श्रेयवाद्यांनी बीडचं वाटोळं केलं
गणेश सावंत -9422742810
सावित्री नदीवरचा पुल १६५
दिवसात बांधून पूर्ण होतो
आणितो त्या
भागातील
रहदारीसह पतिव्रता ठरतो मग
बिंदुसरा नदीवरचा पुल वर्षानुवर्षे
तसाच रेंगाळत पडतो. मग हा
पुल रंडका झालाय की
विधूर झालाय? हा आमचा सवाल आणि जर पुल बांधण्यासाठी सावित्री
नदीवरजसे निष्पापांचे बळी गेले तसे बळी बिंदुसरा नदीवरचा पुल
‘शुद्र मांजराच्या वक्षस्थळावर
वाकडी नजर टाकू नका’
हे धाडस आम्हीच केलं होतं आणि क्षीरसागरांच्या भूमिकेचं खंबीर समर्थनही केलं होतं. आज या गोष्टीला किमान ५ वर्षे उलटून गेले आहेत, मात्र या पाच वर्षाच्या कालखंडात बीड शहरात ना उड्डाण पुल झाला ना बिंदुसरा नदीवरचा पुल झाला. आजच्या परिस्थितीच्या पापाचे बाप कोण? हा सवाल अधिकाराने विचारण्याचा अधिकार हा बीड शहरातील जनतेचा आणि जिल्ह्यातील जनतेचा आहे याची जाणीव नेतृत्वांना असायलाच हवी. जर सावित्री नदीवर दुर्दैवी घटना घडते, बस वाहून जाते, काही निष्पाप लोकांचे बळी जातात आणि राज्यातील नादुरुस्त पुलांचा प्रश्न तेंव्हा ऐरणीवर येतो, सावित्री नदीवरचा पुल १६५ दिवसात पूर्ण केला जातो, मग बिंदुसरा नदीवरच्या पुलासह राज्यातल्या इतर पुलांच्या उभारणीसाठी देवेंद्र फडणवीसांचं सरकार निष्पापांचे बळी जाण्याची वाट पहातय का? तसं नसतं तर या तीन वर्षाच्या कालखंडात आवश्यक त्याठिकाणी पुलाची उभारणी करण्याचा प्रयत्न या नव्या सरकारने केला असता. परंतु केवळ जात-पात, धर्म-पंथ आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर तहाच्या नावाखाली मुर्खांची नांदी नाचवायची आणि प्रसिद्धीच्या झोतात राहत जाहिरातबाजीचं कुंकू कपाळी लिहायचं यापेक्षा दुसरं ते काहीच या राज्य सरकारला अद्याप तरी करता आलं नाही. हा नक्कीच राग आहे, कारण गेल्या चार दिवसांच्या कालखंडात बीड शहरातील जनतेला आणि जिल्ह्याबाहेरून येणार्या जनतेला जो त्रास होतोय तो पराकोटीचा आहे. नुसता त्रास होत नाही तर रुग्णांना घेऊन आलेल्या नातेवाईकांपासून रुग्णाला मरण यातना सहन कराव्या लागत आहे. याचा थोडा तरी अंदाज बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंना आहे का? रॉयलस्टोनमध्ये गणपती बसला, बीड पासून ते मुंबईच्या वर्तमानपत्रापर्यंत थाटात आरत्यांच्या बातम्या आल्या, परंतु त्याचवेळी बीडच्या बिंदुसरा नदीवरचा पर्यायी पुल वाहून गेला त्याच्या मोठमोठ्या बातम्या आल्या, त्या तरी पंकजा मुंडेंनी वाचल्यात का? हा सवाल एवढ्यासाठीच विचारतो की, बीडच्या
जिल्हाधिकार्यांचा हटवादीपणा
