Wednesday, 26 October 2016


वेदाचा तो अर्थ आम्हासी ठाव । इतरांनी वहावा भार माथा ॥

प्रक्षुब्ध मनाचा 

नि:शब्द हुंकार 


-गणेश सावंत-



मॅराथॉन अग्रलेख भाग-1




का
ळ्या आईचं हृदय चिरून एक दान्यावर हजार ते लाख-लाख दाने निर्माण करणारा मराठा समाज. राष्ट्रावर आणि राज्यावर संकट आलच तर गवताचेही भाले करत संकटाला सामोरे जाणारा मराठा समाज आपल्या स्वराज्यावर आणि राज्यावर भले कोणीही चालून आले तर त्याच्याशी दोन हात करत विजयश्री खेचून आणणारी लढवय्या जमात म्हणजे मराठा समाज. इतिहासाच्या पाना-पानामध्ये मराठ्यांच्या रक्ताळलेल्या लढाया आणि विजयश्री पाहितली तर मराठ्यांची मनगटे कायम समाज रक्षणासाठी शिवशिवतात हे उघड सत्य आतापर्यंत नाकारता येणार नाही. म्हणूनच जेंव्हा जेंव्हा मराठा समाज पेटून उठला तेव्हा तेंव्हा काळालाही मराठा समाजाच्या मानगुटीवर नव्हे तर त्यांच्या विजय मिरवणुकीमध्ये नाचावं वाटलं. हे शब्दात सांगणं किंवा शब्दात मांडणं जेवढं चांगलं वाटतं तेवढच मराठ्यांच्या इतिहासावर भाष्य करताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, परंतु मराठ्यांचं स्वराज्य उभारल्यानंतर राज्यामध्ये पेशवाई आली आणि पेशवाईच्या भौतिक सुखाच्या आहारी महाराष्ट्रातील धनदांडगी मराठ्यांची घरे गेली आणि तेथूनच शिवशिवणार्‍या मराठ्यांच्या मनगटांचा वापर छूत-अछूत हे म्हणण्यासाठी आणि दारिद्य्रात खितपत पडलेल्या लोकांना त्रास देण्यासाठी होत गेला. परिणामी अठरा विश्‍व दारिद्रयात असलेली जमात हे पराकोटीचे अत्याचार सहन करत राहीली हे उघड सत्य कोणालाही आणि केंव्हाही नाकारता येणार नाही, परंतु महाराष्ट्राची माती ही नरवीरांची माती आहे. महाराष्ट्राची माती ही सत्याला महत्त्व देणारी, सत्याची चाड आणि असत्याची चीड निर्माण करून सोडणारी माती आहे. या मातीमध्ये शाहू-ङ्गुले-आंबेडकर जन्माला आले. त्यापूर्वी जगद्गुरू संत तुकारामांनीही अशा व्यवस्थेविरुद्ध रणसिंग ङ्गुंकले होते. अखेर स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात बदल होत राहिले आणि महाराष्ट्रासह देशामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी मुभा मिळाली. ही मुभा झगडा करून, अन्यायाविरुद्ध पेटून उठल्यानंतर मिळाली. हा इतिहास सांगण्याचा खटाटोप एवढ्यासाठीच, बंगले इमले आणि शेतीसह पाटीलकी गाजवणार्‍या महाराष्ट्रातील बहुसंख्याक मराठा समाजात आज अठराविश्‍व दारिद्रय उघड होत चालले आहे. किर्तीवान आणि मेहनती समाजाची दशा आणि दिशा आज अशी का? या प्रश्‍नाचे उत्तर मराठा समाजाच्या ठराविक घराण्याकडे बोट दाखवायला लावते आणि ते बोट तेवढेच सत्याकडे दाखवले जाते. याबाबत दुमत असण्याचं कारण नाही. औरंगाबादेत मराठ्यांचा मोर्चा झाला. तो अभूतपूर्व निघाला त्यानंतर बीडमध्ये मराठ्यांनी मोर्चा काढला, तो न भूतो ना भविष्यती असा राहील असा वाटला. परंतु महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यात मराठे रस्त्यावर उतरू लागले. लेकीबाळी रस्त्यावर आल्या. आपल्या न्याय हककासाठी भांडू लागले, परंतु इतिहास साक्षीला आहे मराठे जेंव्हा रस्त्यावर उतरले तेंव्हा उतरलेल्या 
मराठ्यांना दुभंग 
करण्याचे कटकारस्थान सातत्याने रचण्यात आले. आम्ही गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून यावर भाष्य केलं नाही. आजपासून मॅराथॉन अग्रलेख बीड जिल्ह्यातल्या वाचकांसाठी केवळ मराठ्यांच्या मोर्चावर लिहित आहोत. या अग्रलेखाचा उद्देश मराठ्यांच्या मोर्चामधील मराठ्यांच्या सर्वसामान्य माणसांची भूमिका, सरकारची भूमिका, मोर्चाचं श्रेय घेण्याचा खटाटोप त्याचबरोबर मराठ्यांचा सरकारसह कुठल्याच पक्षाच्या नेत्यांवर नसलेला विश्‍वास यावर भाष्य करणार आहोत. बीडचा मोर्चा झाल्यानंतर राज्यात अनेक मोर्चे झाले, त्या मोर्चांना मराठ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली. सरकारच्या उरात धडकी भरली. वेगवेगळ्या पक्षातील मराठा नेत्यांच्या भुवया वर झाल्या, तोंडाला कोरड पडली, परंतु या मोर्चाला दुभंगण्याचा आणि मोर्चाच्या मागण्यांतून जातीवाचक मोर्चाला झालर लावण्याचं काम काही नत्द्रष्ट पैदासींकडून होताना दिसून येऊ लागलं. मराठ्यांच्या मागण्या कोपर्डीतील बलात्कार प्रकरणात असलेल्या आरोपीतांना ङ्गाशीची शिक्षा देण्यात यावी, मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, यासह अन्य मागण्यांवर मराठे रस्त्यावर उतरले. यामध्ये ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतो त्यामुळे त्या कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी, अशा प्रकारची एक मागणी मराठे मोर्चाकरांच्या मागण्यांच्या निवेदनातून दिसून येते. तेवढ्याच मागणीला टार्गेट करत महाराष्ट्रातील जातीवादी शक्तींनी ज्या पद्धतीने दलित-मराठा वाद लावण्याचे कटकारस्थान रचले आणि मराठ्यांविरुद्ध दलित, दलितांविरुद्ध मराठा असे विषारी ङ्गुसकार सोशल नेटवर्किंग मीडियातून सोडायला सुरुवात केली. ते राज्यासाठी हानीकारक म्हणावेच लागेल. कारण हा मोर्चा 


