Sunday, 25 December 2016

आनंदाची डोहे..! पण ?

-गणेश सावंत-

9422742810



                     
ष्टवर्धान जागृत, अष्टप्रधान वेस्टीत, न्यायलंकार पंडित, शस्त्राशस्त्रशास्त्र  पारंगत राजनिती धूरंधर प्रौढप्रताप पुरंधर, क्षत्रिय कुलावंत, सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की...!  शी ललकारी साडेतीनशे-चारशे वर्षानंतरही कानावर पडली की, महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या मातीत निपजलेल्या जिवंत माणसांच्या मुखातून जय केव्हा बाहेर पडतं हे त्यालाही माहित होत नाही. काय ती ताकत शिवछत्रपतींच्या कर्तृत्व कर्माची आणि काय ती महती छत्रपतींच्या स्वराज्य धर्माची आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा आलेख याची देही याची डोळा अखंड देशाला नव्हे तर जगाला पाहता यावा म्हणून अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्यदिव्य स्मारक उभा राहतय. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काल जेव्हा शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन झाले तेंव्हा समुद्रातील अजाज्र लाटांनाही हायसं वाटलं असेल. उंच उंच उडणार्‍या लाटा काल केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक याठिकाणी उभारायचं म्हणून दूरच कुठं अडल्या जात होत्या की काय, म्हणूनच काल सागरही शांत दिसून येत होता. महाराष्ट्राची किर्ती केवळ आणि केवळ राजा शिवछत्रपतींच्या कर्तृत्व, कर्मामुळेच जगाच्या पाठिवर अजरामर आहे. आज जरी शिवछत्रपतींचे स्मारक उभा करून त्या 16 हेक्टरमध्ये तरी महाराष्ट्रातील शिवबांचं स्वराज्य भविष्यात तुम्हा-आम्हाला अनुभवता येईल. बाकी महाराष्ट्र असो की, देश असो त्याठिकाणी स्वराज्य असेलच हे सांगणे कठीण. आज जरी छत्रपतींच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं असलं तरी छत्रपतींच्या कर्तृत्वाला स्मारक तयार करून मुजरा घालणं हा छत्रपतींचा सर्वात मोठा सन्मान असेल, असं म्हणणं अत्यंत मुर्खपणाचं ठरेल. आम्ही मोठ्या जबाबदारीने म्हणतोत, छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड हा राज्यातील तळागाळातल्या सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसापासून कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, कास्तकर्‍यांपर्यंत न्याय हक्काबरोबर त्याला त्याच्या मुलभूत गरजा मिळणं आणि मिळवून देणं हे राज्यकर्त्यांचं आद्यकर्तव्य. हे कर्तव्य पूर्ण केलं म्हणजे छत्रपतींच्या महाराष्ट्रात छत्रपतींना मानाचा मुजरा घालणं होय आणि हा मानाचा मुजरा खर्‍या अर्थाने तेव्हाच घातला जाईल जेव्हा महाराष्ट्रातील छत्रपतींचे गडकोट, किल्ले पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून केला जाईल. आजपर्यंत छत्रपतींच्या कर्तृत्व, कर्माला काही तथाकथीत लोकांनी झाकण्याचा प्रयत्न केला. एकअंगी छत्रपती दाखविण्याचा खटाटोपही झाला. परंतु शिवाजीराजे हे सूर्य आहेत. कोंबडा झाकून ठेवल्याने सूर्य उगवायचं थांबत नाही हे महाराष्ट्राने पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्माचे रक्षक होते आणि ते केवळ 
मुस्लिमांचेच दुश्मन 
     होते, शिवाजी महाराज तलवार चालवायचे, युद्धखोर होते, लूट करत असायचे, असा काहीसा अत्यंत खोटारडा इतिहास मनुवाद्यांनी मधल्या काही दशकांमध्ये लिहिला आणि शिवाजी महाराजांना एका धर्माच्या चौकटीमध्ये बिनधास्त बसवलं. धर्माच्या चौकटीत बसवताना ह्या खोटारड्या इतिहासकारांनी राजेंच्या इतिहासालाच नव्हे तर त्यांच्या कर्तृत्व कर्माबरोबर इभ्रतीलाही पेनाच्या टोकदार ब्लेड लावण्याचा प्रयत्न केला. परंतु राजे जेवढे मर्दानी होते तेवढेच त्यांचे कर्तृत्वही ज्वलंत होते. ते कर्तृत्व कर्म झाकल्याने झाकून जाणार नाही. म्हणूनच चालू दोन-तीन दशकांपासून महाराष्ट्राच्या मातीत नव्हे तर देशाच्या मातीत निपजलेल्या आणि बहुजनांच्या कुषिमध्ये जन्मलेल्या नव्या तरण्याताठ्या पोरांनी पुन्हा एकदा छत्रपतींचा इतिहास वाचला, गडकोट, किल्ल्यांना भेटी दिल्या. मग हे नवे इतिहासकार सर्व जात-पात-धर्म-पंथातले होते. त्यांना हवा होता तो केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास. त्यांना हवे होते रयतेचे राजे शिवाजी महाराज आणि बघता बघता खोटारड्या इतिहासकारांच्या कानसुलात हाणावं तसं नव्या इतिहासकारांनी पुराव्यानिशी खरे छत्रपती जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. ते काही प्रमाणात यशस्वीही झाले, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानांचे विरोधक नव्हते हे पुन्हा-पुन्हा सिद्ध झाले. विरोधक असते तर त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिमांच्या तुकड्या नसत्याच. स्वत: शिवाजी महाराजांचे बॉडीगार्डही मुस्लिम नसते. हे जेव्हा हिंदू धर्मातील बहुजनांना समजले आणि उमजले आणि मुस्लिमांनाही जेव्हा हे लक्षात आले तेव्हा पोटपुजा करणार्‍या तथाकथीत खोटारड्या इतिहासकारांचे लक्तरे वेशीला टांगली गेले आणि ते निस नागवे झाले. खरा इतिहास समोर आला. छत्रपती हे कोण्या एका धर्माचे नव्हे तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारे एक राजे होते. म्हणूनच काल-परवा महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चे निघाले आणि या मोर्चांना पाठिंबा मुस्लिमांनीही दिला. नव्हे नव्हे तर आजही मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की, आपल्या मुख्यातून जय म्हणतात. खरं यश त्या स्मारकापेक्षा हे असायला हवं, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणूनच स्मारक होतय हे अत्यानंदाची बाब. पराकोटीचा आनंद नक्कीच आहे म्हणूनच
आनंदाचे डोहो 
आनंद तरंग असं प्रत्येकाला वाटतं आणि ते वाटायलाही हवे. राजेंचा इतिहास हा जितका लढाईखोरीचा तितकाच अर्थनितीचा, तेवढाच युद्धनितीचा. आरमराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहितलं जातं. साडेतीनशे वर्षांपूर्वी समुद्रमार्गे शत्रूंचा धोका शिवाजी राजांनी लक्षात घेतला होता. एकविसाव्या शतकात आमच्या सरकारला हा धोका लक्षात आला नव्हता, परिणामी 26/11 हा रक्तरंजित दिवस ठरला. छत्रपती शिवाजी राजे दिव्यदृष्टीपेक्षा भविष्याचा वेध घेणारे राजे होते. अर्थकारण कसं असावं, राजकारण कुठं करावं, शेती कशी असावी, शेतसारा कसा ठेवावा, अर्थनितीमध्ये चलनाला किती महत्त्व द्यावं, ते चलन कोणी उभं करावं, कसं उभं करावं याचा ज्या माणसाला अभ्यास होता तो काहींच्या मते दैवदूत असला तरी आमच्या मते विज्ञान युगाला जन्म देणारा सर्वात मोठा आणि सर्वच क्षेत्रातला वैज्ञानिक शिवाजी राजे होते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. राजे जेवढे स्वराज्यावर प्रेम करायचे, स्वराज्य निर्माण करण्यासाठी जिवाचं रान करायचे तेवढेच राजे रक्तमांसाचे माणसं जोडायचे. म्हणूनच राजेंना स्वत:चं शेतपोत, घरदार विकून रायगड बांधण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारा हिरोजी इंदोरकर मिळू शकतो. स्वत:च्या पोराचं लग्न असताना लग्नापेक्षा गडावर आक्रमण करायला गेलेले तानाजी मालुसरे मिळू शकतात. काय म्हणावं, एक एक माणसांबद्दल कोण तोफेच्या आवाज होईपर्यंत खिंड लढवत लढवत प्राण सोडत नाही तर कोण पोटच्या पोराचं लग्न टाकून गड सर करायला जातो. कोण मृत्यूच्या पालखीत हसत-हसत बसतो तर कोण आपल्या राजाचं शब्द राखण्यासाठी भल्यामोठ्या मदमस्त हत्तीशी झूंज देतो. कोणी खोटा शिवाजी म्हणून मरणाच्या आंथरुणावर झोपतो तर कोणी 80 व्या वर्षी गड सर करताना तरण्याबांड शत्रूंना लोळवतो तर कोणी मिसरुट न फुटलेलं पोर पडणारे भगवे निशान सावरत विसएक शत्रुंना ठार करतो तर कोणी सात वीर मराठे 30 हजार फौजेशी जाऊन भेटतात. तर कोणी 60 मावळे गड जिंकून देतात. हे अल्पशे आणि छोटे उदाहरणं देण्याचे एवढेच कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं इतिहास, राजेंचं कर्तृत्व-कर्म, राजेंचा राजधर्म आणि राजेंचा रयतेविषयी असलेला आर्थिक, शैक्षणिक, शेती, पाणी याबाबतचं धोरण आणि रयतेबाबत मुलभूत गरजांविषयी राजेंचं असलेलं लक्ष हे प्रेरणादायी असताना खरच राजेंची आम्ही प्रेरणा घेतोय का? आज आम्ही राजेंचं भव्यदिव्य स्मारक उभारतोय परंतु त्याच राजेंच्या महाराष्ट्रात रयत सुखी आणि समृद्ध आहे काय? महिला-मुलींची अबू्र सुरक्षित आहे का? सर्वसामान्यातील सर्वसामान्यांची जान आणि माल आजही संकटात का आहे? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित एवढ्यासाठीच कराव्याच्या वाटतात. राजेंचं स्मारक होतय नक्कीच आमचा उर भरून येतोय, छाती चौडी होतेय. स्मारकाचं डिझाईन घमण्यातलं रक्त सळसळ वहातय, परंतु छत्रपतींच्या गड किल्ल्यांबाबत काय, त्यांच्या संवर्धनाबाबत काय, महाराष्ट्रातल्या मातीत नव्हे तर देशाच्या मातीत जन्मलेल्या पोरांना शिवाजी महाराजांची अर्थनिती, युद्ध निती, जलसंधारणाचे धडे, चलन व्यवस्थेची भूमिका, शेतसार्‍याची पद्धत, माणूस म्हणून माणसासारखं जगण्याची उर्मी शिकवली जातेय का, तर याचं उत्तर नाही येईल जन्माला आलेल्या कुठल्याही मुलाला आणि मुलीला यशस्वी करायचं असेल तर शिवचरित्र त्यांच्या नसानसात भिनायला हवं आणि तेव्हाच भिनलं जाईल जेव्हा शिक्षणामध्ये शिवचरित्र मोठ्या प्रमाणात घेतलं जाईल. आज स्मारक झालं, आता गडकोट किल्ल्यांचं संवर्धन आणि अभ्यासक्रमात शिवचरित्र यावं हीच अपेक्षा.


