आजच्या सायं दै बीड रिपोर्टर मध्ये वाचा रगेल आणी रंगेल बुवा बाबाची लीला बिनधास्त मध्ये
ऐसे कैसे झाले भोंदू| कर्म करूनी म्हणती साधू॥
अंगी लावुनिया राख| डोळे झाकुनिया करती पाप॥
गणेश सावंत-9422742810
संस्कार आणि संस्कृतीचा टेंभा मिरवत देशवासियांच्या विश्वासाला, त्यांच्या भक्तीचा बाजार मांडणारे एकशे बडकर एक बुवा बाबा महाराज आपल्या कुकर्माने प्रसिद्धीच्या झोतात येत आहेत. दुर्दैवं याचं वाटत हा देश साधू संतांचा असतांना या देशामध्ये असे निर्लज्ज आणि नालायक लोकांचा जन्म होतोच कसा आणि जन्म झालाच तरी राजकर्ते, राज्यकर्ते, राजसत्ता, धर्मसत्ता अशांना थारा देतेच कसे. जे काही महाराज आज जेलमध्ये आहेत ते व्याभिचारी, बलात्कारी आणि स्त्रीयांचा अपमान करणारे आहेत. हा देश नामदेवांचा आहे, तुकोबांचा आहे, संत भगवानबाबांचा आहे. अरे आम्ही तर म्हणून तुकोबांना बदनाम करण्यासाठी तेव्हाच्या धर्ममार्तंडांनी त्यांच्या अंगावर वेश्या पाठवली, तुकोबाने त्या वेश्येला परावी नारी रुख्मीण समान म्हणत तिला मातेचा दर्जा दिला हे असतात संत. बीड जिल्ह्यात गेल्या शतकात होवून गेलेले थोर संत भगवानबाबांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या अंधरूनात चोळी टाकली. आमच्या बाबांनी स्वत:चे जनेंद्रीय कापून संतत्वाचं, त्यागाचं आणि भक्क्तीभावाचं दर्शन घडवून दिलं, याला म्हणतात संत. आणि आजचे जेलमध्ये जाणारे संत नव्हे ते तर बाईलवेडे भडवेच.
संस्कार आणि संस्कृतीचा टेंभा मिरवणार्या तथाकथीत भोंदूबाबांचा उच्छांद देशात काही वर्षांपासून पहावयास मिळत आहे. सोळाव्या शतकापर्यंतच्या आणि त्यानंतरच्या बहूतांशी संतांनी समाज प्रबोधन करत संस्कार आणि संस्कृती टिकवली खरी परंतू त्यावेळीही त्या खर्या संतांना टाळकुट्यांनी देश बुडवला म्हणत काहींनी खर्या संतांना जाणीवपूर्वक त्रास दिला. त्रास देणारे खरे तर संस्कार आणि संस्कृतीचा नुसता टेंभा मिरवणारे होते. त्याच मंबाजीच्या औलादी आता देशात संस्कार आणि संस्कृतीचा टेंभा हातात घेवून वळवळ करत आहेत. या नुसत्या वळवळ करत नाहीत तर कामातुरा भय न लज्जागत भाद्रपद महिना प्रत्येक महिन्यात समजून श्वानाचीया परि आपले दर्शन घडवतांना दिसून येत आहेत. दुर्दैवं याचं वाटतं मोठमोठ्या बिदाग्या घेणारे हे निर्लज्ज महाराज जेव्हा स्त्रियांच्या अब्रूला हात घालतात तेव्हाही अंध भक्त त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरतात. काय म्हणावं या भक्तीला अन् काय म्हणावं या अंधश्रद्धेला. या देशात असे काही संत होवून गेले की त्या संतांनी वेश्येलाही मातेचं स्थान दिलं. