Sunday, 25 December 2016

आनंदाची डोहे..! पण ?

-गणेश सावंत-

9422742810



                     
ष्टवर्धान जागृत, अष्टप्रधान वेस्टीत, न्यायलंकार पंडित, शस्त्राशस्त्रशास्त्र  पारंगत राजनिती धूरंधर प्रौढप्रताप पुरंधर, क्षत्रिय कुलावंत, सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की...!  शी ललकारी साडेतीनशे-चारशे वर्षानंतरही कानावर पडली की, महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या मातीत निपजलेल्या जिवंत माणसांच्या मुखातून जय केव्हा बाहेर पडतं हे त्यालाही माहित होत नाही. काय ती ताकत शिवछत्रपतींच्या कर्तृत्व कर्माची आणि काय ती महती छत्रपतींच्या स्वराज्य धर्माची आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा आलेख याची देही याची डोळा अखंड देशाला नव्हे तर जगाला पाहता यावा म्हणून अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्यदिव्य स्मारक उभा राहतय. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काल जेव्हा शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन झाले तेंव्हा समुद्रातील अजाज्र लाटांनाही हायसं वाटलं असेल. उंच उंच उडणार्‍या लाटा काल केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक याठिकाणी उभारायचं म्हणून दूरच कुठं अडल्या जात होत्या की काय, म्हणूनच काल सागरही शांत दिसून येत होता. महाराष्ट्राची किर्ती केवळ आणि केवळ राजा शिवछत्रपतींच्या कर्तृत्व, कर्मामुळेच जगाच्या पाठिवर अजरामर आहे. आज जरी शिवछत्रपतींचे स्मारक उभा करून त्या 16 हेक्टरमध्ये तरी महाराष्ट्रातील शिवबांचं स्वराज्य भविष्यात तुम्हा-आम्हाला अनुभवता येईल. बाकी महाराष्ट्र असो की, देश असो त्याठिकाणी स्वराज्य असेलच हे सांगणे कठीण. आज जरी छत्रपतींच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं असलं तरी छत्रपतींच्या कर्तृत्वाला स्मारक तयार करून मुजरा घालणं हा छत्रपतींचा सर्वात मोठा सन्मान असेल, असं म्हणणं अत्यंत मुर्खपणाचं ठरेल. आम्ही मोठ्या जबाबदारीने म्हणतोत, छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड हा राज्यातील तळागाळातल्या सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसापासून कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, कास्तकर्‍यांपर्यंत न्याय हक्काबरोबर त्याला त्याच्या मुलभूत गरजा मिळणं आणि मिळवून देणं हे राज्यकर्त्यांचं आद्यकर्तव्य. हे कर्तव्य पूर्ण केलं म्हणजे छत्रपतींच्या महाराष्ट्रात छत्रपतींना मानाचा मुजरा घालणं होय आणि हा मानाचा मुजरा खर्‍या अर्थाने तेव्हाच घातला जाईल जेव्हा महाराष्ट्रातील छत्रपतींचे गडकोट, किल्ले पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून केला जाईल. आजपर्यंत छत्रपतींच्या कर्तृत्व, कर्माला काही तथाकथीत लोकांनी झाकण्याचा प्रयत्न केला. एकअंगी छत्रपती दाखविण्याचा खटाटोपही झाला. परंतु शिवाजीराजे हे सूर्य आहेत. कोंबडा झाकून ठेवल्याने सूर्य उगवायचं थांबत नाही हे महाराष्ट्राने पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्माचे रक्षक होते आणि ते केवळ 
मुस्लिमांचेच दुश्मन 