प्रक्षुब्द मनाचा 

नि:शब्द हुंकार 


आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाकडे होत असलेले दुर्लक्ष राज्याच्या नेतृत्वात मराठ्यांचे काही घराणे असताना वाडी-वस्तीवर आणि ग्रामीण भागावर, डोंगराळ भागावर राहणार्‍या मराठ्यांकडे, त्यांच्या घराकडे, त्यांच्या मुलभूत गरजांकडे, लेकरांच्या शिक्षणाकडे आणि अखंड समाजाच्या आरोग्याकडे, भविष्याकडे जे दुर्लक्ष केलं गेलं, मराठा समाज हा संख्येने मोठा आहे म्हणून प्रत्येक वेळा बहुजनाची टिमकी वाजवत त्यांच्याकडे जाणं टाळलं. त्यांचा आर्थिकच नव्हे तर बौद्धीक विकास करण्या
लाही आडवं पाडण्यात आलं. तेंव्हा दशको ना दशकोमधील मराठ्यांची समाज व्यवस्था, शासन व्यवस्था आणि प्रशासन व्यवस्थेवर प्रचंड प्रमाणात चीड निर्माण झाली. गावागावातला मराठा अंत:करणातून संतापून गेला आणि ती खदखद कोपर्डीच्या प्रकरणातून लव्हा रसाप्रमाणे बाहेर पडली. परंतु गेल्या चाळीस - पंचेचाळीस दिवसांपासून मराठ्यांचे मोर्चे लाखानिशी निघताहेत, या मोर्चाची दखल गेल्या आठ दिवसांपर्यंत ना सरकारने घेतली ना सत्याचा डांगोरा पिटवणार्‍या महाराष्ट्रातील आणि देशातील मीडियाने घेतली. हार्दिक पटेल सारख्या तरण्याताठ्या पोराचं आंदोलन जगाला दिसून येतं, परंतु मराठ्यांचं आंदोलन महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या तथाकथीत सत्याची भूमिका घेऊ पाहणार्‍या मीडियाला दिसलं नाही. याचा उघड अर्थ आजही सोळाव्या शतकातील जातीय व्यवस्था, वर्णव्यवस्था या देशात आणि या महाराष्ट्रात आहे. दलितांवर अत्याचार होतात हे जेवढं सत्य आहे आणि त्या अत्याचाराचा वापर देशातील राजकारणी राजकारणासाठी करतात हे तेवढच सत्य आहे. परंतु मराठ्यांवर होत असलेले अत्याचार दाखवण्यात आले आणि राज्यासह देशातील मराठा बाहेर पडला तर कोणा कोणाच्या चड्ड्या पिवळ्या झाल्याशिवाय राहणार नाहीत याची जाण मनुवादी मीडियाला आहे म्हणूनच मराठ्यांच्या मोर्चाकडे दुर्लक्ष केलं जातं. परंतु प्रक्षुब्द मनाने बाहेर पडलेला मराठा हाताची घडी तोंडावर बोट ठेवत रस्त्याने मूकमोर्चा काढतोय. लाखाने लोक बाहेर पडताहेत. आपल्या मागण्या निवेदन स्वरुपामध्ये प्रशासन आणि शासन दरबारी देताहेत. एकेकाळी हर हर महादेवची ललकारी देणारा आज शांततेच्या मार्गाने नि:शब्द होत शिस्तीने चालतोय मग मराठे या मोर्चामध्ये मुके असताना त्यांच्या मागण्या ठरवणारे कोण? मराठ्यांनी आपल्या मोर्चाच्या निवेदनात ऍट्रासिटी ऍक्ट रद्द कराची मागणी केलेलीच नाही तर ही मागणी केली असं म्हणत बोंब ठोकणारे ते महाभाग कोण? याची ओळख मराठ्यांच्या लोकांनी आणि दलितांच्या लोकांनी आता करून घ्यायला हवी. प्रत्येक पक्षातला मराठा असो वा मराठेत्तर असो तो केवळ अशा मोर्चांचा उपयोग स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी करून घेणार. हे उघड सत्य कुठल्याही समाजातल्या लोकांनी असत्य समजू नये कारण जोपर्यंत माणसातला माणूस हा माणसासारखा उघड डोळ्याने पाहणार नाही , उघड कानाने ऐकणार नाही तोपर्यंत राजकीय पोळी भाजून घेणार्‍या तथाकतीत वळ्यावगळीच्या पैदासी आपल्या उरावर बसून थयाथया नाचणार हेही या अनुषंगाने सांगावसं वाटतं. प्रक्षुब्ध मनाचा नि:शब्द हुंकार टाकत मराठे जेवढ्या ताकतीने बाहेर पडले आणि कुठल्याही पक्षाच्या नेत्याला सोबत न घेता हा सकळ मराठ्यांचा मोर्चा आहे असं म्हणत थेट जगद्गुरू संत तुकोबांच्या विचारांवर

वेदाचा तो अर्थ आम्हासी ठाव ।

इतरांनी वहावा भार माथा ॥


असं ठणकावून सांगत मराठे रस्त्यावर उतरले. 



