Sunday, 21 May 2017

त्या वड्यावगळीच्या पैदासीचा बाप कोण ?

तिडक्याचं किडकं  मस्तक आधी ठेचा 
गणेश सावंत-9422742810
        जिथं स्वाभिमान नावाची चिज नव्हती, पारतंत्र्यात राहा, केवळ आणि केवळ मुजरे घालण्यातच धन्यता मानली जात होती. अन्याय, अत्याचार सहन करणं हे अंगवळणी पडलं होतं. लाज-लज्जा, शरम नाकाला गुंडाळली गेली होती. माणसासारखे माणूस असून जनावरांसारखं जिनं जगावं लागत होतं. इज्जत काय असते, अब्रू कशाला म्हणतात हे स्मरणापलिकडे गेलं होतं. अशा वेळी माझ्या माणसांना इज्जत अब्रू मिळावी, त्याच्यातला स्वाभिमान जागृत व्हावा, त्याला लाज-लज्जा, शरम असावी आणि तो स्वातंत्र्याच्या जगामध्ये निर्भयपणे मिरावा याचसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं उभं आयुष्य खर्च केलं. रात्रीचा दिवस करत महाराष्ट्राच्या गावागावात स्वातंत्र्य पोहचविलं, तेव्हा कुठं महाराष्ट्राच्या मातीत निपजलेल्यांना सह्याद्रीसारख्या निधड्या छात्या आल्या, स्वाभिमान आला, स्वकर्तृत्व आलं, नेतृत्व करण्याची उर्मी आली. छत्रपतींनी स्वातंत्र्य दिलं, स्वाभिमान जागृत करत केला, धैर्य ठेवून संघर्ष केल्यानंतर यशाची पताका फडकवता येते, हे जाज्वल्य उदाहरण स्वत:च्या उभारल्या गेलेल्या स्वराज्यातून उभ्या महाराष्ट्राला नव्हे जगाला दाखवून दिले. छत्रपतींचा इतिहास कुठल्या एका जातीचा, धर्माचा अथवा पंथाचा नाही. त्यामुळे छत्रपती हे फक्त मराठ्यांचेच आहेत हे म्हणणेही तेवढेच चुकीचे. अवघ्या जगाने छत्रपतींच्या स्वराज्याची, त्यांच्या कर्तव्य कर्माची, अर्थव्यवस्थेची, जलसंधारणाची, युद्धनितीची आणि स्वराज्यातल्या मावळ प्रांतात नेतृत्व करणार्‍यांपासून गोपनीवर पाखरं राखणार्‍यांच्या व्यवस्थेपर्यंतची दखल घेतली. छत्रपतींच्या इतिहासातूनच राज्य, देश आणि जगातले बहुतांशी देशही चालत आहेत. तेंव्हा राजेंना स्वत:च्या माणसांना स्वातंत्र्य मिळावं यासाठी झगडावं लागलं. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशा स्थितीत मोहिमेवर जावं लागलं. परंतु आज त्याच स्वातंत्र्याच्या स्वाभिमानात महाराष्ट्राच्याच मातीत जेंव्हा किड लागते तेव्हा मात्र तळपायाची आग मस्तकाला जाते. संतापून असल्या तिडक्या आणि किडक्या व्यक्तीच्या नरडीचा घोट घ्यावासा वाटतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ही शिस्तीची, कायद्याची आणि परोपकारी असल्याने या संतापाला कायदेशीर मार्ग दाखवावा लागतो. लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालविलेली आजची लोकशाही आहे, इथं कायद्याचं राज्य आहे म्हणून किडक्यांना संपवण्याची भाषा करता येत नाही. ज्या महाराष्ट्राच्या मातीने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष दिला त्याच छत्रपतींच्या मातीत तिडक्यासारखी वड्यावगळीची पैदास जन्माला येते, हे महाराष्ट्राचं नव्हे तर त्याच्या माय-बापाचं दुर्दैव म्हणावं लागेल. शुद्ध बिजापोटी फळ रसाळ गोमटी, परंतु या तिडक्याचं बिज नक्कीच किडकं म्हणूनच त्याच्या जिभेतून थेट छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांच्याबाबत अपशब्द निघाले. अरे ज्या माणसाने स्वाभिमान जागृत केला, धैर्य काय असतं, संघर्ष काय असतो याची शिकवण दिली त्याच युगपुरुषाच्या बाबतीत बोलताना तुझी जिभ का झडली नाही? असं त्या विठ्ठल तिडकेला कानफटात देऊन विचारावंसं वाटतं. एक 

