Sunday, 24 September 2017

                                        
बाबांनी वैष्णव धर्म वाढवला 

आम्ही काय वाढवतोय?


-गणेश सावंत-9422742810

तुकोबा विमानात बसून जावू शकतात तसे ते येवू ही शकतात. मी तर म्हणतो तुकोबा आपल्यातून गेलेच नाही ते इथेच आहेत. मन करारे निर्मळ सर्व सिद्धीचे कारण या दृष्टीने आणि साध्य ते असाध्य या वृत्तीने तुकोबांना शोधलं तर ते नक्कीच तुमच्या आमच्यात सापडतील. काळ कोणताही असो त्याचे नाव वेगळे असेल, रूप वेगळष असेल, कर्तव्य कर्म वेगळे असेल त्यामुळे केवळ त्याच्या नावारूपात न अडकता तुकोबा संत असून काठी हाणतात पण कोणाचे डोके फोडा म्हणत नाहीत. ही काठी शब्दाची, विवेकाची, ज्ञानाची, विचाराची, काम, क्रोध, लोभाचा त्याग करायचा सांगणारी जीच्यामुळे डोक्याला झिणझिण्या येतील आणि काम, क्रोध, लोभाला सोबत घेवून झोपलेल्यांना जाग येईल. अधुनिकता म्हणत असाल तर ती काळाशी नाही तर विचाराशी संबंधित असते याचा विचार आता करावाच लागेल. तुकोबानंतर संत पदाला कोणी गेले असेल तर ते माझ्या जिल्ह्यातले, माझे गुरूवर्य अखंड मानव जातीचे उद्धारकर्ते संत भगवान बाबा यांचंच नाव घ्यावं लागेल. बुद्धांकडे पाहिले तर आम्हाला तुकाराम दिसतात. तुकारामांकडे पाहिलं तर आम्हाला आज भगवान बाबा दिसतात. तुकोबांच्या विचारावर भागवत धर्माची पताका फडकवणारे संत बहिणाबाई शिऊरकरानंतर २० व्या शतकातले महान संत भगवान बाबच. बाबांचं कर्तृत्व कर्म, बाबांचा त्याग आणि बाबांची समाजाकडे पहाण्याची दृष्टी तुमच्या आमच्यात आली तर नक्कीच बाबांनी वैष्णव धर्म वाढवलाय आम्ही काय वाढवतोय हा प्रश्‍नच पडणार नाही. संत भगवान बाबांचं कर्तृत्व कर्म याची देही याची डोळा पाहणारे देह आजही बीड जिल्ह्यातल्या कानाकोपर्‍यात कुठे ना कुठे श्वास घेतात. त्यांची भेट घेतल्यानंतर, त्यांच्या ह्रदयातून आणि त्यांच्या नैनातून भगवान बाबा आम्ही जेंव्हा पाहतो तेंव्हा बाबांचं ते सुजवळ रूपडं डोळ्यासमोर येतं त्याचबरोबर त्यांची त्यागी वृत्ती आणि संतत्वाच महान कार्यही डोळ्यासमोर येईल. अलगदपणे निघून जातं. वाटतं बाबा आपल्यात आहेत, अजूबाजुलाच आहेत आणि ते सांगतायत काम, क्रोध, लोभ सोडा मस्सर सोडा आणि मानवता ही जात समजून माणुसकी हा धर्म उमजून कामाला लागला. माणसातलं माणूस पण जागृत करण्याचं कार्य जसं तुकोबांनी केलं तसच कार्य संत भगवान बाबांनी केलं. तुकोबांचा अवडता अभंग बाबा आपल्या कीर्तनात सातत्याने निवडायचे तेंव्हाच त्या अभंगाचा मतीत अर्थ उमजायला वेळ लागत नाही. कारण त्या अभंगातच 


खेळ आहे. 


खेळ मांडीयेला वाळवंटी घाई | नाचति वैष्णव भाई रे ॥
क्रोध अभिमान गेला पाटवनि | एका एका लागती पाई रे ॥
गोपिचंद ओटू तुळशीच्या माळा | हार मिळविती गळा ॥
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव | अनुपम्य सुख सोहळा रे ॥
वर्ण अभिमान विसरलीय याती | एक एका लोटांगणी जाती ॥
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे ॥
होतो जय जयकार गर्जत अंबर | मातले हे वैष्णव वीर रे ॥


विठ्ठलाचं नामस्मरण करत तुकोबांचा जयघोष जेंव्हा होतो तेंव्हा क्रोध, अभिमान पालटून जातो आणि जो तो एकमेकांच्या पायी लागतो. तोच क्रोध अभियान संपुष्टात आणायचाय, स्वत:च मन निर्मळ ठेवायचय, चित्त स्वच्छ ठेवायचय म्हणजे पाषाणाला ही पाझर सुटेल आणि पुन्हा वैष्णवांचा नारा अंबरापर्यंत पोहचेल. माझे वैष्णव वीर जे जे कार करत तेंव्हा मातलेले असतील परंतू हा मातलेला पणा सज्जनांचा असेल, आनंदाचा असेल, उत्सवाचा असेल भगवान बाबा हे कर्तृत्व कर्माचे जेवढे जिवंत मुर्तीमंत उदाहरण होते तेवढेच उद्धारकर्ते आणि समाज मनाचे पुरस्कर्ते ही होते. बीड जिल्ह्यात बाबांचा जन्म व्हावा म्हणजे या जिल्ह्याचे परमभाग्य त्यांचा सहवास लाभावा म्हणजे स्वर्गीयानंद आणि बाबांचं गुरूवत्त्व लाभावं हा सात्विक आनंद. परंतू बाबांच्या आणि तुकोबांच्या कुठल्या विचाराशी तुम्ही आम्ही सुसंगत राहतोय का? भागवत धर्म असेल, वैष्णव धर्म असेल, वारकरी धर्म असेल या तीन नावातल्या धर्मातला माणूस धर्म आज तुम्ही आम्ही जगतोय का? हा जाहीर सवाल एवढ्यासाठीच करावासा वाटतो गेल्या दोन वर्षापासून दुर्दैवाने ज्या भगवानगडावरून माणूस धर्म शिकवला त्या संत भगवानबाबांच्या गडावर सुरक्षा व्यवस्था वाढवावी लागत आहे. बाबांनाही हे रूचत नसेल, माझे भक्त हट्टी, अट्टहासी असू शकतात असं त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल. अरे जिथं भगवान बाबांच्या समोर 


