Tuesday, 12 December 2017

सायं दैनिक बीड रिपोर्टर मधील आज १२ डिसेंबर गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त अग्रलेख 

नैनं छिदन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावक: |
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ॥

दखलबाज गोपीनाथराव


विशेष संपादकिय...

- गणेश सावंत -9422742810

गोपीनाथ पांडुरंग मुंडे या नावाच्या देहाला काळाने आमच्यातून हिरावून घेतलं. ज्या देहात धैर्य होतं, ज्या देहाने कायम संघर्ष अनुभवला, जो देह सत्यासाठी, न्यायासाठी, हक्कासाठी लढला. ज्या देहाने आपलं उभं आयुष्य कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांसह ऊसताड कामगारांच्या हक्कासाठी चंदनासारखं झिजवलं, ज्या देहाकडे आणि त्याच्या कर्तृत्व-कर्माकडे पाहितल्यानंतर विजयी पताका घेऊन साक्षात काळालाही या देहाच्या विजयी मिरवणुकीमध्ये नाचण्याचा मोह आवरत नव्हता. तोच देह आमच्यातून ईहीलोकी नेण्याचे धाडस म्हणणार नाही आम्ही, पातक काळाने केले. काळाला गोपीनाथ मुंडे नावाच्या नरदेहाची बहुदा ईर्ष्या झाली असावी. त्यांच्या संघर्ष आणि कर्तृत्व-कर्मातून जे निर्माण होते ते निर्भय असते आणि हेच निर्भय पुढे काळालाही भिणार नाहीत, म्हणून आणि म्हणूनच काळाने गोपीनाथ पांडुरंग मुंडे नावाच्या नरदेहाला गेल्या तीन वर्षांपूर्वी भूतलावरून आपल्या सोबत नेलं. गोपीनाथ मुंडेंचा देह पृथ्वीतलावर नसेल, गोपीनाथ मुंडेंचा आवाज कानी पडत नसेल परंतु गोपीनाथ मुंडेंच्या कर्तृत्व-कर्माचा फुलांचा सडा बीड जिल्हावासियांच्या दारासमोरच नव्हे महाराष्ट्राच्या तमाम वंचितांच्या दारासमोर आजही पडलेला आहे आणि त्या फुलांचा सुगंध जेव्हा जेव्हा दरवळतो, तेव्हा तेव्हा गोपीनाथ मुंडेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही, असं वाटतं, साहेब इथच आहेत, आज संध्याकाळी सात वाजता त्यांचं भाषण आहे, परंतु ते नऊ वाजेपर्यंत येतील आणि व्यासपीठावरून भाषण करतील. कुठे हसी मजाक असेल, तर कुठे सर्वसामान्यांसाठी सरकारला धारेवर धरण्याची भाषा असेल. म्हणूनचसाहेब आपल्यात नसले तरी गोपीनाथ मुंडे म्हणजे नैनं छिदन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावक: |न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ॥या ओळींचा भावार्थ अशा कर्तृत्व-कर्माने मोठे असलेल्या संघषमय देहाच्या आत्म्याला कुठलंही शस्त्र कापू शकत नाही. कितीही मोठी आग या आत्म्याला जाळू शकत नाही. नदीचं पाणी सोडा सागराचं पाणी अथवा ढगफुटीही या देहाला भिजवू शकत नाही. कितीही मोठं वादळ येऊद्या, वायू या देहाला वाळवू शकत नाही. असे वर्णन गोपीनाथरावांचं केलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कारण साहेब म्हणजे दखलबाज गोपीनाथराव गोपीनाथ मुंडेंच्या गेल्या चार दशकाच्या राजकीय कारकिर्दीत किमान दोन दशकाचे आम्ही याची देही याची डोळा साक्षीदार आहोत. जेव्हा सायकलवर बसून प्रचार करणारे आणि पक्षाची विचारसरणी घराघरात पोहचविणारे गोपीनाथराव हेलिकॉप्टरमध्ये बसून पक्षाचा आणि पक्षाच्या विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करताना आम्ही याची देही याची डोळा पाहितलं आहे. गोपीनाथरावांची राजकीय कारकिर्द ही संघर्षमय आहे. हे सांगायला कुठल्या ज्योतिष्याची गरज नाही कारण महाराष्ट्राच्या मातीत जेंव्हा जेंव्हा क्रांत्या झाल्या, ज्यांनी-ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहितले त्यांच्या नशिबी संघर्ष हा आलाच. विसाव्या-एकविसाव्या माहिती तंत्रज्ञानाच्या शतकात गोपीनाथरावांचा संघर्ष जणू सोळाव्या शतकातल्या संत-महात्म्यांबरोबर समाज सुधारकांसारखा दिसून आला. सत्यासाठी-न्यायासाठी, कष्टकरी, कामगार आणि दिनदुबळ्यांसाठी साहेबांचा जिव जसा तुटायचा तसा आजमितीला महाराष्ट्रातल्या भाजपातील अन्य नेत्यांचा तुटतोच हे सांगणे कठीण आहे. कारण जसा संघर्ष रक्तात असायला हवा, जशी न्याय देण्याची उर्मी आणि दिनदुबळे -वंचितांशी प्रेम, प्रेमाची उब देण्याची किमया काही लोकांमध्येच असते आणि ती गोपीनाथरावांमध्ये होती. म्हणूनच ते दखलबाज गोपीनाथराव होते. किरकोळातील किरकोळ गोष्टीची दखल घेणे आणि संबंधितांना न्याय मिळवून देणे ही जी गोपीनाथरावांची भूमिका होती ती भूमिका पाहून आम्ही थेट कुरुक्षेत्रावर जातो. अरे, ज्या अर्जुनाच्या रथाचा सारथी साक्षात भगवान श्रीकृष्ण होता तरीही अर्जुन कुरुक्षेत्रावर आल्यानंतर समोरचे आप्तस्वकिय पाहून ‘अर्जुनाने सिद्धांत ममगात्राणि मुखश्‍च परशिष्यती’ झाल्याचे सांगितले. समोरचे आप्तस्वकिय पाहून माझे हातपाय गळतायत, युद्ध कशासाठी करायचे, सत्तेसाठी-पैशासाठी? असा सवाल उपस्थित करून हात-पाय गळणारा अर्जुन आपल्या कर्तव्य-कर्माला बगल देताना आम्ही ग्रंथात वाचला परंतु स्वराज्यासाठी आणि सत्यासाठी आप्तस्वकिय आडवे आले तरी त्यांना आडवं करण्याचं काम याच महाराष्ट्रातल्या मातीत राजे शिवछत्रपतींनी केलं. ‘स्वराज्य हा माझा धर्म आहे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक जातीतला माणूस हा स्वराज्याचा पाईक आहे,’ याची शिकवण छत्रपती शिवाजी राजेंनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुरुक्षेत्रावरच्या अर्जुनासारखं कर्तव्य-कर्माला बगल दिली नाही तर आपले कर्तव्य-कर्म पुर्णत्वाकडे नेले आणि महाराष्ट्रावर भगवी पताका फडकावली. गोपीनाथ मुंडेंनीही आपल्या उभ्या आयुष्यात अर्जुनासारखी बगलबाजी दाखविली नाही तर सत्यासाठी, न्यायासाठी राजकारण करत दखलबाज गोपीनाथ मुंडे होऊन दाखविलं. त्यामुळे शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून ज्या भाजपाकडे पाहितलं जात होतं त्या शेटजी-भटजींच्या पक्षाला अठरापगड जातीतल्या घरांमध्ये घेऊन जाण्याचं काम गेल्या चार दशकात गोपीनाथ मुंडेंनी केलं. त्याचं फळ १९९५ ला सेना-भाजपाला सत्तेत येऊन चाखता आलं ते केवळ आणि केवळ गोपीनाथराव मुंडेंमुळेच. नाही तर मुंडे नसते तर आजपर्यंतही शेटजी-भटजींचे पक्ष दार उघड बया दार उघड... अशा आरोळ्या मारीत महाराष्ट्राच्या भवानी मातेचं दार ठोठावत बसले असते. महाराष्ट्राची कुलस्वामीनिही त्याच्या पाठीशी खंभीरपणे उभी राहते ज्याच्यामध्ये धैर्य ठेवण्याची उमेद असते, संघर्ष करण्याचं धाडस असतं अन् हा संघर्ष करत विजयी पताका फडकविण्याची ज्यामध्ये मनगटात उर्मी असते त्यालाच भवानी मातेचा आशीर्वाद असतो हे इतिहासाची पानं चाळताना आपसुकपणे पहावयास मिळतं. विज्ञानाने अविष्कृत केलेल्या आजच्या काळात गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष हा जाजव्ल्य आणि धगधगता संघर्ष होता हेही नाकारता येणार नाही. गोपीनाथ मुंडे राजकारण करताना समाजकारणाला जेवढे महत्त्व द्यायचे तेवढेच स्वत: महाराष्ट्राच्या मातीत जन्मलो आहोत याची जाणीव ते ठेवायचे. जिथं कुठं जुलुम, जबरदस्ती होत असेल, शेळ्या-मेंढ्या प्रमाणे मोकाटपणे कुठे कुणी जर अन्याय सहन करत असेल तर अशावेळी जातीवंत महाराष्ट्राच्या वाघाचा हा बच्चा दुष्ट संहारीले मागे | ऐसे उदंड एकतो ॥परंतु रोकडे काही | मूळ सामर्थ्य दाखवितो ॥या समर्थांच्या अवळणीनुसार तत्कालीन सत्ताधार्‍यांविरोधात गोपीनाथरावांचा हा आवाज चढता राहिला आणि ‘परिधानता गेली सत्ता उदंड झाली’ असाच स्वत:च्या कर्तृत्वाचा सूर्योदय गोपीनाथरावांनी करून स्वत:च्या नावाचा आणि संघर्षचा दरारा दिल्लीच्या तक्तापर्यंत गोपीनाथरावांनी पोहचविला. हे जेवढे त्रिवार सत्य तेवढेच बीडचा स्वाभिमान महाराष्ट्राच्या गल्लीबोळात नव्हे तर दिल्लीच्या तक्तावरही त्यांनी रेखाटला. होतेच गोपीनाथराव आणि आहेतच गोपीनाथराव, असं ठामपणे म्हणण्याचं कारणच तेवढं कारण आजही लोकांच्या मनामनात-तनातनात गोपीनाथराव दिसून येतात. जेवढा संघर्ष गोपीनाथरावांच्या जिवनी होता तेवढेच गोपीनाथराव प्रेमळ होते. आम्हाला आजही आठवतं, त्यांचे सख्खे मित्र प्रमोद महाजन त्यांना सोडून गेले आणि एका कार्यक्रमात गोपीनाथरावांनी ‘प्रमोदजी मी गोपीनाथ मुंडे बोलतोय...असं म्हणत थेट प्रमोद महाजनांना फोन केला. एका मराठी दूरचित्रवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये गोपीनाथरावांनी हा फोन लावला. हो हो मी गोपीनाथराव मुंडे बोलतोय. आपण एकाच वेळी कॉलेजमध्ये होतो. एकाच खेळाच्या मैदानात खेळलो, एकाच वेळी अंबाजोगाईतून पुण्याला शिकायला गेलो, एकाच वेळी आणीबाणीत जेलमध्ये गेलो, एकाच वेळी आपण राजकारणात आलो, एकाच वेळी राजकारणात आपण यश संपादन केलं मग याच वेळी आपण मला सोडून का गेलात एकटे? हा अन्याय आहे, तुमचं अचानक सोडून जाण्यामुळे माझं नाही देशाचं नुकसान झालं. कारण देशाला पंतप्रधान पदाचा उमेदवार नाहीये, तुम्ही असता.... परत या... तुम्ही आलात तर या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकाल, एवढी तुमची योग्यता आहे. असा तुम्ही एक डाव मांडला आणि हा डाव अर्ध्यावर का सोडला? हा माझा प्रश्‍न आहे, मित्र म्हणून तुम्हाला विचारण्याचा अधिकार मला आहे, तुम्ही ममता, जयललिता, समता सगळ्यांना एकत्र बांधत होता आता कुणीच नाहीये आपल्याबराबेर. त्यांना तुम्हीच आणू शकला असता. शिवसेना आणि आमच्यात कधी मतभेद होतात पण युती कशी टिकवायची याची कला तुम्हाला अवगत होती आम्हाला कुठंंय! अशा स्थितीत तुमचं असणं किती आवश्यक होतं आणि तुम्ही देश.... आज परत या. तुम्हाला आला तर या देशात नवी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही आला तर माझ्या सारखे असंख्य लोक तुमच्या पाठीमागे उभे राहून ही क्रांती घडविल्याशिवाय राहणार नाही. पुनर्जन्मावर माझा विश्‍वास आहे, कदाचित तुम्ही याच देशात जन्म घेतला असेल आणि तोच प्रमोद महाजन या देशाला निश्‍चितच महाशक्ती केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बोललात याबद्दल धन्यवाद... गोपीनाथरावांचा हा फोन खरच हृदयाला भिडणारा होता. आजही युट्युबवर आपण हा व्हिडिओ पाहिला तर लक्षात येईल. गोपीनाथराव, तुम्हाला मित्रत्वाच्या नात्याने महाजनांना फोन करण्याचा अधिकार आहे, परंतु तुम्ही अर्ध्यावरती डाव मोडून का गेलात? हा आमचा अधिकार नसला तरी त्या तमाम कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, दिनदुबळे, वंचितांच्या माध्यमातून हा सवाल करण्याचं धाडस आम्ही करतोय अन् गोपीनाथ गडावर आज तुमच्या जयंतीदिनी महाराष्ट्राच्या गल्लीबोळातून, सह्याद्रीच्या कानाकोपर्‍यातून, माळरान-डोंगरातून आणि बांधा-बांधावरून प्रत्येक व्यक्तीने तुम्हाला अभिवादन करण्यासाठी उपस्थित होतोय. कोणी आठवणीने आपल्या आसवांना वाट मोकळी करून देतय तर कोणी कर्तृत्व-कर्म आणि धाडसी नेतृत्व याची शिदोरी घेऊन संघर्षाचा वसा आपल्या पदरी बांधतोय. कष्टकर्‍याचं पोर, ऊसतोड कामगाराची पोरगी तुमच्या समाधीस्थळी येतेय, नतमस्तक होते अन् म्हणते ‘सायब मी शिकण, मोठ्ठी व्हयल आणि तुमच्या संघर्षाचा वारसा पुढे नेईल’ गोपीनाथराव आज तुमच्यज्ञा-आमच्यात देहाने नाहीत, परंतु संघर्षशील विचाराने ते कायम आहेत. म्हणूनच गोपीनाथरावांच्या जयंतीदिनी त्यांच्या पावनस्मृतीस विनम्र अभिवादन आणि रिपोर्टरकडून बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर अखंड महाराष्ट्रातील कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळे, वंचितांना गोपीनाथरावांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 29 November 2017

विशेष संपादकीय...