आनंदाची डोहे..! पण ?
-गणेश सावंत-
अष्टवर्धान जागृत, अष्टप्रधान वेस्टीत, न्यायलंकार पंडित, शस्त्राशस्त्रशास्त्र  पारंगत राजनिती धूरंधर प्रौढप्रताप पुरंधर, क्षत्रिय कुलावंत, सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की...!  अशी ललकारी साडेतीनशे-चारशे वर्षानंतरही कानावर पडली की, महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या मातीत निपजलेल्या जिवंत माणसांच्या मुखातून जय केव्हा बाहेर पडतं हे त्यालाही माहित होत नाही. काय ती ताकत शिवछत्रपतींच्या कर्तृत्व कर्माची आणि काय ती महती छत्रपतींच्या स्वराज्य धर्माची आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा आलेख याची देही याची डोळा अखंड देशाला नव्हे तर जगाला पाहता यावा म्हणून अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्यदिव्य स्मारक उभा राहतय. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काल जेव्हा शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन झाले तेंव्हा समुद्रातील अजाज्र लाटांनाही हायसं वाटलं असेल. उंच उंच उडणार्‍या लाटा काल केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक याठिकाणी उभारायचं म्हणून दूरच कुठं अडल्या जात होत्या की काय, म्हणूनच काल सागरही शांत दिसून येत होता. महाराष्ट्राची किर्ती केवळ आणि केवळ राजा शिवछत्रपतींच्या कर्तृत्व, कर्मामुळेच जगाच्या पाठिवर अजरामर आहे. आज जरी शिवछत्रपतींचे स्मारक उभा करून त्या 16 हेक्टरमध्ये तरी महाराष्ट्रातील शिवबांचं स्वराज्य भविष्यात तुम्हा-आम्हाला अनुभवता येईल. बाकी महाराष्ट्र असो की, देश असो त्याठिकाणी स्वराज्य असेलच हे सांगणे कठीण. आज जरी छत्रपतींच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं असलं तरी छत्रपतींच्या कर्तृत्वाला स्मारक तयार करून मुजरा घालणं हा छत्रपतींचा सर्वात मोठा सन्मान असेल, असं म्हणणं अत्यंत मुर्खपणाचं ठरेल. आम्ही मोठ्या जबाबदारीने म्हणतोत, छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड हा राज्यातील तळागाळातल्या सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसापासून कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, कास्तकर्‍यांपर्यंत न्याय हक्काबरोबर त्याला त्याच्या मुलभूत गरजा मिळणं आणि मिळवून देणं हे राज्यकर्त्यांचं आद्यकर्तव्य. हे कर्तव्य पूर्ण केलं म्हणजे छत्रपतींच्या महाराष्ट्रात छत्रपतींना मानाचा मुजरा घालणं होय आणि हा मानाचा मुजरा खर्‍या अर्थाने तेव्हाच घातला जाईल जेव्हा महाराष्ट्रातील छत्रपतींचे गडकोट, किल्ले पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून केला जाईल. आजपर्यंत छत्रपतींच्या कर्तृत्व, कर्माला काही तथाकथीत लोकांनी झाकण्याचा प्रयत्न केला. एकअंगी छत्रपती दाखविण्याचा खटाटोपही झाला. परंतु शिवाजीराजे हे सूर्य आहेत. कोंबडा झाकून ठेवल्याने सूर्य उगवायचं थांबत नाही हे महाराष्ट्राने पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्माचे रक्षक होते आणि ते केवळ 
मुस्लिमांचेच दुश्मन
होते, शिवाजी महाराज तलवार चालवायचे, युद्धखोर होते, लूट करत असायचे, असा काहीसा अत्यंत खोटारडा इतिहास मनुवाद्यांनी मधल्या काही दशकांमध्ये लिहिला आणि शिवाजी महाराजांना एका धर्माच्या चौकटीमध्ये बिनधास्त बसवलं. धर्माच्या चौकटीत बसवताना ह्या खोटारड्या इतिहासकारांनी राजेंच्या इतिहासालाच नव्हे तर त्यांच्या कर्तृत्व कर्माबरोबर इभ्रतीलाही पेनाच्या टोकदार ब्लेड लावण्याचा प्रयत्न केला. परंतु राजे जेवढे मर्दानी होते तेवढेच त्यांचे कर्तृत्वही ज्वलंत होते. ते कर्तृत्व कर्म झाकल्याने झाकून जाणार नाही. म्हणूनच चालू दोन-तीन दशकांपासून महाराष्ट्राच्या मातीत नव्हे तर देशाच्या मातीत निपजलेल्या आणि बहुजनांच्या कुषिमध्ये जन्मलेल्या नव्या तरण्याताठ्या पोरांनी पुन्हा एकदा छत्रपतींचा इतिहास वाचला, गडकोट, किल्ल्यांना भेटी दिल्या. मग हे नवे इतिहासकार सर्व जात-पात-धर्म-पंथातले होते. त्यांना हवा होता तो केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास. त्यांना हवे होते रयतेचे राजे शिवाजी महाराज आणि बघता बघता खोटारड्या इतिहासकारांच्या कानसुलात हाणावं तसं नव्या इतिहासकारांनी पुराव्यानिशी खरे छत्रपती जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. ते काही प्रमाणात यशस्वीही झाले, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानांचे विरोधक नव्हते हे पुन्हा-पुन्हा सिद्ध झाले. विरोधक असते तर त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिमांच्या तुकड्या नसत्याच. स्वत: शिवाजी महाराजांचे बॉडीगार्डही मुस्लिम नसते. हे जेव्हा हिंदू धर्मातील बहुजनांना समजले आणि उमजले आणि मुस्लिमांनाही जेव्हा हे लक्षात आले तेव्हा पोटपुजा करणार्‍या तथाकथीत खोटारड्या इतिहासकारांचे लक्तरे वेशीला टांगली गेले आणि ते निस नागवे झाले. खरा इतिहास समोर आला. छत्रपती हे कोण्या एका धर्माचे नव्हे तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारे एक राजे होते. म्हणूनच काल-परवा महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चे निघाले आणि या मोर्चांना पाठिंबा मुस्लिमांनाही दिला. नव्हे नव्हे तर आजही मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की, आपल्या मुख्यातून जय म्हणतात. खरं यश त्या स्मारकापेक्षा हे असायला हवं, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणूनच स्मारक होतय हे अत्यानंदाची बाब. पराकोटीचा आनंद नक्कीच आहे म्हणूनच 
आनंदाचे डोहो 