प्रति (पत्री) सरकार झुकले 


तिथं तुमच्या आमच्या सारख्या पामराचे काय? आजच्या तरूणांना प्रति सरकार किंवा पत्री सरकार याची माहिती नसेल, भगवान बाबांचा छळकर्‍यांनी जेंव्हा छळ मांडला, धुम्या गडावरून बाबांनी जावं म्हणून पराकुटीचे कटकारस्थान केले. तेंव्हा आणि तेंव्हाच या नतदृष्ट छळकर्‍यांनी बाबांवर पराकुटीचे आरोप केले. बाबा हे इंग्रजांचे आणि निजामांचे हेर आहेत. अशी चुकीची माहिती तेंव्हाचे प्रति सरकार क्रांतीसिंह क्रांतीकारी नाना पाटलांना देण्यात आली. नाना पाटील बीड जिल्ह्यात आले आणि बाबांचा समाचार घेवू म्हणाले. बाबांपर्यंत जावून पोहोचले परंतू बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्या प्रमाणे बीड जिल्ह्यात आल्यानंतर बाबांची देशभक्ती, बाबांच माणूस प्रेम आणि बाबातलं संतत्व नाना पाटलांना दिसलं. क्रांतीसिंह नाना पाटील त्याठिकाणी बाबांच्या चरणी नतमस्तक झाले मात्र छळकर्‍यांनी आपली नतदृष्ट कटकारीस्थानाची पैदाशी सोडली नाही. बाबा जेंव्हा भगवानगडावर आले तेंव्हा मनामध्ये कुठलेही कटकारस्थान न ठेवता आपलं उदाक्त कार्य त्यांनी पुढे चालू ठेवले. ज्या बाबांच्या समोर पत्री सरकार झुकले, त्या भगवानगडाच्या समोर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कुठल्याही सरकारला झुकावे लागेल. कारण तुकोबांचा जो जाज्वल इतिहास आहे तोच इतिहास २० व्या शतकात जीवंत ठेवण्याचं कार्य बाबांनी केलं. तुकोबांनी अंधश्रद्धेवर प्रखर कोरडे ओढले. जिथं आम्हाला, लिहिण्याचा, बोलण्याचा, कवित्व करण्याचा अधिकार नव्हता तिथं तुकोबांनी कधीही न भंग पावणारी अभंगगाथा लिहिली. आणि तथाकथित धर्म मार्तंडांना वेदाचा तो अर्थ आम्हासी ठावा, इतरांनी वाहवा भार माथा असे ठणकावून सांगितले. तर बाबांनीही आपल्या उपदेशात समाजाला दिशा देणारं कार्य सांगितलं. बाबा आपल्या कीर्तनात सातत्याने लोकांना समजतील असे साधे आणि सोपे उपदेश करायचे. सत्कर्म, सत्याचरण, परोपकार, न्याय, निती, प्रिती आणि कर्तव्य कर्माच पालन करण्याचं धोरण आखा म्हणून सांगायचे. कर्ज काढून अथवा प्रपंचाकडे दुर्लक्ष करून भगवंत भेटीसाठी तिर्थ यात्रेला जाणे ही सर्वात मोठी चुक असल्याचेही ते ठणकावून सांगायचे. गळ्यात तुळशीमाळ घाला, भगवंताचं चिंतन करा, परमार्थ वाढवा, मुलांना चांगले शिक्षण द्या, चोरी करू नका, उपाशी रहा पण कर्ज काढू नका, व्यसनाच्या आहारी जावू नका, लाचार बनू नका, हिंसा करू नका, जातीभेद अस्पृश्यता मानू नका असे रोख ठोक समाजाला बजावत समाज उद्धारक कर्मयोगीपणाचे दातृत्व बाबा दाखवून द्यायचे. आम्ही जरी आज बाबांना याची देही याची डोळा पाहिले नसेल परंतू आमच्या आजी-आजोबांच्या नेत्रातून आणि ह्रदयातून जेंव्हा आम्ही बाबांना पाहतो तेंव्हा भगवानगडावर आज वाद विवाद दिसून येतो तो आम्हाला तरी संतापाच्या खाईत घेवून जातो. आम्ही मोठ्या अभिमानाने म्हणतो होय आम्ही तुकोबांचे भक्त आणि भगवानबाबांचे शिष्य, भगवान बाबांना आणि त्यांच्या कार्याला जेंव्हा एकचित्ती आम्ही मस्तकात उतरण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा आजच्या 