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना बदनाम करण्यासाठी तथाकथीत धर्ममार्तंडांनी कटकारस्थान करत त्यांच्याकडे वेश्येला पाठवलं. तेव्हा तुकोबांनी परावी नारी रुख्मीण समान मानत तिला मातेचं स्थान दिलं. तर बीड जिल्ह्यात गेल्या शतकात होवून गेलेले संत भगवान बाबा यांच्या अंथरुनात काही तथाकथीत लोकांनी चोळी टाकली तर भगवान बाबांनी आपलं जनेंद्रीय कापून संतांची उदारता आणि संतांचा त्याग दाखवून दिला. दुसरीकडे मात्र आसारामबापूंपासून ते रामरहिम पर्यंत ज्या काही संतांच्या कामातूर घटना आज निदर्शनास येत आहेत त्या धर्मालाच नव्हे तर देशाच्या संस्कार आणि संस्कृतीला काळिमा फासणार्या आहेत, असे असतांनाही अशा संतांना केवळ राजकीय दृष्ट्या लाभ उठवायचा म्हणून राज्यकर्ते जवळ करत असतील, मोठमोठ्या बिदाग्या देत असतील, त्यांच्या संस्थांना टॅक्स फ्री करत असतील तर या कामातूर झालेल्या मस्तवाल महाराजांच्या बलात्काराला ते जेवढे जबाबदार आहेत तेवढेच जबाबदार सरकारचे नुमाइंदे आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आज काल कोणीही उठतं आणि कपाळी टिळा, अंगात भगवे वस्त्र परिधान करून मला अमूक देवाचं वरदान असल्याचं सांगत लोकांना भुलवित आपली दुकानदारी चालू ठेवतं. ही दुकानदारी एवढी फोपावली जातेय की ती दुकानदारी फोपावण्यासाठी जे काही एजंट म्हणण्यापेक्षा भडवे उभे केले जातात त्या भाडखावू वृत्तींच्या भडव्यांमुळेच या महाराजांची चलती. मग यामध्ये भाडखावू वृत्ती दोन पैशांपासून ते सत्तेची खुर्ची मिळवणार्या लोकांपर्यंत उघडपणे पहावयास मिळते.
ऐसे कैसे झाले भोंदू|
कर्म करूनी म्हणती साधू॥ऐसे कैसे झाले भोंदू|
अंगी लावुनिया राख| डोळे झाकुनिया करती पाप॥
दाखवुनिया वैराग्याची कळा| भोगी विषयाचा सोहळा॥
तुका म्हणे सांगो किती| जळो तयाची संगती॥
दाखवुनिया वैराग्याची कळा| भोगी विषयाचा सोहळा॥
तुका म्हणे सांगो किती| जळो तयाची संगती॥
कुकर्म करुन साधू म्हणून घेणारे, लोकांना फसवणारे भोदू जगात का निर्माण झाले, हे कळतच नाही. दिवसा अंगाला राख फासून डोळे झाकून ध्यान करायचे आणि रात्री पापे करायची असा या लोकांचा व्यवहार. एकीकडे वैराग्याचं सोंग दाखवायचं अन् दुसरीकडे अंध भक्तांच्या माघारी विषय सोहळ्यात नाचायचे ही रित या तथाकथीत भोंदूबाबांची. यामुळे त्यांच्या सोबत असणार्यांचे अथवा ते ज्या देशात आहेत त्या देशाचे भले होवूच शकत नाही. अशा महाराजांच्या संगतीला आग लागो असं या अभंगात तुकोबांनी म्हटलंय. मग जर सोळाव्या शतकात तुकाराम महाराजांनी भोदू संतांबाबत असे शब्दाचे आसूड ओढले असतील तर मग आज माहिती तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या आविष्काराने प्रफूल्लीत झालेल्या एकवीसाव्या शतकात रामरहिम सारख्या नागव्या बाबाचे समर्थन आजपर्यंत करण्यात आले. या देशाने आसाराम बापूसारखा बलात्कारी थेरडा महाराज पााहितला. ज्या