आनंद तरंग असं प्रत्येकाला वाटतं आणि ते वाटायलाही हवे. राजेंचा इतिहास हा जितका लढाईखोरीचा तितकाच अर्थनितीचा, तेवढाच युद्धनितीचा. आरमराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहितलं जातं. साडेतीनशे वर्षांपूर्वी समुद्रमार्गे शत्रूंचा धोका शिवाजी राजांनी लक्षात घेतला होता. एकविसाव्या शतकात आमच्या सरकारला हा धोका लक्षात आला नव्हता, परिणामी 26/11 हा रक्तरंजित दिवस ठरला. छत्रपती शिवाजी राजे दिव्यदृष्टीपेक्षा भविष्याचा वेध घेणारे राजे होते. अर्थकारण कसं असावं, राजकारण कुठं करावं, शेती कशी असावी, शेतसारा कसा ठेवावा, अर्थनितीमध्ये चलनाला किती महत्त्व द्यावं, ते चलन कोणी उभं करावं, कसं उभं करावं याचा ज्या माणसाला अभ्यास होता तो काहींच्या मते दैवदूत असला तरी आमच्या मते विज्ञान युगाला जन्म देणारा सर्वात मोठा आणि सर्वच क्षेत्रातला वैज्ञानिक शिवाजी राजे होते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. राजे जेवढे स्वराज्यावर प्रेम करायचे, स्वराज्य निर्माण करण्यासाठी जिवाचं रान करायचे तेवढेच राजे रक्तमांसाचे माणसं जोडायचे. म्हणूनच राजेंना स्वत:चं शेतपोत, घरदार विकून रायगड बांधण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारा हिरोजी इंदोरकर मिळू शकतो. स्वत:च्या पोराचं लग्न असताना लग्नापेक्षा गडावर आक्रमण करायला गेलेले तानाजी मालुसरे मिळू शकतात. काय म्हणावं, एक एक माणसांबद्दल कोण तोफेच्या आवाज होईपर्यंत खिंड लढवत लढवत प्राण सोडत नाही तर कोण पोटच्या पोराचं लग्न टाकून गड सर करायला जातो. कोण मृत्यूच्या पालखीत हसत-हसत बसतो तर कोण आपल्या राजाचं शब्द राखण्यासाठी भल्यामोठ्या मदमस्त हत्तीशी झूंज देतो. कोणी खोटा शिवाजी म्हणून मरणाच्या आंथरुणावर झोपतो तर कोणी 80 व्या वर्षी गड सर करताना तरण्याबांड शत्रूंना लोळवतो तर कोणी मिसरुट न फुटलेलं पोर पडणारे भगवे निशान सावरत विसएक शत्रुंना ठार करतो तर कोणी सात वीर मराठे 30 हजार फौजेशी जाऊन भेटतात. तर कोणी 60 मावळे गड जिंकून देतात. हे अल्पशे आणि छोटे उदाहरणं देण्याचे एवढेच कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं इतिहास, राजेंचं कर्तृत्व-कर्म, राजेंचा राजधर्म आणि राजेंचा रयतेविषयी असलेला आर्थिक, शैक्षणिक, शेती, पाणी याबाबतचं धोरण आणि रयतेबाबत मुलभूत गरजांविषयी राजेंचं असलेलं लक्ष हे प्रेरणादायी असताना खरच राजेंची आम्ही प्रेरणा घेतोय का? आज आम्ही राजेंचं भव्यदिव्य स्मारक उभारतोय परंतु त्याच राजेंच्या महाराष्ट्रात रयत सुखी आणि समृद्ध आहे काय? महिला-मुलींची अबू्र सुरक्षित आहे का? सर्वसामान्यातील सर्वसामान्यांची जान आणि माल आजही संकटात का आहे? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित एवढ्यासाठीच कराव्याच्या वाटतात. राजेंचं स्मारक होतय नक्कीच आमचा उर भरून येतोय, छाती चौडी होतेय. स्मारकाचं डिझाईन घमण्यातलं रक्त सळसळ वहातय, परंतु छत्रपतींच्या गड किल्ल्यांबाबत काय, त्यांच्या संवर्धनाबाबत काय, महाराष्ट्रातल्या मातीत नव्हे तर देशाच्या मातीत जन्मलेल्या पोरांना शिवाजी महाराजांची अर्थनिती, युद्ध निती, जलसंधारणाचे धडे, चलन व्यवस्थेची भूमिका, शेतसार्‍याची पद्धत, माणूस म्हणून माणसासारखं जगण्याची उर्मी शिकवली जातेय का, तर याचं उत्तर नाही येईल जन्माला आलेल्या कुठल्याही मुलाला आणि मुलीला यशस्वी करायचं असेल तर शिवचरित्र त्यांच्या नसानसात भिनायला हवं आणि तेव्हाच भिनलं जाईल जेव्हा शिक्षणामध्ये शिवचरित्र मोठ्या प्रमाणात घेतलं जाईल. आज स्मारक झालं, आता गडकोट किल्ल्यांचं संवर्धन आणि अभ्यासक्रमात शिवचरित्र यावं हीच अपेक्षा.
आनंदाची डोहे..! पण ?
-गणेश सावंत-
अष्टवर्धान जागृत, अष्टप्रधान वेस्टीत, न्यायलंकार पंडित, शस्त्राशस्त्रशास्त्र  पारंगत राजनिती धूरंधर प्रौढप्रताप पुरंधर, क्षत्रिय कुलावंत, सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की...!  अशी ललकारी साडेतीनशे-चारशे वर्षानंतरही कानावर पडली की, महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या मातीत निपजलेल्या जिवंत माणसांच्या मुखातून जय केव्हा बाहेर पडतं हे त्यालाही माहित होत नाही. काय ती ताकत शिवछत्रपतींच्या कर्तृत्व कर्माची आणि काय ती महती छत्रपतींच्या स्वराज्य धर्माची आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा आलेख याची देही याची डोळा अखंड देशाला नव्हे तर जगाला पाहता यावा म्हणून अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्यदिव्य स्मारक उभा राहतय. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काल जेव्हा शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन झाले तेंव्हा समुद्रातील अजाज्र लाटांनाही हायसं वाटलं असेल. उंच उंच उडणार्‍या लाटा काल केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक याठिकाणी उभारायचं म्हणून दूरच कुठं अडल्या जात होत्या की काय, म्हणूनच काल सागरही शांत दिसून येत होता. महाराष्ट्राची किर्ती केवळ आणि केवळ राजा शिवछत्रपतींच्या कर्तृत्व, कर्मामुळेच जगाच्या पाठिवर अजरामर आहे. आज जरी शिवछत्रपतींचे स्मारक उभा करून त्या 16 हेक्टरमध्ये तरी महाराष्ट्रातील शिवबांचं स्वराज्य भविष्यात तुम्हा-आम्हाला अनुभवता येईल. बाकी महाराष्ट्र असो की, देश असो त्याठिकाणी स्वराज्य असेलच हे सांगणे कठीण. आज जरी छत्रपतींच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं असलं तरी छत्रपतींच्या कर्तृत्वाला स्मारक तयार करून मुजरा घालणं हा छत्रपतींचा सर्वात मोठा सन्मान असेल, असं म्हणणं अत्यंत मुर्खपणाचं ठरेल. आम्ही मोठ्या जबाबदारीने म्हणतोत, छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड हा राज्यातील तळागाळातल्या सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसापासून कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, कास्तकर्‍यांपर्यंत न्याय हक्काबरोबर त्याला त्याच्या मुलभूत गरजा मिळणं आणि मिळवून देणं हे राज्यकर्त्यांचं आद्यकर्तव्य. हे कर्तव्य पूर्ण केलं म्हणजे छत्रपतींच्या महाराष्ट्रात छत्रपतींना मानाचा मुजरा घालणं होय आणि हा मानाचा मुजरा खर्‍या अर्थाने तेव्हाच घातला जाईल जेव्हा महाराष्ट्रातील छत्रपतींचे गडकोट, किल्ले पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून केला जाईल. आजपर्यंत छत्रपतींच्या कर्तृत्व, कर्माला काही तथाकथीत लोकांनी झाकण्याचा प्रयत्न केला. एकअंगी छत्रपती दाखविण्याचा खटाटोपही झाला. परंतु शिवाजीराजे हे सूर्य आहेत. कोंबडा झाकून ठेवल्याने सूर्य उगवायचं थांबत नाही हे महाराष्ट्राने पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्माचे रक्षक होते आणि ते केवळ 
मुस्लिमांचेच दुश्मन