भगवान गडावरील 


वादाबाबत कोण चुकतय आणि कोण चुकवतोय यावर भाष्य ही करावसं वाटत नाही. भगवानगड हे चेतना देणारं भक्तीस्थान आहे. स्व.गोपीनाथ मुंडेंना भगवानगडावरून दिल्ली दिसायची हे जेवढं त्रिकाल सत्य आहे तेवढंच भगवानगडावर जाणार्‍या प्रत्येक भक्तांना आणि बाबांच्या समाधीशी नतमस्तक होणार्‍या प्रत्येक निर्मळ वृत्तीला भगवानगडावरून स्वत:चं भविष्य दिसत आलं आहे. आणि हे भविष्य माणसाला माणूस म्हणून काटेरी वाटावरूनही संकटे दूर करत मार्गस्थ होण्यास मदत करत आला आहे. आज आम्ही पाहतोय गेल्या दोन वर्षापासून भगवानगडावर दसरा मेळाव्यापासून दोन गट पडले. गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्रींनी गडावर राजकीय भाषण करण्यास बंदी घातली आहे. आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेसह त्यांचे समर्थक गडावर दसरा मेळावा व्हावा म्हणून प्रयत्न करत आहेत. हा वाद एवढा विकोपाला गेलाय, गडाचे समर्थक पंकजा मुंडेंच्या समर्थकांवरल आग पाखड करताय आणि पंकजा मुंडे समर्थक गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्रींविरूद्ध आग ओकतायत. हा वाद एवढा विकोपाला गेलाय की एकमेकांना बदनाम करण्याची कुठलीही संधी आता सोडली जात नाहीय. आमचा या दोन्ही समर्थकांना जाहीर सवाल आहे. कुठय बाबांचा वैष्णव धर्म? कुठय भगवानबाबांचे विचार? कुठय भगवानबाबांची सहष्णूता? केलाय का काम, क्रोध, लोभाचा त्याग? भगवानगडावर जे वैष्णव यायचे ते वैष्णव आहेत का आता? कुठयत वारकरी? कुठयत माळकरी? कुठयत टाळकरी? किती जणांच्या कपाळी गोपीचंद आहे? किती जणांच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत? किती जण वर्ण अभिमान विसरेलत? आणि किती जण भगवानगडावर मेळा लागल्यानंतर खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचति वैष्णव भाई रे म्हणत एकमेकांच्या पाई किती लोक लागतायत? विचार करा संघर्षाची चेतना भगवानगड आहे. न्युनगंडतेत अडकलेल्या माणसाला संघर्ष करण्याची क्षमता देणारा भगवानगड आहे. आणि तुमचा आमचा मालक संत भगवानबाबा आहेत. एवढं वाचल्यावर तरी भगवान बाबांना स्मरण करा, आम्हाला जसे गौतम बुद्धात तुकोबा दिसतात तसे तुकोबात भगवानबाबा दिसतात. तुम्हाला खरच सांगा कोण दिसत?


सायं दैनिक बीड रिपोर्टर मधील आज दि. 24 सप्टेंबर रविवार अग्रलेख

Monday, 18 September 2017

सायं दैनिक बीड रिपोर्टर मधील आज दि. 17 सप्टेंबर रविवार अग्रलेख

सबसे खतरनाक होता है मुर्दा शांती से भर जाना

‘अच्छे
की लुच्चे दिन’


-गणेश सावंत-9422742810
एवढे तुम्ही षंड कसे, पायाखाली आग तरी थंड कसे या प्रशनावर तरी राग येतोय का? होय आम्हीच विचारतोय हा प्रश्‍न, स्वप्नाळू दुनियेत घेऊन जाणार्‍या सरकारला नाही तर नमो रुग्णांना. काय हालत आहे सध्या देशाची? कुठयत अच्छे दिन? संपली का महागाई? हे रोजचेच प्रश्‍न झाले. अरे इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तरी आहे काय? भाजपाच्या आमदारांना, पदाधिकार्‍यांना आणि मंत्र्यांना प्रश्‍न विचारण्याचाही लाग नाही. यालाच लोकशाही म्हणायचं का? नव्हे नव्हे भाजपाच्या भाषेत रामराज्य म्हणायचं का? कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आणि कुठं नेऊन ठेवलाय हा देश? हा प्रश्‍न सातत्याने का विचारण्यात येऊ नये? परंतु हे प्रश्‍न विचारण्याचे धाडस दाखवणार्‍याच्या मुसक्या बांधण्याचे मनसुबे जेंव्हा आखले जातात तेव्हा गेल्या काही दशकापूर्वी आपल्या लेखणीतून आग ओकणार्‍या कवि अवतार सिंह संधू उर्ङ्ग ‘पाश’ यांच्या या कवितेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पाश धगधगत्या निखार्‍यासारखं या कवितेतून बोलतात-
पुलिस की मार सबसे खतरनाक नहीं होती
गद्दारी, लोभ की मुठ्ठी सबसे खतरनाक नहीं होती
बैठे बिठाए पकड़े जाना बुरा तो है
सहमी सी चुप्पी में जखड़े जाना बुरा तो है
पर सबसे खतरनाक नहीं होता
सबसे खतरनाक होता है
मुर्दा शांति से भर जाना
ना होना तड़प का
सब कुछ सहन कर जाना
घर से निकलना काम पर
और काम से लौट कर घर आना
सबसे खतरनाक होता है
हमारे सपनों का मर जाना
सबसे खतरनाक होती है, कलाई पर
चलती घडी, जो वर्षों से स्थिर है|
सबसे खतरनाक होती है वो आंखें
जो सब कुछ देख कर भी पथराई सी है
वो आंखें जो संसार को प्यार से
निहारना भूल गयी है
वो आंखें जो भौतिक संसार के
कोहरे के धुंध में खो गयी हो
जो भूल गयी हो दिखने वाली
वस्तुओं के सामान्य
अर्थ और खो गयी हो व्यर्थ के खेल
के वापसी में
सबसे खतरनाक होता है वो चांद
जो प्रत्येक हत्या के बाद उगता है
सूने हुए आंगन में
जो चुभता भी नहीं आंखों में
गर्म मिर्च के समान
सबसे खतरनाक होता है वो गीत जो
मातमी विलाप के साथ कानों में पडता है
और दुहराता है बुरे आदमी की दस्तक
डरे हुए लोगों के दरवाजेपर
मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं होती
पुलिस की मार सबसे खतरनाक नहीं होती
गद्दारी, लोभ की मुट्ठी
सबसे खतरनाक नहीं होती
सबसे खतरनाक होता है, हमारे सपनों का मर जाना