आसाराम बापूच्या शाही स्नानाला लाख लाखाच्या आणि कोटकोटीच्या बिदाग्या द्याव्या लागायच्या. झोपेतून उठलेला आसाराम बापू स्वत:च्या डोळ्याचे चापडे चिपडे चोळत बाहेर निघायचा आणि महिला भक्त त्याला दुधाने अंघोळ घालायच्या. त्या दुधाची नंतर खिर केली जायची आणि ती प्रसाद म्हणून वाटली जायची. एवढं दुर्दैवं या देशवासियांचं आहे. याला दुर्दैवं म्हणायचं की अंध विश्वास म्हणायचा हे सांगणे कठीण आहे. तोच आसाराम बापू बलात्काराच्या आरोपात पकडला जातो, त्याला शिक्षा होते. तेव्हा तरी देशातल्या राज्यकर्त्यांनी या देशात भोंदूगिरी करणार्या तथाकथीत बाबांच्या नागव्यापणावर आसूड ओढायला हवे होते परंतू असं न होता हरियाणा पंजाबमध्ये महाराजांच्या नावाखाली गुंडांचे डेरे दिसून आले आहेत. रामरहिमच्या अगोदर अशाच एका महाराजाने थेट देशाच्या आर्मीविरूद्ध आक्रमन बोलले नव्हे नव्हे तर जणू युद्धाला आव्हान दिले, कुठून येते या लोकांमध्ये ही ताकद, पाप करायचं, महिला मुलींवर बलात्कार करायचा अन् नंतर उघडं पडलंच तर थेट देशाच्या अस्मितेला आव्हान द्यायचं. कसली आलीयं श्रद्धा. भोगविलासी अन् कामातूर झालेल्या अशा महाराजांचे जनेंद्रीय खरं तर चौका चौकात कापून त्यांना शिक्षा द्यायला हवी म्हणजे भविष्यात तरी श्रद्धेच्या नावावर बाजार मांडणारे, आया बहिणीच्या इभ्रतीला हात घालणार नाहीत. पंधरा वर्षांपूर्वी एखाद्या मुलीवर बलात्कार होतो, त्या डेर्यात साधवी म्हणून राहणार्या मुलीचा लैगिक छळ होतो आणि ती मुलगी पंधरा वर्षांपूर्वी सरकारसह न्याय व्यवस्थेला पत्र पाठवून आपली व्यथा मांडते. विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतर प्रथमच या देशामध्ये तेव्हा भाजपाचं सरकार आलेलं होतं.
जय जवान| जय किसान॥ बरोबर जय विज्ञानचा नारा
राजकारणातले अजातशत्रू पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे एकीकडे देत होते. देश प्रगतीपथावर जातोय असं सांगत होते. त्याचवेळी संस्कार आणि संस्कृतीचा टेंभा मिरवणारे तथाकथीत बुवा मात्र हरियाना पंजाबमध्ये आपल्या उच्छांदाचे पाय रोवत होता. देश जागतिक पातळीवर आघाडीवर जाईल, बलशाली होईल असं एकीकडे वाटत होतं तर दुसरीकडे देशवासियांच्या भक्तीशी त्यांच्या भावनाशी खेळले जात होते. देश जागतिक महासत्ताक होईल आणि महासत्ताक होण्यासाठी देशवासियांनी साक्षर होत पुढं यावं असं आव्हान केलं जात होतं अन् इकडं देशात काही बुवाबाज भांमटे लोकांना जादू टोण्याच्या नावावर मुर्खात काढत होते. महिला सशक्तीकरणाचा नारा दिला जात होता अन् इकडे रामरहिमसारखा आणि आसारामबापूसारखा तथाकथीत महाराज महिलांच्याच अब्रूचे लचके तोडत होता. अशा स्थितीत साध्वी थेट पंतप्रधानांना पत्र लिहितेय. न्याय व्यवस्थेला पत्र लिहितेय