होते, शिवाजी महाराज तलवार चालवायचे, युद्धखोर होते, लूट करत असायचे, असा काहीसा अत्यंत खोटारडा इतिहास मनुवाद्यांनी मधल्या काही दशकांमध्ये लिहिला आणि शिवाजी महाराजांना एका धर्माच्या चौकटीमध्ये बिनधास्त बसवलं. धर्माच्या चौकटीत बसवताना ह्या खोटारड्या इतिहासकारांनी राजेंच्या इतिहासालाच नव्हे तर त्यांच्या कर्तृत्व कर्माबरोबर इभ्रतीलाही पेनाच्या टोकदार ब्लेड लावण्याचा प्रयत्न केला. परंतु राजे जेवढे मर्दानी होते तेवढेच त्यांचे कर्तृत्वही ज्वलंत होते. ते कर्तृत्व कर्म झाकल्याने झाकून जाणार नाही. म्हणूनच चालू दोन-तीन दशकांपासून महाराष्ट्राच्या मातीत नव्हे तर देशाच्या मातीत निपजलेल्या आणि बहुजनांच्या कुषिमध्ये जन्मलेल्या नव्या तरण्याताठ्या पोरांनी पुन्हा एकदा छत्रपतींचा इतिहास वाचला, गडकोट, किल्ल्यांना भेटी दिल्या. मग हे नवे इतिहासकार सर्व जात-पात-धर्म-पंथातले होते. त्यांना हवा होता तो केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास. त्यांना हवे होते रयतेचे राजे शिवाजी महाराज आणि बघता बघता खोटारड्या इतिहासकारांच्या कानसुलात हाणावं तसं नव्या इतिहासकारांनी पुराव्यानिशी खरे छत्रपती जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. ते काही प्रमाणात यशस्वीही झाले, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानांचे विरोधक नव्हते हे पुन्हा-पुन्हा सिद्ध झाले. विरोधक असते तर त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिमांच्या तुकड्या नसत्याच. स्वत: शिवाजी महाराजांचे बॉडीगार्डही मुस्लिम नसते. हे जेव्हा हिंदू धर्मातील बहुजनांना समजले आणि उमजले आणि मुस्लिमांनाही जेव्हा हे लक्षात आले तेव्हा पोटपुजा करणार्‍या तथाकथीत खोटारड्या इतिहासकारांचे लक्तरे वेशीला टांगली गेले आणि ते निस नागवे झाले. खरा इतिहास समोर आला. छत्रपती हे कोण्या एका धर्माचे नव्हे तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारे एक राजे होते. म्हणूनच काल-परवा महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चे निघाले आणि या मोर्चांना पाठिंबा मुस्लिमांनाही दिला. नव्हे नव्हे तर आजही मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की, आपल्या मुख्यातून जय म्हणतात. खरं यश त्या स्मारकापेक्षा हे असायला हवं, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणूनच स्मारक होतय हे अत्यानंदाची बाब. पराकोटीचा आनंद नक्कीच आहे म्हणूनच 
आनंदाचे डोहो 
आनंद तरंग असं प्रत्येकाला वाटतं आणि ते वाटायलाही हवे. राजेंचा इतिहास हा जितका लढाईखोरीचा तितकाच अर्थनितीचा, तेवढाच युद्धनितीचा. आरमराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहितलं जातं. साडेतीनशे वर्षांपूर्वी समुद्रमार्गे शत्रूंचा धोका शिवाजी राजांनी लक्षात घेतला होता. एकविसाव्या शतकात आमच्या सरकारला हा धोका लक्षात आला नव्हता, परिणामी 26/11 हा रक्तरंजित दिवस ठरला. छत्रपती शिवाजी राजे दिव्यदृष्टीपेक्षा भविष्याचा वेध घेणारे राजे होते. अर्थकारण कसं असावं, राजकारण कुठं करावं, शेती कशी असावी, शेतसारा कसा ठेवावा, अर्थनितीमध्ये चलनाला किती महत्त्व द्यावं, ते चलन कोणी उभं करावं, कसं उभं करावं याचा ज्या माणसाला अभ्यास होता तो काहींच्या मते दैवदूत असला तरी आमच्या मते विज्ञान युगाला जन्म देणारा सर्वात मोठा आणि सर्वच क्षेत्रातला वैज्ञानिक शिवाजी राजे होते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. राजे जेवढे स्वराज्यावर प्रेम करायचे, स्वराज्य निर्माण करण्यासाठी जिवाचं रान करायचे तेवढेच राजे रक्तमांसाचे माणसं जोडायचे. म्हणूनच राजेंना स्वत:चं शेतपोत, घरदार विकून रायगड बांधण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारा हिरोजी इंदोरकर मिळू शकतो. स्वत:च्या पोराचं लग्न असताना लग्नापेक्षा गडावर आक्रमण करायला गेलेले तानाजी मालुसरे मिळू शकतात. काय म्हणावं, एक एक माणसांबद्दल कोण तोफेच्या आवाज होईपर्यंत खिंड लढवत लढवत प्राण सोडत नाही तर कोण पोटच्या पोराचं लग्न टाकून गड सर करायला जातो. कोण मृत्यूच्या पालखीत हसत-हसत बसतो तर कोण आपल्या राजाचं शब्द राखण्यासाठी भल्यामोठ्या मदमस्त हत्तीशी झूंज देतो. कोणी खोटा शिवाजी म्हणून मरणाच्या आंथरुणावर झोपतो तर कोणी 80 व्या वर्षी गड सर करताना तरण्याबांड शत्रूंना लोळवतो तर कोणी मिसरुट न फुटलेलं पोर पडणारे भगवे निशान सावरत विसएक शत्रुंना ठार करतो तर कोणी सात वीर मराठे 30 हजार फौजेशी जाऊन भेटतात. तर कोणी 60 मावळे गड जिंकून देतात. हे अल्पशे आणि छोटे उदाहरणं देण्याचे एवढेच कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं इतिहास, राजेंचं कर्तृत्व-कर्म, राजेंचा राजधर्म आणि राजेंचा रयतेविषयी असलेला आर्थिक, शैक्षणिक, शेती, पाणी याबाबतचं धोरण आणि रयतेबाबत मुलभूत गरजांविषयी राजेंचं असलेलं लक्ष हे प्रेरणादायी असताना खरच राजेंची आम्ही प्रेरणा घेतोय का? आज आम्ही राजेंचं भव्यदिव्य स्मारक उभारतोय परंतु त्याच राजेंच्या महाराष्ट्रात रयत सुखी आणि समृद्ध आहे काय? महिला-मुलींची अबू्र सुरक्षित आहे का? सर्वसामान्यातील सर्वसामान्यांची जान आणि माल आजही संकटात का आहे? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित एवढ्यासाठीच कराव्याच्या वाटतात. राजेंचं स्मारक होतय नक्कीच आमचा उर भरून येतोय, छाती चौडी होतेय. स्मारकाचं डिझाईन घमण्यातलं रक्त सळसळ वहातय, परंतु छत्रपतींच्या गड किल्ल्यांबाबत काय, त्यांच्या संवर्धनाबाबत काय, महाराष्ट्रातल्या मातीत नव्हे तर देशाच्या मातीत जन्मलेल्या पोरांना शिवाजी महाराजांची अर्थनिती, युद्ध निती, जलसंधारणाचे धडे, चलन व्यवस्थेची भूमिका, शेतसार्‍याची पद्धत, माणूस म्हणून माणसासारखं जगण्याची उर्मी शिकवली जातेय का, तर याचं उत्तर नाही येईल जन्माला आलेल्या कुठल्याही मुलाला आणि मुलीला यशस्वी करायचं असेल तर शिवचरित्र त्यांच्या नसानसात भिनायला हवं आणि तेव्हाच भिनलं जाईल जेव्हा शिक्षणामध्ये शिवचरित्र मोठ्या प्रमाणात घेतलं जाईल. आज स्मारक झालं, आता गडकोट किल्ल्यांचं संवर्धन आणि अभ्यासक्रमात शिवचरित्र यावं हीच अपेक्षा.
Chat Conversation End