वेळोवेळी वर्तमानपत्रांनी मांडला. परंतु शहरातली वाहतूक सुरळीत करण्यासाठी, शहराबाहेरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सर्वसामान्यांसह रुग्णांना शहरातील दवाखान्यात येण्यासाठी व्यवस्था करण्यापेक्षा पदचार्यांपासून वाहनधारकांपर्यंत कसा जास्तीचा त्रास वाढेल, ही जी भूमिका जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी घेतली. एकतर बिंदुसरा नदी पात्रावरचा मोठा पुल वर्षानुवर्षे नादुरुस्त आणि धोकायदाक म्हणून गणला गेला. त्यासाठी पर्यायी पुलाची उभारणी करण्यात आली. वर्षात तो दोन वेळेस वाहून गेला. आज परिस्थिती अशी आहे, बार्शी नाका परिसरातून साध्या पादचार्यालाही नदी ओलांडता येत नाही. जणू शहरवासियांचा मसनवाटा हा पुलाच्या अलिकड आणि शहराबाहेरील लोकांचा मसनवाटा नदीच्या पलिकडे अशी स्थिती जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी याठिकाणी उभी केली आहे. एक तर जवळपास दहा ते बारा महिने झाले हे महोदय बीड जिल्ह्यात आले आहे, परंतु अद्यापपर्यंत लोकहिताचे अथवा जनतेचे प्रश्न जिल्ह्याचा मायबाप म्हणून सोडवण्याचा कुठलाच प्रयत्न यांच्याकडून झाला नाही. जेंव्हा पीक विम्याचा प्रश्न होता तेव्हा आमचे जिल्हाधिकारी सुट्टीवर गेले, जेव्हा केव्हा शहरावर आणि जिल्ह्यावर संकट येतं तेव्हा तेव्हा प्रशासन व्यवस्थेतील एक दांडगं पितृत्व म्हणून जिल्हाधिकार्यांकडे पाहितलं जातं आणि या पितृत्वाच्या छत्राखाली जनता सुरक्षित राहिल, असं मानलं जातं परंतु देवेंद्र फडणवीस सरकारने म्हणा अथवा दस्तुरखुद्द पालकमंत्री पंकजा मुंडेंनी म्हणा दिसायला रुपडं आणि कामाला म्हातारडं असं प्रशासनातलं बुजगावणं आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मांडून ठेवलं. हे एवढ्यासाठीच आहे, पंकजा मुंडे तिथं रॉयलस्टोनमध्ये सगळे सणवार आनंदात साजरा करत आहेत आणि इथे बीड शहरात आणि जिल्ह्यात या पुलामुळे लोकांच्या सणावाराच्या आनंदावर पाणी फेरलं जातं आहे. शहरवासियांनी आणि जिल्हावासियांनी सहन तरी कुठपर्यंत करायचं? तुम्ही पालकमंत्री आहात ताई आणि अण्णा तुम्ही या शहराचे आजपर्यंतचे कर्तेधरते आहात. या पुलामुळे तीन दिवसात ज्या यातना शहरवासियांनी सहन केल्या त्याचा थोडासा परिचय करून घ्यायचाच असेल तर
जिल्हा रुग्णालयात विचारा
या तीन दिवसांमध्ये तुमच्याकडे किती रुग्ण आले, जे आले ते केवळ वाहतूक जॅम असल्यामुळे त्यांचे दुखने वाढले आणि कित्येकांना रुग्णालयात येता आले नाही म्हणून अक्षरश: प्राणही गमवावे लागले. हे लिखित नसले तरी बीड जिल्ह्याच्या जनतेने आपलं भाग्य म्हणून रस्त्यातच आपल्या रुग्णाचा मृत्यू झाला, असं मानत परतीच्या पावसाने त्याला अग्निडाग देण्यात धन्यता मानली या पेक्षा मोठे ते दुर्दैव काय असायला हवे आणि सगळ्यात मोठं किती दिवस तुम्ही दोघे या पुलाचा राजकारण करणार आहात? या पुलावरून किती दिवस तुम्ही पत्रकबाजी करून यांना भेटलो, त्यांना भेटलो असे म्हणणार. आता तर बातमी तीच फक्त दिनांक बदलायचं बाकी राहीला आहे, बीडच्या