विशेष लेख:गणेश सावंत -9422742810
शेक्सपेअर म्हणायचे नावात काय आहे? आता आम्ही म्हणतोय भाजपात राम नाही. म्हणूनच हे राम म्हणण्याची वेळ आलेल्या भाजपाने आता भाजपात राम आणण्यासाठी देशाचेच नव्हे तर जगाचे आयकॉन असणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपलंस करत दलितांना मोहुन टाकण्याच्या इराद्याने राम नामाचा जप डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावातच जपायला सुरूवात केलीय. उत्तर प्रदेशातले रामभक्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तथा जगभर ओळखले जाणारे बी.आर.आंबेडकर यांच्या नावाचे नामांतरण करत आता डॉ.भिमराव रामजी आंबेडकर या नावाने उत्तर प्रदेशात बाबासाहेबांना ओळखले
जाईल असा फतवा काढला. दुसरीकडे याच राज्यात बदायु जिल्ह्यात नव्याने उभा केलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला भगवा रंग देवून भाजपाने बाबासाहेबांच्या नावासह आपल्या पक्षात राम आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु भाजपाच्या राम नावाच्या भिम जपाला देशातील दलित बांधव, आंबेडकर अनुयायी आणि सर्वसामान्य जनता भुलेल काय?
रामायण
अखंड भारतीय समाज रामायणाकडे आजही सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतो. रामायणातले प्रभु राम मर्यादा पुरूषोत्तम आहेत. त्यागाची मुर्ती आहे. त्या रामायणामध्ये त्याग करणारी सिता आहे, लढणारी सिता आहे. सुख आहे, दु:ख आहे, मित्र आहे, दगाफटका आहे, युद्ध आहे, सर्रशी आहे, पिच्छेहाट आहे, अमृत आहे, विष आहे, हनुमानासारखा स्वामी भक्त आहे या उलट रावणाचा सख्खा भाऊ बिभीषण रामाला मिळाल्याने रामाचा विजय सुकर आहे. घरभेदी लंका ढाये हे उदाहरण येथेच पहायला मिळंत. रामायणातच रामावर टिका आहे. रामायण हे संपूर्ण जस विचार स्वातंत्र्य आहे तसच प्रभु रामावर याच रामायणात वालीची रोख ठोक टिका आहेे. संतप्त शेतीची तिष्ण व तिव्र टिका आहे. लक्ष्मण इतका प्रक्षुब्ध होतो की, दशरथाला लक्ष्मण थेट कामलंपट म्हतारा म्हणतो. त्याला तात्काळ राजे पदावरून पदोचुत्त करू या असं ही रामाला सांगतो. रामायण हिंदु धर्मातील विचाराचा पाया रचणारा ग्रंथ आहे. रामायणात सुखं दु:खाचे प्रसंग आहेत. तसे रामायणात बुद्धीभेद नाहीये. इथं केवळ आईच्या सांगण्यावरून सत्तेला लाथ मारून वनवासाला जाणारा मुलगा पहावयास मिळतो. इथेच शबरीचे उष्टे बोरं खाणारा उदारमतवादी राजा परंतु वनवासी असलेला युवराज आम्हाला भेटतो. परंतू खरच त्या रामायणातून आणि त्या प्रभु रामातून त्यागाची शिकवण आज कोणी घेतय का? जर त्यागाची शिकवण घेत असतील तर मग जो राम आईच्या शब्दाखातर सत्तेला लाथ मारून राजगादीला लाथ मारून चौदा वर्ष वनवासाला जावू शकतो मग आज वनवासी भगवे वस्त्र परिधान करून सत्तेची अभिलाषा का बाळगतात? मुख्यमंत्री का होतात? रामभक्त आहात मग कधी शबरीचे उष्टी बोरं खाण्याचा प्रयत्न केलाय का? ते सर्व सांगण्याचा खटाटोप एवढ्यासाठीच आज देशभरात जय श्रीरामचे नारे लगावले जातायत आणि रामाच्या नावावर लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवल्या लोकशाहीच्या राज्यात हिंदु राष्ट्राची निर्मिती करण्याचा अट्टाहास धरला जातोय. अठरा पगड जाती ज्या ठिकाणी गुन्यागोविंदाने राहत असतांना आपआपल्या संस्कार आणि संस्कृतींना जोपासत असतांना देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची घटना असतांना राम राज्याच्या नावाखाली
भगव्या राज्याचे धोरण
का आणि कशामुळे आखले जाते. २०१४ च्या निवडणूकीमध्ये भाजपाला देशात मोठे यश मिळाले. संघ परिवाराला पितृत्व माणणार्या भाजपाची विचारश्रेणी काल आणि आजही हिंदुवादी आहे. नक्कीच स्वत:च्या धर्माचा प्रत्येकाने गर्व करायला हवा, परंतू दुसर्याच्या धर्माचा अनादर करण्याचा अधिकार कोणालाच नाही. परंतू भारतीय जनता पार्टी आणि त्या पक्षातील मंत्री, खासदार, नेते हिंदुत्वाच्या नावाखाली जय श्रीरामचा गजर करत दुसर्याच्या धर्माचा अनादर करत आहेत हे त्रिवार सत्य. देशभरात सुरू असलेल्या भगव्या राजनितीतून दिसून येते. अच्छे दिनची गुहार लावत सत्तेत आलेल्या भाजपाला गेल्या साडेतीन वर्षाच्या कालखंडात देशामध्ये कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळ्यांसह सर्वसामान्य दीनदलित, पतदलितांना न्याय देता आला नाही. काल शेटजी-भटजीचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा आज देशात राज्य करतोय. देशातल्या किमान २२ राज्यामध्ये सत्तेत आहे. अशास्थितीतही जनता समाधानी नसल्याने २०१९ च्या निवडणूकीत भगव्या धोरणाचे पानिपत होईल हे उमजून आल्याने भाजपाने आता आयकॉन शोधण्याची