मात्र न्यायालय यावर सकारात्मक दृष्टीकोणातून पाहतं आणि सीबीआय चौकशीचे आदेश देतं. सरकारने काय केलं? हा आमचा सवाल, हा देशाचा सवाल आहे. तर बुवा बाबा हा माणसातला आहे, अध्यात्मातला आहे, इथं हात घातला तर आपले हात पोळतील, आपली सत्ता जाईल म्हणून तेव्हाच्या राज्यातील सत्ताधार्यांनी आणि केंद्रातील सत्ताधार्यांनी दुर्लक्ष करत या महाराजाला अभय दिलं. वर्षांमागून वर्षे गेले, चौकशीअंती महाराज हा लिंगपिसाट आहे हे उघड झाले. तरीही गेल्या पंधरा वर्षाच्या कालखंडात केंद्र सरकारपासून ते वेगवेगळ्या राज्य सरकारने रामरहिमला अष्टपैलू म्हणून सन्मानित केले गेले. हरियाणा सरकारने बिदाग्या दिल्या. त्या बिदाग्यामधून आणि त्या सन्मानामधून याच्यातला महाराज तर सोडा माणूसपण संपला आणि हा निव्वळ लिंगपिसाट कामातूर कुत्रा निघाला. मात्र तरीही आम्हा राज्यकर्त्यांना आणि आंधळ्या भक्तांना या महाराजाचा खरा चेहरा दिसला नाही. मात्र अशा स्थितीतही काही लोकांना तो चेहरा दिसला. रामचंद्र छत्रपती नावाच्या पत्रकाराने आपल्या ‘पुरा सच’ या सायं दैनिकात या रामरहिमच्या बातम्या छापल्या, तेव्हा महाराज म्हणून घेणार्या, संत म्हणून घेणार्या आणि पिताजी म्हणून घेणार्या या बाबाने
छत्रपतीला गोळ्या घातल्या
रामचंद्र छत्रपती रामरहिमच्या काळ्या करतूदी जगासमोर आणत होते. नावात त्यांच्या छत्रपती असल्यामुळे ते सत्याची कास धरून होते. रामचंद्रांनी महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला आणि त्यातून प्रेरणा घेत सत्याची पताका खांद्यावर घेतली. आपल्या वर्तमानपत्रातून भोंदूगिरी करणार्या महाराजांविरोधात आक्रमक भुमिका घेतली आणि रामरहिमसारख्या नितीभ्रष्ट, नतभ्रष्ट महाराजाचे कोथळे बाहेर काढण्यास सुरूवात केली. दुर्दैवं याचं वाटत की रामचंद्र छत्रपती यांच्या घरात घुसून त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र या प्रकरणातही तत्कालीन विद्यमान सरकारने म्हणावं तसं लक्ष घातलं नाही. म्हणून तर अशा भोंदूबाबाची मिजास वाढली, मस्ती वाढली, माज वाढला आणि या भामट्यांनी आपल्या डेर्यांमध्ये सावित्रीबाई फुलेंची शाळा नव्हे तर गुंडांची शाळा सुरू केली. वेगवेगळ्या आमिषाला बळी पडत अखंड महिला भक्तीभावाने त्या ठिकाणी गेल्या परंतू त्यांच्या भक्तीवरच या बाबाने बलात्कार केला. ज्या कोणी मुलींनी याला विरोध केला त्या विरोधाला या बाबाने आपल्या विश्वासर्हतेच्या आणि सरकारी आशिर्वादाच्या धमक्यांनी तो विरोध मोडून काढला. त्यामुळेच एक नव्हे दोन नव्हे राम रहिमसारख्या लिंगपिसाटाने सुमारे ३०० महिलांवर बलात्कार केल्याचे आता उघड होतांना दिसून येवू लागलं आहे. स्वत:ची काम वासना भागवण्यासाठी या हरामखोराने आपल्या डेर्यात एक भुयार निर्माण केलं होतं. त्या भुयारामध्ये सर्वकाही ऐशोआराम पहावयास मिळत होते. शय्यागृह लाजवेल असं होतं. किती हा कळस आणि नालायकपणा पण तरीही राज्यकर्त्यांना याचं काही वाटलं नाही. दुर्दैवं याचं वाटत, जेव्हा अशा लिंगपिसाटांना आश्रय देणारे आणि त्यांच्या अंधभक्तीत राहणारे या