प्रक्षुब्ध मनाचा नि:शब्द हुंकार 
---------------
पवित्र ते कुळ पावन तो देश ॥जेथे हरिचे दास घेती जन्म ।
---------------

मराठा मोर्चा! 


जातीवाचक?



-------------------
-गणेश सावंत

-------------------

मॅराथॉन अग्रलेख भाग-2


समाजातील अन्यायाच्या विरोधात विद्रोहाची भावना व्यक्त करणे हा महाराष्ट्राचा स्वभाव आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाकडे मराठ्यांच्याच बाधीत नेतृत्वाकडून जातबांधवाकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून, मरठ्यांमधील सर्वसामान्य, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजुर, सुशिक्षीत, बेरोजगार, महिला-मुलींमध्ये कमालीची अस्वस्थता पसरलेली असावी. आज ना उद्या नेतृत्व करणारे मराठे आपल्या अडचणी समजुन घेतील, मुलांच्या शिक्षणाचा आरोग्याचा प्रश्‍न सोडवतील. अडचणीत सापडलेल्या व्यवसायाला उभारी देण्यासाठी काही तरी नवे तंत्रज्ञान आणतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महाराजांचेच नाव घेवून बेल भंडार उधळणारे, गुलाल उधळणारे, महाराजांच्या नखातला मळ तरी होण्याचा प्रयत्न करतील, असं महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांना वाटायचं. महाराष्ट्राची शासन व्यवस्था-प्रशासन व्यवस्था ही कधी तरी सर्वसामान्य मराठ्यांचे प्रश्‍न समजून घेईल. अठरा विश्‍व दारिद्रयात खितपत पडलेल्या मराठ्यांना उभारी आणणण्यासाठी प्रयत्नांची परीकाष्टा करील. न्यूनगंडतेत अडकून आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या मनामनामध्ये आत्मविश्‍वास निर्माण करीन. परंतू अखंड महाराष्ट्रातील मराठ्यांचा आत्मविश्‍वास गमावला गेला आणि कोपडर्ीच्या प्रकरणातून शासन-प्रशासन व्यवस्थेसह मराठा नेतृत्वाविरूध्दची खदखद बाहेर पडू लागली. महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात लाखा-लाखाचे मोर्चे निघाले. या मोर्चांमध्ये प्रमुख मागणी कोपर्डीतील बलात्कार्‍यांना फाशी द्या आणि त्यानंतरच्या मागण्या या सर्व मराठ्यांच्या मागासलेपणाला दूर करणार्‍या, मराठ्यांच्या भावी पिढीला आत्मसन्मानीत होवून जगण्यासाठी चेव देणार्‍या आहेत. आणि या मागणीमध्ये ऍट्रासिटी कायद्याचा होत असलेला गैरवापर थांबवण्यासाठी कायद्यात काही तरी बदल करण्याची मागणीची ओळ होती. महाराष्ट्राची माती ही जात-पात, धर्म-पंथांच्या पलीकडची, सत्याला सत्य आणि असत्याला असत्य मानणारी आणि याच महाराष्ट्रात कर्मकांडासह शिवाशिवीची अंमलबजावणी करणारी माणसेही होती. त्यामुळे एकीकडे मराठे रस्त्यावर उतरले. मराठा नेतृत्वासह शासन- प्रशासन व्यवस्थेच्या उरात धडकी भरली. हे मोर्चे रोखायचे कसे? मराठ्यांच्या संतापाला आवर घालायचा कसा? मराठ्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली, ती विझवायची कशी? या प्रश्‍नाचे उत्तर जेंव्हा शासन- प्रशासन व्यवस्थेसह मराठा नेतृत्वाला मिळेना, तेंव्हा स्वत:ची चमडी बजावण्यासाठी पांढरतोंड्या इंग्रजांची ध्येय धोरणे हाती घेत, फोडा आणि तोडा, जात-धमावर्र वाद घाला, ही सडकी मानसिकता या लोकांनी समोर मांडली आणि मराठ्यांच्या क्रांती मोर्चाला जातीवाचक ठरवण्याचा उद्योग सुरू ठेवला. औरंगाबादचा मोर्चा झाला तेंव्हा कुठला विषय झाला नाही. मात्र बीड आणि इतर ठिकाणचे मोर्चे निघाले तेंव्हा विषय आपल्या आटोक्या बाहेर जातोय म्हणून ऍट्रासिटीचे प्रकरण जास्तीत जास्त पेटवण्याचे काम तथाकथित लोकांकडून होतांना दिसून येऊ लागले. जात-पात, धर्म-पंथावरचे दंगे महाराष्ट्राने अनुभवले आहे. त्या दंग्यांमध्ये सर्वसामान्य माणुसच भरडला गेला आहे. त्यामुळे जातीवादी शक्तींना ना मराठे, ना दलित थारा देतील. जर मराठा मोर्चामधून जातीयचे बीज पेरले जात असेल आणि दलित समाजही जाणिवपूवर्क मराठ्यांचा द्वेष करत असेल तर आमचा जाहिर सवाल आहे,