सुरूवात केली आहे. भाजपाकडे आणि संघ परिवाराकडे देशासाठी बलिदान देणार्यांची संख्या नगन्य असल्याने आता दुसर्याचे आयकॉन आपले कसे होतील यासाठी भाजपाकडून सरळ-सरळ प्रयत्नांची परिकष्टा केली जाते. त्या प्रयत्नातूनच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबावर हिंदु धर्माचा कसा प्रभाव होता आणि त्या प्रभावातूनच बाबासाहेबांच्या वडिलांचं नाव रामजी कसं ठेवण्यात आलं हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात असल्याचे उत्तर प्रदेशातील रामभक्त मुख्यमंत्री योगीनाथ यांनी दाखवून दिले आणि बाबासाहेबांच्या नावापुढे रामजी आंबेडकर असं लिहिण्यास सुरूवात केली. हा खटाटोप बाबासाहेबांच्या प्रेमापोटी म्हणता येईल का? आणि तसं म्हणता येत असेल तर उत्तर प्रदेश सरकारने बाबासाहेबांचे नामांतर करण्याची वेळ आताच का ठेवली? असे एक ना अनेक प्रश्न यातून उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. भगव्या धोरणाने बाधित झालेल्या भाजपाने आपल्या भगवीकरणाची चाचपणी सुरू ठेवली आणि ती चाचपणी उत्तर प्रदेशात
राम नावाचा जयघोष
करत देशाची प्रतिक्रिया काय येते याकडे लक्ष केंद्रीत केले. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाचे खा.राघव लखनपाल यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढली. या जयंतीमध्ये उत्तर प्रदेश में रहेना होंगा तो योगी..योगी कहना होंगा, जय श्रीराम अशा घोषणा आंबेडकर जयंतीत दिल्या आणि इथुनच उत्तर प्रदेशातला दलित भाजपाच्या काव्याला ओळखत राहिला. बघता-बघता भाजपाचा हा कावा अवघ्या देशाला कळून चुकला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या मुळ प्रतवर डॉ.भिमराव रामजी आंबेडकर असं नाव लिहलं आहे. त्या नावाचा आधार घेत राम नाईक यांच्या सुचनेवरून उत्तर प्रदेशात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावा पुुढं त्यांच्या वडिलांचे नाव रामजी लिहिण्याचा फतवा काढला आणि तो फतवा राज्यात अंमलातही आणला. खरं पाहिलं तर तात्वीकदृष्ट्या हे जरी योग्य वाटत असलं, महाराष्ट्रसह देशातल्या काही राज्यात स्वत:च्या नावापुढे पित्याचं नाव लिहणं हे अभिमानास्पद वाटलं जातं. परंतू तसं लिहिलं जावं ही सक्ती नाही. परंतू निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजप ज्या वृत्तीने वागतयं ती वृत्ती जातं, पात, धर्म, पंताला बाधित करणारी नव्हे काय? एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावा पुढं रामजी लिहित आम्ही रामभक्त आणि अखंड दलित समाजाचे उद्धारकर्ते बाबासाहेबही रामभक्त हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपाच्या या वृत्तीत दिसून येतो. म्हणून आणि म्हणूनच भाजपाच्या या वृत्तीला देशभरातून विरोध होतो. असं होत असतांना उत्तर प्रदेश सरकार मात्र आपल्या भगवीकरणाच्या आणि जात्यांध भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही. डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या नावाचे नामांतरण केल्यानंतर आता बाबासाहेबांच्या पुतळ्याचा कलर बदलत
बाबासाहेबांचा कोट भगवा
करण्याचा घाट उत्तर प्रदेश सरकारने घेतला. देशामध्ये दलित असुरक्षित असल्याच्या अनेक घटना उघड होत आहेत. राज्या-राज्यामध्ये जात, पात, धर्म, पंतावरील दंगली होत आहेत. देशातला दलित रस्त्यावर उतरला आहे. आंबेडकर जयंतीतल्या जय श्रीरामाच्या जयघोषाने भाजपाची वृत्ती समोर आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावापुढे रामजी नाव लिहिण्यामागचा कुटील हेतू जनतेसमोर आला आहे. त्या पाठोपाठ आता उत्तर प्रदेशातच बदायु जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे भगवीकरण करण्यात आले. निळ्या कोटात राहिलेले बाबासाहेबांचे पुतळे आता उत्तर प्रदेशातल्या बदायु जिल्ह्यामध्ये भगव्या कोटामध्ये दिसून येवू लागले. या घटनेनेही उत्तर प्रदेशातला आणि देशातला दलित नक्कीच चवताळला. परंतु भाजपाचा जो हेतू आहे तो दलितांनी ओळखून घ्यायला हवा. जसा दलितांनी हेतू ओळखावा तसा तो हिंदूंनी ओळखायला हवा. जसा हिंदुंनी ओळखावा तसा तो मुस्लिमांसह इतर अठरापगड जातींनी ओळखायला हवा. जात, पात, धर्म, पंताच्या नावावर मताची उत्पत्ती करण्याचा प्रयास भारतीय जनता पार्टीचा यातून लक्षात येतो. परंतू ही उत्पत्ती दंगल सदृश्य होत असेल, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करत असेल, धर्मा-धर्मामध्ये भावना बिघडवत असेल तर बाबासाहेबांच्या विचारावर चालणार्या या देशाने सत्ताधार्यांचा हा हेतू लक्षात घ्यावा. बाबासाहेबांवर किंवा त्यांच्या कुटुंबियावर हिंदु धर्माचा पगडा होता.