आठवा ते भाषण, डिझेल के भाव कम हुये की नही... पेट्रोल के दाम निचे आये के नही.... अच्छे दिन आये की नही.... लोग कहते है मोदी नसिब लेके आया है.... फिर बोलो तुम्हे नसिबवाला चाहिये या बदनसिब... असं म्हणत ‘कसमे वादे-प्यार-वफा’ची बात करणार्‍या भाजपाच्या नेतृत्वाने आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अवघ्या देशाला स्वप्नाळू दुनियेत नेले. अच्छे दिनची वाट बघता-बघता तिन वर्षे निघून गेले आणि देशवासियांची अक्षरश: वाट लागली. कवि पाश आपल्या कवितांमधून सर्व काही ठिक आहे, पोलिसांची मार अवघड नाही, लूट अवघड नाही, परंतु आमच्या स्वप्नांची राखरांगोळी, सर्वसामान्यांच्या स्वप्नांची हत्या, सर्वात खतरनाक असल्याचे सांगतो आणि तिच हत्या भाजप सरकारकडून आता होताना दिसते. ज्या डिझेल-पेट्रोलच्या बढाया मोदी सरकारकडून मारल्या जात होत्या त्याच मोदी सरकारच्या कालखंडात डिझेल-पेट्रोलचे भाव एवढे काही वाढले की देशवासियांना अक्षरश: 
दिवसा लुटण्याचे धंदे 
भाजपने सुरू केल्याचे उघडपणे दिसून येऊ लागले. विरोधी बाकावर असताना सत्ताधारी कॉंग्रेसला धारेवर धरत भाजप महंगाई डायन खाए जात है...चा नारा देत रस्त्यावर उतरत होती. संसद बंद पाडत होती. विशेष म्हणजे त्या वेळेस क्रुड तेलाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. मात्र आता क्रुड तेलाच्या किमती ५० टक्क्यावर आलेल्या असताना पेट्रोल-डिझेलचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत. या पापाचे बाप भाजप सरकारच्या व्यतिरिक्त दुसरे कोणीच नाही हे उघड सत्य नाकारता येणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त झाले असताना ज्या पद्धतीने वेगवेगळे टॅक्स लावून सरकार देशातल्या सर्वसामान्य जनतेला लुटतय ते पाहून हे सरकार दरोडेखोरांचं आहे की, एखाद्या पक्षाचं आहे हे सांगणं कठीण होऊन बसलं. २०१३ सालची आकडेवारी पाहितली तर त्यावेळी क्रुड ऑईल ११० डॉलर प्रति बॅरल होते. त्यावेळेस पेट्रोल ७५ आणि डिझेल ५५ रुपये होते, मात्र गेल्या दोन महिन्यांच्या कालखंडात क्रुड तेलाचं बॅरल ५० डॉलरपेक्षा अधिक झालं नाही तरीही पेट्रोल ८३ रुपयांपर्यंत विकलं जातय. काय म्हणावं या सरकारला? हे सरकार आल्यानंतर आणि क्रुड तेलाचे भाव कमी झाल्यानंतर एक्साईज ड्युटी कमी होईल, अशी अपेक्षा होती. परंतु एक्साईज ड्युटी कमी तर सोडा ती कितीतरी पटीने वाढविण्यात आली आहे. पेट्रोलवर यापूर्वी ६ ते ७ रुपये एक्साईज ड्युटी होती, ती वाढवून या सरकारने २० ते २१ रुपये केली आहे. महाराष्ट्रात तर एक्साईज ड्युटी व्यतिरिक्त एक लिटर पेट्रोल मागे ११ रुपये दुष्काळ कर वसूल केला जातोय आणि १६ टक्के व्हॅट. केेंद्र सरकार २२ रुपये आणि राज्य सरकार २७ रुपये असा एकूण ४९ रुपयांचा टॅक्स जनतेच्या खिशातून वसूल केला जातो तेव्हा हे सरकार लोकांच्या हितासाठी आहे की लोकांच्या खिशावर आणि घरांवर दरोडे टाकण्यासाठी हेच समजायला मार्ग नाही. डिझेलच्या बाबतीतही चार ते पाच रुपयांवरची एक्साईज ड्युटी १२ ते १३ रुपयांवर या सरकारने नेली. महाराष्ट्रात २ रुपयांचा दुष्काळ कर आणि ९ रुपयांचा व्हॅट कर त्यातच पालिका, स्वच्छ भारत सेज यासह अन्य करही यात लावले जात आहेत. आम्हाला आश्‍चर्य याचं वाटतं, एखाद्याने मर्सिडिज गाडी खरेदी केली तर त्यावर ४२ टक्के कर द्यावा लागेल, परंतु गोरगरीबाने एक लिटर पेट्रोल खरेदी केलं तर त्यावर ५५ टक्के कर सध्या द्यावा लागत आहे. मग सांगा हे ‘अच्छे दिन’ आहेत? नव्हे नव्हे हे तर लुच्च्यांचे दिन आहेत! पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने महागाईचा जो भडका उडाला आहे आणि या महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य ज्या पद्धतीने होरपळून निघत आहे ती पद्धत प्रचंड जिवघेणी आहे. केंद्र सरकार एकीकडून दोर खेचतय आणि राज्य सरकार एकीकडून दोर खेचतय, मधे सर्वसामान्यांना थेट फाशी दिली जाते. सरकारला नेमकं करायचं काय? इथं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, धार्मिक दहशतवाद्याच्या बंदुका खांद्यावर लावल्या जातात, इथं सत्य बोलेल, सत्य लिहिल तर त्याच्या छाताडात गोळ्या घातल्या जातात आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि प्रभू रामांचं नाव घेत 
शिवराज्य आणि रामराज्य 
ची भाषा या सरकारकडून केली जाते ती भाषा निव्वळ लोकांना भावनिक करून मुख्य मुद्यांकडील लक्ष विचलित करण्यासाठी. राज्य सरकार ज्या पद्धतीने पेट्रोलवर ११ रुपयांचा दुष्काळ कर वसूल करत आहे आणि डिझेलवर ५ रुपयांचा दुष्काळ कर लादत आहे, विशेष म्हणजे गेल्या तीन ते चार वर्षांच्या कालखंडात एकदाही महाराष्ट्रात पूर्णत: दुष्काळ जाहीर केलेला नाही. असे असतानाही कराची रक्कम मात्र प्रचंड प्रमाणात वसूल केली जाते. कुठे जातो हा पैसा? शेतकर्‍यांना कर्जमाफी नाही, शिक्षणासाठी पैसा नाही, राज्यातील रस्त्यांची बोंब आहे, लोकांना मुलभूत गरजा दिल्या जात नाहीत, विजेची टंचाई प्रचंड प्रमाणात आहे, भारनियमन वाढलं आहे, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळा टाहो फोडून ओरडत आहे. छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांचे व्यापार सरकारच्या तुघलकी कारभारामुळे अक्षरश: आतबट्‌ट्याचे होऊ लागले आहेत. एकीकडे ‘मेकिंग इंडिया’ आणि ‘शाईनिंग इंडिया’ची भाषा केली जाते, सिंहापासून वाघापर्यंतची छप्पन इंचाची छाती दाखवून शिवराज्य आणि रामराज्याची भाषा बोलली जाते, दुसरीकडे मात्र केवळ या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला स्वप्नाळू दुनियेत घेऊन जात त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली जाते. लोकांच्या स्वप्नांची राखरांगोळी करणे ही सर्वात खतरनाक गोष्ट आहे हे सत्ताधार्‍यांनी लवकर उमजून घ्यावे.

