गायीला वाचवा
बाईला मारा
गणेश सावंत-9422742810
कलम को रोखणे के लिए अगर गोली का सहारा लेना पडता हो
तो सोचो की उस कलम में कितनी ताकद होगी
भाजपाने आपला खोटारडा प्रचार करण्यासाठी सोशल नेटवर्कींग मिसडियाची जी ट्रोलींग सुरू केली आहे, ती देशाला घातक आहे. एकीकडे सत्य बोलणार्या आणि सत्य लिहिणार्या लोकांना देशद्रोही ठरवलं जातयं. तर दुसरीकडे सत्य लिहिणार्या महिलांचीही हत्या केली जातेय. हा देश क्रांतीकार्यांचा, स्वाभिमान्यांचा आणि सत्यासाठी आपला देह चंदनासारखा झिजवणार्या त्यागी संतांचा आहे. इथं भलेही हुकूमशहा वधारले, सरसेशेवटी विरांची अहिंसाच सर्वश्रेष्ठ ठरली. कारण १६ व्या शतकात जगद्गुरू संत तुकोबांनी आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, शब्दाची शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका. सत्य वाद्यांची हाल अपेष्टा होईल, त्यांचे मुडदे पडतील परंतू त्यांच्याकडे असणारी शब्दाची श्रीमंती आणि शब्दाचे शस्त्र संपणार नाहीत म्हणूनच वरच्या हिंदीतील ओळींमध्ये बंदूकीला रोखणारी पेणाची ताकद दाखवली आहे. भलेही आज गौरी लंकेश यांची हत्या झाली असेल परंतू त्यांच्या विचारांची आणि सत्याची कास धरणार्या देशातील बहूतांशी सत्यवाद्यांच्या नसानसामध्ये पुन्हा एकदा सत्याची नशा भिनली आहे.सत्य बोलणे जिथं अपराध ठरतो, प्रश्न विचारणे जिथं देशद्रोह ठरू लागलाय, जिथं सत्य लिहिणं अपराध समजलं जावू लागलंय. त्याच लोकशाहीच्या देशात गुंडांची गर्दीश वाढतांना दिसून येत आहे. बंदूकीच्या सहाय्याने दबावतंत्राचा अवलंब केला जातोय. माहिती तंत्रज्ञानाचा आविष्कार सत्य दडपण्यासाठी आणि स्वत:ची मार्केटींग करण्यासाठी वापरला जातोय. म्हणून आणि म्हणूनच इथं सत्य बोलणार्यांना आणि सत्य लिहिणार्यांना शहिद व्हावे लागत आहे. एक नव्हे दोन नव्हे सत्य बोलणार्या आणि सत्य लिहिणार्या शेकडो पत्रकारांची आणि विचारवंतांची इथं निघृणपणे हत्या केली जातेय आणि पुन्हा आम्ही लोकशाहीचा डांगोरा पिटवत आहोत. याला लोकशाही म्हणायची काय? नरेंद्र दाभोळकरांसारखे ज्येष्ठ विचारसरणी असणारे दुरदृष्टीची इथे हत्या केली जाते. याच देशात गोविंद पानसरेंची हत्या होते, कलबुर्ग यांनाही गोळ्या घालून ठार मारले जाते आणि आता गायी वाचवणार्यांच्या देशात बाईलाही जिवंत मारले जाते. काय गुन्हा त्या महिला पत्रकाराचा, एवढाच ना तिनं सत्य बोलणं, सत्य लिहिणं आणि तथाकथीत धर्ममार्तंडांविरोधात भुमिका घेणं हिच जर तिची चुक असेल, हाच जर तिचा गुन्हा असेल तर लोकशाहीच्या राज्यात संविधानाप्रमाणे तिचा विरोध व्हायला हवा होता. गौरी लंकेश या ज्येष्ठ पत्रकार आणि संपादीका यांची जी काही निघृणपणे हत्या झालीय ती हत्या एका व्यक्तीची नव्हे तर ती विचाराची हत्या करण्याचा प्रयास तथाकथीत लोकांकडून झालाय. परंतू गौरी लंकेश यांचं शरीर मेलंय पण विचार मरतीलच हे सांगणे कठीण आहे. कारण हा देश समाजसुधारकांचा, क्रांतिकार्यांचा, सत्यासाठी आपलं उभं आयुष्य चंदनासारखं झिजवणार्या संतांचा आणि खर्याला खरं व खोट्याला खोटं म्हणणार्या व्यक्तींचा देश आहे. गौरी लंकेश यांची ज्या निघृणपणे हत्या झाली आणि त्या हत्येनंतर देशामध्ये जे काही सोशलनेटवर्कींग