ते रामभक्त होते तर मग बाबासाहेबांना
काळाराम मंदिरात प्रवेश का नाही?
हा सवाल आज आम्ही करतोय. तेंव्हा बाबासाहेब आंबेडकर तथाकथित मनुवाद्यांसह धर्म मार्तंडांना करत होते. काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एक दिवस नव्हे, दोन दिवस नव्हे, महिना नव्हे दोन महिने नव्हे पाच ते सहा वर्षे सत्याग्रह करावा लागला. मंदिरात प्रवेश करण्यासाठी अरे जगाला दिशा देणार्या व्यक्तीला झगडावे लागत असेल आणि त्या काळचे तथाकथित धर्म मार्तंड बाबासाहेबांच्या पित्याचे नाव रामजी असतांना त्यांना प्रवेश देत नसतील तर आज त्याच रामजी नावाचा फतवा काढून या देशातल्या जनतेला आंबेडकरवादी अनुयायांना भाजप फसवू शकत नाही हेही तेवढच खरं. जात, पात, धर्म, पंत या विषयाला महत्त्व देत जागतिक महासत्ताकडे निघणार्या या देशातल्या जनतेचे मुलभुत प्रश्न दुर्लक्षित करणारे सरकार देशाला महासत्तेकडे घेवून जाईल काय? माहिती तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या अविष्काराने प्रफुल्लीत झालेल्या आजच्या युगात धर्मा-धर्मात, जाती-जातीत वाद निर्माण करणे हा जर हेतू सत्ताधार्यांचा असेल तर तो हेतू इंग्रजांचा ही होता. इंग्रज त्या हेतूमध्ये यशस्वी झाले आणि या देशामध्ये ते २०० वर्षे राज्य करत राहिले. धर्माबाबत, जातीबाबत भूमिका काय असावी या पेक्षा राज्यकर्त्यांची भूमिका सर्वसामान्य, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळ्यांबाबत कशी असेल याकडे लक्ष देणे राज्यकर्त्यांचं आद्यकर्तव्य आहे. भलेही एखाद्या वेळेस शत्रुच्या डोळ्या आश्रू आणता आले नाही तरी चालेल परंतू रयतेच्या डोळ्यात आलेल्या आश्रूने कुठल्या राज्यकर्त्याचा पराभव झाला तर तो पराभव त्या राज्यकर्त्याचा नपुुंसक धर्म दाखवणारा मानला जाईल. आणि आज तेच होयत. धर्माची व्याख्या, जातीची व्याख्या, सत्तेची व्याख्या होतेय.
बाबासाहेब धर्माबद्दल बोलतात
ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे तो धर्म नसून शिरजोरीची सजावट आहे. ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो तो धर्म नसून रोग आहे. ज्या धर्मात अमंगल पशुचा स्पर्श झाला असता चालतो पण माणसाचा स्पर्श चालत नाही. तो धर्म नसून वेडगळपणा आहे. जो धर्म एक वर्गाने विद्या शिकू नये, घनसंचय करू नये, शस्त्रधारणा करू नये असे सांगतो तो धर्म नसून माणसाचे जीवनाचे विडंबन आहे. जो धर्म अशिक्षितांना अशिक्षत रहा, निर्धनांना निर्धन रहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून शिक्षा आहे. ही साधी व्याख्या बाबासाहेबांची आहे. या पुढं जात बुद्धीभेद करणार्या लोकांपेक्षा असे बुद्धीभेद करणार्यांच्या काव्यात अडकणार्यांबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘तुमची तुमच्या ध्येयाच्या पावित्र्यावर अठळ निष्ठा असली पाहिजे, ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांची सेवा करण्यासाठी कर्तव्य पुरते हेतूने जे लोक आत्मप्रेरित होतात ते धन्य होत तुमचे ध्येय उच्च उदाक्त आणि महान आहे. आणि तुमचे मिशन तेजस्वी आणि गौरवशाली आहे. जे आपला वेळ आणि बुद्धी व आपले सर्वस्व गुलामीच्या निदर्शनासाठी पणाला लावतात ते धन्य होत. जे गुलामगिरीत जखडलेल्यांना स्वतंत्र करण्यासाठी महान संकटे ह्रदविदारक मानहानी, वादळे आणि धोक्याची परवा न करता जोपर्यंत पददलित जनतेला आपले मानव अधिकार प्राप्त होत नाहीत तोपर्यंत संघर्ष करीत राहतात त्यांचा विजय असो. आता आम्हाला प्रश्न एवढाच विचारायचा आहे. धर्माच्या व्याख्येबाबत बाबासाहेबांची भूमिका आणि पत दलितेच्या सेवेबाबत डॉ.भिमराव आंबेडकरांची भूमिका भाजप खरच साकारतय? तर या ठिकाणी नाही हे उत्तर येईल. केवळ २०१९ च्या मतांसाठी राम नावाचा भिम जप करत कधी जनतेवर हे राम म्हणण्याची वेळ तर कधी स्वत:वर हे राम म्हणण्याची वेळ भाजप आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच डॉ.बी.आर.आंबेडकरांच्या नावाचे नामांतर व त्यांच्या कोटाचे भगवीकरण हे देशवासियांना पचेलच हे सांगणे कठीण. ===============================
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अग्रलेख
इ.स.१९२७ साली १२ ऑगस्ट रोजी बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतमध्ये लिहिलेला हा अग्रलेख आजच्या राजकीय सामाजिक घडामोडीवर तंतोतंत लागू होत आहे. सरकारची भूमिका आणि जनतेची ससेहेलपाट कशी होते आणि त्यावर सडेतोड बाबासाहेबांचं भाष्य काय होतं ते इथं वाचा.