मातेची जो थाने फाडी |
                                                                                                                                                                       

-गणेश सावंत-9422742810


कोपर्डीतील घटना महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला हादरून सोडणारी. स्त्री जातीच्या सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी. कोपर्डीतील छकुलीवर झालेला बलात्कार आणि तिची हत्या ही उभ्या महाराष्ट्राला शरमून टाकणारी बाब. या घटनेमुळे उभा महाराष्ट्र पेटून उठला. अखेर आज न्यायदेवतेने या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. बलात्कार करणारे बलात्कारी हे नुसते नराधमच नाहीत तर ज्या स्त्री जातीच्या उदरातून यांची पैदास झाली अक्षरश: त्या उदरालाच हे तिघे म्हणजे एक शिवी आहे, नव्हे नव्हे शाप आहे.
ज्या महाराष्ट्राचा इतिहास बलात्कार्‍यांचा चौरंगा करणारा आहे. ज्या महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकर्‍याच्या भाजीच्या देठाला हात लावण्याची हिंम्मत ही कोणी करत नव्हतं, त्याच महाराष्ट्रात वड्या वगळीच्या पैदाशी गेल्या काही वर्षात थय्या..थय्या नाचत आहेत. कामातूर झालेले श्‍वापदाच्या औलादी आपली कामवासना भागवण्यासाठी कवळ्या कळ्या कुस्कारीत आहेत. तळपायाची आग मस्तकाला जावी, हाताच्या मुठी वळाव्यात, ओठ दाताखाली यावेत, मस्तकाला आट्या पडाव्यात इतका संताप या बलात्कार्‍यांच्या विरोधात महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड हिन्दुस्तानात पहावयास मिळतो. कानून अंधा होता हैं, न्याय व्यवस्थेच्या डोळ्यावर पट्टी आहे म्हणून असे गुंड मवाली आणि कामांध सावज टिपूण आपली वासना क्षमावतात आणि निष्पापांना जिवानीशी मारतात अशीच काहीशी भावना लोकांनी लोकांसाठी लोकांकरीता चावलेल्या लोकशाहीच्या राज्यामध्ये वावारणार्‍या प्रत्येकांची झाली होती. परंतू दिल्लीत निर्भयाचा बलात्कार झाला, तिची क्रुरतेने हत्या करण्यात आली. त्या हत्त्येने अवघा देश एवकटला अन् बलात्काराच्या गुन्ह्यात बदल करण्यास शासन व्यवस्थेला भाग पाडले. त्या नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. आता तरी देशातील भगिनी मुक्त संचार करेल, निर्भयपणे वावरले. परंतू नाही, कामातुरा भय ना लज्जा असलेले काम पिपासू आपलं काम दाखवतच राहिले. देशासह महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात बलात्काराच्या घटना घडतच राहिल्या, परंतु कायदा कठोर झाला आणि त्या कठोर कायद्यातून बलात्कार्‍यांविरोधात निकाल लागू लागले. अशा वातावरणातही महाराष्ट्र गेल्या वर्षी पुन्हा काही तथाकथीत नराधमांनी आपल्या क्रुर कृत्यातून काळवंडून टाकला. जणू मातेच्या थानाचीच फाडाफाडी या हरामींनी केली. ज्या स्त्री जातीच्या उदरातून जन्म घेतला जातो तिचं स्तनपान करून अंगात बळ आणलं जातं त्याच स्त्रीच्या संगोपनामुळे स्वत:च्या पायावर ही माणसं उभी राहिली जातात, तिचं बोट धरून हेच माणसं चालायला शिकतात, बोलायला शिकतात, पुढे मोठी होतात अन् समाज व्यवस्थेच्या म्हणा अथवा स्वत:च्या क्रूर कर्माचे फळ म्हणा हे लोक पुन्हा त्या स्त्री जातीच्या वर्णाकडे वाकडी नजर टाकतात. तिच्या छातीवरचा पदर खाली कसा पडेल, अशी निर्लज्ज अपेक्षा बाळगतात. तिच अपेक्षा कोपर्डीतल्या त्या तीन नराधमांनी बाळगली अन् १३ जूलै २०१६ च्या भल्या सकाळी छकुली अक्षरश: कुसकरली गेली. छकुलीच्या या बलात्कार आणि हत्याकांडाने अवघा 

महाराष्ट्र पेटला

कोपर्डीतल्या त्या छकुलीवर बलात्कार्‍यांनी नुसता बलात्कार केला नाही तर तिच्या शरीराचे लचके तोडले, तिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृत शरीराची घोर विटंबणा केली. बलात्कार आणि हत्येच्या या घटनेने कुठल्याही माणसाच्या मस्तकातली अळी सटकेल आणि असे कृत्य करणार्‍या नराधमाच्या नरडीचा घोट घ्या, असे म्हणेन आणि तेच झाले. बलात्कार झाल्यानंतर दोन-तीन दिवस या बलात्कार आणि हत्याकांडाकडे महाराष्ट्र पोलिसांनी तेवढ्या दखलतेने पाहितलं नाही, परंतु घटनेचं गांभीर्य आणि अशा निर्दयी घटनेला अंजाम देणार्‍या नराधमांच्या क्रूरकृत्याची वाच्यता महाराष्ट्रभर नव्हे देशभर झाली अन् माणूस म्हणून जगणार्‍या प्रत्येकाच्या तळपायाची आग अक्षरश: मस्तकात गेली. कोपर्डीतल्या छकुलीला न्याय मिळावा आणि बलात्कार करून हत्याकांड करणार्‍या नराधमांना जेरबंद करावे यासाठी न भूतो न भविष्यती महाराष्ट्रात एकी झाली. विखुरलेला मराठा समाज या घटनेने एकत्रित आला, नुसता एकत्रित आला नाही, आया बाया, बाया-बापडे, अबालवृद्ध बलात्कार्‍यांच्या नरडीचा घोट घ्या, नराधमांना भरचौकात फाशी द्या, गोळ्या घाला, अशा संतप्त प्रतिक्रिया देऊ लागले. औरंगाबादेत पहिला मोर्चा निघाला. या मोर्चातल्या लोकांची संख्या किती हजार-पाचशे, लाख-दोन लाख नव्हे नव्हे किती तरी लाख असा एक नव्हे महाराष्ट्रात ५८ मोर्चे मराठा समाजाने काढले. या मोर्चेकर्‍यांची सर्वात पहिली मागणी ही कोपर्डीतील छकुलीचा बलात्कार करून तिची हत्या करणार्‍या नराधमांना फाशी द्या म्हणून सरकारला या घटनेची गंभीर दखल घ्यावी लागली आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला लढवावा लागला. जागतिक किर्तीचे उज्ज्वल निकम हे वकील छकुलीच्या बाजुने लढत होते. अखेर तब्बल १६ महिन्यांनी निकाल लागला आणि छकुलीला न्याय मिळाला. तिन्ही नराधमांना फासावर चढवण्याची शिक्षा झाली. त्यात पुन्हा त्यांना अपिलाची संधीही देण्यात आली. आज सकाळी ११ वाजून २३ मिनिटाने मा. न्यायाधीशांनी या तिघांना उभे करून फाशी घोषीत केली. निकाल ऐकण्यासाठी आलेल्या प्रत्येकाचा संताप तोच होता, डोळ्यात दाहही तीच होती. प्रतिक्रिया संतप्त दिल्या जात होत्या. दुसरीकडे छकुलीची माता मात्र धाय मोकळून टाहो फोडत होती. कुठय माझी छकुली... माझ्या छकुलीचे हाल केले... ती देवाघरी गेली.... इथून पुढे तरी छकुलींना सांभाळा. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगी माझी छकुली आहे... त्या मातेच्या टाहोने उभा
महाराष्ट्र गहिवरला
निकाल लागल्यानंतर छकुलीची आई कोर्टाबाहेर आली तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटले होते, कंठ फुटला होता, डोळ्यात अश्रू बसेनासे झाले होते. धाय मोकळू रडत होती. अवघ्या महाराष्ट्राचे आभार मानत होती. न्याय देवतेवर विश्‍वास असल्याचे सांगत होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर विश्‍वास असल्याचे सांगत होती. वेगवेगळ्या संघटना, प्रत्यक्ष न्यायासाठी उभा राहिलेल्या प्रत्येक महाराष्ट्राच्या नरविराचे ती जाहीर आभार रडत-रडत मानत होती. तिच्या बोलण्यामध्ये आवाज रडका असला तरी अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची धार आम्हीही अनुभवली. आम्ही तर टेलिव्हिजन चॅनलसमोर बसून हे सर्व पहात होतो. ती माता म्हणत होती, ‘माझी छकुली गेली, शनिवार आला की आजही मला छकुलीची आठवण येते, महाराष्ट्रातील कुठल्याही छकुलीवर असा प्रसंग येऊ नये, यापुढे जिथं कुठं असा प्रसंग येईल तिथं-तिथं मी न्यायासाठी उभा राहिल, समाज बांधव एकत्र आले, परंतु हे सर्व पहायला माझी छकुली नाही, असं म्हणत पुन्हा ती आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होती तर तिच्या आजुबाजुला असलेल्या काही महिला वकिल तिला धीर देत होत्या. छकुली तुमची नाही अवघ्या महाराष्ट्राची आहे, अवघ्या समाजाची आहे. छकुलीला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र उभा राहिल, हे चित्र आम्ही जेव्हा पहात होतो तेव्हा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातल्या प्रसंग डोळ्यासमोर येत होतो. राजेगावच्या पाटलाने एका गरीब महिलेची अब्रू लुटली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोर्टात हे प्रकरण आलं, महाराजांनी राजेगावच्या पाटलाला बोलावणं धाडलं, पाटील मस्तवाल होता. तुम्ही नामधारी राजे असं म्हणून राजेंच्या आज्ञेवर यायला नकार दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसक्या बांधून आणण्याचे आदेश दिले. फैसला झाला आणि राजेगावच्या पाटलाचा चौरंग केला. हात-पाय तोडले आणि त्या महिलेला न्याय मिळवून दिला. आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने कोपर्डीतल्या छकुलीला न्याय दिला. त्या तीन नराधमांना फासावर चढवले. कोपर्डीतले जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे हे काम वासनेने पछाडलेले नराधम आज भारतीय लोकशाहीच्या आणि संविधानाच्या फटकार्‍याने गारद झाले. परंतु अशा कित्येक हरामी औलादी आजही
मातेचे थाने फाडी
अशा स्थितीमध्ये वागत आहेत. हे लोक नुसते वाचाळच नव्हे तर यांची पैदासही शुद्ध बिजाची असेल हे सांगणे कठीण असल्याची संतप्त प्रतिक्रिया आता ऐकावयास येत आहे आणि ती सत्य आहे. जगद्गुरू संत तुकोबा अशा वृत्तीच्या लोकांबाबत बोलताना म्हणतात...
मातेची जो थाने फाडी | तया जोडी कोण ते ॥
वेदा निंदी तो चांडाळ | भ्रष्ट सुतकियाचा खळ ॥
आगी लावी घरा | मग वस्ती कोठे थारा ॥
तुका म्हणे वर्म | येरा नाचवितो भ्रम ॥
अशा औलादी खरंतर जन्मताच मरायला हव्यात. जो माणूस आईचे उर फुटेल अशा पद्धतीने वागतो, समाजामध्ये आई-बापांची मान खाली होईल, असे वागतो, त्यांना दु:ख देतो आणि त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करतो, माणूस म्हणून जगण्यापेक्षा एखाद्या जनावरागत जगतो. जणू तो मातेची थानेच फाडतो. अशा माणसांना कुठेच थारा नसतो. त्याच औलादी म्हणजे संतोष भवाळ, जितेंद्र शिंदे आणि नितीन भैलुमे हे तिघे आहेत. न्यायव्यवस्थेने या तिघांना बलात्काराची शिक्षा ठोठावली. हे जेवढे समाधानकारक आहे तेवढेच भारताच्या या लोकशाहीतील संविधानाने आणि संविधानाच्या भाषेत न्याय व्यवस्थेने पुढच्या कोर्टातही ही फाशी कायम ठेवत जलदगतीने या फाशीला अंतिम मुहूर्तमेढ द्यावी तेव्हाच कुठे समाजामध्ये बाया-बापडयांना निर्भयपणे वागता येईल.