शिवरायांचे स्वराज्य
आणि भिमरायाची घटना

मराठा आणि दलित विसरतायत का? छत्रपती शिवाजी महाराजांनी जात-पात, धर्म-पंथांपेक्षा स्वाभिमान आणि स्वातंत्र्याला महत्त्व दिले. महाराष्ट्रातल्या अठरापगड जातींना सोबत घेवून मोठमोठ्या सत्तास्थळाला हलवून ठेवलं. बलात्कार्‍यांचे हात-पाय तोडले, शेतकर्‍याच्या भाजीच्या देटालाहा हात लावता कामा नये, असे प्रशासन ठेवले. त्यापुढे जात कर्मकांडात अडकलेला हिंदू समाज आणि महाराष्ट्रातला बहुतांश मराठा समाज जेंव्हा दिन-दलितांवर अन्याय-अत्याचार करायचा, तेंव्हा या समाजाला माणूस म्हणून जगवण्यासाठी याच महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला आणि तथाकथित धर्ममार्तंडांविरोधात एल्गार पुकारला. हा एल्गार पुकारताना बाबासाहेब म्हणतायत, ‘ ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे, तो धर्म नसून शिरजोरांची सजावट आहे. ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो, तो धर्म नसून रोग आहे. ज्या धर्मात अमंगल पशुचा स्पर्श झाला असता चालतो, पण माणसाचा स्पर्श चालत नाही, तो धर्म नसून वेडगळपणा आहे. जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये, धनसंचय करू नये, शस्त्रधारण करू नये असे सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जिवनाचे विडंबन आहे. जो धर्म अशिक्षितांना अशिक्षीत रहा, निर्धनांना निर्धन रहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून शिक्षा आहे.’ बाबासाहेबांच्या या विचारातून आजपर्यंत मराठ्यांच्या खांद्यावर कर्मकांडाच्या बंदुका ठेवून तथाकथीत धर्ममार्तंडांनी जी जात व्यवस्था प्रकर्षाने राबवली, राबवत आहे आणि भविष्यात राबवण्यासाठी खटाटोप करत आहे. त्याच धर्ममार्तंडांना मराठ्यांच्या मोर्चांची आणि दलितांच्या सर्वोच्च स्वातंत्र्याची भिती वाटतेय की काय? आणि त्या भितीतूनच मराठ्यांच्या मोर्चाला जातीवाचक वळण लावण्याचा प्रयत्न केला जातोय की काय? हे शिवराय आणि भिमरायांच्या विचारांवर चालणार्‍या लोकांनी लक्षात ठेवावे. कारण याच महाराष्ट्रात मराठ्यांनो 16 व्या शतकात जगदगुरु संत तुकोबांनी आपल्या घराचं, कुळाचं, गावाचं, राज्याचं वर्णन करताना

पवित्र ते कुळपावन तो देश

असं म्हटलं होतं. तुकोबांचा हा अभंग आपण वाचला आणि त्या अभंगातील मर्म समजून घेतले. तर शिवराय आणि भिमराय यांच्यात कटूता आणण्याचा प्रयत्न करणार्‍यांचे नक्कीच मुस्काट फुटेल. तर ऐका
पवित्र ते कुळ पावन तो देश ॥जेथे हरिचे दास घेती जन्म ।
कर्म-धर्म त्याचे झाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥
वर्ण अभिमाने कोण झाले पावन । ऐसी त्या सांगुनि मज पाशी ॥
अंत्यजादी योनी तरल्या हरीभजने । तयाची पुराणे भाट झाली ॥
वैष्ण तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥
कबीर, मोमीन, लतीब मुसलमान । सेना नाही जान विष्णुदास ॥
कानोपात्र खोदू पिंजारी तो दादू । भजनी अभेदू हरीचे पाय ॥
चोखोमेळा बंका जातीचा महार । त्यासी सर्वेश्‍वर ऐक्य करी ॥
नामीयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियसवी ॥
मैराळ जनक कोण कुळ त्याचे । महेंमान तयाचे काय सांगू ॥

सर्व जात-पात, धर्म- पंथाचे संत या महाराष्ट्रात होवून गेले. आणि त्या संताचा लेखाजोखा तुकोबांनी एका अभंगातून मांडला. आणि त्या अभंगातून ज्या ठिकाणी जात-पात, धर्म-पंथाला महत्त्व नसते, ते कुळ, ते गाव, ते राज्य आणि तो देश पवित्र असतो, असे तुकोबांना म्हणायचे. म्हणून मराठ्यांनी मराठ्यांच्या प्रश्‍नांसाठी पुकारलेला एल्गार हा चांगल्या नजरेतला ठेवावा आणि दलितांनीही या एल्गाराला आक्रमण किंवा आक्रस्ताळ ठरवण्यापेक्षा जातीयवादी शक्तींचा पुरेपूर समाचार घेवूनच प्रतिक्रिया द्यावी. म्हणजे महाराष्ट्रात शिवरायांचे स्वराज्य आणि भिमरायांच्या घटनेने जो-तो प्रगतशील झाल्याशिवाय राहणार नाही. प्रगतशील होण्याचा अर्थ म्हणजे आर्थिकदृष्ट्या आणि भौतिक सुखाचा लालची नव्हे. तर शिवराय आणि भिमरायांच्या विचारांवर प्रगतशील होणारा माणूस हा माणसाने माणसासाठी माणुसकीने कसं वागायचं हे सांगणरा ठरेल. आज महाराष्ट्राच्या कान्याकोपर्‍यातून मराठे हाताची घडी तोंडावर बोट ठेवत मूकमोर्चा काढत आहेत. आपल्या मागण्या जगासमोर आणत आहेत. मराठ्यांच्या मागण्या या त्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोर्चे निघाले नाहीत त्यामुळे मराठ्यांनी असे मोर्चे काढले असल्यामुळे जात्यांध शक्ती या मोर्चांना वेगळे वळण देण्याच्या तयारीत असेल परंतु महाराष्ट्रातल्या सर्व जात-पात-धर्म-पंथातील लोकांनी जातीयवाद्यांचे हे षडयंत्र हाणून पाडणे म्हणजेच महाराष्ट्राच्या विचारसरणीला मुजरा घालणे होय.
उद्याच्या अंकात ‘घाबरलेलं मराठा नेतृत्व अन् तोंडाला कोरड पडलेलं सरकार’