Thursday, 7 September 2017

गायीला वाचवा, बाईला मारा




गायीला वाचवा

बाईला मारा

गणेश सावंत-9422742810

कलम को रोखणे के लिए अगर गोली का सहारा लेना पडता हो

तो सोचो की उस कलम में कितनी ताकद होगी

भाजपाने आपला खोटारडा प्रचार करण्यासाठी सोशल नेटवर्कींग मिसडियाची जी ट्रोलींग सुरू केली आहे, ती देशाला घातक आहे. एकीकडे सत्य बोलणार्‍या आणि सत्य लिहिणार्‍या लोकांना देशद्रोही ठरवलं जातयं. तर दुसरीकडे सत्य लिहिणार्‍या महिलांचीही हत्या केली जातेय. हा देश क्रांतीकार्‍यांचा, स्वाभिमान्यांचा आणि सत्यासाठी आपला देह चंदनासारखा झिजवणार्‍या त्यागी संतांचा आहे. इथं भलेही हुकूमशहा वधारले, सरसेशेवटी विरांची अहिंसाच सर्वश्रेष्ठ ठरली. कारण १६ व्या शतकात जगद्गुरू संत तुकोबांनी आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, शब्दाची शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका. सत्य वाद्यांची हाल अपेष्टा होईल, त्यांचे मुडदे पडतील परंतू त्यांच्याकडे असणारी शब्दाची श्रीमंती आणि शब्दाचे शस्त्र संपणार नाहीत म्हणूनच वरच्या हिंदीतील ओळींमध्ये बंदूकीला रोखणारी पेणाची ताकद दाखवली आहे. भलेही आज गौरी लंकेश यांची हत्या झाली असेल परंतू त्यांच्या विचारांची आणि सत्याची कास धरणार्‍या देशातील बहूतांशी सत्यवाद्यांच्या नसानसामध्ये पुन्हा एकदा सत्याची नशा भिनली आहे.सत्य बोलणे जिथं अपराध ठरतो, प्रश्‍न विचारणे जिथं देशद्रोह ठरू लागलाय, जिथं सत्य लिहिणं अपराध समजलं जावू लागलंय. त्याच लोकशाहीच्या देशात गुंडांची गर्दीश वाढतांना दिसून येत आहे. बंदूकीच्या सहाय्याने दबावतंत्राचा अवलंब केला जातोय. माहिती तंत्रज्ञानाचा आविष्कार सत्य दडपण्यासाठी आणि स्वत:ची मार्केटींग करण्यासाठी वापरला जातोय. म्हणून आणि म्हणूनच इथं सत्य बोलणार्‍यांना आणि सत्य लिहिणार्‍यांना शहिद व्हावे लागत आहे. एक नव्हे दोन नव्हे सत्य बोलणार्‍या आणि सत्य लिहिणार्‍या शेकडो पत्रकारांची आणि विचारवंतांची इथं निघृणपणे हत्या केली जातेय आणि पुन्हा आम्ही लोकशाहीचा डांगोरा पिटवत आहोत. याला लोकशाही म्हणायची काय? नरेंद्र दाभोळकरांसारखे ज्येष्ठ विचारसरणी असणारे दुरदृष्टीची इथे हत्या केली जाते. याच देशात गोविंद पानसरेंची हत्या होते, कलबुर्ग यांनाही गोळ्या घालून ठार मारले जाते आणि आता गायी वाचवणार्‍यांच्या देशात बाईलाही जिवंत मारले जाते. काय गुन्हा त्या महिला पत्रकाराचा, एवढाच ना तिनं सत्य बोलणं, सत्य लिहिणं आणि तथाकथीत धर्ममार्तंडांविरोधात भुमिका घेणं हिच जर तिची चुक असेल, हाच जर तिचा गुन्हा असेल तर लोकशाहीच्या राज्यात संविधानाप्रमाणे तिचा विरोध व्हायला हवा होता. गौरी लंकेश या ज्येष्ठ पत्रकार आणि संपादीका यांची जी काही निघृणपणे हत्या झालीय ती हत्या एका व्यक्तीची नव्हे तर ती विचाराची हत्या करण्याचा प्रयास तथाकथीत लोकांकडून झालाय. परंतू गौरी लंकेश यांचं शरीर मेलंय पण विचार मरतीलच हे सांगणे कठीण आहे. कारण हा देश समाजसुधारकांचा, क्रांतिकार्‍यांचा, सत्यासाठी आपलं उभं आयुष्य चंदनासारखं झिजवणार्‍या संतांचा आणि खर्‍याला खरं व खोट्याला खोटं म्हणणार्‍या व्यक्तींचा देश आहे. गौरी लंकेश यांची ज्या निघृणपणे हत्या झाली आणि त्या हत्येनंतर देशामध्ये जे काही सोशलनेटवर्कींग मिडियावर धर्ममार्तंडांचे ट्रोल उधळत सुटले ते ट्रोल एखाद्या वळू सारखे होते आणि त्या उधळलेल्या वळूचे बाशिंदे देशाचे पंतप्रधानही टि्‌ट्वीटर नावाच्या साईडवर फ्लोवर्स असतील तर अशा वळूंना वेसन घालणार कोण? गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर निखील दधीच नावाच्या मस्तवाल वळूने एक प्रतिक्रिया टाकली, तो म्हणतो ‘‘एक कुतीया कुत्तेकी मौत क्या मरी, सारे पिले एक सूर मे बिलबिला रहे है अब ये कौन कह रहा है किसी शिष्यने गुरुदक्षिणामें गौरी लंकेश को वही दे दिया जिसकी शिक्षा वामपंथी अपने शिष्यो को देती है?’’ याचं हे टि्‌ट्वीट आणि निखील दधीच नावाच्या या मस्तवाल वळूला देशाचे पंतप्रधानही फॉलो करत असतील तर त्या देशामध्ये नेमकं होणार तरी काय? हा प्रश्‍न साहजिकच उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. नुसता हा एक वळू नाही तर असे अनेक वळू गेल्या तीन दिवसात उधळतांना दिसून आले आहे. त्यामुळे तथाकथीत देशप्रेमी आणि धर्ममार्तंडांचा उधळलेला वळू रोखणार आहे की नाही हा प्रश्‍न कायम राहणार आहे. गौरी लंकेश यांची हत्या झाली आणि त्या हत्येनंतर टिव्हीमध्ये डिबिटसाठी बसणारे भाजपाचे असो अथवा हिंदूत्वाचे पुरस्कार करणारे प्रवक्ते थेट या हत्येला कुठं घरगूती कारणाचा तर कुठं भाऊबंदकीची किनार जोडू पाहत होते तेव्हा तर या तथाकथीत हिंदूत्वाचा पुरस्कार करणार्‍या लोकांची शरम वाटत होते. एकीकडे सेक्यूलरिझमला शिव्या शाप देणारे आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करत एक प्रकारे अशा हत्यांना अप्रत्यक्षरित्या समर्थन देणारेच दिसून येत होते. आज आम्ही लिहितोय, नक्कीच याचा तथाकथीत हिंदुवाद्यांना राग आल्याशिवाय राहणार नाही. परंतू ज्या हिंदूत्वाचा पुरस्कार हे तथाकथीत लोक करतात त्या हिंदू धर्मात हत्यासारख्या गंभीर गुन्ह्याला थारा दिसत नाही. हिंदू धर्माचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ गिता त्याग करण्याची शिकवण देते, हेही बहूदा या तथाकथीत लोकांना माहित नसावं. म्हणूनच सत्य लिहिणार्‍या विरूद्ध आणि सत्य बोलणार्‍याविरूद्ध सरळ सरळ या देशात हत्येसारखं पातक केलं जातयं. हा विचार हुकूमशाही धोरणाचा पुरस्कार करणारा नक्कीच आहे आणि हे धोरण लोकशाहीच्या देशाला परवडणारे नाही. या आधीही दोन ते तीन शतकापूर्वी अनेकांनी या ठिकाणी हुकूमशहा होण्याचं धाडस दाखवलं. दोन बोट तुपात बुडतील एवढी हुकूमशाहीही गाजवली. परंतू जेव्हा या देशाच्या स्वाभिमानी नागरीकांच्या गळ्यापर्यंत आलं तेव्हा त्याच देशाच्या लोकांची तळपायाची आग मस्तकाला गेली. संताप लाव्हारसाप्रमाणे प्रत्येकवेळा बाहेर पडला गेला, हाताच्या मुठी वळल्या गेल्या, पुन्हा इन्क्लाबचे नारे दिले गेले, निधड्या छात्यांवर गोळ्या झेलल्या गेल्या आणि हुकूमशाही वृत्तीला नेस्तनाबूत केलं, नामोहरम केलं. मग हे करण्यासाठी गांधींची अहिंसा ही विरांची अहिंसा ठरली. तिथंही नथूराम गोडसे सारख्या उधळलेल्या वळूने गांधींची गोळ्या घालून हत्या केली. छातीवर गोळ्या झेलने हे या देशाला नवे नाही, त्यामुळे दाभोळकर, पानसरे, कलबुर्ग आणि लंकेश यांची हत्या करून कोणी जर सत्याच्या विचाराची हत्या करू पाहत असेल तर ते नादान म्हणायला हरकत नाही. इथं सनसनी आणि थरकाप एकत्र एवढ्यासाठीच येतो, या अगोदर इथं काय झाले माहिती तंत्रज्ञानाच्या आविष्काराचे प्रयोग कोणी कशासाठी केले हे सांगण्यापेक्षा भाजप आणि संघ परिवार मात्र माहिती तंत्रज्ञानाच्या आविष्काराने प्रफुल्लीत झालेल्या आजच्या युगात सोशल नेटवर्कींग मिडियाचा वापर मात्र निव्वळ खोटारड्यापणासाठी करतोय, हे उघड सत्य नाकारता येणार नाही म्हणूनच स्वाती चतुर्वेेदी नावाच्या महिला पत्रकाराने गेल्या तीन वर्षांच्या कालखंडात तिच्यावर ज्या पद्धतीने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोशल नेटवर्कींग मिडियाद्वारे हल्ले चढवले, तिच्या अब्रूचे धिंदवडे काढले, तिला लज्जा वाटेल असे पब्लिश केले. तरीही सत्याची पहारेकरी असणारी स्वाती चतुर्वेदी मागे हटली नाही तर तिने आय ऍम अ ट्रोलनावाचे एक पुस्तक गेल्या काही महिन्यापूर्वी इंग्रजीमध्ये प्रकाशित केले. या पुस्तकात तिन वर्षांच्या कालखंडामध्ये भाजप सरकार ज्या दिशेने जातयं, संघ आणि भाजप सोशल नेटवर्कींग मिडियाचा ज्या पद्धतीने वापर करतयं आणि खोटारडा प्रचार करत देशाची जी दिशाभूल करतयं याची इत्यंभूत माहिती या पुस्तकामध्ये उदाहरणासह आणि पुराव्यासह दिलीयं. स्वाती चतुर्वेदी यांनी