वर्तमानपत्रांना ती बातमीही पाठ झाली, नव्हे नव्हे तर लोकही आता ही बातमी आली तर विनोद म्हणून त्या बातमीकडे पहातात. याचा अनुभव आम्ही घेतलाय, म्हणूनच आम्ही हे उघडपणे मांडतोयत आणि का नाही मांडावं? चुक ते चूक हे मांडणारच. मग राग येव अथवा लोभ वाढो. कारण बीड जिल्ह्यातील जनता जेवढी क्रांतीकारी आहे तेवढी सहनशील आहे, म्हणूनच आजपर्यंत जिल्ह्यातील जनता हे सर्व सहन करत आली आहे परंतु गेल्या तीन ते चार दिवसांच्या कालखंडात शहरामधील वाहतुकीची कोंडी शहरवासी जेंव्हा अनुभवतात आणि शहरात प्रवेश करण्यासाठी जो अनुभव शहराबाहेरील जनतेला येतो तो अनुभव संताप उफाळून आणणारा असतो. आता तरी पुलाचं बघा. जसा सावित्री नदीवरचा पुल १६५ दिवसात झाला तसा हा पुल १२० दिवसात कसा होईल याकडे लक्ष द्या तेव्हाच तुमच्या नेतृत्वाची पताका लोकांनाही खांद्यावर घ्यावीशी वाटेल.
उभारण्यासाठी द्यायचे काय? हा बीड शहरासह जिल्ह्यातील जनतेचा
शासन-प्रशासन व्यवस्थेला जाहीर सवाल आहे.
---------------------------------------------------------
---------------------------------------------------------
सावित्री नदीवरचा पुल १६५ दिवसात बांधून पूर्ण होतो आणि तो त्या भागातील रहदारीसह पतिव्रता ठरतो मग बिंदुसरा नदीवरचा पुल वर्षानुवर्षे तसाच रेंगाळत पडतो. मग हा पुल रंडका झालाय की विधूर झालाय? हा आमचा सवाल आणि जर पुलबांधण्यासाठी सावित्री नदीवर जसे निष्पापांचे बळी गेले तसे बळी बिंदुसरा नदीवरचा पुल उभारण्यासाठी द्यायचे काय? हा बीड शहरासह जिल्ह्यातील जनतेचा शासन-प्रशासन व्यवस्थेला जाहीर सवाल आहे. गेल्या तीन दिवसांपासून बीड शहरातली तुंबलेली वाहतूक पाहता आणि मेटाकुटीला आलेले लोक पाहता शासन व्यवस्थेविरोधात पराकोटीचा संताप व्यक्त केला जात आहे. तत्कालीन रस्ते व बांधकाम मंत्री तथा बीडचे विद्यमान आमदार जयदत्त क्षीरसागर आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. प्रितम मुंडे यांनी गेल्या दोन वर्षाच्या कालखंडात या पुलावरून बरच राजकारण केलं, परंतु श्रेयवादा
च्या या राजकारणात निष्क्रीयतेचं प्रचंड पाणी पुलाखालून गेल्याचं उघड सत्य अवघ्या जिल्ह्याला माहित आहे, म्हणूनच आज बीडचा जो संपर्क तुटलाय, बिंदुसरा नदीवरचा पुल नसल्यामुळे जनतेला जो त्रास होतोय, ग्रामीण भागासह शहरी भागातील प्रवाशांना आणि बीड जिल्ह्याशी जोडणार्या राज्य परराज्यातील वाहन चालकांना जो काही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे तो केवळ आणि केवळ बीड जिल्ह्याच्या अक्रियाशील नेतृत्वामुळेच. आज आम्ही लिहितोय याचा नक्कीच राग पंकजा मुंडेंसह जयदत्त क्षीरसागर यांना आल्याशिवाय राहणार नाही, परंतु होय, आम्ही लिहितोय ते फक्त क्षीरसागर आणि मुंडे यांना पराकोटीचा राग यावा, रागातून थैयथयाट