शुक्रवार ता.१२ ऑगस्ट १९२७
ढोंगीपणा,माथेफिरूपणा व गैरमुत्सद्दीपणा
हिंदु समाजातील कित्येक लोकांनी संघटन व शुद्धी या चळवळी सुरू केल्या असून या चळवळीमध्ये शिकलेल्या लोकांचाच भरणा आहे. साधारण बहुजन समाज या चळवळीपासून साधारणत: अलीप्त आहे असे म्हणावयास हरकत नाही. त्याच प्रमाणे समाजसुधारकांचेही या चळवळीमध्ये फारसे अंग नाही. एकंदरित अर्धवट विचाराच्या लोकांचेच या चळवळीमध्ये प्राबल्य आहे. जुन्या मताच्या लोकांना शुद्धीची कल्पना पकरी वाटते आणि समाज सुधारणेकडे ज्यांचा ओढा आह त्यांना समाजसुधारणेच्या द्वारेच खरे संघटन हिंदूसमाजामध्ये उत्पन्न होईल आणि शुद्धीचे कारण फारसे न उरतां हिंदूसमाजाचे संख्याबल कायम राहून वाढेल असे वाटते, त्यामुळे ते दोन्ही पक्ष या चळवळीपासून अलग राहिले आहे. शुद्धिसंघटनाच्या चळवळीमध्ये अर्धवट लोकांची भरताड झाल्यामुळे त्या चळवळीचा व्हावा तसा उपयोग होत नाही. इतकेच नव्हे तर ढोंगीपणा व माथेफिरूपणा यांना उत येवू लागला आहे. सध्या हिंदूमुसलमानांमध्ये भयंतर तेढ उत्पन्न झाले आहे. तिचा फायदा काही लबाड लोक घेत आहेत. आधीच धार्मिक कलह म्हणजे मुर्खपणाचा बाजार जेंव्हा खर्या धर्माची पायमल्ली होते तेंव्हाच धार्मिक कलह माजतात. जे हिंदू व जे मुसलमान सध्या धर्माच्या नावावर एकमेकांशी भांडत आहेत. त्यांच्यामध्ये खर्या धार्मिक वृत्तीचे माणसे चार दोन तरी सापडतील किंवा नाही याची आम्हाला शंका आहे. धर्माला पदोपदी लाथाळणारे लोकच धर्माचा आवेश दाखवून दुसर्या धर्माच्या लोकांचे प्राण घेवू पाहतात. धर्माने माणसाला देवदूत बनवले पाहिजे. परंतू तसे न होता धार्मिक कलाहामुळे धर्माच्या युगाने माणसाचे माणूसपण जावून त्याला पशुपणा येत आहे. अशास्थितीत अशिक्षित गुंड मारामार्या करितात. एकमेकांचे टाळे सडकतात व खून करतात आणि सुशिक्षीत गुंड अल्पायासाने आपआपल्या समाजात लोकप्रिय होण्याची परवनी साधून घेतात. अशिक्षीत गुंडांच्या दुष्ट कृत्यांची खरी जबाबदारी खरे म्हटले असता सुशिक्षीत गुुंडांवरच आहे. कारण त्यांच्या चितावणीमुळेच अशिक्षीत लोक अत्याचार करावयाला प्रवृत्त होतात. सुशिक्षीत गुंड जसे हिंदुत आहेत तसे मुसलमानात आहेत. पंडितात आहे तसे मौलानामध्ये आहेत. खरे पाहिल्यास धर्माचा सुक्ष्म विचार कोणीच करत नाही, धर्माच्या आद्यतत्वांची कोणालाच परवा नाही. दुराग्रह व दुरभिमान यांचेच उभय समाजांमध्ये प्राबल्य झालेले आहे. ग्रंथप्रामाण्य, अंधश्रद्धा व अज्ञ समजुती, यांनी प्रत्येक धर्माला ग्रासून टाकलेले असल्यामुळे धर्म व सारासार विचार यांच्यात घटस्फोट झालेला आहे
शेक्सपेअर म्हणायचे नावात काय आहे? आता आम्ही म्हणतोय भाजपात राम नाही. म्हणूनच हे राम म्हणण्याची वेळ आलेल्या भाजपाने आता भाजपात राम आणण्यासाठी देशाचेच नव्हे तर जगाचे आयकॉन असणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपलंस करत दलितांना मोहुन टाकण्याच्या इराद्याने राम नामाचा जप डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावातच जपायला सुरूवात केलीय. उत्तर प्रदेशातले रामभक्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तथा जगभर ओळखले जाणारे बी.आर.आंबेडकर यांच्या नावाचे नामांतरण करत आता डॉ.भिमराव रामजी आंबेडकर या नावाने उत्तर प्रदेशात बाबासाहेबांना ओळखले
जाईल असा फतवा काढला. दुसरीकडे याच राज्यात बदायु जिल्ह्यात नव्याने उभा केलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला भगवा रंग देवून भाजपाने बाबासाहेबांच्या नावासह आपल्या पक्षात राम आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु भाजपाच्या राम नावाच्या भिम जपाला देशातील दलित बांधव, आंबेडकर अनुयायी आणि सर्वसामान्य जनता भुलेल काय?