मिडियावर धर्ममार्तंडांचे ट्रोल उधळत सुटले ते ट्रोल एखाद्या वळू सारखे होते आणि त्या उधळलेल्या वळूचे बाशिंदे देशाचे पंतप्रधानही टि्ट्वीटर नावाच्या साईडवर फ्लोवर्स असतील तर अशा वळूंना वेसन घालणार कोण? गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर निखील दधीच नावाच्या मस्तवाल वळूने एक प्रतिक्रिया टाकली, तो म्हणतो ‘‘एक कुतीया कुत्तेकी मौत क्या मरी, सारे पिले एक सूर मे बिलबिला रहे है अब ये कौन कह रहा है किसी शिष्यने गुरुदक्षिणामें गौरी लंकेश को वही दे दिया जिसकी शिक्षा वामपंथी अपने शिष्यो को देती है?’’ याचं हे टि्ट्वीट आणि निखील दधीच नावाच्या या मस्तवाल वळूला देशाचे पंतप्रधानही फॉलो करत असतील तर त्या देशामध्ये नेमकं होणार तरी काय? हा प्रश्न साहजिकच उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. नुसता हा एक वळू नाही तर असे अनेक वळू गेल्या तीन दिवसात उधळतांना दिसून आले आहे. त्यामुळे तथाकथीत देशप्रेमी आणि धर्ममार्तंडांचा उधळलेला वळू रोखणार आहे की नाही हा प्रश्न कायम राहणार आहे. गौरी लंकेश यांची हत्या झाली आणि त्या हत्येनंतर टिव्हीमध्ये डिबिटसाठी बसणारे भाजपाचे असो अथवा हिंदूत्वाचे पुरस्कार करणारे प्रवक्ते थेट या हत्येला कुठं घरगूती कारणाचा तर कुठं भाऊबंदकीची किनार जोडू पाहत होते तेव्हा तर या तथाकथीत हिंदूत्वाचा पुरस्कार करणार्या लोकांची शरम वाटत होते. एकीकडे सेक्यूलरिझमला शिव्या शाप देणारे आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करत एक प्रकारे अशा हत्यांना अप्रत्यक्षरित्या समर्थन देणारेच दिसून येत होते. आज आम्ही लिहितोय, नक्कीच याचा तथाकथीत हिंदुवाद्यांना राग आल्याशिवाय राहणार नाही. परंतू ज्या हिंदूत्वाचा पुरस्कार हे तथाकथीत लोक करतात त्या हिंदू धर्मात हत्यासारख्या गंभीर गुन्ह्याला थारा दिसत नाही. हिंदू धर्माचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ गिता त्याग करण्याची शिकवण देते, हेही बहूदा या तथाकथीत लोकांना माहित नसावं. म्हणूनच सत्य लिहिणार्या विरूद्ध आणि सत्य बोलणार्याविरूद्ध सरळ सरळ या देशात हत्येसारखं पातक केलं जातयं. हा विचार हुकूमशाही धोरणाचा पुरस्कार करणारा नक्कीच आहे आणि हे धोरण लोकशाहीच्या देशाला परवडणारे नाही. या आधीही दोन ते तीन शतकापूर्वी अनेकांनी या ठिकाणी हुकूमशहा होण्याचं धाडस दाखवलं. दोन बोट तुपात बुडतील एवढी हुकूमशाहीही गाजवली. परंतू जेव्हा या देशाच्या स्वाभिमानी नागरीकांच्या गळ्यापर्यंत आलं तेव्हा त्याच देशाच्या लोकांची तळपायाची आग मस्तकाला गेली. संताप लाव्हारसाप्रमाणे प्रत्येकवेळा बाहेर पडला गेला, हाताच्या मुठी वळल्या गेल्या, पुन्हा इन्क्लाबचे नारे दिले गेले, निधड्या छात्यांवर गोळ्या झेलल्या गेल्या आणि हुकूमशाही वृत्तीला नेस्तनाबूत केलं, नामोहरम केलं. मग हे करण्यासाठी गांधींची अहिंसा ही विरांची अहिंसा ठरली. तिथंही नथूराम गोडसे सारख्या उधळलेल्या वळूने गांधींची गोळ्या घालून हत्या केली. छातीवर गोळ्या झेलने हे या देशाला नवे नाही, त्यामुळे दाभोळकर, पानसरे, कलबुर्ग आणि लंकेश यांची हत्या करून कोणी जर सत्याच्या विचाराची हत्या करू पाहत असेल तर ते नादान