मॅराथॉन अग्रलेख भाग-3

गांडू भडवे रणछडे । छिनाल खाय पेढे ॥पतीव्रता को पडे कोडे ॥
-----------------------------------------------------------------------------

प्रक्षुब्ध मनाचा नि:शब्द हुंकार

------------------------------------


घाबरलेला मराठा नेतृत्व 


अन् कोरड पडलेलं सरकार

-------------------------------------

--------------------------------------------------------
गणेश सावंत-9422742810
--------------------------------------------------------


गेल्या कित्येक दशकातल्या खदखदीने फुरफुरलेल्या मराठ्यांच्या मोर्चाचे विवेचन जो तो आपल्या नजरेतून करतो. सकारात्मक, नकारात्मक,उपकारी, परोपकारी, सत्य, असत्य, खरं-खोटं, जो जमेल तो अर्थ लावून मराठ्यांच्या मोर्चाचे विश्‍लेषण केलं जाऊ लागलं. केवळ महाराष्ट्रात बहुसंख्य मराठे आहेत म्हणून आणि बोटावर मोजण्या इतक्या श्रीमंत मराठ्यांच्या सत्तास्थानावरून अखंड महाराष्ट्राच्या मराठ्यांची आर्थिक स्थिती बलदंड आहे अशी व्याख्या मराठ्यांबाबत लावली जात असेल तर ही व्याख्या मराठ्यांना लावणार्‍यांची किव करावीशी वाटते. मराठ्यांच्या मोर्चांकडे संशयाच्या नजरेने पाहणार्‍यांबाबत आम्ही फक्त एवढेच म्हणू ङ्गजिसकी जैशी सोच, परंतू मोर्चाकडे संशयाच्या नजरेने पाहत संशयकल्लोळ निर्माण करणार्‍यांना संत कबीरांच्या भाषेत एवढेच सांगू, गांडू भडवे रणछडे । छिनाल खाय पेढे ॥पतीव्रता को पडे कोडे ॥महाराष्ट्रातला अखंड मराठा समाज अत्यंत शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरलेला असल्याने या मोर्चामागे कुणीतरी राजकीय शक्ती आहे. हे सांगणार्‍या आणि मोर्चाच्या धास्तीने जातीयतेचे विष पेरू पाहणार्‍यांना मराठा समाज ओरडून सांगतोय, आम्ही कोणाचे नेतृत्व स्विकारणार नाही, आम्ही कोणत्या पक्ष, संघटनेशी सलग्न नाही. सरकारने चर्चा करण्यापेक्षा दिलेल्या निवेदनाचा विचार करत त्याचा रोड मॅप करावा आणि ज्या गोष्टी तात्काळ होऊ शकतात, त्या गोष्टी तात्काळ करण्यास सुरूवात करावी. परंतू मराठ्यांच्या मोर्चाने बिथरलेले सत्ताधारी आणि मराठ्यांचेच वेगवेगळ्या पक्षातील नेते मराठ्यांच्या या मोर्चाने आपले थडगे बनते की काय, या धास्तीत मनाला वाटेल तसा कयास या मोर्चाबाबत काढत अनावश्यक प्रतिक्रिया देवून मोकळे होतात आणि अखंड रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाचा जाहीर अपमान करतात. आपण ज्या मराठा समाजामध्ये जन्मलो त्या मराठा समाजाचे काही तरी देणे आहे अशी जाणीव कदीही न होणार्‍या मराठा नेत्यांना रस्त्यावर उतरलेला मराठा पाहून आपली जात आठवली आणि जो तो या मोर्चामध्ये सहभाग नोंदवत या मोर्चाचे श्रेय आपल्या उरावर कसं घेता येईल याचा प्रयत्न करू लागला. परंतु तळपायाची आग मस्तकाला गेलेल्या मराठ्यांना ना स्वत:च्या जातीतील नेतृत्वावर विश्‍वास आहे ना सरकारच्या कालच्या आणि आजच्या कार्यप्रणालीवर विश्‍वास आहे. म्हणूनच जिल्ह्या जिल्ह्यात निघणार्‍या मोर्चांमध्ये गेल्या महिन्याभरापासून मोर्चेकरी मराठ्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका अत्यंत तटस्थ ठेवली. असे असतानाही मराठ्यांच्या या मोर्चाकडे संशयी नजरेने पाहणारे नेत्यांबरोबर स्वत:ला अभ्यासू मानणारे वैचारिक किडेही वळवळ करताना दिसून येतात. आम्हाला आश्‍चर्य वाटतं, ज्या वैचारिक लोकांनी अशा मोर्चांचं विश्‍लेषण समाजातल्या शून्य गतीतल्या माणसापासून करायचं सोडून समाजातल्या शंभरीत गेलेल्या माणसावर या मोर्चाचं विश्‍लेषण केलं जात असेल तर नक्कीच
ही वैचारिक भाडखाऊ वृत्ती असेल. अशा
वैचारिक किड्यांबाबत