करत या दोघांनी आम्हाला शिव्याशाप द्यावेत, परंतु कुठल्याही परिस्थितीत जसा सावित्री नदीवरचा पुल १६५ दिवसात पूर्ण होऊ शकला तसा बिंदुसरा नदीवरचा पुल १२० दिवसात पूर्ण कसा होईल यासाठी त्यांनी रागाच्या भरात तरी शासन-प्रशासन दरबारी बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या यातना आणि शहरवासियांच्या संतप्त भावना राज्य सरकार आणि केेंद्र सरकारसमोर मांडाव्यात. आतापर्यंत हा पुल आम्ही मंजूर करून आणला. या पुलासाठी आम्ही अमूक केलं, तमूक केलं म्हणत महिन्यात चार-चार पत्रके काढली, ती प्रसिद्धीस आणली आणि या पुलासाठी आम्हीच कसं झगडतोय, हे दाखवून देण्यासाठी मुंडे आणि क्षीरसागरांनी प्रयत्नांची परीकाष्ठा करत श्रेयवादाचा डांगोरा मोठ्या प्रमाणात पिटवला. या श्रेयवादानेच बीडचं वाटोळं केलं. गेल्या महिन्या-दोन महिन्यांची गोष्ट, एकीकडून आ. जयदत्त क्षीरसागर या पुलासाठी आम्ही प्रयत्न करतोय म्हणून पत्रकबाजी करत होते, दुसरीकडे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे पुलाचा प्रश्न मार्गी लागला, असे सांगितले जात होते तर तिसरीकडे या जिल्ह्याच्या खासदार पुलावर जात पाहणी करत मुंडे भगिनीच या पुलाचं काम करू शकतात हे दाखवून देण्याचा प्रयास करत होत्या. परंतु निष्पन्न काय झालं? गेल्या तीन वर्षांपासून या पुलाचा प्रश्न ऐरणीवर आहे. जेंव्हा क्षीरसागर सत्तेवर होते तेव्हाही प्रश्न ऐरणीवर होता. सत्ता बदलून तीन वर्षे झाले, अक्षरश: या पुलाची चाळणी झाली, मात्र प्रश्न जैसा थाच दिसून आला. दुसरीकडे उत्तर मात्र पत्रकबाजीतून श्रेयवादाचे जिथंतिथं पहायला मिळाले. कुठपर्यंत आणि किती दिवस बीड शहरासह जिल्ह्यातील जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयास राज्यकर्त्यांसह प्रशासन व्यवस्थेतील वरिष्ठ अधिकारी करीत असतील आणि जाणीवपूर्वक बीडच्या जनतेला त्रास देण्याची मानसिकता ठेवत असतील तर ही मानसिकता जिल्ह्यातली जनता सहन करणार नाही. या अगोदर आम्ही वेळोवेळी या प्रश्नावर आवाज उठवला. जनतेच्या सोबत राहून जे सत्य आहे त्याच्या पाठिशी राहण्याचं धोरण आखलं. जेव्हा माजी मंत्री सुरेश नवलेंनी उड्डाण पुलाला विरोध करण्याचं धाडस दाखवलं तेव्हा आम्हीच नवलेंना म्हणालो होतोत,‘शुद्र मांजराच्या वक्षस्थळावर
हे धाडस आम्हीच केलं होतं आणि क्षीरसागरांच्या भूमिकेचं खंबीर समर्थनही केलं होतं. आज या गोष्टीला किमान ५ वर्षे उलटून गेले आहेत, मात्र या पाच वर्षाच्या कालखंडात बीड शहरात ना उड्डाण पुल झाला ना बिंदुसरा नदीवरचा पुल झाला. आजच्या परिस्थितीच्या पापाचे बाप कोण? हा सवाल अधिकाराने विचारण्याचा अधिकार हा बीड शहरातील जनतेचा आणि जिल्ह्यातील जनतेचा आहे याची जाणीव नेतृत्वांना असायलाच हवी. जर सावित्री नदीवर दुर्दैवी घटना घडते, बस वाहून