सायं दैनिक बीड रिपोर्टर मधील आज १० मार्च रविवार अग्रलेख
भारतीय सीमेवर खडा पहारा देणारे आमचे जवान आणि घरात माणूस मेला तरी मढं झाकून पेरते होणारे आमचे किसान आजही रोज कुठे ना कुठे मरत आहेत. नापाक पाकड्यांच्या हस्तकांच्या मार्फत म्हणा किंवा दहशतवाद्यांकडून कुठे ना कुठे जवानांचे रक्त सांडत आहे. जवानांच्या रक्ताचा बदला घेण्यास आमचे लष्करही तेवढेच बलशाली आहे. परंतु रोज आत्महत्या करणार्या किसानांच्या मृत्यूचा बदला कुठे आणि कसा घ्यायचा ? तो बदला कोण घेणार ?
बेहोशीचा अभिमान, मरणारा किसान
-गणेश सावंत- 9422742810
भारतीय सीमेवर खडा पहारा देणारे आमचे जवान आणि घरात माणूस मेला तरी मढं झाकून पेरते होणारे आमचे किसान आजही रोज कुठे ना कुठे मरत आहेत. नापाक पाकड्यांच्या हस्तकांच्या मार्फत म्हणा किंवा दहशतवाद्यांकडून कुठे ना कुठे जवानांचे रक्त सांडत आहे. जवानांच्या रक्ताचा बदला घेण्यास आमचे लष्करही तेवढेच बलशाली आहे. परंतु रोज आत्महत्या करणार्या किसानांच्या मृत्यूचा बदला कुठे आणि कसा घ्यायचा ? तो बदला कोण घेणार ? शेतकर्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण असणार? विरोधी बाकावर असताना शेतकर्यांच्या आत्महत्येप्रकरणी सत्ताधार्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करा म्हणणारे देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री आहेत. तरीही आत्महत्या घडतच आहेत. हे महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील रयतेसाठी चांगले चिन्ह म्हणता येणारे नाही. देश म्हणजे जमीन नाही तर देश म्हणजे जनताही आहे. हे राज्यकर्त्यांनी विसरायला नको. रोज कुठे ना कुठे शेतकरी आत्महत्या करीत असतील. त्यांचे कुटुंब उघड्यावर पडत असतील तर भविष्यात शेतकर्यांच्या आत्महत्या होऊ नयेत, यासाठी सरकारकडून प्रयत्न व्हायला हवेत. आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी सरकारने पुढे यायला हवे. आज जरी
जय जवान हरतोय किसान
अशी म्हणण्याची वेळ आलेली असली तरी या परिस्थितीला सत्ताधारी जबाबदार आहेत, असं आम्हाला आता म्हणावच लागेल. पुलवामा हल्ल्यात रक्तपात घडवणार्या वड्यावगळीच्या पैदासींचा आमच्या जवानांनी नरडीचा घोट घेतला. पाकिस्तानला भारतीय सैनिकांनी गुडघ्यावर आणले. जवानांचा विजय झाला. ही प्रत्येक भारतवासियांसाठी उर भरून येणारी, छाती चौढी होणारी घटना आहे. परंतु या घटनेत ही उर भरून येणारी घटना घडून येत असतानाच देशात आणि महाराष्ट्रात हरलेला किसान आत्महत्या करतोय ही गोष्ट जवानांच्या कर्तबगारीची मार्केटिंग करणार्या सत्ताधार्यांसाठी आत्मपरिक्षण करावयास लावणारी आहे. केवळ सत्तेसाठी आणि निवडणुकात प्रचारासाठी जवान आणि किसान यांचा वापर होत असेल तर अशा वेळी देशात ज्या परिवाराचे जवान देश रक्षणासाठी सिमेवर शहीद झाले आणि ज्या शेतकर्यांच्या घरात आत्महत्या झाल्या त्या दोन्ही घरातून सरकार विरोधात
धिंद धिंद करीन चिंधड्या
दे माझ्या भावा आणुनिया
असा जाब वजा सवाल विचारलाच जाईल. ज्या महाराष्ट्रात जगद्गुरू संत तुकोबांसारखे संत होऊन गेले, ज्यांनी दुष्काळात मदत कशी करायची? हे दाखवून दिले. दुष्काळी आटलिय द्रव्य नेला सन्मान, स्त्री एक अन्न-अन्न करता मेली, असे उघड म्हणत घरच्यांपेक्षा दारच्यांची चिंता करणार्या तुकोबांनी त्याकाळी देहू प्रांतात जाहीर कर्जमाफी केली. कर्ज वह्या इंद्रायणीत बुडवल्या त्या केवळ जनतेचे हाल पहावत नव्हते म्हणून. आपल्यासारख्याच्या घरात अन्न अन्न करीत महिला मरत असेल तर गोरगरिबांचं काय? हा त्यांना तेव्हा प्रश्न नक्कीच पडला होता. म्हणूनच त्यांनी कर्ज वह्या इंद्रायणीत बुडवल्या. महाराष्ट्रात दुष्काळाने हाहाकार माजवला आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या नागवला गेला आहे. घरात अन्न-पाण्याचा वांदा होऊन बसला आहे. गोठ्यातल्या जनावरांना चारा नाही, पाणी नाही तरीही राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार समूळ कर्जमाफी करत नाही. कर्जमाफीची घोषणा करायची आणि त्यात अडेलतट्टुपणाचे नियम टाकत कर्जमाफी लटकवत ठेवायची हे धोरण जनहिताचे नाही. तुकोबा भूतलावरून अचानक गायब झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांचे छोटे बंधू कान्होबांनी साक्षात देवाला धिंद धिंद करीन चिंधड्या, दे माझ्या भावा आणुनिया, असे बजावले होते तसे आता घरा-घरातून लोक बजावल्याशिवाय राहणार नाहीत. आज सीमेवरच्या युद्धसृष्य परिस्थिती आणि महाराष्ट्रातल्या दुष्काळ परिस्थितीवर
जय जवान, जय किसान, जय विज्ञान
या दोन नार्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. १९६५ साली भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता. त्यापाठोपाठ इ.स. १९९९ साली पुन्हा भारत-पाकमध्ये मोठा तणाव झाला. कारगिल युद्ध झाले, भारताने पोखरण चाचणी केली, त्या वेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या जय जवानी जय किसान या नार्याला जय विज्ञानचा नारा जोडला. हे येथे एवढ्यासाठीच सांगायचं, युद्धजन्य परिस्थितीवर तत्कालीन पंतप्रधानांनी सीमा रेेषा वाचवल्या. शत्रुंना पाणी पाजलं, लष्कराचं मनोबल वाढवलं, जवानांचं कौतुक केलं, देशातील शेतकर्यांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हटलं, देशातील जनतेला आधार दिला. परंतु लष्कराच्या कर्तृत्वाची मार्केटिंग स्वत:च्या पक्षासाठी, स्वत:च्या सत्तेसाठी, स्वत:च्या राजकारणासाठी केली नाही. आता आम्हाला जय जवान, जय किसान, जय विज्ञान देणारे पंतप्रधान हवे आहेत. जवानांची आणि किसानांच्या मृत्यूची मार्केटिंग करणारे राजकारणी नको आहेत. कारण या देशात
जमीन म्हणजे देश नव्हे
तर जमीनीवर राहणारी जनता म्हणजे देश आहे हे समजून घेणारे माणसातले नेतृत्व या देशाला पाहिजे आहेत. आमच्या देशातली एक इंच जमीनही नापाक इरादे करणार्यांना आमचं लष्कर देणार नाही हा आमचाच नव्हे अखंड देशवासियांचा आत्मविश्वास आहे. परंतु त्या देशाच्या जमीनीवर राहणार्या जनतेचं काय? ती आजही आत्महत्या करत आहे. मग जमीनीवर राहणार्या शेतकर्याला, कष्टकर्याला, कामगाराला आणि सर्वसामान्य माणसाला या देशाच्या जमीनीवर राहणं म्हणजे दुखणं वाटत असेल आणि तो आत्महत्या करत असेल तर तो आजच्या राज्यकर्त्यांचा पराभव नव्हे का? याचा विचार राज्यकर्त्यांनी आता करायलाच हवा. आमच्या जवानांच्या कर्तबगारीचा जेवढा आम्हाला अभिमान आहे तेवढाच आमचा किसान आत्महत्या करतोय याचा आत्मक्लेषही आम्हालाच नव्हे तर माणूस म्हणून जगणार्या राजकारण न करणार्या आणि माणसाला माणूस म्हणून पाहणार्या प्रत्येकाला असणार आहे. जी स्थिती राज्याच्या राजकारणाची आहे तीच परिस्थिती
बीडच्या राजकारणाची
या आठवड्यात आम्हाला पहायला मिळाली. कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा करू शकते. यामुळे गेली चार वर्षे केवळ आश्वासनाचा पाऊस पाडणारे आमचे बीडचे लोकप्रतिनिधी गेल्या आठवडाभरात उद्घाटनाच्या कार्यक्रमात दंग झाले तर भक्तगण देशभक्तीत बेहोश होऊन गेले. अशा परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यात रोज दोन आत्महत्या घडत होत्या. तीन दिवसात सात लोकांनी केवळ कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातल्या नापिकीला आणि भविष्याच्या विचाराने सरणावर जाणं पसंत केले. एक आत्महत्या तर थेट मुख्यमंत्र्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभा करणारी ठरली. त्या तरुणाने मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत एक व्हिडिओ केला. इथं आत्महत्या घडत असताना त्या आत्महत्या का घडतायत? किंवा आत्महत्या घडल्यानंतर त्या परिवाराचे काय होणार? याचं सोयरसुतक बीडच्या राजकारण्यांना नव्हतं. जणू हे राजकारणी मढ्यावर पाय देऊन आपल्या राजकीय फायद्यासाठी उद्घाटनांचा धडाका ठेवत होते. ही परिस्थितीही लाजीरवाणी आहे. ज्या राजकारण्यांना शेतकर्याच्या मरणाचं देणंघेणं नाही, त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. त्या राजकारण्यांबाबत शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या मनात खदखद असणार नाही तर काय? पावसाचा दुष्काळ असला तरी आश्वासनाचा सुकाळ आणि पालकमंत्री मुंडे म्हणतात, निधीचा पाऊस पाडणार, हा निधीचा पाऊस खदखदणार्या मनांना भिजवणार का? हा येणारा काळ सांगेलच. परंतु शेतकर्यांकडे दुर्लक्ष करणं हे लोकप्रतिनिधींना आणि सत्ताधार्यांना परवडणारा नाही हेही तेवढच खरं
.जय जवान हरतोय किसान
अशी म्हणण्याची वेळ आलेली असली तरी या परिस्थितीला सत्ताधारी जबाबदार आहेत, असं आम्हाला आता म्हणावच लागेल. पुलवामा हल्ल्यात रक्तपात घडवणार्या वड्यावगळीच्या पैदासींचा आमच्या जवानांनी नरडीचा घोट घेतला. पाकिस्तानला भारतीय सैनिकांनी गुडघ्यावर आणले. जवानांचा विजय झाला. ही प्रत्येक भारतवासियांसाठी उर भरून येणारी, छाती चौढी होणारी घटना आहे. परंतु या घटनेत ही उर भरून येणारी घटना घडून येत असतानाच देशात आणि महाराष्ट्रात हरलेला किसान आत्महत्या करतोय ही गोष्ट जवानांच्या कर्तबगारीची मार्केटिंग करणार्या सत्ताधार्यांसाठी आत्मपरिक्षण करावयास लावणारी आहे. केवळ सत्तेसाठी आणि निवडणुकात प्रचारासाठी जवान आणि किसान यांचा वापर होत असेल तर अशा वेळी देशात ज्या परिवाराचे जवान देश रक्षणासाठी सिमेवर शहीद झाले आणि ज्या शेतकर्यांच्या घरात आत्महत्या झाल्या त्या दोन्ही घरातून सरकार विरोधात
धिंद धिंद करीन चिंधड्या
दे माझ्या भावा आणुनिया
असा जाब वजा सवाल विचारलाच जाईल. ज्या महाराष्ट्रात जगद्गुरू संत तुकोबांसारखे संत होऊन गेले, ज्यांनी दुष्काळात मदत कशी करायची? हे दाखवून दिले. दुष्काळी आटलिय द्रव्य नेला सन्मान, स्त्री एक अन्न-अन्न करता मेली, असे उघड म्हणत घरच्यांपेक्षा दारच्यांची चिंता करणार्या तुकोबांनी त्याकाळी देहू प्रांतात जाहीर कर्जमाफी केली. कर्ज वह्या इंद्रायणीत बुडवल्या त्या केवळ जनतेचे हाल पहावत नव्हते म्हणून. आपल्यासारख्याच्या घरात अन्न अन्न करीत महिला मरत असेल तर गोरगरिबांचं काय? हा त्यांना तेव्हा प्रश्न नक्कीच पडला होता. म्हणूनच त्यांनी कर्ज वह्या इंद्रायणीत बुडवल्या. महाराष्ट्रात दुष्काळाने हाहाकार माजवला आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या नागवला गेला आहे. घरात अन्न-पाण्याचा वांदा होऊन बसला आहे. गोठ्यातल्या जनावरांना चारा नाही, पाणी नाही तरीही राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार समूळ कर्जमाफी करत नाही. कर्जमाफीची घोषणा करायची आणि त्यात अडेलतट्टुपणाचे नियम टाकत कर्जमाफी लटकवत ठेवायची हे धोरण जनहिताचे नाही. तुकोबा भूतलावरून अचानक गायब झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांचे छोटे बंधू कान्होबांनी साक्षात देवाला धिंद धिंद करीन चिंधड्या, दे माझ्या भावा आणुनिया, असे बजावले होते तसे आता घरा-घरातून लोक बजावल्याशिवाय राहणार नाहीत. आज सीमेवरच्या युद्धसृष्य परिस्थिती आणि महाराष्ट्रातल्या दुष्काळ परिस्थितीवर
जय जवान, जय किसान, जय विज्ञान