लिंगपिसाटांसाठी रस्त्यावर
उतरतात, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतात. तेव्हाही सरकारला जाग येत नाही. या प्रकरणामध्ये कोर्ट तटस्थ होतं. अशा बलात्कार्यांना खडी फोडायला पाठवायचंच ही भुमिका कोर्टाची होती. म्हणूनच ज्या दिवशी निकाल येणार आहे त्या दिवशी राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवा, १४४ कलम लागू करा असे आदेश दिले होते मात्र सरकारने १४४ कलम लागू केला परंतू जेव्हा हा लिंगपिसाट भोदूबाबा दोषी ठरवला गेला तेव्हा हरियाणा, पंजाब आणि दिल्लीसह अन्य राज्यात अंध भक्तांनी आणि गुंडांच्या बाबांनी धुमाकूळ घातला. कित्येक निष्पाप लोक मारले गेले. हजारो लाखो करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले, हे केवळ हरियाणामधील भाजप सरकारच्या दुर्लक्षपणामुळेच. आजपर्यंत या बाबाला या लिंगपिसाट माणसाला केवळ सत्तेसाठी पोसलं गेलं. त्याच्या डेर्यामध्ये महिलांवर अत्याचार होतोय, बलात्कार होतोय, तो गुंड पाळतोय, शस्त्रसाठा जमा करतोय यापेक्षा तो आपल्याला आमदार देतोय याकडेच सरकारने लक्ष दिलं. सरकारला असं कधीही वाटलं नाही हा पॅशनेबल बाबा चित्रपटामध्ये जावून मुके घेतोय. मोठमोठ्या पबमध्ये जातोय, बाया नाचवतोय, स्वत: नाचतोय, वेगवेगळी वेसने करतोय मग त्याचे चारित्र्य ते काय असेल याची भनकही या राज्यकर्त्यांना झाली नाही. हा उघड उघड नंगानाच करत होता. तेव्हा तुकोबाच्या भाषेत झालेच तर या नंगानाचाचे वर्णन या अभंगातून पाहता येईल.
एैसे संत झाले कळी| तोंडी तंबाखूची नळी॥
स्नान संध्या बुडविली| पुढे भांग ओढविली॥
भांग भूर्का हे साधन| पची पडे मद्यपान॥
तुका म्हणे अवघे सोंग| तेथे कैचा पांडूरंग॥
ज्या महाराजांच्या तोंडात पान, तंबाखूचा तोबरा भरून ठेवलेला आहे. स्नान संध्या इत्यादी आचरण जो विसरत आहे, गांजा मद्य इत्यादी व्यसनाच्या अधीन होत जो उघड उघड नंगानाच करतो. संतत्वापेक्षा दंभानेच जो परिपूर्ण असतो त्याला इश्वर पावेल का? मग आम्ही तर म्हणू या रामरहिमला कुठला ईश्वर थारा देत असेल. ज्याने अबला महिलांच्या शरीराचे लचके तोडले, त्यांच्या भावनांशी खेळला, त्यांच्या परिवाराच्या परिवाराशी विश्वासघात केला तो महाराज असूच शकत नाही हे राज्यकर्त्यांना का कळू नये. आजही देशात आणि राज्यात असे अनेक भाडखावू वृत्तीचे आणि संतांच्या नावे आपली दुकाने मांडून बसलेले कामातूर बुवा जिथं तिथं दिसून येत आहेत. आतापर्यंत राधे मॉं