इंग्रजीमध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकाचं मराठी अनुवाद मुग्दा कर्णीक नावाच्या पत्रकारानेच केलं. ही महिलाही तथाकथीत धर्ममार्तंड्याकडून पिडीत म्हणायला हरकत नाही कारण आजच्या राज्यकर्त्यांचं धोरण आहे, इथं सत्य बोलायचं नाही, प्रश्‍न विचारायचे नाही, इथं फक्त होयबा एवढंच राहायचं. तसं देशातली बहूतांशी मिडिया सध्या तरी भाजपाच्या अधिपत्याखाली, सत्ताधार्‍यांच्या धर्मसत्तेच्या छत्राखाली आपली कोख उजवण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठं चिरा उतरला जातोय तर कुठं नथ उतरली जातेय. आम्हाला आश्‍चर्य या गोष्टीचे वाटत नाही की पत्रकारांची लाचारी आणि पत्रकारांची बातमी ही तथाकथीत सत्ताधार्‍यांच्या धर्मक्षेत्राखाली पैदा होत असेल तर ती जिथं चिरा उतरला जातो, जिथं नथ उरतली जाते अशा शय्यवृत्त तिचा जन्म होतो असे आम्ही संतप्तपणे म्हणायला मागेपुढे सरणार नाहीत. कारण आय ऍम अ ट्रोल हे पुस्तक वाचल्यानंतर स्वाती चतुर्वेदी आणि मुग्धा कर्णीक यांना सोशल नेटवर्कींग मिडियाच्या मस्तवाल उधळलेल्या वळूकडून ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्या धक्कादायक, भारतीय सुसंस्कृत म्हणून घेणार्‍यांच्या मुस्काटात हाणा म्हणणार्‍याच एक नव्हे दोन नव्हे शेकड्यावर आणि हजारावर संघ परिवार आणि भारतीय जनता पार्टीने सोशल नेटवर्कींग मिडियावर आपल्या खोटारडेपणाची मार्केटींग करण्यासाठी जे ट्रोल उभारले ते टोळधाडीपेक्षा कमी नव्हे हे यातून उघड होते. विशेष म्हणजे खोटारडा प्रचार करणारा आणि मार्केटींग करणारे या टोळधाडीला फ्लोअर्स हे देशाच्या पंतप्रधानांपासून भाजपाचे अनेक नेते आणि हिंदूत्वाचा पुरस्कार करतो म्हणून शेख्या मिरवणारे अनेक तथाकथीत हिंदूत्ववादीही त्यामध्ये आहेत. स्वाती चतुर्वेदी आणि मुग्धा कर्णीक यांच्या विरोधात जी गरळ ओकली गेली ती गरळ केवळ आणि केवळ भाजपाला त्या विरोध करतात, भाजपाच्या विचारसरणीला ते विरोध करतात म्हणून त्यांची सातत्याने अवहेलना करण्यात आली. या पुस्तकावर नक्की बंदी येईल, या पुस्तकाचं उदाहरण गौरी लंकेश यांच्या लेखात एवढ्यासाठीच घ्यायचं होतं. नुसती गोैरी लंकेश यांची हत्या झालीयं परंतू स्वाती चतुर्वेदी नावाच्या पत्रकाराला तर सोशल नेटवर्कींग मिडियातून रोज जिवंत मारलं जातयं. का? या ठिकाणी लोकशाहीचं राज्य आहे ना, इथं भारतीय संविधानाने बोलायला आणि लिहायला स्वातंत्र्य दिलंयं ना, इथं सर्वश्रेष्ठ मंदीर हे लोकशाहीचं म्हणजेच लोकसभा आहे ना, आणि या लोकशाहीच्या लोकसभेतील मंदीरातला सर्वांत मोठा ग्रंथ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे ना, मग असे असतांना तथाकथीत धर्ममार्तंडांकडून आणि त्या धर्ममार्तंडांचा पुरस्कार करणार्‍या सत्ताधारी भाजपाकडून विचाराला विरोध का केला जातोय. प्रश्‍न विचारणार्‍यांना, सत्य बोलणार्‍यांना, सत्य लिहिणार्‍यांना इथं देशद्रोही का ठरवलं जातयं. त्यांना धमक्या का दिल्या जातायत, त्यांची हत्या का केली जातयं, एक विशष्ट प्रणाली राबवण्याच्या नादात जर कोणी थेट भारताच्या स्वाभिमानाला हात घालत विशिष्ट विचार प्रणाली नसा नसात भिनवण्याचा प्रयत्न करत असेल तर हा त्यांचा प्रयत्न नुसता प्रयत्नच राहिल कारण इथं, तुकोबांच्या गाथा बुडवल्या मात्र तुकोबांचे कधीही न भंग पावणारे अभंग आजही मुखोदीत आहेत, कारण त्या अभंगांना सत्याची झालर होती तशीच झालर आजही विचारवंतांच्या विचारांना आहे हे सत्ताधार्‍यांनी विसरता कामा नये. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर देशात जे काही वातावरण निर्माण झाले आहे ते वातावरण सत्ताधार्‍यांचं मुस्काड फोडणारं आहे, म्हणूनच सत्ताधार्‍यांनी आणि सत्ताधार्‍यांच्या विचारांची खोटारडी प्रसिद्धी करणार्‍यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येवर शंका कुशंका उपस्थित करण्याचा प्रयास नव्हे तर खटाटोप सुरू केला, त्यामध्ये