या दोन नार्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. १९६५ साली भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता. त्यापाठोपाठ इ.स. १९९९ साली पुन्हा भारत-पाकमध्ये मोठा तणाव झाला. कारगिल युद्ध झाले, भारताने पोखरण चाचणी केली, त्या वेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या जय जवानी जय किसान या नार्याला जय विज्ञानचा नारा जोडला. हे येथे एवढ्यासाठीच सांगायचं, युद्धजन्य परिस्थितीवर तत्कालीन पंतप्रधानांनी सीमा रेेषा वाचवल्या. शत्रुंना पाणी पाजलं, लष्कराचं मनोबल वाढवलं, जवानांचं कौतुक केलं, देशातील शेतकर्यांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हटलं, देशातील जनतेला आधार दिला. परंतु लष्कराच्या कर्तृत्वाची मार्केटिंग स्वत:च्या पक्षासाठी, स्वत:च्या सत्तेसाठी, स्वत:च्या राजकारणासाठी केली नाही. आता आम्हाला जय जवान, जय किसान, जय विज्ञान देणारे पंतप्रधान हवे आहेत. जवानांची आणि किसानांच्या मृत्यूची मार्केटिंग करणारे राजकारणी नको आहेत. कारण या देशात
जमीन म्हणजे देश नव्हे
तर जमीनीवर राहणारी जनता म्हणजे देश आहे हे समजून घेणारे माणसातले नेतृत्व या देशाला पाहिजे आहेत. आमच्या देशातली एक इंच जमीनही नापाक इरादे करणार्यांना आमचं लष्कर देणार नाही हा आमचाच नव्हे अखंड देशवासियांचा आत्मविश्वास आहे. परंतु त्या देशाच्या जमीनीवर राहणार्या जनतेचं काय? ती आजही आत्महत्या करत आहे. मग जमीनीवर राहणार्या शेतकर्याला, कष्टकर्याला, कामगाराला आणि सर्वसामान्य माणसाला या देशाच्या जमीनीवर राहणं म्हणजे दुखणं वाटत असेल आणि तो आत्महत्या करत असेल तर तो आजच्या राज्यकर्त्यांचा पराभव नव्हे का? याचा विचार राज्यकर्त्यांनी आता करायलाच हवा. आमच्या जवानांच्या कर्तबगारीचा जेवढा आम्हाला अभिमान आहे तेवढाच आमचा किसान आत्महत्या करतोय याचा आत्मक्लेषही आम्हालाच नव्हे तर माणूस म्हणून जगणार्या राजकारण न करणार्या आणि माणसाला माणूस म्हणून पाहणार्या प्रत्येकाला असणार आहे. जी स्थिती राज्याच्या राजकारणाची आहे तीच परिस्थिती
बीडच्या राजकारणाची
या आठवड्यात आम्हाला पहायला मिळाली. कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा करू शकते. यामुळे गेली चार वर्षे केवळ आश्वासनाचा पाऊस पाडणारे आमचे बीडचे लोकप्रतिनिधी गेल्या आठवडाभरात उद्घाटनाच्या कार्यक्रमात दंग झाले तर भक्तगण देशभक्तीत बेहोश होऊन गेले. अशा परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यात रोज दोन आत्महत्या घडत होत्या. तीन दिवसात सात लोकांनी केवळ कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातल्या नापिकीला आणि भविष्याच्या विचाराने सरणावर जाणं पसंत केले. एक आत्महत्या तर थेट मुख्यमंत्र्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभा करणारी ठरली. त्या तरुणाने मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत एक व्हिडिओ केला. इथं आत्महत्या घडत असताना त्या आत्महत्या का घडतायत? किंवा आत्महत्या घडल्यानंतर त्या परिवाराचे काय होणार? याचं सोयरसुतक बीडच्या राजकारण्यांना नव्हतं. जणू हे राजकारणी मढ्यावर पाय देऊन आपल्या राजकीय फायद्यासाठी उद्घाटनांचा धडाका ठेवत होते. ही परिस्थितीही लाजीरवाणी आहे. ज्या राजकारण्यांना शेतकर्याच्या मरणाचं देणंघेणं नाही, त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. त्या राजकारण्यांबाबत शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या मनात खदखद असणार नाही तर काय? पावसाचा दुष्काळ असला तरी आश्वासनाचा सुकाळ आणि पालकमंत्री मुंडे म्हणतात, निधीचा पाऊस पाडणार, हा निधीचा पाऊस खदखदणार्या मनांना भिजवणार का? हा येणारा काळ सांगेलच. परंतु शेतकर्यांकडे दुर्लक्ष करणं हे लोकप्रतिनिधींना आणि सत्ताधार्यांना परवडणारा नाही हेही तेवढच खरं
No comments:
Post a Comment