रामायण
अखंड भारतीय समाज रामायणाकडे आजही सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतो. रामायणातले प्रभु राम मर्यादा पुरूषोत्तम आहेत. त्यागाची मुर्ती आहे. त्या रामायणामध्ये त्याग करणारी सिता आहे, लढणारी सिता आहे. सुख आहे, दु:ख आहे, मित्र आहे, दगाफटका आहे, युद्ध आहे, सर्रशी आहे, पिच्छेहाट आहे, अमृत आहे, विष आहे, हनुमानासारखा स्वामी भक्त आहे या उलट रावणाचा सख्खा भाऊ बिभीषण रामाला मिळाल्याने रामाचा विजय सुकर आहे. घरभेदी लंका ढाये हे उदाहरण येथेच पहायला मिळंत. रामायणातच रामावर टिका आहे. रामायण हे संपूर्ण जस विचार स्वातंत्र्य आहे तसच प्रभु रामावर याच रामायणात वालीची रोख ठोक टिका आहेे. संतप्त शेतीची तिष्ण व तिव्र टिका आहे. लक्ष्मण इतका प्रक्षुब्ध होतो की, दशरथाला लक्ष्मण थेट कामलंपट म्हतारा म्हणतो. त्याला तात्काळ राजे पदावरून पदोचुत्त करू या असं ही रामाला सांगतो. रामायण हिंदु धर्मातील विचाराचा पाया रचणारा ग्रंथ आहे. रामायणात सुखं दु:खाचे प्रसंग आहेत. तसे रामायणात बुद्धीभेद नाहीये. इथं केवळ आईच्या सांगण्यावरून सत्तेला लाथ मारून वनवासाला जाणारा मुलगा पहावयास मिळतो. इथेच शबरीचे उष्टे बोरं खाणारा उदारमतवादी राजा परंतु वनवासी असलेला युवराज आम्हाला भेटतो. परंतू खरच त्या रामायणातून आणि त्या प्रभु रामातून त्यागाची शिकवण आज कोणी घेतय का? जर त्यागाची शिकवण घेत असतील तर मग जो राम आईच्या शब्दाखातर सत्तेला लाथ मारून राजगादीला लाथ मारून चौदा वर्ष वनवासाला जावू शकतो मग आज वनवासी भगवे वस्त्र परिधान करून सत्तेची अभिलाषा का बाळगतात? मुख्यमंत्री का होतात? रामभक्त आहात मग कधी शबरीचे उष्टी बोरं खाण्याचा प्रयत्न केलाय का? ते सर्व सांगण्याचा खटाटोप एवढ्यासाठीच आज देशभरात जय श्रीरामचे नारे लगावले जातायत आणि रामाच्या नावावर लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवल्या लोकशाहीच्या राज्यात हिंदु राष्ट्राची निर्मिती करण्याचा अट्टाहास धरला जातोय. अठरा पगड जाती ज्या ठिकाणी गुन्यागोविंदाने राहत असतांना आपआपल्या संस्कार आणि संस्कृतींना जोपासत असतांना देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची घटना असतांना राम राज्याच्या नावाखाली
भगव्या राज्याचे धोरण
का आणि कशामुळे आखले जाते. २०१४ च्या निवडणूकीमध्ये भाजपाला देशात मोठे यश मिळाले. संघ परिवाराला पितृत्व माणणार्या भाजपाची विचारश्रेणी काल आणि आजही हिंदुवादी आहे. नक्कीच स्वत:च्या धर्माचा प्रत्येकाने गर्व करायला हवा, परंतू दुसर्याच्या धर्माचा अनादर करण्याचा अधिकार कोणालाच नाही. परंतू भारतीय जनता पार्टी आणि त्या पक्षातील मंत्री, खासदार, नेते हिंदुत्वाच्या नावाखाली जय श्रीरामचा गजर करत दुसर्याच्या धर्माचा अनादर करत आहेत हे त्रिवार सत्य. देशभरात सुरू असलेल्या भगव्या राजनितीतून दिसून येते. अच्छे दिनची गुहार लावत सत्तेत आलेल्या भाजपाला गेल्या साडेतीन वर्षाच्या कालखंडात देशामध्ये कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळ्यांसह सर्वसामान्य दीनदलित, पतदलितांना न्याय देता आला नाही. काल शेटजी-भटजीचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा आज देशात राज्य करतोय. देशातल्या किमान २२ राज्यामध्ये सत्तेत आहे. अशास्थितीतही जनता समाधानी नसल्याने २०१९ च्या निवडणूकीत भगव्या धोरणाचे पानिपत होईल हे उमजून आल्याने भाजपाने आता आयकॉन शोधण्याची सुरूवात केली आहे. भाजपाकडे आणि संघ परिवाराकडे देशासाठी बलिदान देणार्यांची संख्या नगन्य असल्याने आता दुसर्याचे आयकॉन आपले कसे होतील यासाठी भाजपाकडून सरळ-सरळ प्रयत्नांची परिकष्टा केली जाते. त्या प्रयत्नातूनच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबावर हिंदु धर्माचा कसा प्रभाव होता आणि त्या प्रभावातूनच बाबासाहेबांच्या वडिलांचं नाव रामजी कसं ठेवण्यात आलं हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात असल्याचे उत्तर प्रदेशातील रामभक्त मुख्यमंत्री योगीनाथ यांनी दाखवून दिले आणि बाबासाहेबांच्या नावापुढे रामजी आंबेडकर असं लिहिण्यास सुरूवात केली. हा खटाटोप बाबासाहेबांच्या प्रेमापोटी म्हणता येईल का? आणि तसं म्हणता येत असेल तर उत्तर प्रदेश सरकारने बाबासाहेबांचे नामांतर करण्याची वेळ आताच का ठेवली? असे एक ना अनेक प्रश्न यातून उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. भगव्या धोरणाने बाधित झालेल्या भाजपाने आपल्या भगवीकरणाची चाचपणी सुरू ठेवली आणि ती चाचपणी उत्तर प्रदेशात