Monday, 19 December 2016

उठो दोस्तो, जिले के हर एक गरीब को जगा दो ,

सरकार के दरो-दिवार हिला दो


मुसल्लम -ए-इमान तो मुसलमान


-गणेश सावंत- 9422742810

सत्यावर असत्य जेव्हा थयाथया नाचते, हक्क जेव्हा अडगळीला पडतात. न्याय जेव्हा अन्यायाची भाषा बोलतो तेव्हा अंतरमन सत्य-न्याय-हक्कासाठी पेटून उठल्याशिवाय राहत नाही. जेव्हा जेव्हा माणसा-माणसातलं अंतरमन पेटून उठतं तेव्हा तेव्हा शायर-ए-सरफरोशी बिस्मिल अजिमाबादी यांच्या या ओळी......



सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है 

देखना है जोर कितना बाजु-ए-कातिल मे है 


या ओठावर आल्याशिवाय राहत नाहीत. कारण बिस्मिल अजिमाबादींनी स्वातंत्र्यपूर्व काळात माणसा-माणसांना पेटून उठण्यासाठी अशा अनगिनत क्रांतीकारी शायरी करून माणसांना सत्य-न्याय आणि हक्कासाठी रस्त्यावर उतरवणं भाग पाडलं. आज स्वातंत्र्याच्या सत्तरीतही माणसांना ज्या मुलभूत गरजा मिळायला हव्यात, त्यांना जो न्याय आणि हक्क मिळायला हवा तो न्याय हक्क मिळत नाही. म्हणूनच स्वतंत्र भारतातला मुस्लिम समाज आजही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या पूर्णत: मागास आहे. मुस्लिम समाजाकडे स्वाभिमानसारखी दौलत सोडली तर त्यांच्या घरांमध्ये अठराविश्‍व दारिद्य्र कायम दिसून आलेलं आहे. स्वातंत्र्याच्या कालखंडात देशासाठी फासावर जाणारा मुस्लिम, इंग्रजांना पळताभुई करून सोडविणारा क्रांतीकारी मुस्लिम, भारतावर प्रेम करणारा मुस्लिम आज मात्र केवळ आरक्षण नाही म्हणून स्वत:च्या घरांमध्ये उंदरं खेळवित असल्यागत जिवन जगत आहे. जगाच्या पाठीवर सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून भारताकडे पाहितलं जातं. जगाच्यापाठीवर अठरा पगड जाती गुण्यागोविंदाने राहतात त्याला भारत म्हणतात आणि ही लोकशाही, ही एकता तेव्हाच निर्माण झाली जेव्हा सर्वप्रथम मौलाना हसरत मोहानी ऊर्फ फजलूर हसन यांनी जेव्हा सर्वप्रथम ‘इन्कलाब झिंदाबाद,’चा नारा दिला.

    मोहम्मद इकबाल यांनी तराना-ए-हिंदमध्ये ‘सारे जहॉं से अच्छा हिंदोस्ता हमारा, हम बुल-बुले है इसकी सारा गुलिस्तॉं हमारा, यातून भारताबाबत मुस्लिमांची मानसिकता दाखविली. असे एक ना अनेक शहीद स्वातंत्र्य सैनिक मुस्लिम समाजामध्ये जन्मले. संत-सुफींनी भारताला सर्वोच्च स्थान दिलं. मग भारत सरकारने मुस्लिमांना इतर समाजाच्या तुलनेत आजपर्यंत त्यांना मागास का ठेवले? सातत्याने मुस्लिम समाजाचा केवळ आणि केवळ मतांसाठीच वापर का केला? मुस्लिम समाज बहुसंख्यक नसला तरी लोकशाहीमध्ये तो निर्णायक आहे. याबाबतचे महत्त्व आजपर्यंतच्या सरकारला का पटले नाही. समाज सत्तेत नसला तरी सत्तेत कोणाला आणायचं हे पहात असताना त्या मुस्लिम समाजाच्या अर्थव्यवस्थेकडे मुस्लिमांच्या शिक्षणाकडे, आरोग्याकडे आणि दारिद्य्राकडे आजपर्यंत का लक्ष दिले गेले नाही. हे प्रश्‍न केव्हाही प्रश्‍नच राहतील. म्हणूनच आज देशभरातील मुस्लिम आपल्या न्याय-हक्कासाठी रस्त्यावर उतरत आहे. आपल्या भविष्याला म्हणजेच मुलांना शिक्षण आणि नोकर्‍या मिळाव्यात म्हणून आरक्षणासाठी टाहो फोडत आहे. हा टाहो स्वातंत्र्याच्या सत्तरीत जी पिडा सहन केली, जे दारिद्य्र नशिबी आले त्या दारिद्य्राच्या किनकाळ्या आज न्याय-हक्क आणि सत्य म्हणून टाहोच्या रूपात 20 डिसेंबरला मूक मोर्चाच्या स्वरुपात बाहेर येतात तेव्हा प्रत्येक मुस्लिम समाजातील लेकरांचे एकच ध्येय आहे ते म्हणजे

होय, आम्हालाही अन्सार शेख व्हाचयं

  जालन्याचा अन्सार शेख 20 वर्षाचा तरुण यूपीएससीमध्ये राज्यात प्रथम येतो, त्याची पार्श्‍वभूमी पाहितली, त्याची घरची परिस्थिती पाहितली तर प्रत्येक मुस्लिम घरातील मुला-मुलींचे ध्येय काय असू शकते हे लक्षात येईल. अन्सार शेखचे वडील रिक्षा चालवितात. घरामध्ये अठराविश्‍व दारिद्य्र आहे, तीन आया आहेत, भाऊ बहीण आहेत, परंतु अन्सारकडे 21 व्या शतकातील दृष्टी होती, भविष्याचा वेध होता, म्हणून त्याने हॉटेलमध्ये काम केलं, टेबलं पुसले, कप-बशा धूतल्या आणि आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वत:ला अभ्यासामध्ये झोकून दिलं. त्या लेकराला यश आलं आणि तो यूपीएससीच्या परीक्षेमध्ये पहिला आला. अभ्यास करत डोळे फोडले, डोळे लाल केले तेव्हा कुठे त्याच्या डोक्यावर लाल दिवा आला. हा अपवाद असला तरी असंख्य मुस्लिम समाजातील मुलं-मुली एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षेत केवळ आरक्षण नसल्यामुळे अर्ध्या आणि एक मार्काने मागे जातात. दहावीपासून तीच परिस्थिती मुस्लिम समाजाला अनुभवयास मिळते. मग दारिद्य्रात खितपत पडलेल्या मुस्लिम समाजातील या भविष्याच्या वेध घेणार्‍या लेकरांचं भविष्य केवळ आरक्षण नाही म्हणून काळवंडत असेल तर याविरुद्ध आवाज बुलंद झालाच पाहिजे. म्हणूनच 20 तारखेच्या मूक मोर्चाला जिल्हाभरातून आणि घराघरातून प्रत्येक मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आरक्षणामुळे जर शिक्षण आणि नोकर्‍याचा प्रश्‍न मिटून मुस्लिम समाजातलं अठराविश्‍व दारिद्य्र संपुष्टात येत असेल तर ते आरक्षण मुस्लिमांचा हक्क समजून सरकारने द्यायलाच हवा. सध्या देशामध्ये आरक्षणावर काहुर माजलं. मता-मतांतरे दिसूनही येतात. 52 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, असं सांगितलंही जातं. परंतु आम्ही तर सहज आणि सोप्या भाषेत सांगू. 

52 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येते

   आरक्षणासाठी कायदेशीर बाबी तपासणं हे सरकारचं आणि कर्त्याधर्त्यांचं आद्य कर्तव्य आहे. म्हणूनच आम्ही मोठ्या जबाबदारीने सांगतो, मुस्लिम आरक्षणाबाबत इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार हा सर्वोच्च न्यायालयाचा अत्यंत गाजलेला खटला समजून घ्या. 16 नोव्हेंबर 1992 रोजी या खटल्याचा ऐतिहासिक निकाला लागला आणि त्यानंतर मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली. कोणत्याही नवीन मागास प्रवर्गाचा यादीत समावेश करण्यापूर्वी या आयोगाचा सल्ला घ्यावा लागतो. इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे की, ‘मागासवर्ग कोणता हे न्यायालय ठरवू शकत नाही, त्याचबरोबर मागासवर्ग ठरवण्यासाठी मार्गदर्शक निकष कोणते हे ठरविणेही कोर्टाला शक्य नाही यामुळे राज्यानेच याबाबत निकष ठरवून कोर्टासमोर पुरावे ठेवणे आवश्यक आहे.’ मुस्लिम आरक्षणाबाबतही सरकारने असे पुरावे ठेवायला हवेत. एखादा वर्ग सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे की नाही हे ठरविण्यासाठी या वर्गाची जात, त्यांचा पारंपारिक उद्योग, त्यांचे निवासाचे ठिकाण, गरीबी, शिक्षण आणि शिक्षणाची पत यावरून निर्णय घेता येईल. अर्थात हे निकषही सर्वसमावेश नसून याला आणखीही निकषाची जोड असू शकते. याच खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण किती असावे याबाबत काही नोंदी केल्या आहेत. त्यांची त्यामागची स्वच्छ भूमिका लक्षात घेऊनच आरक्षण देणे आवश्यक आहे. 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असू नये, अशी केवळ मार्गदर्शक धारणार आहे. हा कायदा नाही. 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण दिले जाऊ शकते मात्र हे आरक्षण देताना त्या त्या वर्गाचे आरक्षणासाठीचे निकष तपासणे अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या राज्यातील 85 टक्के लोकसंख्या जर मागास असेल तर त्या राज्यात तितके आरक्षण दिले जाऊ शकते. एखाद्या वर्गाला आरक्षण देताना त्या वर्गात मागास असल्याचे संख्याबळ निश्‍चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा दाखविताना संख्याबळाची नोंद सर्वात महत्त्वाची ठरते. ही नोंद जोपर्यंत पूर्ण पुराव्यानिशी होत नाही तोपर्यंत अशा वर्गाला आरक्षण दिले जाऊ शकत नाही. आमचं म्हणणं केवळ एवढच आहे, इंदिरा सहानी खटल्यामध्ये ज्या पद्धतीने यश संपादित करता आले त्या पद्धतीनेच मुस्लिम आरक्षणाबाबतही यश संपादित केले तर नक्कीच भंगार, ब्रेड, पेप्सी, आईसकांडी, सुया-पिना, फुगे, गॅरेज यासह अत्यंत हलके काम परंतु स्वाभिमानाने कष्टकरून जिवन जगणार्‍या मुस्लिम समाजाला आणि त्या घरामधील माणसांना मानसिक दृष्ट्या बलशाली बनवता येईल. परंतु भारतामध्ये आजपर्यंत आक्रोश केल्याशिवाय, बंड केल्याशिवाय किंवा ‘इनक्लाब झिंदाबाद’चे नारे दिल्याशिवाय काहीही होत नाही. तेही खरं आहे म्हणा, रडल्याशिवाय माय पाजत नाही हे आपल्याकडे म्हटलं जातं. 