Wednesday, 15 November 2017

फुंकार वेदनांची ! विकृती मनोवृत्तीची!!
अन् कायद्याचा कोथळा
-गणेश सावंत
जगाच्या पाठीवर महासत्तेकडे वाटचाल करणार्‍या एकशे तिस कोटीच्या देशात असे काही प्रसंग आणि घटनांना अंजाम दिला जातो की त्या घटना आणि प्रसंग नुसत्या आठवल्या तरी समाजाचं भान हरवलं की हिरावून घेतलं हा प्रश्‍न माणूस म्हणून जगणार्‍यांना भेडसावून सोडतं. गुरूग्राम येथील रॉयन इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी प्रद्यूम्न ठाकूर या चिमुरड्याची हत्या होते. हत्यारा अकरावीत शिकणारा विद्यार्थी असतो आणि या हत्येचं कारण परिक्षा लांबणीवर पडाव्यात म्हणून शाळेत काहीतरी व्हावं हे किरकोळ कारण असतं. यातून गुन्हेगारी विश्‍व वाढत चाललंय या पेक्षा अल्पवयीन मुलात गुन्हेगारीचं पालन होतयं हे अधिक गंभीर म्हणावं लागेल. आपल्या मुलांचं आयुष्य आणि भविष्य उज्वल व्हावं, भविष्यात त्यांनी काहीतरी करून दाखवावं यासाठी प्रत्येक माता-पिता आपल्या जीवाचं रान करतात. मुलांना लहानाचं मोठं करतात. त्यांना शिकवतात, समाजाचं ज्ञान देतात. परंतू हेच मुले अल्पवयीन असतात तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये गंभीर गुन्हा करण्याच्या आळ्या जेव्हा वळवळ करतात तेव्हा दोष गुन्हेगारी स्वरूपाच्या त्या मुलांना द्यायचा की त्यांच्या मातापित्यांना की अजून समाज व्यवस्थेला द्यायचा? हेच कळायला मार्ग नाही. सदरची घटना ही जेवढी गंभीर तेवढीच गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत नव्हे नव्हे तर वाडीवस्ती तांड्यापासून शहरी भागापर्यंत आपल्या पाल्याचा सांभाळ करणार्‍या पालकांना चिंतेत टाकणारी आणि समाज व्यवस्थेला आत्मपरिक्षण करावयास लावणारी म्हणावी लागेल. वेदनांवर फुंकार टाकत जो तो आपल्या मुलांचा सांभाळ करत असतो परंतू हा सांभाळ करतांना मानवी जीवनामध्ये जे आक्रमन होते ते आक्रमन रोखण्यासाठी किंवा त्या अक्रमनाला प्रतिविरोध करण्यासाठी मुलांची अकलनशक्ती वाढवावी यासाठी पालकांसह समाजजीवनातील तुम्ही आम्ही प्रयत्नशील आहोत का? हा प्रश्‍न आता प्रत्येकाने स्वत:ला विचारायलाच हवा! प्रद्यूम्नची हत्या आणि हत्यार्‍याचं वय त्याचबरोबर त्या हत्येचं कारण जेव्हा समजून घेतलं जातं तेव्हा 
अल्पवयीन गुन्हेगारी 
मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचे उघड स्पष्ट होतं. शालेय विद्यार्थ्यांमधली ही गुन्हेगारी एका स्वरूपात नाही हेही तेवढंच खरं. वर्गमित्रावर गोळीबार करणं, वर्गमैत्रीणीवर बलात्कार करणं, चाकू मारणं, शिक्षकांची हत्या करणं अशा कैक घटना महाराष्ट्रासह देशात जेव्हा घडतात तेेव्हा घराबरोबर ज्या शाळांना गुरूकुल म्हणून ओळखलं जातं त्यांची जबाबदारी आता समाजज्ञानाबरोबर समाजासोबत भरकटत येणार्‍या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना आपल्या मुलांना शिवूही नयेत यासाठी प्रयत्न होणे गरजेचं म्हणावं लागेल. प्रद्यूम्नची हत्या ही केवळ शाळेमध्ये असं काहीतरी भयानक कृत्य व्हावं आणि त्या कृत्यातून आपली अकरावीची परीक्षा लांबणीवर पडावी एवढंच कारण यामध्ये असेल तर अल्पवयीन मुलांच्या मस्तकामध्ये गुन्हेगारी कृत्याचा हा जो किडा वळवळतोय तो किडा वेळीच ज्ञानअर्जनाने म्हणा, भावनेनेन म्हणा ठेचायला हवा. हा किडा ठेचणे म्हणजे सिमेवरच्या अतिरेकी कारवाया रोखणे सोपे परंतू हा किडा ठेचणे तेवढा अवघड हे उघड सत्य प्रत्येक पालकांनी नक्कीच आत्मसात करायला हवं. मुलांच्या डोक्यांमध्ये गुन्हेगारी वृत्तीचा किडा का वळवळतोय याचे असंख्य कारण आहेत. समाजामध्ये असलेली विकृती घडत चाललेले गुन्हेगारी स्वरूपाचे घटनाक्रम आणि वेगवेगळ्या प्रसिद्धीमाध्यम म्हणा अथवा मनोरंजनात्मक कार्यक्रमामधून दाखवले जाणारे कार्यक्रम म्हणा, हे सर्वच अल्पवयीन मुलाच्या मस्तकात गुन्हेगारी वृत्तीचा किडा जन्माला घालण्याचं साधन समजायला हवं. आम्ही नेहमी म्हणतो मोहन करमचंद गांधी नावाच्या मुलाने वयाच्या ७ व्या वर्षी राजा हरिश्‍चंद्राचं नाटक एक वेळेस पाहितलं आणि या मुलावर या नाटकाचा प्रभाव एवढा पडला की मस्तकातल्या राजा हरिश्‍चंद्राच्या किड्याने मोहन करमचंद गांधींना उभं आयुष्य सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर नेलं आणि सरतेशेवटी हाच मुलगा गांधी नावाचा महात्मा म्हणून जगभर ओळखला जावू लागला. मग एक सांगा जर एका नाटकाचा प्रभाव सकारात्मक दृष्टीने एवढा पडू शकतो तर मग  आपली मुले रोज वेगवेगळ्या दुरचित्रवाहिन्यांमधून पहात असलेले बलात्काराचे प्रसंग, मारधाडीचे प्रसंग, खूनासारखे अतिरंजीत दृष्य दिवसातून दहा ते पन्नास वेळा पहात असतील. तर मग त्यांच्या मस्तकात राजा हरिश्‍चंद्राचा किडा जन्म घेईल की एखाद्या खुन्याचा किडा वळवळ करील याचाही शोध आणि बोध या संवेदनशिल विषयात नक्कीच घ्यावा लागेल. वेदनांच्या फुंकारवर जेव्हा विकृती मनोवृत्ती अरुढ होते तेव्हा अशा घटना वाढत जातात आणि त्या घटनांना अन्जाम देणार्‍यांची संख्याही तेवढीच मोठी होते ही समाजासाठी प्रचंड घातक अशी दिशा म्हणावी लागेल. ‘मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ किंवा ‘शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी’ हे जेवढे त्रिवार सत्य तेवढेच ‘नाही निर्मळ जीवन काय करील साबण’ हेही नाकारण्याजोगे नक्कीच नाही. याला जबाबदार कुठल्या एका घटकाला किंवा कुठल्या एका घराला नक्कीच धरता येणार नाही. सध्याच्या या स्पर्धेच्या युगात शुल्लक वाद, किरकोळ भांडण कधी जीवघेणे ठरेल हे जसं सांगता येत नाही तसंच याचं लोण आता शाळेकरी मुलांपर्यंत येवून पोहचलं आहे हे सत्यही आता स्विकारावं लागणार आहे.  मित्र मित्रांचे खंडणीसाठी अपहरण करतो, कधी त्याची हत्या करतो, कधी वर्गमैत्रीणीवर सामूहिक बलात्कार होतात, किरकोळ वादातून विद्यार्थ्याचा बळी दिला जातो हे सर्व प्रकार पाहितले तर समाजमनाचा वाढलेला स्वार्थ आणि हरपत चाललेली संवेदनशिलता हे आता तुमच्या आमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणावे लागेल. अल्पवयीन विकृतीचे आव्हान कसे पेलवायचे? हा जसा प्रश्‍न तुमच्या आमच्यासमोर आणि अखंडसमाजासमोर आऽ करून उभा आहे तसा 
कायद्याचा कोथळा
काढणारा प्रसंगही कायद्याच्या रक्षकांकडूनच उभा राहतो तेव्हा मात्र समाजमनाबरोबरच कायदाही आता रक्षकांच्या हाती सुरक्षित नाही याचीही भिती वाटू लागते. सांगलीमध्ये अनिकेत कोथाळे नावाच्या तरुणाचा मृत्यू कोठडीत होतो, पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर केल्याने कोठडीत प्रचंड मारहाण केल्याने अनिकेत यमसदनी जातो हे जेवढे दुर्दैवं त्यापेक्षाही पोलिसांनी त्या पुढे केलेले कृत्य हे गुन्हेगारीवृत्तीला प्रोत्साहन देणारे म्हणावे लागेल. सांगलीतल्या अनिकेत कोथाळेला अटक केली जाते, त्याला मारहाण केली जाते, मारहाणीत त्याचा मृत्यू होतो, मृत्यूनंतर कामटे नावाचा पोलीस अधिकारी आणि अन्य पोलीस तो मृतदेह सांगलीपासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी घेवून जातात. दरीमध्ये तो एकदा नव्हे तर दोनदा जाळण्याचा प्रयत्न होतो आणि नंतर अनिकेत कोथाळेची हत्या करण्यासाठीच पोलीसांनी सुपारी घेतल्याचा आरोप होतो, किती  हे भयंकर! ज्या पोलीसांकडे कायद्याचा रक्षक म्हणून पाहितलं जातं तेच पोलिस समाज जीवनामध्ये जगतांना कायदा हातात घेवून कायद्याचे भक्षक होतात तेव्हा कायद्याचा दबदबा किंवा कायद्याची सकारात्मक दृष्टी ही समाजमनाबरोबर शालेय जीवनात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांवर कशी असेल आणि विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन कायद्याच्या बाबत कसा असेल हे समजून घ्यावंच लागेल. प्रद्यूम्नची हत्या आणि अनिकेतची हत्या हे दोन वेगवेगळे प्रसंग असले तरी समाज जीवनात विकृती वाढवणारे गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देणारे प्रसंग म्हणावे लागतील आणि हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही. अनिकेतची हत्या करणारा पोलीस अधिकारी हा कामटे नावाचा आहे, आम्हाला आठवतं जेव्हा मुंबई महानगरीवर दहशतवाद्यांचा हल्ला झाला तेव्हा अशोक कामटे नावाच्या दमदार आणि देशभक्त कायदा रक्षक अधिकार्‍याने अखंड मानवजातीला सुरक्षित ठेवण्यासाठी जीवाचं रान करत दहशतवाद्यांशी दोन हात केले. या दोन हातामध्ये आमचे अशोक कामटे शहिद झाले, आजही अशोक कामटेंची कामगिरी आठवली की सिना चौडा होतो, मान उंचावते आणि निधड्या छातीने अशोक कामटेंसारख्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याला मनोमनी सलाम ठोकावासा वाटतो! परंतू दुसरीकडे अनिकेत कोथळेची हत्या करणारा कामटे नावाचा अधिकारी जेव्हा आमच्या डोळ्यासमोर येतो तेव्हा अशा अधिकार्‍याला भर चौकात चाबकाने फोडावं असा संताप मनोमनीच नव्हे तर पायाच्या बोटापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत संताप आणि संताप व्यक्त करावासा वाटतो. ज्यांच्या हाती कायदा आहे, ज्यांच्यावर समाज सुरक्षेची धुरा आहे त्याच लोकांनी सुपारीबाज होत गुन्हेगारी वृत्तीला प्रोत्साहीत करण्याचं धोरण आखलं असेल तर त्या कामटे नावाच्या अधिकार्‍याने जणू कायद्याचाच कोथळा बाहेर काढला म्हणावा लागेल. हे दोन्ही प्रसंग वेगवेगळे आहेत परंतू समाजाला दिशा देणारे किंवा समाजाला दिशा देण्यासाठी एक चिमटा नव्हे तर सरळ वार करणारे आहेत त्यामुळे गुन्हेगारी वृत्तीची नांगी ठेचण्यासाठी सर्वप्रथम कायद्याच्या रक्षकांना सरळ करण्याचं काम सरकारनं करावं. अनिकेत कोथळेची हत्या झाल्यानंतर गेल्या आठ दिवसांच्या कालखंडात महाराष्ट्रात पोलीसांविरोधात कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त बावीस गुन्हे दाखल झालेे आहेत. हत्या करण्याचा प्रयत्न, बनावट नोटा प्रकरण या गंभीर गुन्ह्यासह आत्महत्यासारख्या घटनांना प्रोत्साहन देणारे गुन्हेही या पोलीस दलातील कर्मचार्‍यांवर दाखल झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ताब्यात असलेलं गृहविभाग आता गुन्हेगारी विभाग होतयं का? हा सवाल नक्कीच विचारला तर तो चुकीचा असणार नाही. पोलीस खात्यामधली गुन्हेगारी प्रवृत्ती जशी राज्याला आणि देशाला घातक आहे तशीच अल्पवयीन मुलांमध्ये शिरत चाललेली गुन्हेगारी मनोवृत्ती ही देशाच्या भविष्याला घातक आहे असं आता समजून घ्यावं लागेल. त्यासाठी कोणी उपाय योजना करो अथवा न करो प्रत्येक माणसाने माणूस म्हणून जगण्यासाठी आधी स्वत:साठी झटावं म्हणजे त्याच्यातील ही मनोवृत्ती सकारात्मक असेल आणि ती सकारात्मक मनोवृत्ती आपल्या पाल्याच्या डोक्यात गुन्हेगारी वृत्तीचा किडा जन्माला घालू देणार नाही.

Sunday, 24 September 2017

                                        
बाबांनी वैष्णव धर्म वाढवला 

आम्ही काय वाढवतोय?