राम नावाचा जयघोष
करत देशाची प्रतिक्रिया काय येते याकडे लक्ष केंद्रीत केले. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाचे खा.राघव लखनपाल यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढली. या जयंतीमध्ये उत्तर प्रदेश में रहेना होंगा तो योगी..योगी कहना होंगा, जय श्रीराम अशा घोषणा आंबेडकर जयंतीत दिल्या आणि इथुनच उत्तर प्रदेशातला दलित भाजपाच्या काव्याला ओळखत राहिला. बघता-बघता भाजपाचा हा कावा अवघ्या देशाला कळून चुकला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या मुळ प्रतवर डॉ.भिमराव रामजी आंबेडकर असं नाव लिहलं आहे. त्या नावाचा आधार घेत राम नाईक यांच्या सुचनेवरून उत्तर प्रदेशात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावा पुुढं त्यांच्या वडिलांचे नाव रामजी लिहिण्याचा फतवा काढला आणि तो फतवा राज्यात अंमलातही आणला. खरं पाहिलं तर तात्वीकदृष्ट्या हे जरी योग्य वाटत असलं, महाराष्ट्रसह देशातल्या काही राज्यात स्वत:च्या नावापुढे पित्याचं नाव लिहणं हे अभिमानास्पद वाटलं जातं. परंतू तसं लिहिलं जावं ही सक्ती नाही. परंतू निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजप ज्या वृत्तीने वागतयं ती वृत्ती जातं, पात, धर्म, पंताला बाधित करणारी नव्हे काय? एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावा पुढं रामजी लिहित आम्ही रामभक्त आणि अखंड दलित समाजाचे उद्धारकर्ते बाबासाहेबही रामभक्त हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपाच्या या वृत्तीत दिसून येतो. म्हणून आणि म्हणूनच भाजपाच्या या वृत्तीला देशभरातून विरोध होतो. असं होत असतांना उत्तर प्रदेश सरकार मात्र आपल्या भगवीकरणाच्या आणि जात्यांध भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही. डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या नावाचे नामांतरण केल्यानंतर आता बाबासाहेबांच्या पुतळ्याचा कलर बदलत
बाबासाहेबांचा कोट भगवा
करण्याचा घाट उत्तर प्रदेश सरकारने घेतला. देशामध्ये दलित असुरक्षित असल्याच्या अनेक घटना उघड होत आहेत. राज्या-राज्यामध्ये जात, पात, धर्म, पंतावरील दंगली होत आहेत. देशातला दलित रस्त्यावर उतरला आहे. आंबेडकर जयंतीतल्या जय श्रीरामाच्या जयघोषाने भाजपाची वृत्ती समोर आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावापुढे रामजी नाव लिहिण्यामागचा कुटील हेतू जनतेसमोर आला आहे. त्या पाठोपाठ आता उत्तर प्रदेशातच बदायु जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे भगवीकरण करण्यात आले. निळ्या कोटात राहिलेले बाबासाहेबांचे पुतळे आता उत्तर प्रदेशातल्या बदायु जिल्ह्यामध्ये भगव्या कोटामध्ये दिसून येवू लागले. या घटनेनेही उत्तर प्रदेशातला आणि देशातला दलित नक्कीच चवताळला. परंतु भाजपाचा जो हेतू आहे तो दलितांनी ओळखून घ्यायला हवा. जसा दलितांनी हेतू ओळखावा तसा तो हिंदूंनी ओळखायला हवा. जसा हिंदुंनी ओळखावा तसा तो मुस्लिमांसह इतर अठरापगड जातींनी ओळखायला हवा. जात, पात, धर्म, पंताच्या नावावर मताची उत्पत्ती करण्याचा प्रयास भारतीय जनता पार्टीचा यातून लक्षात येतो. परंतू ही उत्पत्ती दंगल सदृश्य होत असेल, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करत असेल, धर्मा-धर्मामध्ये भावना बिघडवत असेल तर बाबासाहेबांच्या विचारावर चालणार्या या देशाने सत्ताधार्यांचा हा हेतू लक्षात घ्यावा. बाबासाहेबांवर किंवा त्यांच्या कुटुंबियावर हिंदु धर्माचा पगडा होता.