     होते, शिवाजी महाराज तलवार चालवायचे, युद्धखोर होते, लूट करत असायचे, असा काहीसा अत्यंत खोटारडा इतिहास मनुवाद्यांनी मधल्या काही दशकांमध्ये लिहिला आणि शिवाजी महाराजांना एका धर्माच्या चौकटीमध्ये बिनधास्त बसवलं. धर्माच्या चौकटीत बसवताना ह्या खोटारड्या इतिहासकारांनी राजेंच्या इतिहासालाच नव्हे तर त्यांच्या कर्तृत्व कर्माबरोबर इभ्रतीलाही पेनाच्या टोकदार ब्लेड लावण्याचा प्रयत्न केला. परंतु राजे जेवढे मर्दानी होते तेवढेच त्यांचे कर्तृत्वही ज्वलंत होते. ते कर्तृत्व कर्म झाकल्याने झाकून जाणार नाही. म्हणूनच चालू दोन-तीन दशकांपासून महाराष्ट्राच्या मातीत नव्हे तर देशाच्या मातीत निपजलेल्या आणि बहुजनांच्या कुषिमध्ये जन्मलेल्या नव्या तरण्याताठ्या पोरांनी पुन्हा एकदा छत्रपतींचा इतिहास वाचला, गडकोट, किल्ल्यांना भेटी दिल्या. मग हे नवे इतिहासकार सर्व जात-पात-धर्म-पंथातले होते. त्यांना हवा होता तो केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास. त्यांना हवे होते रयतेचे राजे शिवाजी महाराज आणि बघता बघता खोटारड्या इतिहासकारांच्या कानसुलात हाणावं तसं नव्या इतिहासकारांनी पुराव्यानिशी खरे छत्रपती जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. ते काही प्रमाणात यशस्वीही झाले, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानांचे विरोधक नव्हते हे पुन्हा-पुन्हा सिद्ध झाले. विरोधक असते तर त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिमांच्या तुकड्या नसत्याच. स्वत: शिवाजी महाराजांचे बॉडीगार्डही मुस्लिम नसते. हे जेव्हा हिंदू धर्मातील बहुजनांना समजले आणि उमजले आणि मुस्लिमांनाही जेव्हा हे लक्षात आले तेव्हा पोटपुजा करणार्‍या तथाकथीत खोटारड्या इतिहासकारांचे लक्तरे वेशीला टांगली गेले आणि ते निस नागवे झाले. खरा इतिहास समोर आला. छत्रपती हे कोण्या एका धर्माचे नव्हे तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारे एक राजे होते. म्हणूनच काल-परवा महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चे निघाले आणि या मोर्चांना पाठिंबा मुस्लिमांनीही दिला. नव्हे नव्हे तर आजही मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की, आपल्या मुख्यातून जय म्हणतात. खरं यश त्या स्मारकापेक्षा हे असायला हवं, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणूनच स्मारक होतय हे अत्यानंदाची बाब. पराकोटीचा आनंद नक्कीच आहे म्हणूनच
आनंदाचे डोहो 
आनंद तरंग असं प्रत्येकाला वाटतं आणि ते वाटायलाही हवे. राजेंचा इतिहास हा जितका लढाईखोरीचा तितकाच अर्थनितीचा, तेवढाच युद्धनितीचा. आरमराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहितलं जातं. साडेतीनशे वर्षांपूर्वी समुद्रमार्गे शत्रूंचा धोका शिवाजी राजांनी लक्षात घेतला होता. एकविसाव्या शतकात आमच्या सरकारला हा धोका लक्षात आला नव्हता, परिणामी 26/11 हा रक्तरंजित दिवस ठरला. छत्रपती शिवाजी राजे दिव्यदृष्टीपेक्षा भविष्याचा वेध घेणारे राजे होते. अर्थकारण कसं असावं, राजकारण कुठं करावं, शेती कशी असावी, शेतसारा कसा ठेवावा, अर्थनितीमध्ये चलनाला किती महत्त्व द्यावं, ते चलन कोणी उभं करावं, कसं उभं करावं याचा ज्या माणसाला अभ्यास होता तो काहींच्या मते दैवदूत असला तरी आमच्या मते विज्ञान युगाला जन्म देणारा सर्वात मोठा आणि सर्वच क्षेत्रातला वैज्ञानिक शिवाजी राजे होते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. राजे जेवढे स्वराज्यावर प्रेम करायचे, स्वराज्य निर्माण करण्यासाठी जिवाचं रान करायचे तेवढेच राजे रक्तमांसाचे माणसं जोडायचे. म्हणूनच राजेंना स्वत:चं शेतपोत, घरदार विकून रायगड बांधण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारा हिरोजी इंदोरकर मिळू