-गणेश सावंत-9422742810

तुकोबा विमानात बसून जावू शकतात तसे ते येवू ही शकतात. मी तर म्हणतो तुकोबा आपल्यातून गेलेच नाही ते इथेच आहेत. मन करारे निर्मळ सर्व सिद्धीचे कारण या दृष्टीने आणि साध्य ते असाध्य या वृत्तीने तुकोबांना शोधलं तर ते नक्कीच तुमच्या आमच्यात सापडतील. काळ कोणताही असो त्याचे नाव वेगळे असेल, रूप वेगळष असेल, कर्तव्य कर्म वेगळे असेल त्यामुळे केवळ त्याच्या नावारूपात न अडकता तुकोबा संत असून काठी हाणतात पण कोणाचे डोके फोडा म्हणत नाहीत. ही काठी शब्दाची, विवेकाची, ज्ञानाची, विचाराची, काम, क्रोध, लोभाचा त्याग करायचा सांगणारी जीच्यामुळे डोक्याला झिणझिण्या येतील आणि काम, क्रोध, लोभाला सोबत घेवून झोपलेल्यांना जाग येईल. अधुनिकता म्हणत असाल तर ती काळाशी नाही तर विचाराशी संबंधित असते याचा विचार आता करावाच लागेल. तुकोबानंतर संत पदाला कोणी गेले असेल तर ते माझ्या जिल्ह्यातले, माझे गुरूवर्य अखंड मानव जातीचे उद्धारकर्ते संत भगवान बाबा यांचंच नाव घ्यावं लागेल. बुद्धांकडे पाहिले तर आम्हाला तुकाराम दिसतात. तुकारामांकडे पाहिलं तर आम्हाला आज भगवान बाबा दिसतात. तुकोबांच्या विचारावर भागवत धर्माची पताका फडकवणारे संत बहिणाबाई शिऊरकरानंतर २० व्या शतकातले महान संत भगवान बाबच. बाबांचं कर्तृत्व कर्म, बाबांचा त्याग आणि बाबांची समाजाकडे पहाण्याची दृष्टी तुमच्या आमच्यात आली तर नक्कीच बाबांनी वैष्णव धर्म वाढवलाय आम्ही काय वाढवतोय हा प्रश्‍नच पडणार नाही. संत भगवान बाबांचं कर्तृत्व कर्म याची देही याची डोळा पाहणारे देह आजही बीड जिल्ह्यातल्या कानाकोपर्‍यात कुठे ना कुठे श्वास घेतात. त्यांची भेट घेतल्यानंतर, त्यांच्या ह्रदयातून आणि त्यांच्या नैनातून भगवान बाबा आम्ही जेंव्हा पाहतो तेंव्हा बाबांचं ते सुजवळ रूपडं डोळ्यासमोर येतं त्याचबरोबर त्यांची त्यागी वृत्ती आणि संतत्वाच महान कार्यही डोळ्यासमोर येईल. अलगदपणे निघून जातं. वाटतं बाबा आपल्यात आहेत, अजूबाजुलाच आहेत आणि ते सांगतायत काम, क्रोध, लोभ सोडा मस्सर सोडा आणि मानवता ही जात समजून माणुसकी हा धर्म उमजून कामाला लागला. माणसातलं माणूस पण जागृत करण्याचं कार्य जसं तुकोबांनी केलं तसच कार्य संत भगवान बाबांनी केलं. तुकोबांचा अवडता अभंग बाबा आपल्या कीर्तनात सातत्याने निवडायचे तेंव्हाच त्या अभंगाचा मतीत अर्थ उमजायला वेळ लागत नाही. कारण त्या अभंगातच 


खेळ आहे. 


खेळ मांडीयेला वाळवंटी घाई | नाचति वैष्णव भाई रे ॥
क्रोध अभिमान गेला पाटवनि | एका एका लागती पाई रे ॥
गोपिचंद ओटू तुळशीच्या माळा | हार मिळविती गळा ॥
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव | अनुपम्य सुख सोहळा रे ॥
वर्ण अभिमान विसरलीय याती | एक एका लोटांगणी जाती ॥
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे ॥
होतो जय जयकार गर्जत अंबर | मातले हे वैष्णव वीर रे ॥


विठ्ठलाचं नामस्मरण करत तुकोबांचा जयघोष जेंव्हा होतो तेंव्हा क्रोध, अभिमान पालटून जातो आणि जो तो एकमेकांच्या पायी लागतो. तोच क्रोध अभियान संपुष्टात आणायचाय, स्वत:च मन निर्मळ ठेवायचय, चित्त स्वच्छ ठेवायचय म्हणजे पाषाणाला ही पाझर सुटेल आणि पुन्हा वैष्णवांचा नारा अंबरापर्यंत पोहचेल. माझे वैष्णव वीर जे जे कार करत तेंव्हा मातलेले असतील परंतू हा मातलेला पणा सज्जनांचा असेल, आनंदाचा असेल, उत्सवाचा असेल भगवान बाबा हे कर्तृत्व कर्माचे जेवढे जिवंत मुर्तीमंत उदाहरण होते तेवढेच उद्धारकर्ते आणि समाज मनाचे पुरस्कर्ते ही होते. बीड जिल्ह्यात बाबांचा जन्म व्हावा म्हणजे या जिल्ह्याचे परमभाग्य त्यांचा सहवास लाभावा म्हणजे स्वर्गीयानंद आणि बाबांचं गुरूवत्त्व लाभावं हा सात्विक आनंद. परंतू बाबांच्या आणि तुकोबांच्या कुठल्या विचाराशी तुम्ही आम्ही सुसंगत राहतोय का? भागवत धर्म असेल, वैष्णव धर्म असेल, वारकरी धर्म असेल या तीन नावातल्या धर्मातला माणूस धर्म आज तुम्ही आम्ही जगतोय का? हा जाहीर सवाल एवढ्यासाठीच करावासा वाटतो गेल्या दोन वर्षापासून दुर्दैवाने ज्या भगवानगडावरून माणूस धर्म शिकवला त्या संत भगवानबाबांच्या गडावर सुरक्षा व्यवस्था वाढवावी लागत आहे. बाबांनाही हे रूचत नसेल, माझे भक्त हट्टी, अट्टहासी असू शकतात असं त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल. अरे जिथं भगवान बाबांच्या समोर 


प्रति (पत्री) सरकार झुकले 


तिथं तुमच्या आमच्या सारख्या पामराचे काय? आजच्या तरूणांना प्रति सरकार किंवा पत्री सरकार याची माहिती नसेल, भगवान बाबांचा छळकर्‍यांनी जेंव्हा छळ मांडला, धुम्या गडावरून बाबांनी जावं म्हणून पराकुटीचे कटकारस्थान केले. तेंव्हा आणि तेंव्हाच या नतदृष्ट छळकर्‍यांनी बाबांवर पराकुटीचे आरोप केले. बाबा हे इंग्रजांचे आणि निजामांचे हेर आहेत. अशी चुकीची माहिती तेंव्हाचे प्रति सरकार क्रांतीसिंह क्रांतीकारी नाना पाटलांना देण्यात आली. नाना पाटील बीड जिल्ह्यात आले आणि बाबांचा समाचार घेवू म्हणाले. बाबांपर्यंत जावून पोहोचले परंतू बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्या प्रमाणे बीड जिल्ह्यात आल्यानंतर बाबांची देशभक्ती, बाबांच माणूस प्रेम आणि बाबातलं संतत्व नाना पाटलांना दिसलं. क्रांतीसिंह नाना पाटील त्याठिकाणी बाबांच्या चरणी नतमस्तक झाले मात्र छळकर्‍यांनी आपली नतदृष्ट कटकारीस्थानाची पैदाशी सोडली नाही. बाबा जेंव्हा भगवानगडावर आले तेंव्हा मनामध्ये कुठलेही कटकारस्थान न ठेवता आपलं उदाक्त कार्य त्यांनी पुढे चालू ठेवले. ज्या बाबांच्या समोर पत्री सरकार झुकले, त्या भगवानगडाच्या समोर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कुठल्याही सरकारला झुकावे लागेल. कारण तुकोबांचा जो जाज्वल इतिहास आहे तोच इतिहास २० व्या शतकात जीवंत ठेवण्याचं कार्य बाबांनी केलं. तुकोबांनी अंधश्रद्धेवर प्रखर कोरडे ओढले. जिथं आम्हाला, लिहिण्याचा, बोलण्याचा, कवित्व करण्याचा अधिकार नव्हता तिथं तुकोबांनी कधीही न भंग पावणारी अभंगगाथा लिहिली. आणि तथाकथित धर्म मार्तंडांना वेदाचा तो अर्थ आम्हासी ठावा, इतरांनी वाहवा भार माथा असे ठणकावून सांगितले. तर बाबांनीही आपल्या उपदेशात समाजाला दिशा देणारं कार्य सांगितलं. बाबा आपल्या कीर्तनात सातत्याने लोकांना समजतील असे साधे आणि सोपे उपदेश करायचे. सत्कर्म, सत्याचरण, परोपकार, न्याय, निती, प्रिती आणि कर्तव्य कर्माच पालन करण्याचं धोरण आखा म्हणून सांगायचे. कर्ज काढून अथवा प्रपंचाकडे दुर्लक्ष करून भगवंत भेटीसाठी तिर्थ यात्रेला जाणे ही सर्वात मोठी चुक असल्याचेही ते ठणकावून सांगायचे. गळ्यात तुळशीमाळ घाला, भगवंताचं चिंतन करा, परमार्थ वाढवा, मुलांना चांगले शिक्षण द्या, चोरी करू नका, उपाशी रहा पण कर्ज काढू नका, व्यसनाच्या आहारी जावू नका, लाचार बनू नका, हिंसा करू नका, जातीभेद अस्पृश्यता मानू नका असे रोख ठोक समाजाला बजावत समाज उद्धारक कर्मयोगीपणाचे दातृत्व बाबा दाखवून द्यायचे. आम्ही जरी आज बाबांना याची देही याची डोळा पाहिले नसेल परंतू आमच्या आजी-आजोबांच्या नेत्रातून आणि ह्रदयातून जेंव्हा आम्ही बाबांना पाहतो तेंव्हा भगवानगडावर आज वाद विवाद दिसून येतो तो आम्हाला तरी संतापाच्या खाईत घेवून जातो. आम्ही मोठ्या अभिमानाने म्हणतो होय आम्ही तुकोबांचे भक्त आणि भगवानबाबांचे शिष्य, भगवान बाबांना आणि त्यांच्या कार्याला जेंव्हा एकचित्ती आम्ही मस्तकात उतरण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा आजच्या 


भगवान गडावरील 


वादाबाबत कोण चुकतय आणि कोण चुकवतोय यावर भाष्य ही करावसं वाटत नाही. भगवानगड हे चेतना देणारं भक्तीस्थान आहे. स्व.गोपीनाथ मुंडेंना भगवानगडावरून दिल्ली दिसायची हे जेवढं त्रिकाल सत्य आहे तेवढंच भगवानगडावर जाणार्‍या प्रत्येक भक्तांना आणि बाबांच्या समाधीशी नतमस्तक होणार्‍या प्रत्येक निर्मळ वृत्तीला भगवानगडावरून स्वत:चं भविष्य दिसत आलं आहे. आणि हे भविष्य माणसाला माणूस म्हणून काटेरी वाटावरूनही संकटे दूर करत मार्गस्थ होण्यास मदत करत आला आहे. आज आम्ही पाहतोय गेल्या दोन वर्षापासून भगवानगडावर दसरा मेळाव्यापासून दोन गट पडले. गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्रींनी गडावर राजकीय भाषण करण्यास बंदी घातली आहे. आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेसह त्यांचे समर्थक गडावर दसरा मेळावा व्हावा म्हणून प्रयत्न करत आहेत. हा वाद एवढा विकोपाला गेलाय, गडाचे समर्थक पंकजा मुंडेंच्या समर्थकांवरल आग पाखड करताय आणि पंकजा मुंडे समर्थक गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्रींविरूद्ध आग ओकतायत. हा वाद एवढा विकोपाला गेलाय की एकमेकांना बदनाम करण्याची कुठलीही संधी आता सोडली जात नाहीय. आमचा या दोन्ही समर्थकांना जाहीर सवाल आहे. कुठय बाबांचा वैष्णव धर्म? कुठय भगवानबाबांचे विचार? कुठय भगवानबाबांची सहष्णूता? केलाय का काम, क्रोध, लोभाचा त्याग? भगवानगडावर जे वैष्णव यायचे ते वैष्णव आहेत का आता? कुठयत वारकरी? कुठयत माळकरी? कुठयत टाळकरी? किती जणांच्या कपाळी गोपीचंद आहे? किती जणांच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत? किती जण वर्ण अभिमान विसरेलत? आणि किती जण भगवानगडावर मेळा लागल्यानंतर खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचति वैष्णव भाई रे म्हणत एकमेकांच्या पाई किती लोक लागतायत? विचार करा संघर्षाची चेतना भगवानगड आहे. न्युनगंडतेत अडकलेल्या माणसाला संघर्ष करण्याची क्षमता देणारा भगवानगड आहे. आणि तुमचा आमचा मालक संत भगवानबाबा आहेत. एवढं वाचल्यावर तरी भगवान बाबांना स्मरण करा, आम्हाला जसे गौतम बुद्धात तुकोबा दिसतात तसे तुकोबात भगवानबाबा दिसतात. तुम्हाला खरच सांगा कोण दिसत?