तिडके किडका निघाला 

म्हणून राज्यभरात एवढा संताप व्यक्त होताना दिसून येतो. तिडकेने जर आपली वड्यावगळीची पैदास आहे हे दाखवायचेच होते तर तो अन्य मार्गानेही दाखवू शकत होता, परंतु महाराष्ट्राच्या मातीत लोकशाहीच्या राज्यात ज्या प्रमाणे राजकीय पक्षांनी थोर-महात्म्यांना एखाद्या चौकटीत बसवून जात-पात-धर्म-पंथावर मताची भिक मागायला सुरुवात केली त्यातूनच तिडक्या सारख्या किडक्यांची पैदास एखाद्या नालीत अळ्यांनी वळवळ करावी, तशी वळवळ करताना दिसून येऊ लागले. आपण कोणाचे समर्थक आहोत याबाबत कोणाचचं दुमत असण्याचं कारण नाही. कोणी कोणाच्या विचारांवर प्रभावीत होऊन त्यांचं नेतृत्व स्वीकारावं याबाबतही कोणाला देणंघेणं नाही. लोकशाहीच्या राज्यात बोलण्याला आणि लिखाणाला स्वातंत्र्य असल्याने सोशल नेटवर्किंगमधून जो तो आपले मत व्यक्त करताना दिसून येतो. परंतु या वैयक्तिक मतांना काही ठिकाणी जातीची झालर लावली जाते. ती जातीची झालर मानव जातीला एखाद्या कॅन्सरप्रमाणे सडवित आहे हेच या किडक्या तिडकेच्या प्रकरणावरून उघडपणे स्पष्ट होताना दिसून येते. तिडके एखाद्या पक्षातील नेत्याच्या नेतृत्वाचं गुणगाण करताना, त्याचं समर्थन करताना, त्याच्या नेतृत्वाबद्दल कोणी वंगाळ बोललं म्हणून जर तिडके थेट महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोट उचलत असेल, त्याची जिभ चराचरा बोलत असेल तर तिडकेंसारख्या चराचरा बोलणार्‍या किडक्या जिभा आणि पोटात एक अन् ओठात एक ठेवणार्‍यांना आणि मस्तकात केवळ जात्यांध अळ्या वळवळ करणार्‍यांची मस्तके वेळीच ठेचली पाहिजेत. मग ती कायद्याच्या चौकटीत म्हणा अथवा भरचौकात म्हणा, तिडकेचा गुन्हा नव्हे तर तो महागुन्हा आहे. हे प्रकरण गेली दोन दिवस वार्‍यासारखं पसरत आहे. आज जणू जिल्ह्यात वणवा पेटला आहे, अशा स्थितीतही बीड जिल्ह्याचं म्हणा किंवा राज्याचं पोलिस प्रशासन त्या किडक्याला आणि सडक्याला अद्याप पकडू शकलं नाही. ज्या व्यक्तिच्या गरळीमुळे अवघ्या महाराष्ट्रात आगडोंब उसळेल, हे माहित असताना प्रशासन अद्याप याबाबत हरकतमध्ये येत नाही याचा अर्थ शासन आणि प्रशासन व्यवस्थेला बहुदा यावर प्रतिक्रिया काय उमटतात याची परीक्षा घ्यायची असेल तर तिडकेपेक्षा राज्यातलं भाजप सरकार तेवढच किडकं आणि सडकं आहे हे उघडबुद्धीने स्पष्टपणे आम्ही एवढ्यासाठीच मांडतोय. गेल्या दोन दिवसांच्या कालखंडात तिडकेसारखा विठ्ठल नावाचा सडका गजाआड जायला हवा होता. परंतु असं झाल्याचं अद्यापपर्यंत पहावयास मिळालं नाही. तिडकेच्या संवादावरून सर्वत्र जो संताप आहे 