म्हणायला हरकत नाही. इथं सनसनी आणि थरकाप एकत्र एवढ्यासाठीच येतो, या अगोदर इथं काय झाले माहिती तंत्रज्ञानाच्या आविष्काराचे प्रयोग कोणी कशासाठी केले हे सांगण्यापेक्षा भाजप आणि संघ परिवार मात्र माहिती तंत्रज्ञानाच्या आविष्काराने प्रफुल्लीत झालेल्या आजच्या युगात सोशल नेटवर्कींग मिडियाचा वापर मात्र निव्वळ खोटारड्यापणासाठी करतोय, हे उघड सत्य नाकारता येणार नाही म्हणूनच स्वाती चतुर्वेेदी नावाच्या महिला पत्रकाराने गेल्या तीन वर्षांच्या कालखंडात तिच्यावर ज्या पद्धतीने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोशल नेटवर्कींग मिडियाद्वारे हल्ले चढवले, तिच्या अब्रूचे धिंदवडे काढले, तिला लज्जा वाटेल असे पब्लिश केले. तरीही सत्याची पहारेकरी असणारी स्वाती चतुर्वेदी मागे हटली नाही तर तिने आय ऍम अ ट्रोलनावाचे एक पुस्तक गेल्या काही महिन्यापूर्वी इंग्रजीमध्ये प्रकाशित केले. या पुस्तकात तिन वर्षांच्या कालखंडामध्ये भाजप सरकार ज्या दिशेने जातयं, संघ आणि भाजप सोशल नेटवर्कींग मिडियाचा ज्या पद्धतीने वापर करतयं आणि खोटारडा प्रचार करत देशाची जी दिशाभूल करतयं याची इत्यंभूत माहिती या पुस्तकामध्ये उदाहरणासह आणि पुराव्यासह दिलीयं. स्वाती चतुर्वेदी यांनी इंग्रजीमध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकाचं मराठी अनुवाद मुग्दा कर्णीक नावाच्या पत्रकारानेच केलं. ही महिलाही तथाकथीत धर्ममार्तंड्याकडून पिडीत म्हणायला हरकत नाही कारण आजच्या राज्यकर्त्यांचं धोरण आहे, इथं सत्य बोलायचं नाही, प्रश्न विचारायचे नाही, इथं फक्त होयबा एवढंच राहायचं. तसं देशातली बहूतांशी मिडिया सध्या तरी भाजपाच्या अधिपत्याखाली, सत्ताधार्यांच्या धर्मसत्तेच्या छत्राखाली आपली कोख उजवण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठं चिरा उतरला जातोय तर कुठं नथ उतरली जातेय. आम्हाला आश्चर्य या गोष्टीचे वाटत नाही की पत्रकारांची लाचारी आणि पत्रकारांची बातमी ही तथाकथीत सत्ताधार्यांच्या धर्मक्षेत्राखाली पैदा होत असेल तर ती जिथं चिरा उतरला जातो, जिथं नथ उरतली जाते अशा शय्यवृत्त तिचा जन्म होतो असे आम्ही संतप्तपणे म्हणायला मागेपुढे सरणार नाहीत. कारण आय ऍम अ ट्रोल हे पुस्तक वाचल्यानंतर स्वाती चतुर्वेदी आणि मुग्धा कर्णीक यांना सोशल नेटवर्कींग मिडियाच्या मस्तवाल उधळलेल्या वळूकडून ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्या धक्कादायक, भारतीय सुसंस्कृत म्हणून घेणार्यांच्या मुस्काटात हाणा म्हणणार्याच एक नव्हे दोन नव्हे शेकड्यावर आणि हजारावर संघ परिवार आणि भारतीय जनता पार्टीने सोशल नेटवर्कींग मिडियावर आपल्या खोटारडेपणाची मार्केटींग करण्यासाठी जे ट्रोल उभारले ते टोळधाडीपेक्षा कमी नव्हे हे यातून उघड होते. विशेष म्हणजे खोटारडा प्रचार करणारा आणि मार्केटींग करणारे या टोळधाडीला फ्लोअर्स हे देशाच्या पंतप्रधानांपासून भाजपाचे अनेक नेते आणि हिंदूत्वाचा पुरस्कार करतो म्हणून शेख्या मिरवणारे अनेक तथाकथीत हिंदूत्ववादीही त्यामध्ये आहेत. स्वाती चतुर्वेदी आणि मुग्धा कर्णीक यांच्या विरोधात जी गरळ ओकली गेली ती गरळ केवळ आणि केवळ भाजपाला त्या विरोध करतात, भाजपाच्या