ते रामभक्त होते तर मग बाबासाहेबांना
काळाराम मंदिरात प्रवेश का नाही?
हा सवाल आज आम्ही करतोय. तेंव्हा बाबासाहेब आंबेडकर तथाकथित मनुवाद्यांसह धर्म मार्तंडांना करत होते. काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एक दिवस नव्हे, दोन दिवस नव्हे, महिना नव्हे दोन महिने नव्हे पाच ते सहा वर्षे सत्याग्रह करावा लागला. मंदिरात प्रवेश करण्यासाठी अरे जगाला दिशा देणार्या व्यक्तीला झगडावे लागत असेल आणि त्या काळचे तथाकथित धर्म मार्तंड बाबासाहेबांच्या पित्याचे नाव रामजी असतांना त्यांना प्रवेश देत नसतील तर आज त्याच रामजी नावाचा फतवा काढून या देशातल्या जनतेला आंबेडकरवादी अनुयायांना भाजप फसवू शकत नाही हेही तेवढच खरं. जात, पात, धर्म, पंत या विषयाला महत्त्व देत जागतिक महासत्ताकडे निघणार्या या देशातल्या जनतेचे मुलभुत प्रश्न दुर्लक्षित करणारे सरकार देशाला महासत्तेकडे घेवून जाईल काय? माहिती तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या अविष्काराने प्रफुल्लीत झालेल्या आजच्या युगात धर्मा-धर्मात, जाती-जातीत वाद निर्माण करणे हा जर हेतू सत्ताधार्यांचा असेल तर तो हेतू इंग्रजांचा ही होता. इंग्रज त्या हेतूमध्ये यशस्वी झाले आणि या देशामध्ये ते २०० वर्षे राज्य करत राहिले. धर्माबाबत, जातीबाबत भूमिका काय असावी या पेक्षा राज्यकर्त्यांची भूमिका सर्वसामान्य, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळ्यांबाबत कशी असेल याकडे लक्ष देणे राज्यकर्त्यांचं आद्यकर्तव्य आहे. भलेही एखाद्या वेळेस शत्रुच्या डोळ्या आश्रू आणता आले नाही तरी चालेल परंतू रयतेच्या डोळ्यात आलेल्या आश्रूने कुठल्या राज्यकर्त्याचा पराभव झाला तर तो पराभव त्या राज्यकर्त्याचा नपुुंसक धर्म दाखवणारा मानला जाईल. आणि आज तेच होयत. धर्माची व्याख्या, जातीची व्याख्या, सत्तेची व्याख्या होतेय.
बाबासाहेब धर्माबद्दल बोलतात
ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे तो धर्म नसून शिरजोरीची सजावट आहे. ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो तो धर्म नसून रोग आहे. ज्या धर्मात अमंगल पशुचा स्पर्श झाला असता चालतो पण माणसाचा स्पर्श चालत नाही. तो धर्म नसून वेडगळपणा आहे. जो धर्म एक वर्गाने विद्या शिकू नये, घनसंचय करू नये, शस्त्रधारणा करू नये असे सांगतो तो धर्म नसून माणसाचे जीवनाचे विडंबन आहे. जो धर्म अशिक्षितांना अशिक्षत रहा, निर्धनांना निर्धन रहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून शिक्षा आहे. ही साधी व्याख्या बाबासाहेबांची आहे. या पुढं जात बुद्धीभेद करणार्या लोकांपेक्षा असे बुद्धीभेद करणार्यांच्या काव्यात अडकणार्यांबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘तुमची तुमच्या ध्येयाच्या पावित्र्यावर अठळ निष्ठा असली पाहिजे, ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांची सेवा करण्यासाठी कर्तव्य पुरते हेतूने जे लोक आत्मप्रेरित होतात ते धन्य होत तुमचे ध्येय उच्च उदाक्त आणि महान आहे. आणि तुमचे मिशन तेजस्वी आणि गौरवशाली आहे. जे आपला वेळ आणि बुद्धी व आपले सर्वस्व गुलामीच्या निदर्शनासाठी पणाला लावतात ते धन्य होत. जे गुलामगिरीत जखडलेल्यांना स्वतंत्र करण्यासाठी महान संकटे ह्रदविदारक मानहानी, वादळे आणि धोक्याची परवा न करता जोपर्यंत पददलित जनतेला आपले मानव अधिकार प्राप्त होत नाहीत तोपर्यंत संघर्ष करीत राहतात त्यांचा विजय असो. आता आम्हाला प्रश्न एवढाच विचारायचा आहे. धर्माच्या व्याख्येबाबत बाबासाहेबांची भूमिका आणि पत दलितेच्या सेवेबाबत डॉ.भिमराव आंबेडकरांची भूमिका भाजप खरच साकारतय? तर या ठिकाणी नाही हे उत्तर येईल. केवळ २०१९ च्या मतांसाठी राम नावाचा भिम जप करत कधी जनतेवर हे राम म्हणण्याची वेळ तर कधी स्वत:वर हे राम म्हणण्याची वेळ भाजप आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच डॉ.बी.आर.आंबेडकरांच्या नावाचे नामांतर व त्यांच्या कोटाचे भगवीकरण हे देशवासियांना पचेलच हे सांगणे कठीण. ===============================
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अग्रलेख
इ.स.१९२७ साली १२ ऑगस्ट रोजी बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतमध्ये लिहिलेला हा अग्रलेख आजच्या राजकीय सामाजिक घडामोडीवर तंतोतंत लागू होत आहे. सरकारची भूमिका आणि जनतेची ससेहेलपाट कशी होते आणि त्यावर सडेतोड बाबासाहेबांचं भाष्य काय होतं ते इथं वाचा.