शकतो. स्वत:च्या पोराचं लग्न असताना लग्नापेक्षा गडावर आक्रमण करायला गेलेले तानाजी मालुसरे मिळू शकतात. काय म्हणावं, एक एक माणसांबद्दल कोण तोफेच्या आवाज होईपर्यंत खिंड लढवत लढवत प्राण सोडत नाही तर कोण पोटच्या पोराचं लग्न टाकून गड सर करायला जातो. कोण मृत्यूच्या पालखीत हसत-हसत बसतो तर कोण आपल्या राजाचं शब्द राखण्यासाठी भल्यामोठ्या मदमस्त हत्तीशी झूंज देतो. कोणी खोटा शिवाजी म्हणून मरणाच्या आंथरुणावर झोपतो तर कोणी 80 व्या वर्षी गड सर करताना तरण्याबांड शत्रूंना लोळवतो तर कोणी मिसरुट न फुटलेलं पोर पडणारे भगवे निशान सावरत विसएक शत्रुंना ठार करतो तर कोणी सात वीर मराठे 30 हजार फौजेशी जाऊन भेटतात. तर कोणी 60 मावळे गड जिंकून देतात. हे अल्पशे आणि छोटे उदाहरणं देण्याचे एवढेच कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं इतिहास, राजेंचं कर्तृत्व-कर्म, राजेंचा राजधर्म आणि राजेंचा रयतेविषयी असलेला आर्थिक, शैक्षणिक, शेती, पाणी याबाबतचं धोरण आणि रयतेबाबत मुलभूत गरजांविषयी राजेंचं असलेलं लक्ष हे प्रेरणादायी असताना खरच राजेंची आम्ही प्रेरणा घेतोय का? आज आम्ही राजेंचं भव्यदिव्य स्मारक उभारतोय परंतु त्याच राजेंच्या महाराष्ट्रात रयत सुखी आणि समृद्ध आहे काय? महिला-मुलींची अबू्र सुरक्षित आहे का? सर्वसामान्यातील सर्वसामान्यांची जान आणि माल आजही संकटात का आहे? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित एवढ्यासाठीच कराव्याच्या वाटतात. राजेंचं स्मारक होतय नक्कीच आमचा उर भरून येतोय, छाती चौडी होतेय. स्मारकाचं डिझाईन घमण्यातलं रक्त सळसळ वहातय, परंतु छत्रपतींच्या गड किल्ल्यांबाबत काय, त्यांच्या संवर्धनाबाबत काय, महाराष्ट्रातल्या मातीत नव्हे तर देशाच्या मातीत जन्मलेल्या पोरांना शिवाजी महाराजांची अर्थनिती, युद्ध निती, जलसंधारणाचे धडे, चलन व्यवस्थेची भूमिका, शेतसार्‍याची पद्धत, माणूस म्हणून माणसासारखं जगण्याची उर्मी शिकवली जातेय का, तर याचं उत्तर नाही येईल जन्माला आलेल्या कुठल्याही मुलाला आणि मुलीला यशस्वी करायचं असेल तर शिवचरित्र त्यांच्या नसानसात भिनायला हवं आणि तेव्हाच भिनलं जाईल जेव्हा शिक्षणामध्ये शिवचरित्र मोठ्या प्रमाणात घेतलं जाईल. आज स्मारक झालं, आता गडकोट किल्ल्यांचं संवर्धन आणि अभ्यासक्रमात शिवचरित्र यावं हीच अपेक्षा.


आनंदाची डोहे..! पण ?
-गणेश सावंत-
अष्टवर्धान जागृत, अष्टप्रधान वेस्टीत, न्यायलंकार पंडित, शस्त्राशस्त्रशास्त्र  पारंगत राजनिती धूरंधर प्रौढप्रताप पुरंधर, क्षत्रिय कुलावंत, सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की...!  अशी ललकारी साडेतीनशे-चारशे वर्षानंतरही कानावर पडली की, महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या मातीत निपजलेल्या जिवंत माणसांच्या मुखातून जय केव्हा बाहेर पडतं हे त्यालाही माहित होत नाही. काय ती ताकत शिवछत्रपतींच्या कर्तृत्व कर्माची आणि काय ती महती छत्रपतींच्या स्वराज्य धर्माची आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा आलेख याची देही याची डोळा अखंड देशाला नव्हे तर जगाला पाहता यावा म्हणून अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्यदिव्य स्मारक उभा राहतय. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काल जेव्हा शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन झाले तेंव्हा समुद्रातील अजाज्र लाटांनाही हायसं वाटलं असेल. उंच उंच उडणार्‍या लाटा काल केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक याठिकाणी उभारायचं म्हणून दूरच कुठं अडल्या जात होत्या की काय, म्हणूनच काल सागरही शांत दिसून येत होता. महाराष्ट्राची किर्ती केवळ आणि केवळ राजा शिवछत्रपतींच्या कर्तृत्व, कर्मामुळेच जगाच्या पाठिवर अजरामर आहे. आज जरी शिवछत्रपतींचे स्मारक उभा करून त्या 16 हेक्टरमध्ये तरी महाराष्ट्रातील शिवबांचं स्वराज्य भविष्यात तुम्हा-आम्हाला अनुभवता येईल. बाकी महाराष्ट्र असो की, देश असो त्याठिकाणी स्वराज्य असेलच हे सांगणे कठीण. आज जरी छत्रपतींच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं असलं तरी छत्रपतींच्या कर्तृत्वाला स्मारक तयार करून मुजरा घालणं हा छत्रपतींचा सर्वात मोठा सन्मान असेल, असं म्हणणं अत्यंत मुर्खपणाचं ठरेल. आम्ही मोठ्या जबाबदारीने म्हणतोत, छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड हा राज्यातील तळागाळातल्या सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसापासून कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, कास्तकर्‍यांपर्यंत न्याय हक्काबरोबर त्याला त्याच्या मुलभूत गरजा मिळणं आणि मिळवून देणं हे राज्यकर्त्यांचं आद्यकर्तव्य. हे कर्तव्य पूर्ण केलं म्हणजे छत्रपतींच्या महाराष्ट्रात छत्रपतींना मानाचा मुजरा घालणं होय आणि हा मानाचा मुजरा खर्‍या अर्थाने तेव्हाच घातला जाईल जेव्हा महाराष्ट्रातील छत्रपतींचे गडकोट, किल्ले पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून केला जाईल. आजपर्यंत छत्रपतींच्या कर्तृत्व, कर्माला काही तथाकथीत लोकांनी झाकण्याचा प्रयत्न केला. एकअंगी छत्रपती दाखविण्याचा खटाटोपही झाला. परंतु शिवाजीराजे हे सूर्य आहेत. कोंबडा झाकून ठेवल्याने सूर्य उगवायचं थांबत नाही हे महाराष्ट्राने पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्माचे रक्षक होते आणि ते केवळ 
मुस्लिमांचेच दुश्मन
होते, शिवाजी महाराज तलवार चालवायचे, युद्धखोर होते, लूट करत असायचे, असा काहीसा अत्यंत खोटारडा इतिहास मनुवाद्यांनी मधल्या काही दशकांमध्ये लिहिला आणि शिवाजी महाराजांना एका धर्माच्या चौकटीमध्ये बिनधास्त बसवलं. धर्माच्या चौकटीत बसवताना ह्या खोटारड्या इतिहासकारांनी राजेंच्या इतिहासालाच नव्हे तर त्यांच्या कर्तृत्व कर्माबरोबर इभ्रतीलाही पेनाच्या टोकदार ब्लेड लावण्याचा प्रयत्न केला. परंतु राजे जेवढे मर्दानी होते तेवढेच त्यांचे कर्तृत्वही ज्वलंत होते. ते कर्तृत्व कर्म झाकल्याने झाकून जाणार नाही. म्हणूनच चालू दोन-तीन दशकांपासून महाराष्ट्राच्या मातीत नव्हे तर देशाच्या मातीत निपजलेल्या आणि बहुजनांच्या कुषिमध्ये जन्मलेल्या नव्या तरण्याताठ्या पोरांनी पुन्हा एकदा छत्रपतींचा इतिहास वाचला, गडकोट, किल्ल्यांना भेटी दिल्या. मग हे नवे इतिहासकार सर्व जात-पात-धर्म-पंथातले होते. त्यांना हवा होता तो केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास. त्यांना हवे होते रयतेचे राजे शिवाजी महाराज आणि बघता बघता खोटारड्या इतिहासकारांच्या कानसुलात हाणावं तसं नव्या इतिहासकारांनी पुराव्यानिशी खरे छत्रपती जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. ते काही प्रमाणात यशस्वीही झाले, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानांचे विरोधक नव्हते हे पुन्हा-पुन्हा सिद्ध झाले. विरोधक असते तर त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिमांच्या