असो आसारामबापू असो किंवा अन्य सात ते आठ जे की केवळ महिलांवर बलात्कार केले म्हणून जेलमध्ये गेले आहेत ते असोत. यांची वर्गवारी पाहितली, यांचे आचरण पाहितले तर हे संस्कार आणि संस्कृतीपासून कोसो दूर आहेत. हे लोक केवळ स्त्रीलंपट आणि त्या लोकांजवळ इतरांना घेवून जाणारे भाडखावू वृत्तीचे याशिवाय याविषयी काही बोलणे ते चुकीचे ठरेल. रामरहिमने केलेला उच्छांद हा संस्कार, संस्कृतीबरोबर धर्माचा अपमान जसा आहे तसा देशवासियांचा सर्वात मोठा विश्वासघात आहे, त्यामुळे या महाराजाला जामीन मिळणार नाही याची तरतूद आता करायला हवी. हे एवढ्यासाठीच, यासाठी सांगावंसं वाटतं कारण हा रामरहिम दोषी ठरला जाणार हे जेव्हा राज्यसरकारसह केंद्र सरकारला माहित होतं तेव्हा तो कोर्टात येताना ज्या पद्धतीने त्याचा ताफा आणि ताफ्यामधील गाड्यांमध्ये ज्या वस्तू मिळून आल्या त्या निव्वळ त्या बाबाला अभय देणार्या आणि देशवासियांच्या संकटात भर घालणार्या होत्या. त्यामुळेच अशा बाबांना आता इथं स्थान नाही ही भुमिका सरकारने घ्यायला हवी आणि माझ्या देशातील राज्यातील आणि जिल्ह्यातील
माता भगिनींनो
काहीही करा, घरातल्या मायबापांना देव माना, सासू-सासर्यांना देव माना त्यांची सेवा करा परंतू शेतात काही पिकत नाही, पोरगं पास होत नाही, पोरीचं लग्न होत नाही, नवर्याची दारू सूटत नाही, घरात चोरी होतेय, शेजारणीचं वाटूळं व्हावं, एखादी रंडकी चंडगी व्हावी, कोणाचं बोडकं बसावं, स्वत:चं चांगलं व्हावं, स्वत:च्या घरात धनधान्याच्या रासा पडाव्यात, इमले जुमले अन् बंगले आपलेच असावेत असे नवसं सायसं करणं बंद करा असे रडगाणे घेवून बुवा बाबाच्या दारात जावू नका, कुठलाही बुवा बाबा असं काहीच करू शकत नाही. कुठल्याही बुवा बाबाला कुठलीही दैवी शक्ती नाही, तो कुठलाही आजार बरा करू शकत नाही तो फक्त तुमचा विश्वासघात करू शकतो. तुमच्या भक्तीला विकू शकतो. तुमच्या श्रद्धेचा बाजार मांडू शकतो आणि नंतर तुमचाच लैंगिक छळ करत हा हरामी आपली दुकानदारी कायम चालू ठेवतो म्हणूनच हात जोडून विनंती आहे, श्रद्धा नक्की ठेवा परंतू ती डोळस असावी कारण कुठलाही देव कधीच कुठलीही वस्तू देण्यासाठी लाच मागत नाही त्यामुळे देवाला काही तरी केलं म्हणजे आपल्याला देव देईल असं म्हणणं चुकीचं आहे. देव कधीही आपल्या लेकरांना त्रास देत नाही, श्रद्धा ही चेतना निर्माण करणारी असते. भक्ती हा विश्वास निर्माण करते त्यामुळे श्रद्धा आणि भक्ती स्वत:जवळ निश्चित ठेवा, चेतनेने संघर्ष करण्यासाठी उठा आणि भक्तीने होय मी हे काम करणारच, मी या कामात यशस्वी होणारच, परिक्षेत पास होणारच, पुढच्या पाच वर्षात घर बांधणारच अशा विश्वासाने पुढे या मग बघा नक्कीच तुमचे भले होईल. कुठला बुवा बाबा तुमचं भलं करूच शकणार नाही.