म्हणूनच आम्ही स्वत: बीड जिल्ह्यातल्या मुस्लिम बांधवांना जाहीर 

आवाहन करतोय,


उठो मेरे दोस्तो, जिले के हर एक गरीब को जगा दो ,

सरकार के दरो-दिवार हिला दो 


काबील होकर भी मयस्सर न रोजी


आरक्षण के साथ सत्य हक़ को आवाज दो

आता अठराविश्‍व दारिद्यामध्ये खितपत पडायचे नाही. आरक्षण हे हक्काचं आहे, तुमच्या माझ्या लेकरांच्या भविष्याचा आहे, भवितव्याचा आहे, त्यामुळे जो सच्चा मुसलमान आपल्या परिवाराचं भविष्य आणि भवितव्य लक्षात घेतो तोच मुसल्लम -ए-इमान असतो हे लक्षात ठेवूनच 20 तारखेचा मोर्चा महाराष्ट्रातला सर्वात मोठा शांततेला, शिस्तीतला मोर्चा ठरेल हे पाहूनच आपल्या न्याय-हक्क आणि सत्यासाठी रस्त्यावर यायचे.

Monday, 12 December 2016

सा दै बीड रिपोर्टर मधील आज १२ डिसेम्बरचा अग्रलेख 

दानत...

-गणेश सावंत- 9422742810



दानत या शब्दाचा अर्थ काय? दानत या शब्दाची व्याख्या काय? दानत या शब्दाची ताकद काय? दानत या शब्दाची महती काय? दानत या शब्दात दडलयं काय? हे प्रश्‍न जेंव्हा पडतात, तेंव्हा वरील ङ्गोटो पाहितला की, अलगदपणे दानत या शब्दाचे यथोयोचित अर्थ, व्याख्या, ताकत, महती उमजल्याशिवाय राहत नाही. नुसता अर्थ किंवा महती उमजून येत नाही, तर संघर्षाची उर्मी जागी झाल्याशिवाय राहत नाही. संघर्ष कसा असतो? संघर्ष कशाला म्हणायचे? संघर्ष कसा करावा लागतो? संघर्ष सत्य आहे की, असत्य. संघर्ष खरा आहे की खोटा. त्याची सुरुवात कोठून करायची? आणि शेवट कसा करायचा? आणि हो, त्या शेवटाचे ङ्गलित काय असेल? याचे इत्तेनभूत उदाहरणासह सारांश हा ङ्गोटो पाहितलाच की, तुम्हा आम्हाला मिळेल. समाज जीवनापासून राजकीय जिवनापर्यंत नव्हे-नव्हे तर ग्रामीण जिवनापासून शहरी जिवनापर्यंत ज्या माणासाचा प्रवास संघर्षमय झालेला असतो. या संघर्षात तो यशाची पताका ङ्गडकवत असतो. तेंव्हा त्या माणसातला माणुसकीच्या अंशाचा अंत झाल्यागत अनुभव येतो. परंतू इथं हा अनुभव आलेला नाही. उलट जशी- जशी यशाची पताका ङ्गडङ्गडङ्गड ङ्गडकत राहिली. तशी माणुसकी या माणसामध्ये कायम जिवंत राहिली. वरचा ङ्गोटो पािहतल्यामुळे आणि या अग्रलेखाचे शिर्षक दानत हे ठेवल्यामुळे महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या माणसाला हा लेख कोणाबद्दल लिहिला जातोय, हे सांगण्याची गरज नाही. कारण कुठलाही राजकीय वारसा नाही. घरामध्ये कोणी राजकारणामधला हस्तक नाही. तरीही एखादा माणुस गावच्या सरपंचापासून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांपर्यंत आणि दिल्लीच्या तख्तापर्यंत जो जावून पोहचतो, तो माणूस एक तर धुरंधर क्रांतीकारी अथवा सामाजिक दृष्टीकोन ठेवणारा संतच असू शकतो. बीड जिल्हा तसा भाग्यवान. जसा या देशाला, महाराष्ट्राला भूगोलाबरोबर इतिहास आहे. तसा त्या इतिहासाच्या पानामध्ये बहुतांश पाने हे बीड जिल्ह्याच्या इतिहासाचे असतीलच. दुर्देवाने आणखी एक इतिहासाचं पान 2014 मध्ये स्व. गोपीनाथ मुंडेंसाठी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात लिहिलं गेलं. सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानलिये नाही बहुमता हा सिद्धांत तंतोतंत साहेबांबाबत लागू होतो. सत्य आणि असत्य याची सांगड राजकारणाबरोबर समाजकारणाशी जोडून तळागाळातल्या माणसाला उभं करर्‍याचं काम आणि तरुण पिढीला स्वत:च्या संघर्षातून संघर्षाबाबत माहिती देण्याचं आणि कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची उर्जा देण्याचे प्रयत्न स्व. गोपीनाथराव मुंडेंनी स्वकर्मातून आमच्या पिढीला दिले. एखाद्या शेतकर्‍याचं लेकरू जेंव्हा टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रिम असं म्हणत अशक्य ते शक्य करण्याचं स्वप्न पाहतं नव्हे नव्हे तर ते स्वप्न पूर्ण करतं तेंव्हा त्याच्या पावलावर चालणार्‍यांची संख्या तेवढीच मोठी होते आणि या संख्यात्मिक गणितामध्ये जेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रात संघर्षमय माणसाच्या जिवनातल्या भुतकाळातील गोष्टी लक्षात ठेवून आमच्यासारखी पिढी आपआपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होते तेव्हा त्या पिढीतल्या आणि त्या संख्यात्मिक गणितामधल्या एक एक अंकाला गोपीनाथ मुंडेंची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय भीष्माचार्य अनेक असतील, त्यांचे शिष्यही तेवढेच असतील परंतु शिष्य आणि भीष्माचार्य महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच राहील ते म्हणजे साहेब. त्याचं कारणही तसच आहे. ज्या माणसाच्या संघर्षमय जिवनाची गाथा ऐकून त्या माणसाच्या विजयी मिरवणुकांमध्ये 