तो पराकोटीचा संताप 

जान-मालच्या नुकसानीतून व्यक्त झाला तरच तो संताप मोठा मानायचा, अशी जर राज्यकर्त्यांची भूमिका असेल तर ती महाराष्ट्राच्या संस्कार, संस्कृतीबरोबर सर्वसामान्य परवडणारी नाही आणि आज जो विषय सोशल नेटवर्किंग मीडियामुळे स्फोटक बनला आहे याला सोशल नेटवर्किंग मीडिया जेवढी जबाबदार आहे तेवढीच तिडके नावाच्या किडक्याच्या मेंदुतील सडकी मानसिकताही जबाबदार आहे आणि तिडकेसारख्या तरुणाच्या मस्तकात ही सडकी मानसिकता मग ती जातीची असो अथवा अन्य कुठली ती आलीच कुठून? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न. आम्ही कुठल्या एका जातीला अथवा एका पक्षाला समोर ठेवून बोलत नाहीत, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने जात-पात-धर्म-पंथाला घेऊन राजकारण केलं जातं, वेगवेगळ्या जातींना ग्रहीत धरून निवडणुकांमध्ये उतरविले जाते त्याचा परिणाम तिडक्यांसारख्या व्यक्तींच्या मस्तकामध्ये असले सडके विचार जन्म घेतात. राज्याच्या राजकारणावर बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा दबदबा आहे, हे स्वाभिमानाने सांगावसं वाटतं परंतु त्याच बीड जिल्ह्यात जातीच्या नावावर राजकारण होतं नव्हे नव्हे तर निवडणुका लढविल्या जातात, तेव्हा मात्र हा स्वाभिमान अपमानामध्ये बदलून जातं. राज्यकर्त्यांना निवडणूक लढवणार्‍यांना, पुढार्‍यांना, नेतृत्वांना पाच वर्षाच्या कालखंडासाठी, पाच वर्षांच्या सत्तेसाठी जातीची समिकरणे महत्त्वाची असतील, परंतु या जातीच्या समिकरणातून जर बापालाच कोणी शिव्या घालत असेल तर त्या पापाचे बाप हे राजकारणीच असतील हेही तेवढेच उघड सत्य आणि तिडकेच्या बाबतीतही हे त्रिवार सत्य. आजकाल महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना माझं ते खरं ह्या तोर्‍यामध्ये वावरण्याची जणू मस्तीच आली आहे. परंतु हा महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ही खरं ते माझं अशी आहे, याचा विसर अशा लोकांना पडला म्हणूनच तिडकेसारख्याच्या तोंडातून असा सडका विषय निघाला. अजूनही वेळ गेलेली नाही. राज्यकर्त्यांनी, राजकारण्यांनी महापुरुषांना जातीच्या चौकटीत बसविण्यापेक्षा त्यांचे कर्तव्य-कर्म, त्यांचे धोरण लोकांपर्यंत न्यायला हवेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणार्‍या त्या तिडकेचा कडेलोट तर व्हावाच परंतु तिडके ज्या पद्धतीने बोलतोय त्याला जे धारीष्ट आलय, ते कोणी दिलं नसलं तरी अशा पैदासींच्या धारीष्ट्याला कापण्याचं कामही राज्यकर्त्यांबरोबर जे नेतृत्व करतात त्यांनी आधी करावं. शिवाजी महाराजांचा अपमान, महाराष्ट्राच्या मातीत मराठेच नव्हे तर कुठल्याच जातीचा माणूस सहन करणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर नुकताच जन्मलेला नवजात बालकही जय म्हणतं, एवढी उर्मी त्या नावात आहे. ही केवळ त्यांच्या कर्तृत्व-कर्मामुळेच, याची जाण अवघ्या महाराष्ट्राला आहे. तिडकेच्या अटकेसाठी शिवप्रेमींनी बंद पुकारलाय. उद्या बीड जिल्हा बंद असणार आहे अन् नक्कीच तो कडकडीत बंद राहील, परंतु या बंदच्या काळात आपल्याकडून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या, असं म्हणण्याचं धाडस आमचंच नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याच नेतृत्वाचं अथवा नेत्याचं किंवा राज्यकर्त्यांचं असेल, असंही आम्हाला वाटत नाही कारण विषय तेवढा गंभीर आहे. परंतु तरीही महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची अस्मिता कुठल्या एका जातीपूर्ती मर्यादीत नव्हती. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:च्या धर्माचा गर्व करावा, परंतु दुसर्‍याच्या धर्माचा अनादर, दुसर्‍याच्या जातीचा अनादर कोणीही करू नये एवढे यावेळी सांगावेसे वाटते आणि थेट बीड जिल्हा पोलिस प्रशासनासह महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना आम्ही उघडपणे आणि ठणकावून सांगतो, काहीही करा, आकाश-पाताळ एक करा, जमीन खोदा वा आणखी काय करा परंतु विठ्ठल तिडके नावाचा किडका आणि त्याचा सडका मस्तक आधी ठेचा. उद्याची नुसती ठिणगी आहे आणि हा वणवा कधी पेटेल, भडकेल आणि उभ्या महाराष्ट्रात आगडोंब उसळेल हे सांगता येणार नाही त्यामुळे हातावर हात ठेवून बसू नका, काय होतय ते बघू नका, तात्काळ हरकतमध्ये या आणि तिडकेच्या मुसक्या बांधा...... 

साय दै बीड रिपोर्टर मधील आजचा २१ मे रविवार अग्रलेख
http://beedreporter.net/

No comments:

Post a Comment