सायं दैनिक बीड रिपोर्टर मधील आज दि. 24 सप्टेंबर रविवार अग्रलेख

Monday, 18 September 2017

सायं दैनिक बीड रिपोर्टर मधील आज दि. 17 सप्टेंबर रविवार अग्रलेख

सबसे खतरनाक होता है मुर्दा शांती से भर जाना

‘अच्छे
की लुच्चे दिन’


-गणेश सावंत-9422742810
एवढे तुम्ही षंड कसे, पायाखाली आग तरी थंड कसे या प्रशनावर तरी राग येतोय का? होय आम्हीच विचारतोय हा प्रश्‍न, स्वप्नाळू दुनियेत घेऊन जाणार्‍या सरकारला नाही तर नमो रुग्णांना. काय हालत आहे सध्या देशाची? कुठयत अच्छे दिन? संपली का महागाई? हे रोजचेच प्रश्‍न झाले. अरे इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तरी आहे काय? भाजपाच्या आमदारांना, पदाधिकार्‍यांना आणि मंत्र्यांना प्रश्‍न विचारण्याचाही लाग नाही. यालाच लोकशाही म्हणायचं का? नव्हे नव्हे भाजपाच्या भाषेत रामराज्य म्हणायचं का? कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आणि कुठं नेऊन ठेवलाय हा देश? हा प्रश्‍न सातत्याने का विचारण्यात येऊ नये? परंतु हे प्रश्‍न विचारण्याचे धाडस दाखवणार्‍याच्या मुसक्या बांधण्याचे मनसुबे जेंव्हा आखले जातात तेव्हा गेल्या काही दशकापूर्वी आपल्या लेखणीतून आग ओकणार्‍या कवि अवतार सिंह संधू उर्ङ्ग ‘पाश’ यांच्या या कवितेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पाश धगधगत्या निखार्‍यासारखं या कवितेतून बोलतात-
पुलिस की मार सबसे खतरनाक नहीं होती
गद्दारी, लोभ की मुठ्ठी सबसे खतरनाक नहीं होती
बैठे बिठाए पकड़े जाना बुरा तो है
सहमी सी चुप्पी में जखड़े जाना बुरा तो है
पर सबसे खतरनाक नहीं होता
सबसे खतरनाक होता है
मुर्दा शांति से भर जाना
ना होना तड़प का
सब कुछ सहन कर जाना
घर से निकलना काम पर
और काम से लौट कर घर आना
सबसे खतरनाक होता है
हमारे सपनों का मर जाना
सबसे खतरनाक होती है, कलाई पर
चलती घडी, जो वर्षों से स्थिर है|
सबसे खतरनाक होती है वो आंखें
जो सब कुछ देख कर भी पथराई सी है
वो आंखें जो संसार को प्यार से
निहारना भूल गयी है
वो आंखें जो भौतिक संसार के
कोहरे के धुंध में खो गयी हो
जो भूल गयी हो दिखने वाली
वस्तुओं के सामान्य
अर्थ और खो गयी हो व्यर्थ के खेल
के वापसी में
सबसे खतरनाक होता है वो चांद
जो प्रत्येक हत्या के बाद उगता है
सूने हुए आंगन में
जो चुभता भी नहीं आंखों में
गर्म मिर्च के समान
सबसे खतरनाक होता है वो गीत जो
मातमी विलाप के साथ कानों में पडता है
और दुहराता है बुरे आदमी की दस्तक
डरे हुए लोगों के दरवाजेपर
मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं होती
पुलिस की मार सबसे खतरनाक नहीं होती
गद्दारी, लोभ की मुट्ठी
सबसे खतरनाक नहीं होती
सबसे खतरनाक होता है, हमारे सपनों का मर जाना

आठवा ते भाषण, डिझेल के भाव कम हुये की नही... पेट्रोल के दाम निचे आये के नही.... अच्छे दिन आये की नही.... लोग कहते है मोदी नसिब लेके आया है.... फिर बोलो तुम्हे नसिबवाला चाहिये या बदनसिब... असं म्हणत ‘कसमे वादे-प्यार-वफा’ची बात करणार्‍या भाजपाच्या नेतृत्वाने आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अवघ्या देशाला स्वप्नाळू दुनियेत नेले. अच्छे दिनची वाट बघता-बघता तिन वर्षे निघून गेले आणि देशवासियांची अक्षरश: वाट लागली. कवि पाश आपल्या कवितांमधून सर्व काही ठिक आहे, पोलिसांची मार अवघड नाही, लूट अवघड नाही, परंतु आमच्या स्वप्नांची राखरांगोळी, सर्वसामान्यांच्या स्वप्नांची हत्या, सर्वात खतरनाक असल्याचे सांगतो आणि तिच हत्या भाजप सरकारकडून आता होताना दिसते. ज्या डिझेल-पेट्रोलच्या बढाया मोदी सरकारकडून मारल्या जात होत्या त्याच मोदी सरकारच्या कालखंडात डिझेल-पेट्रोलचे भाव एवढे काही वाढले की देशवासियांना अक्षरश: 
दिवसा लुटण्याचे धंदे 
भाजपने सुरू केल्याचे उघडपणे दिसून येऊ लागले. विरोधी बाकावर असताना सत्ताधारी कॉंग्रेसला धारेवर धरत भाजप महंगाई डायन खाए जात है...चा नारा देत रस्त्यावर उतरत होती. संसद बंद पाडत होती. विशेष म्हणजे त्या वेळेस क्रुड तेलाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. मात्र आता क्रुड तेलाच्या किमती ५० टक्क्यावर आलेल्या असताना पेट्रोल-डिझेलचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत. या पापाचे बाप भाजप सरकारच्या व्यतिरिक्त दुसरे कोणीच नाही हे उघड सत्य नाकारता येणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त झाले असताना ज्या पद्धतीने वेगवेगळे टॅक्स लावून सरकार देशातल्या सर्वसामान्य जनतेला लुटतय ते पाहून हे सरकार दरोडेखोरांचं आहे की, एखाद्या पक्षाचं आहे हे सांगणं कठीण होऊन बसलं. २०१३ सालची आकडेवारी पाहितली तर त्यावेळी क्रुड ऑईल ११० डॉलर प्रति बॅरल होते. त्यावेळेस पेट्रोल ७५ आणि डिझेल ५५ रुपये होते, मात्र गेल्या दोन महिन्यांच्या कालखंडात क्रुड तेलाचं बॅरल ५० डॉलरपेक्षा अधिक झालं नाही तरीही पेट्रोल ८३ रुपयांपर्यंत विकलं जातय. काय म्हणावं या सरकारला? हे सरकार आल्यानंतर आणि क्रुड तेलाचे भाव कमी झाल्यानंतर एक्साईज ड्युटी कमी होईल, अशी अपेक्षा होती. परंतु एक्साईज ड्युटी कमी तर सोडा ती कितीतरी पटीने वाढविण्यात आली आहे. पेट्रोलवर यापूर्वी ६ ते ७ रुपये एक्साईज ड्युटी होती, ती वाढवून या सरकारने २० ते २१ रुपये केली आहे. महाराष्ट्रात तर एक्साईज ड्युटी व्यतिरिक्त एक लिटर पेट्रोल मागे ११ रुपये दुष्काळ कर वसूल केला जातोय आणि १६ टक्के व्हॅट. केेंद्र सरकार २२ रुपये आणि राज्य सरकार २७ रुपये असा एकूण ४९ रुपयांचा टॅक्स जनतेच्या खिशातून वसूल केला जातो तेव्हा हे सरकार लोकांच्या हितासाठी आहे की लोकांच्या खिशावर आणि घरांवर दरोडे टाकण्यासाठी हेच समजायला मार्ग नाही. डिझेलच्या बाबतीतही चार ते पाच रुपयांवरची एक्साईज ड्युटी १२ ते १३ रुपयांवर या सरकारने नेली. महाराष्ट्रात २ रुपयांचा दुष्काळ कर आणि ९ रुपयांचा व्हॅट कर त्यातच पालिका, स्वच्छ भारत सेज यासह अन्य करही यात लावले जात आहेत. आम्हाला आश्‍चर्य याचं वाटतं, एखाद्याने मर्सिडिज गाडी खरेदी केली तर त्यावर ४२ टक्के कर द्यावा लागेल, परंतु गोरगरीबाने एक लिटर पेट्रोल खरेदी केलं तर त्यावर ५५ टक्के कर सध्या द्यावा लागत आहे. मग सांगा हे ‘अच्छे दिन’ आहेत? नव्हे नव्हे हे तर लुच्च्यांचे दिन आहेत! पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने महागाईचा जो भडका उडाला आहे आणि या महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य ज्या पद्धतीने होरपळून निघत आहे ती पद्धत प्रचंड जिवघेणी आहे. केंद्र सरकार एकीकडून दोर खेचतय आणि राज्य सरकार एकीकडून दोर खेचतय, मधे सर्वसामान्यांना थेट फाशी दिली जाते. सरकारला नेमकं करायचं काय? इथं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, धार्मिक दहशतवाद्याच्या बंदुका खांद्यावर लावल्या जातात, इथं सत्य बोलेल, सत्य लिहिल तर त्याच्या छाताडात गोळ्या घातल्या जातात आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि प्रभू रामांचं नाव घेत 
शिवराज्य आणि रामराज्य 
ची भाषा या सरकारकडून केली जाते ती भाषा निव्वळ लोकांना भावनिक करून मुख्य मुद्यांकडील लक्ष विचलित करण्यासाठी. राज्य सरकार ज्या पद्धतीने पेट्रोलवर ११ रुपयांचा दुष्काळ कर वसूल करत आहे आणि डिझेलवर ५ रुपयांचा दुष्काळ कर लादत आहे, विशेष म्हणजे गेल्या तीन ते चार वर्षांच्या कालखंडात एकदाही महाराष्ट्रात पूर्णत: दुष्काळ जाहीर केलेला नाही. असे असतानाही कराची रक्कम मात्र प्रचंड प्रमाणात वसूल केली जाते. कुठे जातो हा पैसा? शेतकर्‍यांना कर्जमाफी नाही, शिक्षणासाठी पैसा नाही, राज्यातील रस्त्यांची बोंब आहे, लोकांना मुलभूत गरजा दिल्या जात नाहीत, विजेची टंचाई प्रचंड प्रमाणात आहे, भारनियमन वाढलं आहे, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळा टाहो फोडून ओरडत आहे. छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांचे व्यापार सरकारच्या तुघलकी कारभारामुळे अक्षरश: आतबट्‌ट्याचे होऊ लागले आहेत. एकीकडे ‘मेकिंग इंडिया’ आणि ‘शाईनिंग इंडिया’ची भाषा केली जाते, सिंहापासून वाघापर्यंतची छप्पन इंचाची छाती दाखवून शिवराज्य आणि रामराज्याची भाषा बोलली जाते, दुसरीकडे मात्र केवळ या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला स्वप्नाळू दुनियेत घेऊन जात त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली जाते. लोकांच्या स्वप्नांची राखरांगोळी करणे ही सर्वात खतरनाक गोष्ट आहे हे सत्ताधार्‍यांनी लवकर उमजून घ्यावे.