काळही नाचतो

अनेक वेळा काळाला अक्षरश: या संघर्षमय माणसाच्या जिवनाच्या यशोगाथेबाबत हेवा वाटला, काळाने या संघर्षमय माणसाला भीती दाखविण्यासाठी काही वेळा छोटेमोठे अपघात घडविले,पण या काळाला तेव्हा या संघर्षमय माणसाला आपल्यासोबत घेऊन जाण्याची ताकत मिळाली नाही. कारण साहेबांच्या संघर्षमय जिवनाची प्रत्येक पायरी ही सत्य आणि कर्माबरोबर स्वकर्तृत्वाने रचली गेलेली होती आणि ही प्रत्येक पायरी चढायची आणि साहेबांना सोबत घेऊन जायची क्षमता आणि शक्ती त्या काळाला नव्हती. म्हणूनच वेळोवेळी जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष सुरू केला आणि त्या संघर्षातून एक बलाढ्य नेतृत्व स्वत:च्या खांद्यावर घेतलं तेव्हा तेव्हा हा काळ गोपीनाथ मुंडेंच्या विजयी मिरवणुकीमध्ये कडेला उभा राहून मोठ्या ईर्ष्येने गोपीनाथ मुंडेंकडे पाहत असे. काय म्हणावं या माणसाला एवढा संघर्ष करण्याची ताकत याला कोणी दिली. याला एखादा देव प्रसन्न आहे का, असे एक ना अनेक प्रश्‍न त्या काळात पडले असतील. परंतु संघर्ष हा पाचवीला पुजल्यागत गोपीनाथ मुंडे ज्या पद्धतीने आपलं जिवन जगत ती पद्धत राना-वनातल्या कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांसारखी असायची या कास्तकर्‍यांचे, कष्टकर्‍यांचे स्वप्न हेच माझे स्वप्न हे साहेब धाडसाने सांगायचे तेव्हा काळालाही वाटायचं हा आपला बाप आहे. म्हणूनच तर वेळोवेळी जेव्हा केव्हा साहेबांच्या विजयी मिरवणुका निघाल्या, गुलालाची उधळण होत राहिली तेव्हा तेव्हा साक्षात काळ मुंडेंच्या मिरवणुकीमध्ये कमरेवर हात देऊन नाचला. पण काळ तो काळच होता त्याला साहेबांचं यश बघवत नव्हतं, साहेबांजवळ येणारी माणसं त्याला पहावत नव्हती, साहेब ज्या माणसांबाबत आपलं सर्वस्वपणाला लावतात तेही काळाला खुपायचं म्हणूनच तर साहेब जेव्हा सह्याद्रीचा पर्वत ओलांडून दिल्लीच्या तक्तापर्यंत गेले तिथच आणि तिथच काळाने संधी साधली. हमखास पाठीमागे राहिलेला काळ दिल्लीच्या एका रस्त्यावर साहेबाला आडवा आला आणि गेल्या दोन वर्षापूर्वी एका छोट्याशा अपघातामध्ये काळाने साहेबांना सोबत नेले. काळ तेव्हा खिदीखिदी हसला असेल. अरे ज्या माणसाने मला उभे चार दशके स्वत:च्या विजयी मिरवणुकीमध्ये नाचायला लावलं तो दानतवीर आज मी घेऊन जातोय. याचा त्याला अभिमानही वाटला असेल, परंतु काळाने हे माहित नव्हतं तो साहेबांना घेऊन गेला, साहेब शरीराने आमच्यामध्ये नसतील परंतु साहेबांचा संघर्ष, साहेबांचे कर्म-धर्म, कतर्ृत्व त्यांचे संदेश, त्यांचे आदेश आणि त्यांचं हृदय, मन आजही बीड जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या तनातनात आणि कणाकणामध्ये कायम असेल. काळाला जेव्हा हे उमजलं तेहा वेळ निघून गेलेली होती. काळालाही आता पश्‍चाताप होत असेल. साहेबांची त्याच्यासोबत गरज नव्हती, साहेबांची गरज होती ती इथं, महाराष्ट्राच्या मातीला आणि 

दिल्लीच्या तक्ताला

उभं आयुष्य सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसासाठी खर्च करणारा हा अनाथाचा नाथ कायम चार दशके सत्तेच्या बाहेर संघर्ष करत राहिला. गोपीनाथ मुंडेंचे सत्य, कर्तृत्व, कर्म कळायला महाराष्ट्राच्या माणसाला 40 वर्ष लागले. शेवटी महाराष्ट्राने आणि देशाने गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न साकार केले. देशात आणि महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आणली, दुर्दैवाने सत्तेच्या या हिरवळीवर थकून भागून राहिलेल्या साहेबांना थोडंाही आराम करता आला नाही. परंतु आराम हराम है, हे गोपीनाथ मुंडेंना माहित होते म्हणूनच उभ्या आयुष्यात आराम या शब्दाला स्वत:जवळ कधीच त्यांनी ठेवून घेतलं नाही. अरे ज्या भाजपाला शेटजी भटजींचा पक्ष म्हणून ओळखलं जायचं त्या भाजपाला तळागाळातल्या सर्व जात-पात-धर्मातल्या घराघरांमध्ये नेऊन पोहचविणारा हा नाथ जेव्हा सर्वांना अनाथ करून गेला तेव्हा अलगतच महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून ‘परत या परत या, साहेब तुम्ही परत,’ या या किणकाळ्या बाहेर पडल्या. गोपीनाथ मुंडे हा एक असा लाव्हा रस होता की तो फक्त नि फक्त सर्वसामान्य माणसाच्या न्यायासाठीच उफळून यायचा. पक्षामध्ये कानकुण झाली, पक्षाने सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष केलं आणि साहेबाने नुसती नाराजगीही दाखविली तर उभा महाराष्ट्र नव्हे तर देश साहेबांच्या नाराजीला बंड म्हणून पहायचा, ही ताकत साहेबांच्या नाराजगीमध्ये होती. विरोधक हा निवडणुकीपुरता असतो हे धोरण साहेबांपेक्षा अन्य राजकारण्यांनी कधीही अंगीकारलेलं नव्हतं. 

    बीड जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात साहेबांमुळेच अनेक राजकीय विधुरांना कपाली गुलाल लागल्याचंही सांगितलं जातं आणि ते सत्यही आहे. साहेबांबाबत बोलावं तेवढं कमी आहे, लिहावं तेवढं कमी आहे कारण आम्ही सातत्याने म्हणत आलोत साहेब हयात असताना साहेबांच्या विरोधात लिहायचं असेल तर अगोदर 70 टक्के चांगलं लिहावं लागेल तेव्हा कुठं 30 टक्के त्यांच्या त्रुटी लिहिता येतील. जितकी साहेबात दानत, तितकेच साहेब प्रेमळही हे सांगायची, बोलायची आणि लिहायची गरज नाही. लिहायला भरपूर काही आहे, आमच्या वैयक्तिक आठवणीही आज उचंबळून येत आहेत परंतु जो माणूस काळाला स्वत:च्या मिरवणुकीमध्ये नाचवू शकतो त्या माणसाचे कर्तृत्व कर्म आणि संघर्षमय जिवन आम्या पिढीला यशस्वी करून दाखवू शकते एवढेच याठिकाणी सांगू आणि या धिरोदत्ताला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहू.

Sunday, 4 December 2016

‘माझ्याच देशातील काही लोक माझ्यावर आरोप करतात, त्याचे मला आश्‍चर्य वाटते, आजपर्यंत देशाला लुटणार्‍यांना जबाबदारीची जाणीव करून देणं चूक आहे का? भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर हल्ला करून मी गुन्हा केलाय का? मी तुमच्यासाठी लढाई लढतो आहे, भ्रष्टाचारी करून करून काय करतील, मी फकीर आहे, मी झोळी घेईल आणि चालू लागेल
- इति नरेंद्र मोदी 

----------------------------------------------------------------------------------------------------

तुम्ही फकीर झालात, लोकांनी 

तिराळं व्हायचं की मुखिया ! 

-----------------------------------------------------------------------------------------------------

-गणेश सावंत-


नोटबंदीच्या निर्णयाने नक्की काय होणार, काळा पैसा बाहेर येणार काय? याबाबत अद्याप तरी सर्वजण अंधारातच आहेत. आजही जनता रांगेत उभी राहिलेली दिसेल. स्वत:च्या पैशासाठी सर्वसामान्यांना सरणावर जावे लागत आहे. खरचं अच्छे दिनची गुहार लावणार्‍या सरकारने घेतलेल्या या निर्णयाची दिशा भारताला आर्थिक महासत्ताकतेकडे घेऊन जाणारी आहे काय? तशी असेलच तर गेल्या चार आठवड्यांच्या कालखंडात देशातील कुठली परिस्थिती सुधारली? काळ्या पैशाविरुद्ध फास आवळले जात असल्याची आवई उठवली जाते, किती काळ्या पैशावाल्यांना या चार आठवड्यात पकडलं. याचं उत्तर सध्यातरी हो आणि नाही अशा प्रकारचं देण्यापेक्षा नंदी बैलाला पाऊस येणार का? असा प्रश्‍न विचारल्यागत बैल जी मुंडी हलवतो त्याच मुंड्या आता हलताना दिसतायत. आम्हालाही काळ्या पैशाच्या विरुद्ध चिड आहे, नव्हे नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकाला याची चिड असणारच. परंतु चार आठवड्यांचा कालखंड उलटला तरी सरकारच्या हाती काहीच लागत नाही. उलट ज्या रयतेसाठी हा खटाटोप चालू आहे त्या रयतेला मात्र प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मात्र अशा स्थितीतही केवळ अच्छे दिनचे स्वप्न पाहता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम’च्या मनसुब्याखातर नोटबंदीचा निर्णय योग्य असल्याचे सांगत देशवासीय मोदींच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. ते केवळ आणि केवळ 