कॉंग्रेस शासीत राज्यात विचारवंतांच्या हत्या का होतात?

हा एक कुठल्याही देशवासियांच्या मनामध्ये विचारवंतांच्या हत्येबाबत काहूर माजून सोडणारा प्रश्‍न नक्कीच आहे. नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली त्या वेळेस महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचं सरकार होतं. कुलबर्गी यांची हत्या झाली त्यावेळेस कर्नाटकात कॉंग्रेसचं सरकार होतं. आता गौरी लंकेश यांची हत्या झाली तेव्हाही कर्नाटकामध्ये कॉंग्रेसची सत्ता आहे. मग विचारवंतांची हत्या कॉंग्रेस शासीत राज्यातच होतात म्हणजेच कॉंग्रेस शासीत राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे तिनतेरा उडालेले आहेत यामध्ये तथ्यही असेल परंतू याचा अर्थ हा होत नाही की कॉंग्रेस शासीत राज्यात अशा घटना घडतात. सदरचे हत्याकांड हे व्यक्तीची हत्या नव्हे तर विचाराची हत्या करण्याच्या अनुषंगाने केलेला पुर्वनियोजित कट हे उघड असतांना गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कॉंग्रेस शासीत राज्यात विचारवंतांच्या हत्या का होतात हा प्रश्‍न विचारणे म्हणजे खोटारड्या प्रचाराचे ट्रोल नाचवत टोळधाड माजवणे म्हणावे लागेल. ठिक आहे कॉंग्रेस शासीत राज्यांमध्ये विचारवंतांच्या हत्या झाल्या आता भाजप शासीत राज्यात त्या विचारवंतांची हत्या करणार्‍या नराधमांच्या मुस्न्या तर बांधा. एकीकडे सर्जीकल स्ट्राईक करून आपण टिर्‍या बडवून घेतोय, कायदा व सुव्यवस्थेच्या नावाने आम्ही कठोर आहोत हे सांगितलं जातयं. राम राहिम सारख्या बलात्कार्‍याचे वाटोळे करण्यापेक्षा त्याला सुखकारक कसे होईल असंच ज्या राज्यामध्ये केलं जातं त्या राज्यात भाजप शासीत सत्ता असते हे विसरता कामा नये. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला जात पात धर्म पंथ नसतो. हे सर्वात प्रथम जाणवून घ्यायला हवे, कॉंग्रेस शासीत राज्यात विचारवंतांची हत्या का होते हे विचारण्यापेक्षा अशा राज्यात विचारवंतांची हत्या झाली असेल तर त्या हल्लेखोरांना आणि खुण्यांना जेरबंद करून फाशीच्या तख्तापर्यंत पोहचविण्याचे काम भाजपाने केलं असतं तर ते अधिक बरं वाटलं असतं. मात्र असं न करता केवळ देशातील जनतेला भुलभुलैय्या करायचं, जात पात धर्मपंथांच्या नावावर वैचारीक गोंधळ निर्माण करून सोडायचा, एकीकडे गायी वाचवा हो म्हणायचंअन् बाईला जिवंत मारायचं हे कसलं धोरण, गायीच्या पोटात ३३ कोटी देव आहेत, गाय पुजनीय आहे, तिला वाचवलंच पाहिजे. हरकत नाही, चला आम्हीही या विचाराशी सहमत पण बाईच्या पोटामध्ये ३३ कोटी देव नसले तरी ३३ कोटी देवांना पुजनारा किंवा त्या देवांना शिव्या शाप देणारा कोणी तरी जन्माला येतोय म्हणून एकीकडे गायी वाचवायच्या आणि दुसरीकडे बाई मारायच्या हे धोरण सुसंस्कृत भारताला परवडणार आहे का? हिच का भारताची संस्कृती, हेच का भारतीयांचे संस्कार, काय चालूयं नेमकं आणि कशासाठी हा खटाटोप, सत्य बोलणारी बाई, सत्य लिहिणारी बाई जेव्हा बोलते, लिहिते तेव्हा तिच्या अब्रूचे वाभाडे काढले जातायत, तिला सत्य बोलण्यापासून रोखले जाते, शेवटी ऐकलंच नाही तर तिच्यावर गोळ्या घातल्या जातयंत. अरेरे हे तर षंढपणाचं लक्षण, विरोधाला विरोध नक्की असावा, वैचारीक विरोधाला वैचारीकपणानेच विरोध केला जावा, जिथं लोकशही आहे, जिथं भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ आहे तिथं जात पात धर्मपंथाला थारा देता कामा नये. एकीकडे मिडियाच्या नावाने गरळ ओकायची आणि दुसरीकडे सत्तेच्या धर्मक्षेत्राखाली मिडियाला वाकवायचे हे जे सत्ताधारी भाजपाला धोरण जमलंय त्या धोरणावर इंडिया टिव्हीचे रविश कुमार यांचं एक वाक्य आम्हाला खास करून आठवतं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री झोपताना त्यांच्या तळपायाला विष लावून झोपले तर या देशातले ९८ टक्के पत्रकार सकाळी मरून पडलेले दिसतील, हे जळजळीत सत्य रविश कुमार यांनी व्यक्त केलं. तेव्हा भाजपाच्या ट्रोलपुढे खरंच देशाची मिडिया झुकतेय का? असं जेव्हा पाठीमागं वळून पाहिलं तेव्हा याचं उत्तर हो आल्याशिवाय राहत नाही. परंतू अशा परिस्थितीतही काही पत्रकार असे आहेत, जे सत्यासाठी, समतेसाठी लोकशाहीसाठी कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूरांसाठी पोटतिडकीने प्रश्‍न मांडतायत आणि त्या पोटतिडकीमुळेच इथं गायी वाचवल्या जातायंत मात्र बाईला जिवंत मारलं                                

सायं दै बीड रिपोर्टर मधील आजच्या बिनधास्त मध्ये वाचा