तुकड्या नसत्याच. स्वत: शिवाजी महाराजांचे बॉडीगार्डही मुस्लिम नसते. हे जेव्हा हिंदू धर्मातील बहुजनांना समजले आणि उमजले आणि मुस्लिमांनाही जेव्हा हे लक्षात आले तेव्हा पोटपुजा करणार्‍या तथाकथीत खोटारड्या इतिहासकारांचे लक्तरे वेशीला टांगली गेले आणि ते निस नागवे झाले. खरा इतिहास समोर आला. छत्रपती हे कोण्या एका धर्माचे नव्हे तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारे एक राजे होते. म्हणूनच काल-परवा महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चे निघाले आणि या मोर्चांना पाठिंबा मुस्लिमांनाही दिला. नव्हे नव्हे तर आजही मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की, आपल्या मुख्यातून जय म्हणतात. खरं यश त्या स्मारकापेक्षा हे असायला हवं, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणूनच स्मारक होतय हे अत्यानंदाची बाब. पराकोटीचा आनंद नक्कीच आहे म्हणूनच 
आनंदाचे डोहो 
आनंद तरंग असं प्रत्येकाला वाटतं आणि ते वाटायलाही हवे. राजेंचा इतिहास हा जितका लढाईखोरीचा तितकाच अर्थनितीचा, तेवढाच युद्धनितीचा. आरमराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहितलं जातं. साडेतीनशे वर्षांपूर्वी समुद्रमार्गे शत्रूंचा धोका शिवाजी राजांनी लक्षात घेतला होता. एकविसाव्या शतकात आमच्या सरकारला हा धोका लक्षात आला नव्हता, परिणामी 26/11 हा रक्तरंजित दिवस ठरला. छत्रपती शिवाजी राजे दिव्यदृष्टीपेक्षा भविष्याचा वेध घेणारे राजे होते. अर्थकारण कसं असावं, राजकारण कुठं करावं, शेती कशी असावी, शेतसारा कसा ठेवावा, अर्थनितीमध्ये चलनाला किती महत्त्व द्यावं, ते चलन कोणी उभं करावं, कसं उभं करावं याचा ज्या माणसाला अभ्यास होता तो काहींच्या मते दैवदूत असला तरी आमच्या मते विज्ञान युगाला जन्म देणारा सर्वात मोठा आणि सर्वच क्षेत्रातला वैज्ञानिक शिवाजी राजे होते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. राजे जेवढे स्वराज्यावर प्रेम करायचे, स्वराज्य निर्माण करण्यासाठी जिवाचं रान करायचे तेवढेच राजे रक्तमांसाचे माणसं जोडायचे. म्हणूनच राजेंना स्वत:चं शेतपोत, घरदार विकून रायगड बांधण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारा हिरोजी इंदोरकर मिळू शकतो. स्वत:च्या पोराचं लग्न असताना लग्नापेक्षा गडावर आक्रमण करायला गेलेले तानाजी मालुसरे मिळू शकतात. काय म्हणावं, एक एक माणसांबद्दल कोण तोफेच्या आवाज होईपर्यंत खिंड लढवत लढवत प्राण सोडत नाही तर कोण पोटच्या पोराचं लग्न टाकून गड सर करायला जातो. कोण मृत्यूच्या पालखीत हसत-हसत बसतो तर कोण आपल्या राजाचं शब्द राखण्यासाठी भल्यामोठ्या मदमस्त हत्तीशी झूंज देतो. कोणी खोटा शिवाजी म्हणून मरणाच्या आंथरुणावर झोपतो तर कोणी 80 व्या वर्षी गड सर करताना तरण्याबांड शत्रूंना लोळवतो तर कोणी मिसरुट न फुटलेलं पोर पडणारे भगवे निशान सावरत विसएक शत्रुंना ठार करतो तर कोणी सात वीर मराठे 30 हजार फौजेशी जाऊन भेटतात. तर कोणी 60 मावळे गड जिंकून देतात. हे अल्पशे आणि छोटे उदाहरणं देण्याचे एवढेच कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं इतिहास, राजेंचं कर्तृत्व-कर्म, राजेंचा राजधर्म आणि राजेंचा रयतेविषयी असलेला आर्थिक, शैक्षणिक, शेती, पाणी याबाबतचं धोरण आणि रयतेबाबत मुलभूत गरजांविषयी राजेंचं असलेलं लक्ष हे प्रेरणादायी असताना खरच राजेंची आम्ही प्रेरणा घेतोय का? आज आम्ही राजेंचं भव्यदिव्य स्मारक उभारतोय परंतु त्याच राजेंच्या महाराष्ट्रात रयत सुखी आणि समृद्ध आहे काय? महिला-मुलींची अबू्र सुरक्षित आहे का? सर्वसामान्यातील सर्वसामान्यांची जान आणि माल आजही संकटात का आहे? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित एवढ्यासाठीच कराव्याच्या वाटतात. राजेंचं स्मारक होतय नक्कीच आमचा उर भरून येतोय, छाती चौडी होतेय. स्मारकाचं डिझाईन घमण्यातलं रक्त सळसळ वहातय, परंतु छत्रपतींच्या गड किल्ल्यांबाबत काय, त्यांच्या संवर्धनाबाबत काय, महाराष्ट्रातल्या मातीत नव्हे तर देशाच्या मातीत जन्मलेल्या पोरांना शिवाजी महाराजांची अर्थनिती, युद्ध निती, जलसंधारणाचे धडे, चलन व्यवस्थेची भूमिका, शेतसार्‍याची पद्धत, माणूस म्हणून माणसासारखं जगण्याची उर्मी शिकवली जातेय का, तर याचं उत्तर नाही येईल जन्माला आलेल्या कुठल्याही मुलाला आणि मुलीला यशस्वी करायचं असेल तर शिवचरित्र त्यांच्या नसानसात भिनायला हवं आणि तेव्हाच भिनलं जाईल जेव्हा शिक्षणामध्ये शिवचरित्र मोठ्या प्रमाणात घेतलं जाईल. आज स्मारक झालं, आता गडकोट किल्ल्यांचं संवर्धन आणि अभ्यासक्रमात शिवचरित्र यावं हीच अपेक्षा.
आनंदाची डोहे..! पण ?
-गणेश सावंत-
अष्टवर्धान जागृत, अष्टप्रधान वेस्टीत, न्यायलंकार पंडित, शस्त्राशस्त्रशास्त्र  पारंगत राजनिती धूरंधर प्रौढप्रताप पुरंधर, क्षत्रिय कुलावंत, सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की...!  अशी ललकारी साडेतीनशे-चारशे वर्षानंतरही कानावर पडली की, महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या मातीत निपजलेल्या जिवंत माणसांच्या मुखातून जय केव्हा बाहेर पडतं हे त्यालाही माहित होत नाही. काय ती ताकत शिवछत्रपतींच्या कर्तृत्व कर्माची आणि काय ती महती छत्रपतींच्या स्वराज्य धर्माची आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा आलेख याची देही याची डोळा अखंड देशाला नव्हे तर जगाला पाहता यावा म्हणून अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्यदिव्य स्मारक उभा राहतय. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काल जेव्हा शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन झाले तेंव्हा समुद्रातील अजाज्र लाटांनाही हायसं वाटलं असेल. उंच उंच उडणार्‍या लाटा काल केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक याठिकाणी उभारायचं म्हणून दूरच कुठं अडल्या जात होत्या की काय, म्हणूनच काल सागरही शांत दिसून येत होता. महाराष्ट्राची किर्ती केवळ आणि केवळ राजा शिवछत्रपतींच्या कर्तृत्व, कर्मामुळेच जगाच्या पाठिवर अजरामर आहे. आज जरी शिवछत्रपतींचे स्मारक उभा करून त्या 16 हेक्टरमध्ये तरी महाराष्ट्रातील शिवबांचं स्वराज्य भविष्यात तुम्हा-आम्हाला अनुभवता येईल. बाकी महाराष्ट्र असो की, देश असो त्याठिकाणी स्वराज्य असेलच हे सांगणे कठीण. आज जरी छत्रपतींच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं असलं तरी छत्रपतींच्या कर्तृत्वाला स्मारक तयार करून मुजरा घालणं हा छत्रपतींचा सर्वात मोठा सन्मान असेल, असं म्हणणं अत्यंत मुर्खपणाचं ठरेल. आम्ही मोठ्या जबाबदारीने म्हणतोत, छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड हा राज्यातील तळागाळातल्या सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसापासून कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, कास्तकर्‍यांपर्यंत न्याय हक्काबरोबर त्याला त्याच्या मुलभूत गरजा मिळणं आणि मिळवून