संत तुकोबांच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘नाही निर्मळ जिवन काय करील साबण, वृक्ष न धरी पुष्पफळ काय करील वसंतकाळ? वांझे न होती लेकरे काय करील भ्रतारे, नपुंसक नवर्‍याशी काय करील बाईल त्याशी असेच म्हणावे लागेल. ज्याचं अंत:करण शुद्ध नाही तो निर्मळ असूच शकत नाही. मग कुठल्याही साबणीने अंघोळ केली आणि फेस कोपरापासून ढोपरापर्यंत नेला तरी टिर्‍या दिसायच्या त्या तश्याच दिसतील. एवढा स्पष्ट आणि उघड मराठ्यांच्या मोर्चाबाबत लिहिण्याचं एवढच कारण की एक महिन्यापासून मोर्चे निघताहेत, या मोर्चामागे कोणीही नाही, स्वयंस्फूर्तीने मोर्चे निघताहेत आणि अशा स्थितीमध्ये काही नत्द्रष्ट, वैचारिक म्हणवून घेणार्‍या पैदासी सरळ-सरळ या मोर्चाला प्री-प्लॅन आणि बामनाचा मुख्यमंत्री आहे म्हणून निघत आहेत, असा कयास काढून मोकळे होत असतील तर अशा सडक्या विचारसरणीला आम्हा घरी धन शब्दाची रत्ने शब्दाची शस्त्रे यत्न करू या सिद्धांतातून उत्तर देऊच. काल -परवा एका वैचारिक बुद्धिजीवीने आर्थिक संधी नाही हे दुखने खर्‍या गरीब मराठ्यांचे आहेही परंतु राज्याची अर्थकेंद्रे इतकी वर्षे मराठा समाजाच्याच हाती होती, याकडे कशी डोळेझाक करणार? असा सवाल उपस्थित करून बोटावर माेजण्या इतक्या श्रीमंत मराठ्यांच्या बराबरीने आज रस्त्यावर उतरलेल्या मराठ्यांना बसवण्याचं कटकारस्थान करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर उतरलेला मराठा इतकी वर्षे ज्या मराठ्यांकडे अर्थकेंद्रे होते त्यांच्या विरोधातही बोंब मारतोय. त्यांना सोबत घेऊन कोणावर आक्रमण करत नाही हे या बुद्धीजीवी किड्यांना गेल्या महिन्याभरात का दिसलं नसावं? केवळ मराठे रस्त्यावर उतरले म्हणून जर मराठे मुख्यमंत्री बामनाला विरोध करतात हे दाखवून मराठ्यांना जातीयवादी ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न अशा तथाकथीत बुद्धीजीवी किड्यांकडून केला जातो. ‘बनी तो बनी,’ ही मानसिकता मोर्चाकरी मराठ्यांची नव्हे. मोर्चामुळे धास्तावलेल्या आणि सत्यापासून दुरावत जाणार्‍या कमविचारी माणसांची आहे. मराठ्यांचे मोर्चे हे जेवढ्या शिस्तीने, जेवढ्या ताकतीने, जेवढ्या आत्मविश्‍वासाने आणि जेवढ्या प्रकर्षाने निघतात तेवढ्याच आत्मविश्‍वासाने मराठ्यांच्या बापजाद्यांनी आणि त्यांना मदत करणार्‍या याच महाराष्ट्रातील अठरा पगड जातींनी गडकोट किल्ले एवढ्या चिकाटीने काबीज केले होते त्यामुळे या मोर्चामध्ये ‘बनी तो बनी,’ ही मानसिकता औषधलाही मिळणार नाही. कारण झोपलेले मराठे आता उठून बसले, उभे राहीले आणि पळते झाले त्यामुळे कुठल्याही वैचारिक किड्यांनी वैचारिक गोंधळ माजवण्याचे कारण नाही. मराठ्यांच्या मोर्चामध्ये बाहेर पडलेल्या बायाबापड्या त्या केवळ आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून बाहेर पडलेल्या आहेत. याची तरी जाणीव सत्ताकेंद्र असलेल्या मराठ्यांना दळभद्री विचारसरणीच्या विचारवंतांना, सत्ताधारी नेत्यांना आहे का हो? आम्ही लिहिलं, आम्ही विचार मांडला म्हणजे तो त्रिवार सत्य अशा भूमिकेत विचार मांडणार्‍यांना मराठ्यांच्या घरातले अठराविश्‍व दारिद्य्र दिसत नाही, पैशामुळे मराठ्यांच्या मुलांचे शिक्षण होत नाही हे दिसत नाही? दुष्काळामुळे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचं जळतं सरण दिसत नाही, पोरीच्या लग्नासाठी दोन गुंठ्यापासून दोन एकर विकणार्‍या मराठ्यांची परिस्थिती पहावत नाही? केवळ चांगल्या दवाखान्यामध्ये म्हातार्‍या आई-बापांना उपचार मिळत नाही त्यामुळे कुडामध्ये खाटेवर पडलेले वृद्ध आई-बाप उपचाराअभावी मरतात हे श्रीमंत मराठ्यांना, सत्ताधार्‍यांना आणि वैचारिक किडे वळवळ करू पाहणार्‍यांना केंव्हा दिसणार? मराठ्यांच्या मोर्चांनी श्रीमंत मराठ्यांच्या उरात, मराठ्यांच्या नेत्यांच्या उरात आणि सत्ताधार्‍यांच्या उरात जी धडकी भरली तीच धडकी वैचारिक किडे वळवळ करणार्‍यांच्याही उरात भरली की काय? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर थेट,