विचारसरणीला ते विरोध करतात म्हणून त्यांची सातत्याने अवहेलना करण्यात आली. या पुस्तकावर नक्की बंदी येईल, या पुस्तकाचं उदाहरण गौरी लंकेश यांच्या लेखात एवढ्यासाठीच घ्यायचं होतं. नुसती गोैरी लंकेश यांची हत्या झालीयं परंतू स्वाती चतुर्वेदी नावाच्या पत्रकाराला तर सोशल नेटवर्कींग मिडियातून रोज जिवंत मारलं जातयं. का? या ठिकाणी लोकशाहीचं राज्य आहे ना, इथं भारतीय संविधानाने बोलायला आणि लिहायला स्वातंत्र्य दिलंयं ना, इथं सर्वश्रेष्ठ मंदीर हे लोकशाहीचं म्हणजेच लोकसभा आहे ना, आणि या लोकशाहीच्या लोकसभेतील मंदीरातला सर्वांत मोठा ग्रंथ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे ना, मग असे असतांना तथाकथीत धर्ममार्तंडांकडून आणि त्या धर्ममार्तंडांचा पुरस्कार करणार्या सत्ताधारी भाजपाकडून विचाराला विरोध का केला जातोय. प्रश्न विचारणार्यांना, सत्य बोलणार्यांना, सत्य लिहिणार्यांना इथं देशद्रोही का ठरवलं जातयं. त्यांना धमक्या का दिल्या जातायत, त्यांची हत्या का केली जातयं, एक विशष्ट प्रणाली राबवण्याच्या नादात जर कोणी थेट भारताच्या स्वाभिमानाला हात घालत विशिष्ट विचार प्रणाली नसा नसात भिनवण्याचा प्रयत्न करत असेल तर हा त्यांचा प्रयत्न नुसता प्रयत्नच राहिल कारण इथं, तुकोबांच्या गाथा बुडवल्या मात्र तुकोबांचे कधीही न भंग पावणारे अभंग आजही मुखोदीत आहेत, कारण त्या अभंगांना सत्याची झालर होती तशीच झालर आजही विचारवंतांच्या विचारांना आहे हे सत्ताधार्यांनी विसरता कामा नये. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर देशात जे काही वातावरण निर्माण झाले आहे ते वातावरण सत्ताधार्यांचं मुस्काड फोडणारं आहे, म्हणूनच सत्ताधार्यांनी आणि सत्ताधार्यांच्या विचारांची खोटारडी प्रसिद्धी करणार्यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येवर शंका कुशंका उपस्थित करण्याचा प्रयास नव्हे तर खटाटोप सुरू केला, त्यामध्ये
कॉंग्रेस शासीत राज्यात विचारवंतांच्या हत्या का होतात?
हा एक कुठल्याही देशवासियांच्या मनामध्ये विचारवंतांच्या हत्येबाबत काहूर माजून सोडणारा प्रश्न नक्कीच आहे. नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली त्या वेळेस महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचं सरकार होतं. कुलबर्गी यांची हत्या झाली त्यावेळेस कर्नाटकात कॉंग्रेसचं सरकार होतं. आता गौरी लंकेश यांची हत्या झाली तेव्हाही कर्नाटकामध्ये कॉंग्रेसची सत्ता आहे. मग विचारवंतांची हत्या कॉंग्रेस शासीत राज्यातच होतात म्हणजेच कॉंग्रेस शासीत राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे तिनतेरा उडालेले आहेत यामध्ये तथ्यही असेल परंतू याचा अर्थ हा होत नाही की कॉंग्रेस शासीत राज्यात अशा घटना घडतात. सदरचे हत्याकांड हे व्यक्तीची हत्या नव्हे तर विचाराची हत्या करण्याच्या अनुषंगाने केलेला पुर्वनियोजित कट हे उघड असतांना गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कॉंग्रेस शासीत राज्यात विचारवंतांच्या हत्या का होतात हा प्रश्न विचारणे म्हणजे खोटारड्या प्रचाराचे ट्रोल नाचवत टोळधाड माजवणे म्हणावे लागेल. ठिक आहे कॉंग्रेस शासीत राज्यांमध्ये विचारवंतांच्या हत्या झाल्या आता भाजप शासीत राज्यात त्या विचारवंतांची हत्या करणार्या नराधमांच्या मुस्न्या तर बांधा. एकीकडे सर्जीकल स्ट्राईक करून आपण टिर्या बडवून घेतोय, कायदा व सुव्यवस्थेच्या नावाने आम्ही कठोर आहोत हे सांगितलं जातयं. राम राहिम सारख्या बलात्कार्याचे वाटोळे करण्यापेक्षा त्याला सुखकारक कसे होईल असंच ज्या राज्यामध्ये केलं जातं त्या राज्यात भाजप शासीत सत्ता असते हे विसरता कामा नये. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला जात पात धर्म पंथ नसतो. हे सर्वात प्रथम जाणवून घ्यायला हवे, कॉंग्रेस शासीत राज्यात विचारवंतांची हत्या का होते हे विचारण्यापेक्षा अशा राज्यात विचारवंतांची हत्या झाली असेल तर त्या हल्लेखोरांना आणि खुण्यांना जेरबंद करून फाशीच्या तख्तापर्यंत पोहचविण्याचे काम भाजपाने केलं असतं तर ते अधिक बरं वाटलं असतं. मात्र असं न करता केवळ देशातील जनतेला भुलभुलैय्या करायचं, जात पात धर्मपंथांच्या नावावर वैचारीक गोंधळ निर्माण करून सोडायचा, एकीकडे गायी वाचवा हो म्हणायचंअन् बाईला जिवंत मारायचं हे कसलं धोरण, गायीच्या पोटात ३३ कोटी देव आहेत, गाय पुजनीय आहे, तिला वाचवलंच पाहिजे. हरकत नाही, चला आम्हीही या विचाराशी सहमत पण बाईच्या पोटामध्ये ३३ कोटी देव नसले तरी ३३ कोटी देवांना पुजनारा किंवा त्या देवांना शिव्या शाप देणारा कोणी तरी जन्माला येतोय म्हणून एकीकडे गायी वाचवायच्या आणि दुसरीकडे बाई मारायच्या हे धोरण सुसंस्कृत भारताला परवडणार आहे का? हिच का भारताची संस्कृती, हेच का भारतीयांचे संस्कार, काय चालूयं नेमकं आणि कशासाठी हा खटाटोप, सत्य बोलणारी बाई, सत्य लिहिणारी बाई जेव्हा बोलते, लिहिते तेव्हा तिच्या अब्रूचे वाभाडे काढले जातायत, तिला सत्य बोलण्यापासून रोखले जाते, शेवटी ऐकलंच नाही तर तिच्यावर गोळ्या घातल्या जातयंत. अरेरे हे तर षंढपणाचं लक्षण, विरोधाला विरोध नक्की असावा, वैचारीक विरोधाला वैचारीकपणानेच विरोध केला जावा, जिथं लोकशही आहे, जिथं भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ आहे तिथं जात पात धर्मपंथाला थारा देता कामा नये. एकीकडे मिडियाच्या नावाने गरळ ओकायची आणि दुसरीकडे सत्तेच्या धर्मक्षेत्राखाली मिडियाला वाकवायचे हे जे सत्ताधारी भाजपाला धोरण जमलंय त्या धोरणावर इंडिया टिव्हीचे रविश कुमार यांचं एक वाक्य आम्हाला खास करून आठवतं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री झोपताना त्यांच्या तळपायाला विष लावून झोपले तर या देशातले ९८ टक्के पत्रकार सकाळी मरून पडलेले दिसतील, हे जळजळीत सत्य रविश कुमार यांनी व्यक्त केलं. तेव्हा भाजपाच्या ट्रोलपुढे खरंच देशाची मिडिया झुकतेय का? असं जेव्हा पाठीमागं वळून पाहिलं तेव्हा याचं उत्तर हो आल्याशिवाय राहत नाही. परंतू अशा परिस्थितीतही काही पत्रकार असे आहेत, जे सत्यासाठी, समतेसाठी लोकशाहीसाठी कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूरांसाठी पोटतिडकीने प्रश्न मांडतायत आणि त्या पोटतिडकीमुळेच इथं गायी वाचवल्या जातायंत मात्र बाईला जिवंत मारलं
सायं दै बीड रिपोर्टर मधील आजच्या बिनधास्त मध्ये वाचा
No comments:
Post a Comment