देणं हे राज्यकर्त्यांचं आद्यकर्तव्य. हे कर्तव्य पूर्ण केलं म्हणजे छत्रपतींच्या महाराष्ट्रात छत्रपतींना मानाचा मुजरा घालणं होय आणि हा मानाचा मुजरा खर्‍या अर्थाने तेव्हाच घातला जाईल जेव्हा महाराष्ट्रातील छत्रपतींचे गडकोट, किल्ले पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून केला जाईल. आजपर्यंत छत्रपतींच्या कर्तृत्व, कर्माला काही तथाकथीत लोकांनी झाकण्याचा प्रयत्न केला. एकअंगी छत्रपती दाखविण्याचा खटाटोपही झाला. परंतु शिवाजीराजे हे सूर्य आहेत. कोंबडा झाकून ठेवल्याने सूर्य उगवायचं थांबत नाही हे महाराष्ट्राने पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्माचे रक्षक होते आणि ते केवळ 
मुस्लिमांचेच दुश्मन
होते, शिवाजी महाराज तलवार चालवायचे, युद्धखोर होते, लूट करत असायचे, असा काहीसा अत्यंत खोटारडा इतिहास मनुवाद्यांनी मधल्या काही दशकांमध्ये लिहिला आणि शिवाजी महाराजांना एका धर्माच्या चौकटीमध्ये बिनधास्त बसवलं. धर्माच्या चौकटीत बसवताना ह्या खोटारड्या इतिहासकारांनी राजेंच्या इतिहासालाच नव्हे तर त्यांच्या कर्तृत्व कर्माबरोबर इभ्रतीलाही पेनाच्या टोकदार ब्लेड लावण्याचा प्रयत्न केला. परंतु राजे जेवढे मर्दानी होते तेवढेच त्यांचे कर्तृत्वही ज्वलंत होते. ते कर्तृत्व कर्म झाकल्याने झाकून जाणार नाही. म्हणूनच चालू दोन-तीन दशकांपासून महाराष्ट्राच्या मातीत नव्हे तर देशाच्या मातीत निपजलेल्या आणि बहुजनांच्या कुषिमध्ये जन्मलेल्या नव्या तरण्याताठ्या पोरांनी पुन्हा एकदा छत्रपतींचा इतिहास वाचला, गडकोट, किल्ल्यांना भेटी दिल्या. मग हे नवे इतिहासकार सर्व जात-पात-धर्म-पंथातले होते. त्यांना हवा होता तो केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास. त्यांना हवे होते रयतेचे राजे शिवाजी महाराज आणि बघता बघता खोटारड्या इतिहासकारांच्या कानसुलात हाणावं तसं नव्या इतिहासकारांनी पुराव्यानिशी खरे छत्रपती जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. ते काही प्रमाणात यशस्वीही झाले, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानांचे विरोधक नव्हते हे पुन्हा-पुन्हा सिद्ध झाले. विरोधक असते तर त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिमांच्या तुकड्या नसत्याच. स्वत: शिवाजी महाराजांचे बॉडीगार्डही मुस्लिम नसते. हे जेव्हा हिंदू धर्मातील बहुजनांना समजले आणि उमजले आणि मुस्लिमांनाही जेव्हा हे लक्षात आले तेव्हा पोटपुजा करणार्‍या तथाकथीत खोटारड्या इतिहासकारांचे लक्तरे वेशीला टांगली गेले आणि ते निस नागवे झाले. खरा इतिहास समोर आला. छत्रपती हे कोण्या एका धर्माचे नव्हे तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारे एक राजे होते. म्हणूनच काल-परवा महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चे निघाले आणि या मोर्चांना पाठिंबा मुस्लिमांनाही दिला. नव्हे नव्हे तर आजही मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की, आपल्या मुख्यातून जय म्हणतात. खरं यश त्या स्मारकापेक्षा हे असायला हवं, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणूनच स्मारक होतय हे अत्यानंदाची बाब. पराकोटीचा आनंद नक्कीच आहे म्हणूनच 
आनंदाचे डोहो 