‘मला पदावरून काढण्याचा कट

या मोर्चामागे शिजत आहे,’ असं सूचक वक्तव्य करतात. मला जर मुख्यमंत्रीपदावरून काढलं तर सर्वांचे प्रश्‍न सुटणार आहेत का? असा सवालही करतात. म्हणजेच मराठा मोर्चा आपल्याला मुख्यमंत्रीपदावरून काढण्याचा कट आहे, असं जर मुख्यमंत्री म्हणत असतील तर रांगड्या महाराष्ट्राला असा दुबळा मुख्यमंत्री मिळालाच कसा? छत्रपती शिवरायांचे, तुकोबांचे, शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेऊन मुख्यमंत्री नसताना देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये हाबूक ठोकून जेंव्हा बोलत होते मग मराठ्याच्या मागण्या, मराठ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी फडणवीस कामाला का लागत नाहीत? आणि त्यांना या मोर्चामुळे असुरक्षिततेची भावना का वाटावी. मुळात ज्याच्या डोक्यामध्ये जातीयतेचे बीज असते, ज्याचा मेंदू जातीयतेच्या विषवल्लीने सडका झालेला असतो त्याला सातत्याने सत्य काय आणि असत्य काय? याची जाणीव होण्यापेक्षा आणि निर्भय राहण्यापेक्षा भयभीत राहणे पसंत असते आणि त्यातूनच अशा प्रकारच्या प्रतिक्रिया बाहेर पडतात. मराठ्यांच्या मोर्चांनी कोणाचं नुकसान केलं? कोणाचं वाटोळं केलं? ते बापडे आपल्या हक्कासाठी गेल्या कित्येक दशकांपासून समाज दुर्लक्षित होत असल्याने आपला गळा मूक मोर्चाच्या माध्यमातून फाडत असतील तर या मोर्चाला जातीय वळण किंवा या मोर्चाचे विश्‍लेषण श्रीमंत मराठ्यांच्या बरोबरीने केले जात असेल तर ते दुर्दैव. महाराष्ट्राचे जाणते राजे शरद पवार यांनीही या मोर्चामध्ये हलकासा पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला, मराठ्यांनी त्यांनाही थारा दिला नाही, छत्रपती संभाजी राजे असतो, मेटे असतो किंवा अन्य नेते असोत, भैय्यू महाराजांसारखा (म्हणे) राष्ट्रीय संत असोत यांनाही मराठा समाजाने थारा दिला नाही. मग मराठ्यांची मानसिकता स्वत:च्या मागण्या मंजूर करण्यासाठी रस्त्यावर उतरणे आहे हे मराठ्यांच्या नेत्यांनी, सरकारने आणि तथाकथीत वैचारिक किडे वळवळ करू पाहणार्‍या बुद्धिजीवींनी लक्षात ठेवावे. 

   मराठ्यांच्या मोर्चांनी मराठा नेतृत्वाच्या उरात नक्कीच धडकी भरलेली आहे, मराठा नेतृत्व घाबरलेलं आहे. तेवढच सरकारच्याही तोंडाला कोरड पडलेली आहे. शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि पक्ष, संघटनेचे मराठा नेतृत्व नेमकं भविष्यात काय होईल याचा जेवढा विचार करत आहेत तेवढाच या मराठ्यांच्या मोर्चाला विस्कळीत कसा आणता येईल याचंही धोरण काही जण आखत आहेत. याची जाणीव मराठ्यांच्या मोर्चेकर्‍यांना आणि सर्वसामान्य मराठ्यांना असायलाच हवी. 

