काकांना वाचवो होऽऽऽ
गणेश सावंत-9422742810
शनिवारवाड्यात नारायणराव पेशव्यांनी ‘काका मला वाचवा,’ची गुहार लगावत टाहो ङ्गोडला अन् तेंव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात काका- पुतण्यांच्या तमाम जोड्यांनी अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. परंतू आता शनिवारवाड्यातल्या काकासारखी परिस्थिती नाही. म्हणजेच काका खलनायक आणि पुतणा केविलवाणा अशी परिस्थिती राहिलेली नाही. राजकारणातला बाज जसाजसा बदलत गेला, तसंतसं पुतण्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपासून ‘काकांना वाचवा,’ अशी हाळी देण्याची वेळ महाराष्ट्राच्या राजकारणात पदोपदी आली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सुमारे अडीचशे वर्षापुर्वी ‘काका मला वाचवा,’चा टाहो ङ्गुटला, तेंव्हापासून तमाम काका लोक हे राजकारणातले नायक किंवा खलनायक आणि पुतण्या केवळ आणि केवळ केविलवाणा असा समज रूढ होत गेला, याला पौराणिक आधारही मिळत गेल्याने वर्तमानातील राजकारणात याच समझाचा पगडा पाहायला मिळाला. अगदी रामायण महाभारतचं उदाहरण घेतलं तरी त्यामध्येही सत्तेसाठी डावलने हे पहावयास मिळते. महाभारतात पुत्र प्रेमापुढे आंधळा झालेला द्रतराष्ट्र काकाने पांडव पुतण्यांच्या विनाशाचा विडा उचल्याचे सांगण्यात येते. रामायणात कैकयीने भरताला गादी मिळावी म्हणून प्रभू रामाला वनवासात पाठवले. सत्तेसाठी स्त्री ही हाङ्गहाङ्गालेली असते, हेच यावरून दिसून येते. पेशव्यांच्या काळात आणि पौराणिक इतिहासात जे पहायला मिळालं, जे वाचायला मिळालं, तेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडतयं. त्यामुळे काका- पुतण्याचं घरातं बोलण्यातून नाराजीचा सूर आला की, महाराष्ट्राच्या राजकारणात काका- पुतण्याचं खळखट्याक झालं, अशी वार्ता येते. आणि ही वार्ता अवघ्या महाराष्ट्रामध्ये निनादाप्रमाणे घुमते. महाराष्ट्राला काका- पुतण्याचं प्रेम आणि खळखट्याक नवं नाही. परंतू जेंव्हा- केंव्हा काका- पुतण्याचं खळखट्याक दुमदुमलं तेंव्हा- तेंव्हा पुतण्यानं काकाला कुठं विठ्ठलाचा दर्जा दिला, कुठं दैवताचा दर्जा दिला, तर कुठं गुरुचा दर्जा दिला. याचा अर्थ पेशवाईन काळातील पुतण्या काका मला वाचवा हो, असा टाहो ङ्गोडत दुबळा पाहायला मिळाला. परंतू आजच्या महाराष्ट्रातले पुतणे काकांना विठ्ठल, दैवतं,गुरु मानत सत्यासाठी, हक्कासाठी आपण लढतोय, हे सांगत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून बाजूला निघतांना माझी विठ्ठलराव श्रध्दा, बडव्यांमुळे बाहेर, असे राज ठाकरे म्हणाले. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मोबाईल नॉटरिचेबलचा खेळ रंगला, तेंव्हा अजित पवार शरद पवारांना दैवत म्हणाले. स्व. गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात वाद झाला. तेंव्हा धनंजय मुंडेंनी गोपीनाथरावांना गुरु मानले. हा जसा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि काका-पुतण्याच्या या इतिहासाच्या पुस्तकामध्ये बीड जिल्ह्याचे धडेही धनंजय मुंडेंच्या रूपाने लिहिले गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काका- पुतण्यांचा निनाद हा बीडशिवाय अधुराच आहे. कारण बीड जिल्ह्यातही मुंडे- पंडित, क्षीरसागर या बलाढ्य राजकीय घराण्यात काका-पुतण्यांमध्ये राजकीय इषर्र्ेने
खळखट्याक
