्य महाराष्ट्रातल्या मातीतलं अथवा या देशातल्या संस्कृतीलं नक्कीच नाही. आम्हाला तर आश्चर्य वाटतं, ज्या पंढरपूरच्या वाळवंटात
खेळ मांडियेला वाळवंटी ठाई । नाचती वैष्णव भाई रे ॥क्रोध अभिमान केला पावटणी । एक-एका लागती पायी रे ॥असं म्हणत अबालवृद्ध, स्त्री-पुरूष, एकमेकांच्या पाया पडून कुठलीही मनी वासना न ठेवता केवळ भक्ती-भावाने नांदते. त्या पंढरपुरामध्ये प्रशांत परिचारकसारख्या व्यक्तीचा जन्म व्हावा हे पंढरपुराचं दुर्दैव, विठू माऊलीचं दुर्दैव की देवेंद्र फडणवीस तुमचं दुर्दैव हेतरी सांगा. ज्या पंढरपूरच्या भूमीमध्ये जनाई-मुक्ताई-कान्होपात्रासारख्या महिला संतांची ये-जा होती, जन्मभूमी होती त्या जनाई-मुक्ताई आणि कान्होपात्राच्या पदरालाच या नालायकाने हात घातला. तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणून मिरवणार्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊ नये यापेक्षा मोठं ते दुर्भाग्य काय असेल. मुख्यमंत्री भाषणात सांगतात, भ्रष्टाचार्यांचे कोथळे बाहेर काढू, परिवर्तन आणूच, पारदर्शक सरकार चालवू, महाराष्ट्रामध्ये स्वराज्य आणू, छत्रपतींचे स्वप्न साकार करू, आदी छत्रपतींचे विचार आचरणात आणायला आपल्या पक्षातील सग्यासोयर्या आमदारांना शिकवा, मतदान घ्यायचं असलं की, तो आमदार आमचा आणि मतदान घ्यायचं नसलं की तो आमदार आमचा नाही, ही जी भूमिका देवेंद्र फडणवीसांची आहे ती कोथळे बाहेर काढणारी नाही तर सत्तालालसी पणाची आहे हेही या ठिकाणी सांगावसं वाटतं. लाज वाटते त्या अामदाराची आणि त्याने असे बेजबाबदार, भयानक वक्तव्य केल्यानंतरही मुख्यमंत्री म्हणून तुम्ही असताना त्याच्याकडे केलेल्या दुर्लक्षाची. प्रशांत परिचारक कोण आहे, तो कसा आहे याच्याशी आम्हास देणेघेणे नाही, परंतु त्यांनी केलेले वक्तव्य हे अखंड स्त्री जातीचा अपमान करणारं. सैनिकांच्या आया-बहिणींचा विनयभंग करणारं आणि महाराष्ट्राच्या मातीला लाजविणारा, सह्याद्रीची मान झुकावणारं नक्कीच आहे. अरे आपला बाप कोण असेल हे जरी आपल्या हातात नसलं तरी आपण
कोणाचे बाप असू
हे तर आपल्या हातात आहे ना! का याचा विसरही छत्रपतींचं स्मरण करणार्या आणि छत्रपतींचं राज्य चालविणार्या भाजपाला आहे की नाही. आम्हाला तरी वाटतं परिचारक यांचं बीज नेमकं कुठलं आहे? कारण महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या जगद्गुरु संत तुकारामांनी शुद्ध बिजापोटी फळ रसाळ गोमटी । असं म्हटलं आहे. बीज जर शुद्ध असेल तर त्या झाडाला, त्या वेलीला फळ हे रसाळ आणि गोमटीच येतं आणि बिजच जर सडलेलं असेल तर त्याचं फळही गंधलेलच असेल. परिचारक बाबतही असच काहीसं स्पष्टपणे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. परिचारक यांनी केलेलं वक्तव्य हे अखंड स्त्री जातीची अवहेलना करणारं आणि सैनिकांची क्रूरचेष्टा करणारं म्हणावं लागेल. बहुदा परिचारकांच्या मस्तकामध्ये पंढरपुरातल्या गोपाळ-बडव्यांचं मलमुत्र तर नाही ना? ही शंका घेणंही घृणास्पद वाटतं मग तरीही परिचारकांच्या मुखातून असं शेण बाहेरच कसं पडलं. परिचारक यांनी केलेलं वक्तव्य हे संतापजनक आहे, माफीलायक नक्कीच नाही. त्यापेक्षाही हे वक्तव्य झाल्यानंतर नमो रुग्णांचा जो खिदखिदाट हाही चिंताजनक आहे. समाज बदलण्यास निघणारा पारदर्शकपणा आणण्याची भाषा करणारा भाजप स्वत:च्या आमदाराला केव्हा बदलणार की ‘आपला तो बाब्या आणि दुसर्याचा तो कारटा’ या धारेणानेच तो काम करत राहणार. असो प्रशांत परिचारक या व्यक्तीस विधान परिषदेसारख्या बुद्धीजीविंच्या भावनात बसण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्राच्या स्वराज्य प्रणालीतील सभासदांच्या या यादीत उपस्थित राहण्याची लायकी नाही, अशा बेछुट माणसाला माफी देणं म्हणजेच ते सरकारचं पुरस्कारीत वागणं म्हणावं लागेल.
साय दै बीड रिपोर्टर मधील आजचा विशेष अग्रलेख
No comments:
Post a Comment