तिराळ्यापणामुळे

एका गावात एक बांगा, तिराळा राहत होता. गावातले लोक त्याला आंधळा, डुचका म्हणून चिडवत. त्याला लोकांचा राग येई. याचा बदला घेण्याचंही तो ठरवी.परंतु त्याला बदला घेता येत नव्हता. एके दिवशी त्याने स्वत:चा एक डोळा फोडला आणि गावभर डोळा फोडल्याने देव दिसतो म्हणून डांगोरा पिटवला. ही माहिती गावच्या मुखियापर्यंत गेली. देव पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या मुखियाने आपले दोन्ही डोळे फोडून घेतले. मुखियाला देव काही दिसला नाही. मुखिया तिराळ्याकडे गेला, देव दिसत नसल्याचे सांगितले. तिराळा म्हणला, मुखियाजी , तुम्ही जर देव दिसत नाही म्हणून सांगितलं तर लोक तुम्हाला मुर्खात काढतील. आपण मुर्खात निघू नये म्हणून मुखियाही गावभर डोळे फोडल्याने देव दिसतो म्हणून डांगोरा पिटू लागला. बघता-बघता अख्ख्या गावाने देव पाहण्यासाठी डोळे फोडून घेतले. पदरी मात्र भविष्याचा अंधार आला. तिराळ्याचा बदला पूर्ण झाला, तशी परिस्थिती आज नोटाबंदीच्या बाबतीत घडती की काय, देशातील सर्वजण म्हणतात, निर्णय चांगला परंतु प्रतिप्रश्‍न निर्णय कसा चांगला याला उत्तर मात्र कोणाला देता येत नाही. अर्थतज्ज्ञांनी एकाच अर्थशास्त्रावर अभ्यास केला, परंतु अर्थतज्ज्ञांचे मत मात्र भिन्न-विभिन्न पहावयास मिळाले. आजची परिस्थिती पाहितली तर धनदांडग्यांचं कुठंही वाकडं झालेलं दिसलं नाही. सर्वसामान्यांच्या लेकीबाळींना बँकेच्या रांगेत उभे राहून बाळांत व्हावं लागलं. म्हातार्‍या बाबाला दोन-पाच हजार रुपये काढण्यासाठी रांगेत उभं राहता-राहता मरण पत्कारावं लागलं. रांगेत उभे राहून राहून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांना मरण स्वीकारावं लागलं आहे. दवाखान्यामध्ये हलगर्जीपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाला तर तिथं डॉक्टरला जबाबदार धरलं जातं. नोटबंदीच्या निर्णयावर देशभरात पन्नासपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. याची जबाबदारी कोण घेणार? सरकारला दोषी ठरवलं जाणार आहे की नाही? की नोटबंदीच्या निर्णयावर मुखियाच्या पाठिशी डोळे फोडून घेणार्‍या देव पाहण्यासाठी आशावादी असणार्‍या लोकांच्या पाठिराख्यावर 

‘मी फकीर आहे,’ 

मी झोळी घेऊन जाईन, एवढ्याशा भावनिक आवाहनावर देशातली विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा व्यवस्थित बसणार आहे का? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित राहण्याचे कारण एवढेच, काळ्या पैशावाल्यांचे मुस्काट रंगविण्यासाठी आखलेली ही योजना एखाद्या ‘तिराळ्या’च्या बदल्याच्या मनसुब्यासारखी तर नव्हे ना? कारण आज आपण देशात कुठेही जा सर्वसामान्यांना नोटबंदीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसल्याचं दिसून येतं. आमच्या मराठवाड्यामध्ये गेल्या चार वर्षात दुष्काळ होता, आमच्याकडे दोन पैसे पहायला मिळत नव्हते. योगायोगाने यावर्षी पाऊस झाला. कापसाला बोंडं फुटली, पांढरं सोनं दारात आलं, परंतु नोटबंदीमुळं ते बाजारात घेऊन जाताना मात्र तोंडाला फेस आला. नव्या नोटा पाहिजे तर 4 हजार क्विंटल आणि जुन्या नोटांवर साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल म्हणजे इथेही सर्वसामान्यांची दीड हजाराला चांगली मारली! हे बहुदा फकीर असणार्‍या व्यक्तिांना  आणि झोळी उचलण्याची भाषा करणार्‍या 21 व्या शतकातील कौटल्यांना माहित नसावं. देशातला सर्वसामान्य नोटबंदीमुळे जेवढा त्रस्त झाला आहे तेवढ्या प्रमाणावर खरचं काळा पैसा बाळगणारा त्रस्त झाला आहे काय? टॅक्स बुडविणारे इमानदारीने बँकेच्या रांगेत उभे राहिलेले पाहिले आहेत काय? ज्या हिमतीने आणि ज्या दिमतीने हा निर्णय घेतला आणि काळा पैसा गंगेत वाहिला जाईल, असा आशावाद ठेवला त्या सरकारच्या आशावादाला काळ्या पैशावाल्यांनी हरताळ लावली आणि काळ्याचे पांढरे पैसे करण्याची मोहीम उघडत ती मोहीम जणू काही फत्तेही झाली. मग आमचा प्रश्‍न आहे, लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालविलेल्या लोकशाहीच्या राज्यात सर्वच बेईमान आहेत का? अख्ख्या देशवासियांना

आम्ही इमानदार !


आहोत. हे फकीराला का सांगावं, झोळीवाल्याला का सांगावं? असा जळजळीत सवाल आम्ही जर विचारला तर नक्कीच आमचा राग येईल. परंतु मोदीजी, तुम्ही जेंव्हा माईकवर येता आणि ‘मेरे भाईयो और बहनो,’ असा सूर आवळता तेव्हा बेईमानापासून सर्व इमानदारांना गळ्याला फास आवळल्यागत वाटतं, ते केवळ दहा-पाच बेईमानांमुळे अवघ्या देशातील नागरिकांना आम्ही इमानदार आहोत आम्ही इमानदार आहोत हे बँकेच्या रांगेत उभे राहून सांगावे लागते, पटवून द्यावे लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सांगतो, या देशाचा कायदा सांगतो, शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील परंतु एका बेकसुराला शिक्षा झाली नाही पाहिजे. मग आता तर काळ्या पैशेवाले बिनदिक्कत घरात पडून आहेत. त्यांची तूपरोटी चालू आहे, परंतु जे इमानदार आहेत, ज्यांना रोज रोजीरोटीसाठी कामावर जावं लागतं त्यांना मात्र बँकेच्या रांगेत उभा राहून आम्ही इमानदार असल्याचं सर्टिफिकेट द्यावं लागतं. मालवणी भाषेमध्ये एक म्हण आहे, ‘वाहघ पडला वाळी आणि केल्डा दाखवतो नाळी,’ म्हणजेच जंगलचा राजा वाघ पिंजर्‍यात अडकल्यानंतर क्षुद्र माकड त्या पिंजर्‍यासमोर येऊन स्वत:च्या जनेंद्रिया हलवत त्या वाघाची अवहेलना करतो. तीच परिस्थिती माझ्या देशातल्या इमानदार, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळे, इमानदार व्यापारी, उद्योगपती यांची आज झाली आहे. आम्ही नोटबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं, आम्ही म्हटलंही काळ्या पैशावाल्यांना झोप येणार नाही, आम्ही मात्र निवांत झोपू, परंतु अर्थव्यवस्थेची घडी जेवढ्या गतीने बसायला हवी होती तेवढ्या गतीने ती बसली नाही किंवा सरकारला ती बसविता आली नाही. याचं कारण शोधणंही गरजेचं आहे. एवढा मोठा निर्णय घेऊन देशाला आर्थिक गोंधळात टाकून, व्यवहार ठप्प ठेवून यातून चांगलं घडलच नाही, तर मग या दोन महिन्याच्या कालखंडात देशातल्या 125 करोडपैकी शंभर करोड सर्वसामान्य लोकांना जो त्रास झाला त्याचं देणं कोण देणार? त्या पापाचे भागिदार कोण होणार? आज जी परिस्थिती आहे, नोटबंदीच्या ऐतिहासिक दृष्टीने सर्वसामान्य सहन करण्याच्या मानसिकतेत आहेत परंतु यातून अघटीत घडलं आणि सहनशीलतेचा बांध फुटला तर त्या परिणामांना सामोरे जाण्यास देशाला परवडेल काय? आज या निर्णयामुळे देशात जी परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती सावरण्याचं काम जेव्हा मोदी करतील आणि सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसांना या दोन महिन्याच्या कालखंडात झालेल्या त्रासाचा मोबदला महागाई कमी करून शिक्षण, आरोग्य आणि देशवासियांच्या मुलभूत गरजा पूर्ण करून जेव्हा देतील तेव्हा नोटबंदी ही सर्वसामान्यांसाठी चांदी दिसेल.


contact= 9422742810 & ganesh.sawant4@gmail.com

www.beedreporter.com