शुक्रवार ता.१२ ऑगस्ट १९२७
ढोंगीपणा,माथेफिरूपणा व गैरमुत्सद्दीपणा
हिंदु समाजातील कित्येक लोकांनी संघटन व शुद्धी या चळवळी सुरू केल्या असून या चळवळीमध्ये शिकलेल्या लोकांचाच भरणा आहे. साधारण बहुजन समाज या चळवळीपासून साधारणत: अलीप्त आहे असे म्हणावयास हरकत नाही. त्याच प्रमाणे समाजसुधारकांचेही या चळवळीमध्ये फारसे अंग नाही. एकंदरित अर्धवट विचाराच्या लोकांचेच या चळवळीमध्ये प्राबल्य आहे. जुन्या मताच्या लोकांना शुद्धीची कल्पना पकरी वाटते आणि समाज सुधारणेकडे ज्यांचा ओढा आह त्यांना समाजसुधारणेच्या द्वारेच खरे संघटन हिंदूसमाजामध्ये उत्पन्न होईल आणि शुद्धीचे कारण फारसे न उरतां हिंदूसमाजाचे संख्याबल कायम राहून वाढेल असे वाटते, त्यामुळे ते दोन्ही पक्ष या चळवळीपासून अलग राहिले आहे. शुद्धिसंघटनाच्या चळवळीमध्ये अर्धवट लोकांची भरताड झाल्यामुळे त्या चळवळीचा व्हावा तसा उपयोग होत नाही. इतकेच नव्हे तर ढोंगीपणा व माथेफिरूपणा यांना उत येवू लागला आहे. सध्या हिंदूमुसलमानांमध्ये भयंतर तेढ उत्पन्न झाले आहे. तिचा फायदा काही लबाड लोक घेत आहेत. आधीच धार्मिक कलह म्हणजे मुर्खपणाचा बाजार जेंव्हा खर्या धर्माची पायमल्ली होते तेंव्हाच धार्मिक कलह माजतात. जे हिंदू व जे मुसलमान सध्या धर्माच्या नावावर एकमेकांशी भांडत आहेत. त्यांच्यामध्ये खर्या धार्मिक वृत्तीचे माणसे चार दोन तरी सापडतील किंवा नाही याची आम्हाला शंका आहे. धर्माला पदोपदी लाथाळणारे लोकच धर्माचा आवेश दाखवून दुसर्या धर्माच्या लोकांचे प्राण घेवू पाहतात. धर्माने माणसाला देवदूत बनवले पाहिजे. परंतू तसे न होता धार्मिक कलाहामुळे धर्माच्या युगाने माणसाचे माणूसपण जावून त्याला पशुपणा येत आहे. अशास्थितीत अशिक्षित गुंड मारामार्या करितात. एकमेकांचे टाळे सडकतात व खून करतात आणि सुशिक्षीत गुंड अल्पायासाने आपआपल्या समाजात लोकप्रिय होण्याची परवनी साधून घेतात. अशिक्षीत गुंडांच्या दुष्ट कृत्यांची खरी जबाबदारी खरे म्हटले असता सुशिक्षीत गुुंडांवरच आहे. कारण त्यांच्या चितावणीमुळेच अशिक्षीत लोक अत्याचार करावयाला प्रवृत्त होतात. सुशिक्षीत गुंड जसे हिंदुत आहेत तसे मुसलमानात आहेत. पंडितात आहे तसे मौलानामध्ये आहेत. खरे पाहिल्यास धर्माचा सुक्ष्म विचार कोणीच करत नाही, धर्माच्या आद्यतत्वांची कोणालाच परवा नाही. दुराग्रह व दुरभिमान यांचेच उभय समाजांमध्ये प्राबल्य झालेले आहे. ग्रंथप्रामाण्य, अंधश्रद्धा व अज्ञ समजुती, यांनी प्रत्येक धर्माला ग्रासून टाकलेले असल्यामुळे धर्म व सारासार विचार यांच्यात घटस्फोट झालेला आहे
No comments:
Post a Comment