आनंद तरंग असं प्रत्येकाला वाटतं आणि ते वाटायलाही हवे. राजेंचा इतिहास हा जितका लढाईखोरीचा तितकाच अर्थनितीचा, तेवढाच युद्धनितीचा. आरमराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहितलं जातं. साडेतीनशे वर्षांपूर्वी समुद्रमार्गे शत्रूंचा धोका शिवाजी राजांनी लक्षात घेतला होता. एकविसाव्या शतकात आमच्या सरकारला हा धोका लक्षात आला नव्हता, परिणामी 26/11 हा रक्तरंजित दिवस ठरला. छत्रपती शिवाजी राजे दिव्यदृष्टीपेक्षा भविष्याचा वेध घेणारे राजे होते. अर्थकारण कसं असावं, राजकारण कुठं करावं, शेती कशी असावी, शेतसारा कसा ठेवावा, अर्थनितीमध्ये चलनाला किती महत्त्व द्यावं, ते चलन कोणी उभं करावं, कसं उभं करावं याचा ज्या माणसाला अभ्यास होता तो काहींच्या मते दैवदूत असला तरी आमच्या मते विज्ञान युगाला जन्म देणारा सर्वात मोठा आणि सर्वच क्षेत्रातला वैज्ञानिक शिवाजी राजे होते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. राजे जेवढे स्वराज्यावर प्रेम करायचे, स्वराज्य निर्माण करण्यासाठी जिवाचं रान करायचे तेवढेच राजे रक्तमांसाचे माणसं जोडायचे. म्हणूनच राजेंना स्वत:चं शेतपोत, घरदार विकून रायगड बांधण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारा हिरोजी इंदोरकर मिळू शकतो. स्वत:च्या पोराचं लग्न असताना लग्नापेक्षा गडावर आक्रमण करायला गेलेले तानाजी मालुसरे मिळू शकतात. काय म्हणावं, एक एक माणसांबद्दल कोण तोफेच्या आवाज होईपर्यंत खिंड लढवत लढवत प्राण सोडत नाही तर कोण पोटच्या पोराचं लग्न टाकून गड सर करायला जातो. कोण मृत्यूच्या पालखीत हसत-हसत बसतो तर कोण आपल्या राजाचं शब्द राखण्यासाठी भल्यामोठ्या मदमस्त हत्तीशी झूंज देतो. कोणी खोटा शिवाजी म्हणून मरणाच्या आंथरुणावर झोपतो तर कोणी 80 व्या वर्षी गड सर करताना तरण्याबांड शत्रूंना लोळवतो तर कोणी मिसरुट न फुटलेलं पोर पडणारे भगवे निशान सावरत विसएक शत्रुंना ठार करतो तर कोणी सात वीर मराठे 30 हजार फौजेशी जाऊन भेटतात. तर कोणी 60 मावळे गड जिंकून देतात. हे अल्पशे आणि छोटे उदाहरणं देण्याचे एवढेच कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं इतिहास, राजेंचं कर्तृत्व-कर्म, राजेंचा राजधर्म आणि राजेंचा रयतेविषयी असलेला आर्थिक, शैक्षणिक, शेती, पाणी याबाबतचं धोरण आणि रयतेबाबत मुलभूत गरजांविषयी राजेंचं असलेलं लक्ष हे प्रेरणादायी असताना खरच राजेंची आम्ही प्रेरणा घेतोय का? आज आम्ही राजेंचं भव्यदिव्य स्मारक उभारतोय परंतु त्याच राजेंच्या महाराष्ट्रात रयत सुखी आणि समृद्ध आहे काय? महिला-मुलींची अबू्र सुरक्षित आहे का? सर्वसामान्यातील सर्वसामान्यांची जान आणि माल आजही संकटात का आहे? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित एवढ्यासाठीच कराव्याच्या वाटतात. राजेंचं स्मारक होतय नक्कीच आमचा उर भरून येतोय, छाती चौडी होतेय. स्मारकाचं डिझाईन घमण्यातलं रक्त सळसळ वहातय, परंतु छत्रपतींच्या गड किल्ल्यांबाबत काय, त्यांच्या संवर्धनाबाबत काय, महाराष्ट्रातल्या मातीत नव्हे तर देशाच्या मातीत जन्मलेल्या पोरांना शिवाजी महाराजांची अर्थनिती, युद्ध निती, जलसंधारणाचे धडे, चलन व्यवस्थेची भूमिका, शेतसार्‍याची पद्धत, माणूस म्हणून माणसासारखं जगण्याची उर्मी शिकवली जातेय का, तर याचं उत्तर नाही येईल जन्माला आलेल्या कुठल्याही मुलाला आणि मुलीला यशस्वी करायचं असेल तर शिवचरित्र त्यांच्या नसानसात भिनायला हवं आणि तेव्हाच भिनलं जाईल जेव्हा शिक्षणामध्ये शिवचरित्र मोठ्या प्रमाणात घेतलं जाईल. आज स्मारक झालं, आता गडकोट किल्ल्यांचं संवर्धन आणि अभ्यासक्रमात शिवचरित्र यावं हीच अपेक्षा.
Chat Conversation End

No comments:

Post a Comment