जाते, काही निष्पाप लोकांचे बळी जातात आणि राज्यातील नादुरुस्त पुलांचा प्रश्न तेंव्हा ऐरणीवर येतो, सावित्री नदीवरचा पुल १६५ दिवसात पूर्ण केला जातो, मग बिंदुसरा नदीवरच्या पुलासह राज्यातल्या इतर पुलांच्या उभारणीसाठी देवेंद्र फडणवीसांचं सरकार निष्पापांचे बळी जाण्याची वाट पहातय का? तसं नसतं तर या तीन वर्षाच्या कालखंडात आवश्यक त्याठिकाणी पुलाची उभारणी करण्याचा प्रयत्न या नव्या सरकारने केला असता. परंतु केवळ जात-पात, धर्म-पंथ आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर तहाच्या नावाखाली मुर्खांची नांदी नाचवायची आणि प्रसिद्धीच्या झोतात राहत जाहिरातबाजीचं कुंकू कपाळी लिहायचं यापेक्षा दुसरं ते काहीच या राज्य सरकारला अद्याप तरी करता आलं नाही. हा नक्कीच राग आहे, कारण गेल्या चार दिवसांच्या कालखंडात बीड शहरातील जनतेला आणि जिल्ह्याबाहेरून येणार्या जनतेला जो त्रास होतोय तो पराकोटीचा आहे. नुसता त्रास होत नाही तर रुग्णांना घेऊन आलेल्या नातेवाईकांपासून रुग्णाला मरण यातना सहन कराव्या लागत आहे. याचा थोडा तरी अंदाज बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंना आहे का? रॉयलस्टोनमध्ये गणपती बसला, बीड पासून ते मुंबईच्या वर्तमानपत्रापर्यंत थाटात आरत्यांच्या बातम्या आल्या, परंतु त्याचवेळी बीडच्या बिंदुसरा नदीवरचा पर्यायी पुल वाहून गेला त्याच्या मोठमोठ्या बातम्या आल्या, त्या तरी पंकजा मुंडेंनी वाचल्यात का? हा सवाल एवढ्यासाठीच विचारतो की, बीडच्या
जिल्हाधिकार्यांचा हटवादीपणा
वेळोवेळी वर्तमानपत्रांनी मांडला. परंतु शहरातली वाहतूक सुरळीत करण्यासाठी, शहराबाहेरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सर्वसामान्यांसह रुग्णांना शहरातील दवाखान्यात येण्यासाठी व्यवस्था करण्यापेक्षा पदचार्यांपासून वाहनधारकांपर्यंत कसा जास्तीचा त्रास वाढेल, ही जी भूमिका जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी घेतली. एकतर बिंदुसरा नदी पात्रावरचा मोठा पुल वर्षानुवर्षे नादुरुस्त आणि धोकायदाक म्हणून गणला गेला. त्यासाठी पर्यायी पुलाची उभारणी करण्यात आली. वर्षात तो दोन वेळेस वाहून गेला. आज परिस्थिती अशी आहे, बार्शी नाका परिसरातून साध्या पादचार्यालाही नदी ओलांडता येत नाही. जणू शहरवासियांचा मसनवाटा हा पुलाच्या अलिकड आणि शहराबाहेरील लोकांचा मसनवाटा नदीच्या पलिकडे अशी स्थिती जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी याठिकाणी उभी केली आहे. एक तर जवळपास दहा ते बारा महिने झाले हे महोदय बीड जिल्ह्यात आले आहे, परंतु अद्यापपर्यंत लोकहिताचे अथवा जनतेचे प्रश्न जिल्ह्याचा मायबाप म्हणून सोडवण्याचा कुठलाच प्रयत्न यांच्याकडून झाला नाही. जेंव्हा पीक विम्याचा प्रश्न होता तेव्हा आमचे