Thursday, 7 September 2017

गायीला वाचवा, बाईला मारा




गायीला वाचवा

बाईला मारा

गणेश सावंत-9422742810

कलम को रोखणे के लिए अगर गोली का सहारा लेना पडता हो

तो सोचो की उस कलम में कितनी ताकद होगी

भाजपाने आपला खोटारडा प्रचार करण्यासाठी सोशल नेटवर्कींग मिसडियाची जी ट्रोलींग सुरू केली आहे, ती देशाला घातक आहे. एकीकडे सत्य बोलणार्‍या आणि सत्य लिहिणार्‍या लोकांना देशद्रोही ठरवलं जातयं. तर दुसरीकडे सत्य लिहिणार्‍या महिलांचीही हत्या केली जातेय. हा देश क्रांतीकार्‍यांचा, स्वाभिमान्यांचा आणि सत्यासाठी आपला देह चंदनासारखा झिजवणार्‍या त्यागी संतांचा आहे. इथं भलेही हुकूमशहा वधारले, सरसेशेवटी विरांची अहिंसाच सर्वश्रेष्ठ ठरली. कारण १६ व्या शतकात जगद्गुरू संत तुकोबांनी आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, शब्दाची शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका. सत्य वाद्यांची हाल अपेष्टा होईल, त्यांचे मुडदे पडतील परंतू त्यांच्याकडे असणारी शब्दाची श्रीमंती आणि शब्दाचे शस्त्र संपणार नाहीत म्हणूनच वरच्या हिंदीतील ओळींमध्ये बंदूकीला रोखणारी पेणाची ताकद दाखवली आहे. भलेही आज गौरी लंकेश यांची हत्या झाली असेल परंतू त्यांच्या विचारांची आणि सत्याची कास धरणार्‍या देशातील बहूतांशी सत्यवाद्यांच्या नसानसामध्ये पुन्हा एकदा सत्याची नशा भिनली आहे.सत्य बोलणे जिथं अपराध ठरतो, प्रश्‍न विचारणे जिथं देशद्रोह ठरू लागलाय, जिथं सत्य लिहिणं अपराध समजलं जावू लागलंय. त्याच लोकशाहीच्या देशात गुंडांची गर्दीश वाढतांना दिसून येत आहे. बंदूकीच्या सहाय्याने दबावतंत्राचा अवलंब केला जातोय. माहिती तंत्रज्ञानाचा आविष्कार सत्य दडपण्यासाठी आणि स्वत:ची मार्केटींग करण्यासाठी वापरला जातोय. म्हणून आणि म्हणूनच इथं सत्य बोलणार्‍यांना आणि सत्य लिहिणार्‍यांना शहिद व्हावे लागत आहे. एक नव्हे दोन नव्हे सत्य बोलणार्‍या आणि सत्य लिहिणार्‍या शेकडो पत्रकारांची आणि विचारवंतांची इथं निघृणपणे हत्या केली जातेय आणि पुन्हा आम्ही लोकशाहीचा डांगोरा पिटवत आहोत. याला लोकशाही म्हणायची काय? नरेंद्र दाभोळकरांसारखे ज्येष्ठ विचारसरणी असणारे दुरदृष्टीची इथे हत्या केली जाते. याच देशात गोविंद पानसरेंची हत्या होते, कलबुर्ग यांनाही गोळ्या घालून ठार मारले जाते आणि आता गायी वाचवणार्‍यांच्या देशात बाईलाही जिवंत मारले जाते. काय गुन्हा त्या महिला पत्रकाराचा, एवढाच ना तिनं सत्य बोलणं, सत्य लिहिणं आणि तथाकथीत धर्ममार्तंडांविरोधात भुमिका घेणं हिच जर तिची चुक असेल, हाच जर तिचा गुन्हा असेल तर लोकशाहीच्या राज्यात संविधानाप्रमाणे तिचा विरोध व्हायला हवा होता. गौरी लंकेश या ज्येष्ठ पत्रकार आणि संपादीका यांची जी काही निघृणपणे हत्या झालीय ती हत्या एका व्यक्तीची नव्हे तर ती विचाराची हत्या करण्याचा प्रयास तथाकथीत लोकांकडून झालाय. परंतू गौरी लंकेश यांचं शरीर मेलंय पण विचार मरतीलच हे सांगणे कठीण आहे. कारण हा देश समाजसुधारकांचा, क्रांतिकार्‍यांचा, सत्यासाठी आपलं उभं आयुष्य चंदनासारखं झिजवणार्‍या संतांचा आणि खर्‍याला खरं व खोट्याला खोटं म्हणणार्‍या व्यक्तींचा देश आहे. गौरी लंकेश यांची ज्या निघृणपणे हत्या झाली आणि त्या हत्येनंतर देशामध्ये जे काही सोशलनेटवर्कींग मिडियावर धर्ममार्तंडांचे ट्रोल उधळत सुटले ते ट्रोल एखाद्या वळू सारखे होते आणि त्या उधळलेल्या वळूचे बाशिंदे देशाचे पंतप्रधानही टि्‌ट्वीटर नावाच्या साईडवर फ्लोवर्स असतील तर अशा वळूंना वेसन घालणार कोण? गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर निखील दधीच नावाच्या मस्तवाल वळूने एक प्रतिक्रिया टाकली, तो म्हणतो ‘‘एक कुतीया कुत्तेकी मौत क्या मरी, सारे पिले एक सूर मे बिलबिला रहे है अब ये कौन कह रहा है किसी शिष्यने गुरुदक्षिणामें गौरी लंकेश को वही दे दिया जिसकी शिक्षा वामपंथी अपने शिष्यो को देती है?’’ याचं हे टि्‌ट्वीट आणि निखील दधीच नावाच्या या मस्तवाल वळूला देशाचे पंतप्रधानही फॉलो करत असतील तर त्या देशामध्ये नेमकं होणार तरी काय? हा प्रश्‍न साहजिकच उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. नुसता हा एक वळू नाही तर असे अनेक वळू गेल्या तीन दिवसात उधळतांना दिसून आले आहे. त्यामुळे तथाकथीत देशप्रेमी आणि धर्ममार्तंडांचा उधळलेला वळू रोखणार आहे की नाही हा प्रश्‍न कायम राहणार आहे. गौरी लंकेश यांची हत्या झाली आणि त्या हत्येनंतर टिव्हीमध्ये डिबिटसाठी बसणारे भाजपाचे असो अथवा हिंदूत्वाचे पुरस्कार करणारे प्रवक्ते थेट या हत्येला कुठं घरगूती कारणाचा तर कुठं भाऊबंदकीची किनार जोडू पाहत होते तेव्हा तर या तथाकथीत हिंदूत्वाचा पुरस्कार करणार्‍या लोकांची शरम वाटत होते. एकीकडे सेक्यूलरिझमला शिव्या शाप देणारे आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करत एक प्रकारे अशा हत्यांना अप्रत्यक्षरित्या समर्थन देणारेच दिसून येत होते. आज आम्ही लिहितोय, नक्कीच याचा तथाकथीत हिंदुवाद्यांना राग आल्याशिवाय राहणार नाही. परंतू ज्या हिंदूत्वाचा पुरस्कार हे तथाकथीत लोक करतात त्या हिंदू धर्मात हत्यासारख्या गंभीर गुन्ह्याला थारा दिसत नाही. हिंदू धर्माचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ गिता त्याग करण्याची शिकवण देते, हेही बहूदा या तथाकथीत लोकांना माहित नसावं. म्हणूनच सत्य लिहिणार्‍या विरूद्ध आणि सत्य बोलणार्‍याविरूद्ध सरळ सरळ या देशात हत्येसारखं पातक केलं जातयं. हा विचार हुकूमशाही धोरणाचा पुरस्कार करणारा नक्कीच आहे आणि हे धोरण लोकशाहीच्या देशाला परवडणारे नाही. या आधीही दोन ते तीन शतकापूर्वी अनेकांनी या ठिकाणी हुकूमशहा होण्याचं धाडस दाखवलं. दोन बोट तुपात बुडतील एवढी हुकूमशाहीही गाजवली. परंतू जेव्हा या देशाच्या स्वाभिमानी नागरीकांच्या गळ्यापर्यंत आलं तेव्हा त्याच देशाच्या लोकांची तळपायाची आग मस्तकाला गेली. संताप लाव्हारसाप्रमाणे प्रत्येकवेळा बाहेर पडला गेला, हाताच्या मुठी वळल्या गेल्या, पुन्हा इन्क्लाबचे नारे दिले गेले, निधड्या छात्यांवर गोळ्या झेलल्या गेल्या आणि हुकूमशाही वृत्तीला नेस्तनाबूत केलं, नामोहरम केलं. मग हे करण्यासाठी गांधींची अहिंसा ही विरांची अहिंसा ठरली. तिथंही नथूराम गोडसे सारख्या उधळलेल्या वळूने गांधींची गोळ्या घालून हत्या केली. छातीवर गोळ्या झेलने हे या देशाला नवे नाही, त्यामुळे दाभोळकर, पानसरे, कलबुर्ग आणि लंकेश यांची हत्या करून कोणी जर सत्याच्या विचाराची हत्या करू पाहत असेल तर ते नादान म्हणायला हरकत नाही. इथं सनसनी आणि थरकाप एकत्र एवढ्यासाठीच येतो, या अगोदर इथं काय झाले माहिती तंत्रज्ञानाच्या आविष्काराचे प्रयोग कोणी कशासाठी केले हे सांगण्यापेक्षा भाजप आणि संघ परिवार मात्र माहिती तंत्रज्ञानाच्या आविष्काराने प्रफुल्लीत झालेल्या आजच्या युगात सोशल नेटवर्कींग मिडियाचा वापर मात्र निव्वळ खोटारड्यापणासाठी करतोय, हे उघड सत्य नाकारता येणार नाही म्हणूनच स्वाती चतुर्वेेदी नावाच्या महिला पत्रकाराने गेल्या तीन वर्षांच्या कालखंडात तिच्यावर ज्या पद्धतीने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोशल नेटवर्कींग मिडियाद्वारे हल्ले चढवले, तिच्या अब्रूचे धिंदवडे काढले, तिला लज्जा वाटेल असे पब्लिश केले. तरीही सत्याची पहारेकरी असणारी स्वाती चतुर्वेदी मागे हटली नाही तर तिने आय ऍम अ ट्रोलनावाचे एक पुस्तक गेल्या काही महिन्यापूर्वी इंग्रजीमध्ये प्रकाशित केले. या पुस्तकात तिन वर्षांच्या कालखंडामध्ये भाजप सरकार ज्या दिशेने जातयं, संघ आणि भाजप सोशल नेटवर्कींग मिडियाचा ज्या पद्धतीने वापर करतयं आणि खोटारडा प्रचार करत देशाची जी दिशाभूल करतयं याची इत्यंभूत माहिती या पुस्तकामध्ये उदाहरणासह आणि पुराव्यासह दिलीयं. स्वाती चतुर्वेदी यांनी इंग्रजीमध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकाचं मराठी अनुवाद मुग्दा कर्णीक नावाच्या पत्रकारानेच केलं. ही महिलाही तथाकथीत धर्ममार्तंड्याकडून पिडीत म्हणायला हरकत नाही कारण आजच्या राज्यकर्त्यांचं धोरण आहे, इथं सत्य बोलायचं नाही, प्रश्‍न विचारायचे नाही, इथं फक्त होयबा एवढंच राहायचं. तसं देशातली बहूतांशी मिडिया सध्या तरी भाजपाच्या अधिपत्याखाली, सत्ताधार्‍यांच्या धर्मसत्तेच्या छत्राखाली आपली कोख उजवण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठं चिरा उतरला जातोय तर कुठं नथ उतरली जातेय. आम्हाला आश्‍चर्य या गोष्टीचे वाटत नाही की पत्रकारांची लाचारी आणि पत्रकारांची बातमी ही तथाकथीत सत्ताधार्‍यांच्या धर्मक्षेत्राखाली पैदा होत असेल तर ती जिथं चिरा उतरला जातो, जिथं नथ उरतली जाते अशा शय्यवृत्त तिचा जन्म होतो असे आम्ही संतप्तपणे म्हणायला मागेपुढे सरणार नाहीत. कारण आय ऍम अ ट्रोल हे पुस्तक वाचल्यानंतर स्वाती चतुर्वेदी आणि मुग्धा कर्णीक यांना सोशल नेटवर्कींग मिडियाच्या मस्तवाल उधळलेल्या वळूकडून ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्या धक्कादायक, भारतीय सुसंस्कृत म्हणून घेणार्‍यांच्या मुस्काटात हाणा म्हणणार्‍याच एक नव्हे दोन नव्हे शेकड्यावर आणि हजारावर संघ परिवार आणि भारतीय जनता पार्टीने सोशल नेटवर्कींग मिडियावर आपल्या खोटारडेपणाची मार्केटींग करण्यासाठी जे ट्रोल उभारले ते टोळधाडीपेक्षा कमी नव्हे हे यातून उघड होते. विशेष म्हणजे खोटारडा प्रचार करणारा आणि मार्केटींग करणारे या टोळधाडीला फ्लोअर्स हे देशाच्या पंतप्रधानांपासून भाजपाचे अनेक नेते आणि हिंदूत्वाचा पुरस्कार करतो म्हणून शेख्या मिरवणारे अनेक तथाकथीत हिंदूत्ववादीही त्यामध्ये आहेत. स्वाती चतुर्वेदी आणि मुग्धा कर्णीक यांच्या विरोधात जी गरळ ओकली गेली ती गरळ केवळ आणि केवळ भाजपाला त्या विरोध करतात, भाजपाच्या विचारसरणीला ते विरोध करतात म्हणून त्यांची सातत्याने अवहेलना करण्यात आली. या पुस्तकावर नक्की बंदी येईल, या पुस्तकाचं उदाहरण गौरी लंकेश यांच्या लेखात एवढ्यासाठीच घ्यायचं होतं. नुसती गोैरी लंकेश यांची हत्या झालीयं परंतू स्वाती चतुर्वेदी नावाच्या पत्रकाराला तर सोशल नेटवर्कींग मिडियातून रोज जिवंत मारलं जातयं. का? या ठिकाणी लोकशाहीचं राज्य आहे ना, इथं भारतीय संविधानाने बोलायला आणि लिहायला स्वातंत्र्य दिलंयं ना, इथं सर्वश्रेष्ठ मंदीर हे लोकशाहीचं म्हणजेच लोकसभा आहे ना, आणि या लोकशाहीच्या लोकसभेतील मंदीरातला सर्वांत मोठा ग्रंथ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे ना, मग असे असतांना तथाकथीत धर्ममार्तंडांकडून आणि त्या धर्ममार्तंडांचा पुरस्कार करणार्‍या सत्ताधारी भाजपाकडून विचाराला विरोध का केला जातोय. प्रश्‍न विचारणार्‍यांना, सत्य बोलणार्‍यांना, सत्य लिहिणार्‍यांना इथं देशद्रोही का ठरवलं जातयं. त्यांना धमक्या का दिल्या जातायत, त्यांची हत्या का केली जातयं, एक विशष्ट प्रणाली राबवण्याच्या नादात जर कोणी थेट भारताच्या स्वाभिमानाला हात घालत विशिष्ट विचार प्रणाली नसा नसात भिनवण्याचा प्रयत्न करत असेल तर हा त्यांचा प्रयत्न नुसता प्रयत्नच राहिल कारण इथं, तुकोबांच्या गाथा बुडवल्या मात्र तुकोबांचे कधीही न भंग पावणारे अभंग आजही मुखोदीत आहेत, कारण त्या अभंगांना सत्याची झालर होती तशीच झालर आजही विचारवंतांच्या विचारांना आहे हे सत्ताधार्‍यांनी विसरता कामा नये. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर देशात जे काही वातावरण निर्माण झाले आहे ते वातावरण सत्ताधार्‍यांचं मुस्काड फोडणारं आहे, म्हणूनच सत्ताधार्‍यांनी आणि सत्ताधार्‍यांच्या विचारांची खोटारडी प्रसिद्धी करणार्‍यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येवर शंका कुशंका उपस्थित करण्याचा प्रयास नव्हे तर खटाटोप सुरू केला, त्यामध्ये

कॉंग्रेस शासीत राज्यात विचारवंतांच्या हत्या का होतात?