झाले आहे. राज्याच्या राजकीय सारीपाटावर बीड जिल्ह्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. या जिल्ह्यामध्ये क्षीरसागर, पंडित, आडसकर, सोळंके या बलाढ्या राजकारण्यांचं अधिराज्य गेल्या पाच दशकापासून आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात या चारही राजकीय घराण्यामध्ये तू..तू..मैं...मै... झाली आणि ती जिल्ह्याच्या कानाकोपर्यात गेल्याशिवाय राहत नाही. बीड जिल्ह्यात काका-पुतण्याच्या राजकीय खळखट्याक दोन- अडीच दशकापुर्वी पंडितांच्या घरापासून सुरुवात झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्ताप्राप्तीपासून तेंव्हा पंडितांना कौटुंबीक बंडाला सामोरे जावे लागले. गेल्या वीस-पंचवीस वर्षापुर्वी तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवाजीराव पंडितांनी आपला मुलगा अमरसिंह पंडितांना संधी दिल्यानंतर नाराज झालेले बदामराव पंडित यांनी बंड पुकारले. आणि विधानसभा निवडणुकीत तेंव्हा शिवाजीराव पंडितांचा दारूण पराभव केला. शनिवारवाड्यात पुतण्याने काका मला वाचवायचा टाहो ङ्गोडला असेल मात्र इथं बदामरावांनी काकांना वाचवा हो म्हणण्याची वेळ आणली. त्या पाठोपाठ गेल्या पाच वर्षापुर्वी स्व. गोपीनाथ मुंडेंच्या करंगळीला धरून राजकारण शिकलेले गोपीनाथरावांसारखं प्रभावी वक्तृत्व असलेलं धनंजय मुंडे यांना बंड करावे लागले. कारण गोपीनाथरावांनी आपली कन्या पंकजांना निवडणूक रिंगणात उतरवले. आणि इथंही गोपीनाथरावांना मेटाकुटीस आणण्याचे काम पुतण्याने केलं होतं. आजही पंकजा मुंडे विरोधात धनंजय मोठ्या ताकदीने लढा देतायेत. बीड जिल्ह्यात काका-पुतण्यातलं राजकीय शब्दातलं अन् सत्तेतलं खळखट्याक जसं चर्चेत आहे. तीच हाळी आता गेल्या महिनाभरापासून बीड जिल्ह्याच्या कानाकोपर्यांतून ऐकावयास मिळत आहे. बीड जिल्ह्यातल्या राजकारणतलं
- थोरलं घर
म्हणून ज्या क्षीरसागर घराण्याकडे पाहितलं जातं. बोटावर मोजण्या इतक्या संख्येने स्वत:चा समाज असताना केवळ राजकीय ईच्छाशक्तीसह सर्व जात-धर्म-पंथांच्या लोकांना सोबत घेवून ज्या काकू नानांनी या जिल्ह्यावर जे राजकीय अधिराज्य गाजवलं. आणि तोच वसा गेल्या वीस वर्षापासून आ. जयदत्त क्षीरसागर चालवत आहेत.त्यामुळे क्षीरसागरांच्या तीन पिढ्यात कौटुंबीक कलह झाला नाही. आणि तो होणेही शक्य नाही. असं वाटतं असताना या थोरल्या घरातही काका- पुतण्यात शाब्दीकसह राजकीय खळखट्याक झालं. आणि बघता-बघता हे खळखट्याक अवघ्या महाराष्ट्राला माहिती झालं. राजकारणतलं थोरलं घर म्हणून क्षीरसागरांकडे पाहितले जाते. डॉ. भारतभुषण क्षीरसागर हे या घरातले मधवे तर रविंद्र क्षीरसागर हे धाकले. रविंद्र क्षीरसागर यांचे चिरंजीव संदीप क्षीरसागर आणि काका डॉ.भारतभुषण क्षीरसागर या काका- पुतण्यात भिनसले. परिणामी नगरपालिका निवडणुकीमध्ये हे दोघे परस्परांविरोधी उभे ठाकले. अशा वेळी घरातले थोरले आ.जयदत्त क्षीरसागरांना दु:ख आणि खंत व्यक्त करत, आपल्या पक्षाच्या पाठिशी उभे रहावे लागले. एकाकी पडलेल्या पुतण्या संदीप यांना नक्कीच काका मला वाचवा होऽऽऽ असा टाहो ङ्गोडण्याची वेळ आली असती. परंतू हा शनिवारवाड्यातला पुतण्या नव्हे तर बंगल्यातला पुतण्या आहे. त्यामुळे काकांनाच वाचवा हो.ऽऽऽ म्हणण्याची वेळ या निवडणुकीच्या अनुषंगाने संदीप यांनी आणल्याचे दिसून येते. गेल्या पंधरा-वीस वर्षापासूनची नगरपालिकेतली सत्ता डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या विरोधातील शहरातील ओरड आणि राजकीय गणितासह मताच्या आकडेवारीत हुकमी एक्के राहिलेलं, क्षीरसागरांचे खंदे समर्थक हे उघड आणि अंतस्थ संदीप क्षीरसागरांना मदत करतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा काकांना वाचवा होऽऽऽ अशी हाळी दिल्याशिवाय राहावत नाही. गेल्या वीस वर्षापासून पंडितांच्या काका- पुतण्यांची गेल्या पाच वर्षापासून मुंडेंच्या काका-पुतण्यांची आणि गेल्या पाच महिन्यापासून क्षीरसागरांच्या काका-पुतण्यांची लढाई बीड जिल्हा याची देही याची डोळा अनुभूत आहे. त्यामुळे 27 तारखेला क्षीरसागरांच्या काका-पुतण्यांच्या लढाईत कोण-कोणाला वाचवा होऽऽऽ म्हणण्याची वेळ आणतो, हे प्रत्यक्षात दिसून येईल. परंतू सध्यातरी काका-पुतण्याच्या राजकीय खळखट्याकची जोरदार चर्चा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चालू आहे. पंडित- मुंडे पाठोपाठ राजकारणतलं थोरलं घर क्षीरसागरांच्या काका- पुतण्यातली लढाई आता अवघा महाराष्ट्र अनुभवतोय.
No comments:
Post a Comment