जिल्हाधिकारी सुट्टीवर गेले, जेव्हा केव्हा शहरावर आणि जिल्ह्यावर संकट येतं तेव्हा तेव्हा प्रशासन व्यवस्थेतील एक दांडगं पितृत्व म्हणून जिल्हाधिकार्यांकडे पाहितलं जातं आणि या पितृत्वाच्या छत्राखाली जनता सुरक्षित राहिल, असं मानलं जातं परंतु देवेंद्र फडणवीस सरकारने म्हणा अथवा दस्तुरखुद्द पालकमंत्री पंकजा मुंडेंनी म्हणा दिसायला रुपडं आणि कामाला म्हातारडं असं प्रशासनातलं बुजगावणं आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मांडून ठेवलं. हे एवढ्यासाठीच आहे, पंकजा मुंडे तिथं रॉयलस्टोनमध्ये सगळे सणवार आनंदात साजरा करत आहेत आणि इथे बीड शहरात आणि जिल्ह्यात या पुलामुळे लोकांच्या सणावाराच्या आनंदावर पाणी फेरलं जातं आहे. शहरवासियांनी आणि जिल्हावासियांनी सहन तरी कुठपर्यंत करायचं? तुम्ही पालकमंत्री आहात ताई आणि अण्णा तुम्ही या शहराचे आजपर्यंतचे कर्तेधरते आहात. या पुलामुळे तीन दिवसात ज्या यातना शहरवासियांनी सहन केल्या त्याचा थोडासा परिचय करून घ्यायचाच असेल तर
जिल्हा रुग्णालयात विचारा
या तीन दिवसांमध्ये तुमच्याकडे किती रुग्ण आले, जे आले ते केवळ वाहतूक जॅम असल्यामुळे त्यांचे दुखने वाढले आणि कित्येकांना रुग्णालयात येता आले नाही म्हणून अक्षरश: प्राणही गमवावे लागले. हे लिखित नसले तरी बीड जिल्ह्याच्या जनतेने आपलं भाग्य म्हणून रस्त्यातच आपल्या रुग्णाचा मृत्यू झाला, असं मानत परतीच्या पावसाने त्याला अग्निडाग देण्यात धन्यता मानली या पेक्षा मोठे ते दुर्दैव काय असायला हवे आणि सगळ्यात मोठं किती दिवस तुम्ही दोघे या पुलाचा राजकारण करणार आहात? या पुलावरून किती दिवस तुम्ही पत्रकबाजी करून यांना भेटलो, त्यांना भेटलो असे म्हणणार. आता तर बातमी तीच फक्त दिनांक बदलायचं बाकी राहीला आहे, बीडच्या वर्तमानपत्रांना ती बातमीही पाठ झाली, नव्हे नव्हे तर लोकही आता ही बातमी आली तर विनोद म्हणून त्या बातमीकडे पहातात. याचा अनुभव आम्ही घेतलाय, म्हणूनच आम्ही हे उघडपणे मांडतोयत आणि का नाही मांडावं? चुक ते चूक हे मांडणारच. मग राग येव अथवा लोभ वाढो. कारण बीड जिल्ह्यातील जनता जेवढी क्रांतीकारी आहे तेवढी सहनशील आहे, म्हणूनच आजपर्यंत जिल्ह्यातील जनता हे सर्व सहन करत आली आहे परंतु गेल्या तीन ते चार दिवसांच्या कालखंडात शहरामधील वाहतुकीची कोंडी शहरवासी जेंव्हा अनुभवतात आणि शहरात प्रवेश करण्यासाठी जो अनुभव शहराबाहेरील जनतेला येतो तो अनुभव संताप उफाळून आणणारा असतो. आता तरी पुलाचं बघा. जसा सावित्री नदीवरचा पुल १६५ दिवसात झाला तसा हा पुल १२० दिवसात कसा होईल याकडे लक्ष द्या तेव्हाच तुमच्या नेतृत्वाची पताका लोकांनाही खांद्यावर घ्यावीशी वाटेल.
साय दै , बीडरिपोर्टर मधील आज दी,३० ऑगष्ट 2017 चा झणझणीत अग्रलेख
No comments:
Post a Comment