हा एक कुठल्याही देशवासियांच्या मनामध्ये विचारवंतांच्या हत्येबाबत काहूर माजून सोडणारा प्रश्‍न नक्कीच आहे. नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली त्या वेळेस महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचं सरकार होतं. कुलबर्गी यांची हत्या झाली त्यावेळेस कर्नाटकात कॉंग्रेसचं सरकार होतं. आता गौरी लंकेश यांची हत्या झाली तेव्हाही कर्नाटकामध्ये कॉंग्रेसची सत्ता आहे. मग विचारवंतांची हत्या कॉंग्रेस शासीत राज्यातच होतात म्हणजेच कॉंग्रेस शासीत राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे तिनतेरा उडालेले आहेत यामध्ये तथ्यही असेल परंतू याचा अर्थ हा होत नाही की कॉंग्रेस शासीत राज्यात अशा घटना घडतात. सदरचे हत्याकांड हे व्यक्तीची हत्या नव्हे तर विचाराची हत्या करण्याच्या अनुषंगाने केलेला पुर्वनियोजित कट हे उघड असतांना गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कॉंग्रेस शासीत राज्यात विचारवंतांच्या हत्या का होतात हा प्रश्‍न विचारणे म्हणजे खोटारड्या प्रचाराचे ट्रोल नाचवत टोळधाड माजवणे म्हणावे लागेल. ठिक आहे कॉंग्रेस शासीत राज्यांमध्ये विचारवंतांच्या हत्या झाल्या आता भाजप शासीत राज्यात त्या विचारवंतांची हत्या करणार्‍या नराधमांच्या मुस्न्या तर बांधा. एकीकडे सर्जीकल स्ट्राईक करून आपण टिर्‍या बडवून घेतोय, कायदा व सुव्यवस्थेच्या नावाने आम्ही कठोर आहोत हे सांगितलं जातयं. राम राहिम सारख्या बलात्कार्‍याचे वाटोळे करण्यापेक्षा त्याला सुखकारक कसे होईल असंच ज्या राज्यामध्ये केलं जातं त्या राज्यात भाजप शासीत सत्ता असते हे विसरता कामा नये. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला जात पात धर्म पंथ नसतो. हे सर्वात प्रथम जाणवून घ्यायला हवे, कॉंग्रेस शासीत राज्यात विचारवंतांची हत्या का होते हे विचारण्यापेक्षा अशा राज्यात विचारवंतांची हत्या झाली असेल तर त्या हल्लेखोरांना आणि खुण्यांना जेरबंद करून फाशीच्या तख्तापर्यंत पोहचविण्याचे काम भाजपाने केलं असतं तर ते अधिक बरं वाटलं असतं. मात्र असं न करता केवळ देशातील जनतेला भुलभुलैय्या करायचं, जात पात धर्मपंथांच्या नावावर वैचारीक गोंधळ निर्माण करून सोडायचा, एकीकडे गायी वाचवा हो म्हणायचंअन् बाईला जिवंत मारायचं हे कसलं धोरण, गायीच्या पोटात ३३ कोटी देव आहेत, गाय पुजनीय आहे, तिला वाचवलंच पाहिजे. हरकत नाही, चला आम्हीही या विचाराशी सहमत पण बाईच्या पोटामध्ये ३३ कोटी देव नसले तरी ३३ कोटी देवांना पुजनारा किंवा त्या देवांना शिव्या शाप देणारा कोणी तरी जन्माला येतोय म्हणून एकीकडे गायी वाचवायच्या आणि दुसरीकडे बाई मारायच्या हे धोरण सुसंस्कृत भारताला परवडणार आहे का? हिच का भारताची संस्कृती, हेच का भारतीयांचे संस्कार, काय चालूयं नेमकं आणि कशासाठी हा खटाटोप, सत्य बोलणारी बाई, सत्य लिहिणारी बाई जेव्हा बोलते, लिहिते तेव्हा तिच्या अब्रूचे वाभाडे काढले जातायत, तिला सत्य बोलण्यापासून रोखले जाते, शेवटी ऐकलंच नाही तर तिच्यावर गोळ्या घातल्या जातयंत. अरेरे हे तर षंढपणाचं लक्षण, विरोधाला विरोध नक्की असावा, वैचारीक विरोधाला वैचारीकपणानेच विरोध केला जावा, जिथं लोकशही आहे, जिथं भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ आहे तिथं जात पात धर्मपंथाला थारा देता कामा नये. एकीकडे मिडियाच्या नावाने गरळ ओकायची आणि दुसरीकडे सत्तेच्या धर्मक्षेत्राखाली मिडियाला वाकवायचे हे जे सत्ताधारी भाजपाला धोरण जमलंय त्या धोरणावर इंडिया टिव्हीचे रविश कुमार यांचं एक वाक्य आम्हाला खास करून आठवतं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री झोपताना त्यांच्या तळपायाला विष लावून झोपले तर या देशातले ९८ टक्के पत्रकार सकाळी मरून पडलेले दिसतील, हे जळजळीत सत्य रविश कुमार यांनी व्यक्त केलं. तेव्हा भाजपाच्या ट्रोलपुढे खरंच देशाची मिडिया झुकतेय का? असं जेव्हा पाठीमागं वळून पाहिलं तेव्हा याचं उत्तर हो आल्याशिवाय राहत नाही. परंतू अशा परिस्थितीतही काही पत्रकार असे आहेत, जे सत्यासाठी, समतेसाठी लोकशाहीसाठी कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूरांसाठी पोटतिडकीने प्रश्‍न मांडतायत आणि त्या पोटतिडकीमुळेच इथं गायी वाचवल्या जातायंत मात्र बाईला जिवंत मारलं                                

सायं दै बीड रिपोर्टर मधील आजच्या बिनधास्त मध्ये वाचा

Thursday, 31 August 2017

ऐसे कैसे झाले भोंदू| कर्म करूनी म्हणती साधू॥ अंगी लावुनिया राख| डोळे झाकुनिया करती पाप॥

आजच्या सायं दै बीड रिपोर्टर मध्ये वाचा रगेल आणी रंगेल बुवा बाबाची लीला बिनधास्त मध्ये

ऐसे कैसे झाले भोंदू| कर्म करूनी म्हणती साधू॥ 

अंगी लावुनिया राख| डोळे झाकुनिया करती पाप॥


गणेश सावंत-9422742810

संस्कार आणि संस्कृतीचा टेंभा मिरवत देशवासियांच्या विश्‍वासाला, त्यांच्या भक्तीचा बाजार मांडणारे एकशे बडकर एक बुवा बाबा महाराज आपल्या कुकर्माने प्रसिद्धीच्या झोतात येत आहेत. दुर्दैवं याचं वाटत हा देश साधू संतांचा असतांना या देशामध्ये असे निर्लज्ज आणि नालायक लोकांचा जन्म होतोच कसा आणि जन्म झालाच तरी राजकर्ते, राज्यकर्ते, राजसत्ता, धर्मसत्ता अशांना थारा देतेच कसे. जे काही महाराज आज जेलमध्ये आहेत ते व्याभिचारी, बलात्कारी आणि स्त्रीयांचा अपमान करणारे आहेत. हा देश नामदेवांचा आहे, तुकोबांचा आहे, संत भगवानबाबांचा आहे. अरे आम्ही तर म्हणून तुकोबांना बदनाम करण्यासाठी तेव्हाच्या धर्ममार्तंडांनी त्यांच्या अंगावर वेश्या पाठवली, तुकोबाने त्या वेश्येला परावी नारी रुख्मीण समान म्हणत तिला मातेचा दर्जा दिला हे असतात संत. बीड जिल्ह्यात गेल्या शतकात होवून गेलेले थोर संत भगवानबाबांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या अंधरूनात चोळी टाकली. आमच्या बाबांनी स्वत:चे जनेंद्रीय कापून संतत्वाचं, त्यागाचं आणि भक्क्तीभावाचं दर्शन घडवून दिलं, याला म्हणतात संत. आणि आजचे जेलमध्ये जाणारे संत नव्हे ते तर बाईलवेडे भडवेच.
संस्कार आणि संस्कृतीचा टेंभा मिरवणार्‍या तथाकथीत भोंदूबाबांचा उच्छांद देशात काही वर्षांपासून पहावयास मिळत आहे. सोळाव्या शतकापर्यंतच्या आणि त्यानंतरच्या बहूतांशी संतांनी समाज प्रबोधन करत संस्कार आणि संस्कृती टिकवली खरी परंतू त्यावेळीही त्या खर्‍या संतांना टाळकुट्यांनी देश बुडवला म्हणत काहींनी खर्‍या संतांना जाणीवपूर्वक त्रास दिला. त्रास देणारे खरे तर संस्कार आणि संस्कृतीचा नुसता टेंभा मिरवणारे होते. त्याच मंबाजीच्या औलादी आता देशात संस्कार आणि संस्कृतीचा टेंभा हातात घेवून वळवळ करत आहेत. या नुसत्या वळवळ करत नाहीत तर कामातुरा भय न लज्जागत भाद्रपद महिना प्रत्येक महिन्यात समजून श्‍वानाचीया परि आपले दर्शन घडवतांना दिसून येत आहेत. दुर्दैवं याचं वाटतं मोठमोठ्या बिदाग्या घेणारे हे निर्लज्ज महाराज जेव्हा स्त्रियांच्या अब्रूला हात घालतात तेव्हाही अंध भक्त त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरतात. काय म्हणावं या भक्तीला अन् काय म्हणावं या अंधश्रद्धेला. या देशात असे काही संत होवून गेले की त्या संतांनी वेश्येलाही मातेचं स्थान दिलं. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना बदनाम करण्यासाठी तथाकथीत धर्ममार्तंडांनी कटकारस्थान करत त्यांच्याकडे वेश्येला पाठवलं. तेव्हा तुकोबांनी परावी नारी रुख्मीण समान मानत तिला मातेचं स्थान दिलं. तर बीड जिल्ह्यात गेल्या शतकात होवून गेलेले संत भगवान बाबा यांच्या अंथरुनात काही तथाकथीत लोकांनी चोळी टाकली तर भगवान बाबांनी आपलं जनेंद्रीय कापून संतांची उदारता आणि संतांचा त्याग दाखवून दिला. दुसरीकडे मात्र आसारामबापूंपासून ते रामरहिम पर्यंत ज्या काही संतांच्या कामातूर घटना आज निदर्शनास येत आहेत त्या धर्मालाच नव्हे तर देशाच्या संस्कार आणि संस्कृतीला काळिमा फासणार्‍या आहेत, असे असतांनाही अशा संतांना केवळ राजकीय दृष्ट्या लाभ उठवायचा म्हणून राज्यकर्ते जवळ करत असतील, मोठमोठ्या बिदाग्या देत असतील, त्यांच्या संस्थांना टॅक्स फ्री करत असतील तर या कामातूर झालेल्या मस्तवाल महाराजांच्या बलात्काराला ते जेवढे जबाबदार आहेत तेवढेच जबाबदार सरकारचे नुमाइंदे आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आज काल कोणीही उठतं आणि कपाळी टिळा, अंगात भगवे वस्त्र परिधान करून मला अमूक देवाचं वरदान असल्याचं सांगत लोकांना भुलवित आपली दुकानदारी चालू ठेवतं. ही दुकानदारी एवढी फोपावली जातेय की ती दुकानदारी फोपावण्यासाठी जे काही एजंट म्हणण्यापेक्षा भडवे उभे केले जातात त्या भाडखावू वृत्तींच्या भडव्यांमुळेच या महाराजांची चलती. मग यामध्ये भाडखावू वृत्ती दोन पैशांपासून ते सत्तेची खुर्ची मिळवणार्‍या लोकांपर्यंत उघडपणे पहावयास मिळते. 
ऐसे कैसे झाले भोंदू| 
कर्म करूनी म्हणती साधू॥
अंगी लावुनिया राख| डोळे झाकुनिया करती पाप॥
दाखवुनिया वैराग्याची कळा| भोगी विषयाचा सोहळा॥
तुका म्हणे सांगो किती| जळो तयाची संगती॥

कुकर्म करुन साधू म्हणून घेणारे, लोकांना फसवणारे भोदू जगात का निर्माण झाले, हे कळतच नाही. दिवसा अंगाला राख फासून डोळे झाकून ध्यान करायचे आणि रात्री पापे करायची असा या लोकांचा व्यवहार. एकीकडे वैराग्याचं सोंग दाखवायचं अन् दुसरीकडे अंध भक्तांच्या माघारी विषय सोहळ्यात नाचायचे ही रित या तथाकथीत भोंदूबाबांची. यामुळे त्यांच्या सोबत असणार्‍यांचे अथवा ते ज्या देशात आहेत त्या देशाचे भले होवूच शकत नाही. अशा महाराजांच्या संगतीला आग लागो असं या अभंगात तुकोबांनी म्हटलंय. मग जर सोळाव्या शतकात तुकाराम महाराजांनी भोदू संतांबाबत असे शब्दाचे आसूड ओढले असतील तर मग आज माहिती तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या आविष्काराने प्रफूल्लीत झालेल्या एकवीसाव्या शतकात रामरहिम सारख्या नागव्या बाबाचे समर्थन आजपर्यंत करण्यात आले. या देशाने आसाराम बापूसारखा बलात्कारी थेरडा महाराज पााहितला. ज्या आसाराम बापूच्या शाही स्नानाला लाख लाखाच्या आणि कोटकोटीच्या बिदाग्या द्याव्या लागायच्या. झोपेतून उठलेला आसाराम बापू स्वत:च्या डोळ्याचे चापडे चिपडे चोळत बाहेर निघायचा आणि महिला भक्त त्याला दुधाने अंघोळ घालायच्या. त्या दुधाची नंतर खिर केली जायची आणि ती प्रसाद म्हणून वाटली जायची. एवढं दुर्दैवं या देशवासियांचं आहे. याला दुर्दैवं म्हणायचं की अंध विश्‍वास म्हणायचा हे सांगणे कठीण आहे. तोच आसाराम बापू बलात्काराच्या आरोपात पकडला जातो, त्याला शिक्षा होते. तेव्हा तरी देशातल्या राज्यकर्त्यांनी या देशात भोंदूगिरी करणार्‍या तथाकथीत बाबांच्या नागव्यापणावर आसूड ओढायला हवे होते परंतू असं न होता हरियाणा पंजाबमध्ये महाराजांच्या नावाखाली गुंडांचे डेरे दिसून आले आहेत. रामरहिमच्या अगोदर अशाच एका महाराजाने थेट देशाच्या आर्मीविरूद्ध आक्रमन बोलले नव्हे नव्हे तर जणू युद्धाला आव्हान दिले, कुठून येते या लोकांमध्ये ही ताकद, पाप करायचं, महिला मुलींवर बलात्कार करायचा अन् नंतर उघडं पडलंच तर थेट देशाच्या अस्मितेला आव्हान द्यायचं. कसली आलीयं श्रद्धा. भोगविलासी अन् कामातूर झालेल्या अशा महाराजांचे जनेंद्रीय खरं तर चौका चौकात कापून त्यांना शिक्षा द्यायला हवी म्हणजे भविष्यात तरी श्रद्धेच्या नावावर बाजार मांडणारे, आया बहिणीच्या इभ्रतीला हात घालणार नाहीत. पंधरा वर्षांपूर्वी एखाद्या मुलीवर बलात्कार होतो, त्या डेर्‍यात साधवी म्हणून राहणार्‍या मुलीचा लैगिक छळ होतो आणि ती मुलगी पंधरा वर्षांपूर्वी सरकारसह न्याय व्यवस्थेला पत्र पाठवून आपली व्यथा मांडते. विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतर प्रथमच या देशामध्ये तेव्हा भाजपाचं सरकार आलेलं होतं. 
जय जवान| जय किसान॥ बरोबर जय विज्ञानचा नारा 
राजकारणातले अजातशत्रू पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे एकीकडे देत होते. देश प्रगतीपथावर जातोय असं सांगत होते. त्याचवेळी संस्कार आणि संस्कृतीचा टेंभा मिरवणारे तथाकथीत बुवा मात्र हरियाना पंजाबमध्ये आपल्या उच्छांदाचे पाय रोवत होता. देश जागतिक पातळीवर आघाडीवर जाईल, बलशाली होईल असं एकीकडे वाटत होतं तर दुसरीकडे देशवासियांच्या भक्तीशी त्यांच्या भावनाशी खेळले जात होते. देश जागतिक महासत्ताक होईल आणि महासत्ताक होण्यासाठी देशवासियांनी साक्षर होत पुढं यावं असं आव्हान केलं जात होतं अन् इकडं देशात काही बुवाबाज भांमटे लोकांना जादू टोण्याच्या नावावर मुर्खात काढत होते. महिला सशक्तीकरणाचा नारा दिला जात होता अन् इकडे रामरहिमसारखा आणि आसारामबापूसारखा तथाकथीत महाराज महिलांच्याच अब्रूचे लचके तोडत होता. अशा स्थितीत साध्वी थेट पंतप्रधानांना पत्र लिहितेय. न्याय व्यवस्थेला पत्र लिहितेय मात्र न्यायालय यावर सकारात्मक दृष्टीकोणातून पाहतं आणि सीबीआय चौकशीचे आदेश देतं. सरकारने काय केलं? हा आमचा सवाल, हा देशाचा सवाल आहे. तर बुवा बाबा हा माणसातला आहे, अध्यात्मातला आहे, इथं हात घातला तर आपले हात पोळतील, आपली सत्ता जाईल म्हणून तेव्हाच्या राज्यातील सत्ताधार्‍यांनी आणि केंद्रातील सत्ताधार्‍यांनी दुर्लक्ष करत या महाराजाला अभय दिलं. वर्षांमागून वर्षे गेले, चौकशीअंती महाराज हा लिंगपिसाट आहे हे उघड झाले. तरीही गेल्या पंधरा वर्षाच्या कालखंडात केंद्र सरकारपासून ते वेगवेगळ्या राज्य सरकारने रामरहिमला अष्टपैलू म्हणून सन्मानित केले गेले. हरियाणा सरकारने बिदाग्या दिल्या. त्या बिदाग्यामधून आणि त्या सन्मानामधून याच्यातला महाराज तर सोडा माणूसपण संपला आणि हा निव्वळ लिंगपिसाट कामातूर कुत्रा निघाला. मात्र तरीही आम्हा राज्यकर्त्यांना आणि आंधळ्या भक्तांना या महाराजाचा खरा चेहरा दिसला नाही. मात्र अशा स्थितीतही काही लोकांना तो चेहरा दिसला. रामचंद्र छत्रपती नावाच्या पत्रकाराने आपल्या ‘पुरा सच’ या सायं दैनिकात या रामरहिमच्या बातम्या छापल्या, तेव्हा महाराज म्हणून घेणार्‍या, संत म्हणून घेणार्‍या आणि पिताजी म्हणून घेणार्‍या या बाबाने 
छत्रपतीला गोळ्या घातल्या
रामचंद्र छत्रपती रामरहिमच्या काळ्या करतूदी जगासमोर आणत होते. नावात त्यांच्या छत्रपती असल्यामुळे ते सत्याची कास धरून होते. रामचंद्रांनी महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला आणि त्यातून प्रेरणा घेत सत्याची पताका खांद्यावर घेतली. आपल्या वर्तमानपत्रातून भोंदूगिरी करणार्‍या महाराजांविरोधात आक्रमक भुमिका घेतली आणि रामरहिमसारख्या नितीभ्रष्ट, नतभ्रष्ट महाराजाचे कोथळे बाहेर काढण्यास सुरूवात केली. दुर्दैवं याचं वाटत की रामचंद्र छत्रपती यांच्या घरात घुसून त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र या प्रकरणातही तत्कालीन विद्यमान सरकारने म्हणावं तसं लक्ष घातलं नाही. म्हणून तर अशा भोंदूबाबाची मिजास वाढली, मस्ती वाढली, माज वाढला आणि या भामट्यांनी आपल्या डेर्‍यांमध्ये सावित्रीबाई फुलेंची शाळा नव्हे तर गुंडांची शाळा सुरू केली. वेगवेगळ्या आमिषाला बळी पडत अखंड महिला भक्तीभावाने त्या ठिकाणी गेल्या परंतू त्यांच्या भक्तीवरच या बाबाने बलात्कार केला. ज्या कोणी मुलींनी याला विरोध केला त्या विरोधाला या बाबाने आपल्या विश्‍वासर्हतेच्या आणि सरकारी आशिर्वादाच्या धमक्यांनी तो विरोध मोडून काढला. त्यामुळेच एक नव्हे दोन नव्हे राम रहिमसारख्या लिंगपिसाटाने सुमारे ३०० महिलांवर बलात्कार केल्याचे आता उघड होतांना दिसून येवू लागलं आहे. स्वत:ची काम वासना भागवण्यासाठी या हरामखोराने आपल्या डेर्‍यात एक भुयार निर्माण केलं होतं. त्या भुयारामध्ये सर्वकाही ऐशोआराम पहावयास मिळत होते. शय्यागृह लाजवेल असं होतं. किती हा कळस आणि नालायकपणा पण तरीही राज्यकर्त्यांना याचं काही वाटलं नाही. दुर्दैवं याचं वाटत, जेव्हा अशा लिंगपिसाटांना आश्रय देणारे आणि त्यांच्या अंधभक्तीत राहणारे या
लिंगपिसाटांसाठी रस्त्यावर 
उतरतात, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतात. तेव्हाही सरकारला जाग येत नाही. या प्रकरणामध्ये कोर्ट तटस्थ होतं. अशा बलात्कार्‍यांना खडी फोडायला पाठवायचंच ही भुमिका कोर्टाची होती. म्हणूनच ज्या दिवशी निकाल येणार आहे त्या दिवशी राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवा, १४४ कलम लागू करा असे आदेश दिले होते मात्र सरकारने १४४ कलम लागू केला परंतू जेव्हा हा लिंगपिसाट भोदूबाबा दोषी ठरवला गेला तेव्हा हरियाणा, पंजाब आणि दिल्लीसह अन्य राज्यात अंध भक्तांनी आणि गुंडांच्या बाबांनी धुमाकूळ घातला. कित्येक निष्पाप लोक मारले गेले. हजारो लाखो करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले, हे केवळ हरियाणामधील भाजप सरकारच्या दुर्लक्षपणामुळेच. आजपर्यंत या बाबाला या लिंगपिसाट माणसाला केवळ सत्तेसाठी पोसलं गेलं. त्याच्या डेर्‍यामध्ये महिलांवर अत्याचार होतोय, बलात्कार होतोय, तो गुंड पाळतोय, शस्त्रसाठा जमा करतोय यापेक्षा तो आपल्याला आमदार देतोय याकडेच सरकारने लक्ष दिलं. सरकारला असं कधीही वाटलं नाही हा पॅशनेबल बाबा चित्रपटामध्ये जावून मुके घेतोय. मोठमोठ्या पबमध्ये जातोय, बाया नाचवतोय, स्वत: नाचतोय, वेगवेगळी वेसने करतोय मग त्याचे चारित्र्य ते काय असेल याची भनकही या राज्यकर्त्यांना झाली नाही. हा उघड उघड नंगानाच करत होता. तेव्हा तुकोबाच्या भाषेत झालेच तर या नंगानाचाचे वर्णन या अभंगातून पाहता येईल. 
एैसे संत झाले कळी| तोंडी तंबाखूची नळी॥
स्नान संध्या बुडविली| पुढे भांग ओढविली॥
भांग भूर्का हे साधन| पची पडे मद्यपान॥
तुका म्हणे अवघे सोंग| तेथे कैचा पांडूरंग॥

ज्या महाराजांच्या तोंडात पान, तंबाखूचा तोबरा भरून ठेवलेला आहे. स्नान संध्या इत्यादी आचरण जो विसरत आहे, गांजा मद्य इत्यादी व्यसनाच्या अधीन होत जो उघड उघड नंगानाच करतो. संतत्वापेक्षा दंभानेच जो परिपूर्ण असतो त्याला इश्‍वर पावेल का? मग आम्ही तर म्हणू या रामरहिमला कुठला ईश्‍वर थारा देत असेल. ज्याने अबला महिलांच्या शरीराचे लचके तोडले, त्यांच्या भावनांशी खेळला, त्यांच्या परिवाराच्या परिवाराशी विश्‍वासघात केला तो महाराज असूच शकत नाही हे राज्यकर्त्यांना का कळू नये. आजही देशात आणि राज्यात असे अनेक भाडखावू वृत्तीचे आणि संतांच्या नावे आपली दुकाने मांडून बसलेले कामातूर बुवा जिथं तिथं दिसून येत आहेत. आतापर्यंत राधे मॉं असो आसारामबापू असो किंवा अन्य सात ते आठ जे की केवळ महिलांवर बलात्कार केले म्हणून जेलमध्ये गेले आहेत ते असोत. यांची वर्गवारी पाहितली, यांचे आचरण पाहितले तर हे संस्कार आणि संस्कृतीपासून कोसो दूर आहेत. हे लोक केवळ स्त्रीलंपट आणि त्या लोकांजवळ इतरांना घेवून जाणारे भाडखावू वृत्तीचे याशिवाय याविषयी काही बोलणे ते चुकीचे ठरेल. रामरहिमने केलेला उच्छांद हा संस्कार, संस्कृतीबरोबर धर्माचा अपमान जसा आहे तसा देशवासियांचा सर्वात मोठा विश्‍वासघात आहे, त्यामुळे या महाराजाला जामीन मिळणार नाही याची तरतूद आता करायला हवी. हे एवढ्यासाठीच, यासाठी सांगावंसं वाटतं कारण हा रामरहिम दोषी ठरला जाणार हे जेव्हा राज्यसरकारसह केंद्र सरकारला माहित होतं तेव्हा तो कोर्टात येताना ज्या पद्धतीने त्याचा ताफा आणि ताफ्यामधील गाड्यांमध्ये ज्या वस्तू मिळून आल्या त्या निव्वळ त्या बाबाला अभय देणार्‍या आणि देशवासियांच्या संकटात भर घालणार्‍या होत्या. त्यामुळेच अशा बाबांना आता इथं स्थान नाही ही भुमिका सरकारने घ्यायला हवी आणि माझ्या देशातील राज्यातील आणि जिल्ह्यातील 

माता भगिनींनो 

काहीही करा, घरातल्या मायबापांना देव माना, सासू-सासर्‍यांना देव माना त्यांची सेवा करा परंतू शेतात काही पिकत नाही, पोरगं पास होत नाही, पोरीचं लग्न होत नाही, नवर्‍याची दारू सूटत नाही, घरात चोरी होतेय, शेजारणीचं वाटूळं व्हावं, एखादी रंडकी चंडगी व्हावी, कोणाचं बोडकं बसावं, स्वत:चं चांगलं व्हावं, स्वत:च्या घरात धनधान्याच्या रासा पडाव्यात, इमले जुमले अन् बंगले आपलेच असावेत असे नवसं सायसं करणं बंद करा असे रडगाणे घेवून बुवा बाबाच्या दारात जावू नका, कुठलाही बुवा बाबा असं काहीच करू शकत नाही. कुठल्याही बुवा बाबाला कुठलीही दैवी शक्ती नाही, तो कुठलाही आजार बरा करू शकत नाही तो फक्त तुमचा विश्‍वासघात करू शकतो. तुमच्या भक्तीला विकू शकतो. तुमच्या श्रद्धेचा बाजार मांडू शकतो आणि नंतर तुमचाच लैंगिक छळ करत हा हरामी आपली दुकानदारी कायम चालू ठेवतो म्हणूनच हात जोडून विनंती आहे, श्रद्धा नक्की ठेवा परंतू ती डोळस असावी कारण कुठलाही देव कधीच कुठलीही वस्तू देण्यासाठी लाच मागत नाही त्यामुळे देवाला काही तरी केलं म्हणजे आपल्याला देव देईल असं म्हणणं चुकीचं आहे. देव कधीही आपल्या लेकरांना त्रास देत नाही, श्रद्धा ही चेतना निर्माण करणारी असते. भक्ती हा विश्‍वास निर्माण करते त्यामुळे श्रद्धा आणि भक्ती स्वत:जवळ निश्‍चित ठेवा, चेतनेने संघर्ष करण्यासाठी उठा आणि भक्तीने होय मी हे काम करणारच, मी या कामात यशस्वी होणारच, परिक्षेत पास होणारच, पुढच्या पाच वर्षात घर बांधणारच अशा विश्‍वासाने पुढे या मग बघा नक्कीच तुमचे भले होईल. कुठला बुवा बाबा तुमचं भलं करूच शकणार नाही.