‘डेड आंबेडकर इज मोअर डेंजरस अलाईव्ह
ऐक्य

-गणेश सावंत

उद्धारली कोटी कुळं
भीमा तुझ्या जन्मामुळे
झाले गुलाम मोकळे
भीमा तुझ्या जन्मामुळे



वामनदादा कर्डक यांच्या शब्दातल्या या जिवंत ओळी आणि काल दलित ऐक्य मोर्चात एकवटलेले माणसे हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आणि स्वाभिमानामुळेच एकवटले हे सांगायला पुन्हा भविष्यकाराची गरज नाही. बीड जिल्ह्याच्या इतिहासात यापूर्वी कधी झाला नाही असा न भूतो न भविष्यती मोर्चा बीडमध्ये झाला. मोर्चेकर्‍यांच्या मागण्या ऍट्रासिटी कायदा अधिक कठोर करण्यात यावा, कोपर्डीतील बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी या मागणीसह अन्य महत्त्वपूर्ण मागण्या घेऊन बीड जिल्ह्यातला दलित वर्ग, मागासवर्ग काल एकत्रित आला. पारतंत्र्यात असताना पांढरतोंड्या इंग्रजांनी भारतावर आणि भारताच्या जनतेवर जे अन्याय-अत्याचार केले त्यापेक्षा अनगिणत अन्याय-अत्याचार पारतंत्र्यात आणि स्वातंत्र्यात उच्चवर्णीय म्हणवून घेणार्‍या माणसांनीच अछूत म्हणत खालच्या जातींच्या लोकांना वागणूक दिली. भले झाले आंबेडकर जन्माला आले. त्यांनी बंड पुकारला आणि दिनदलित, पथदलितांच्या स्वाभिमानासाठी त्यांनाही माणूस म्हणून जगता यावं यासाठी प्रयत्नांची परीकाष्टा केली. आप्तस्वकियांविरोधात उभं ठाकण्याचं धाडस केलं आणि बघता-बघता बाबासाहेबांच्या या प्रयत्नांना अटकेपार यश आलं. त्या यशाचं गमक कायम असेल तर अन्याय करणार्‍यांपेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो हे बाबासाहेबांनी अन्याय पचवणार्‍यांच्या मना मनात आणि नसानसात भिनवलं तेंव्हा मागास म्हणून राहणार्‍या या दलित वर्गाने आपणही माणूस आहोत, आपल्यालाही हक्क आहे आणि त्यासाठी आपल्यालाही या देशात आपले अधिकार मागता येतात याची जाणीव झाली आणि त्या जाणीवेतून हा अखंड दलित समज एकत्रित येऊ लागला. बाबासाहेबांनी म्हटलं होतं, भारत माझा देश आहे, मी या देशाचा मालक आहे, घराघरावर अशा पाट्या लावा, शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे तो जो पेयील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि सत्यासाठी कायदा हातात घेतला तरी चालतो, या तिनच गोष्टी मागास म्हणून राहिलेल्या लोकांच्या मस्तकात उतरल्या आणि त्यांना आपल्या न्याय-हक्कांची जाणीव जाली. हे सर्व करायचं असेल तर एकी महत्त्वाची. म्हणूनच बाबासाहेबांच्या त्या विचारांवर देशातला आजही दलित वर्ग एकत्रित येतो ही ताकत इ.स. 1998 नंतर देशात नव्हे तर बीडमध्ये काल पहावयास मिळाली. बाबासाहेबांनी माणूस असून गुराढोरांसारखं जिवन जगणार्‍यांना स्वाभिमान दिला आणि त्या स्वाभिमानाची शक्ती ऐक्यात आहे, एकीत आहे हे सांगितलं. परंतु दुर्दैवाने देशात आणि महाराष्ट्रात दलितांचं ऐक्य राहिलच असे नाही. परंतु काल बीडमध्ये हे ऐक्य याची देही याची डोळा पाहितलं आणि पुन्हा जगाच्या पाठीवर आंबेडकरांच्या न्याय-हक्काच्या लढाईनंतर एक वाक्य घुमत होतं ते होतं ‘डेड आंबेडकर इज मोअर डेंजरस देन अलाईव्ह’ (मृत आंबेडकरांपेक्षा जिवंत आंबेडकर हे खतरनाक असतील) म्हणजेच आंबेडकरांनी आपल्या अनुयायांच्या मना मनात, तनातनामध्ये अन्यायाविरुद्ध एवढी चीड निर्माण केली की जो कोणी दिनदलित, पथदलितांवर अन्याय-अत्याचार करील त्याविरोधात प्रत्येक आंबेडकरवादी आंबेडकर म्हणूनच लढेल. परंतु ही लढाई सत्याची असेल आणि तीच लढाई सत्य आणि संयमाचीकाल बीडमध्ये पहावयास मिळाली. प्रज्ञा, शील, करुणा या बुद्धांच्या पंचशिलातील तत्त्वांवर चालणारा बौद्ध, दिनदलित, पथदलित काल बौद्धांच्या आचार-विचारांवरच मोर्चामध्ये चालत होता. बीड शहरातील रस्त्यांवर किती लोक असतील याची संख्यात्माक भाष्यला जेवढं महत्त्व नाही तेवढं लोक किती, कुठून, कसे येतात आणि मोर्चात आलेला प्रत्येक व्यक्ती बुद्धांपासून आंबेडकरांपर्यंत कसा मंत्रमुग्ध होता, न्याय-हक्कासाठी आणि सत्यासाठी बाबासाहेबांची आठवण कसा काढीत होता हे अधिक महत्त्वाचं. बीडच्या दलित ऐक्य मोर्चात ‘किती होते रे लोक?’ ही आवई आणि विचारपूस सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टीकोनातून काल रात्रभर कुठं न कुठं चर्चीली जात असेल. त्याचं एकच उत्तर किती होते... लाख लाख. त्याला किती संख्या लावायची हे ज्याने त्याने ठरवावे. संख्येपेक्षा मोर्चामध्ये सहभागी झालेले अबालवृद्ध, तरुण-तरुणी, महिला वर्ग, वृद्ध ज्या पोटतिडकीने मोर्चामध्ये आल्या होत्या आणि ज्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालत-चालत आपल्या मागण्या मूक मोर्चातून जगासमोर मांडत होत्या त्या नक्कीच कौतुकास्पद म्हणायला हरकत नाही. काय म्हणावं त्या महिलांच्या, मुलींच्या आणि तरुणींच्या आत्मविश्‍वासाला, त्यांच्या स्पिरीटला. स्टेडियमपासून जिल्हाधिकारी कार्यालयापयर्ंत तडपत्या उन्हामध्ये या महिला चालत होत्या. महिला किती होत्या, शंभर-पन्ना ? हजार पाचशे? दहा हजार? छे छे लाख लाख! या मोर्चाचं नेतृत्व करणार्‍या युवती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असतील तर अन्य मोर्चात सहभागी झालेल्या महिला या कारंज्याच्याही पाठीमागे होत्या. मग सांगा किती महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या? आपल्या मागण्या मांडताना या मोर्चातल्या कुठल्याही छोट्या-मोठ्या मुलीला विचारलं असता त्या एवढ्या पोटतिडकीने मांडायच्या की विश्‍वास बसत नाही. गावकुसाबाहेर कधी काळी अछूत म्हणून राहणार्‍या या मुली कधी जिजाऊ झाल्या, झाशीची राणी झाल्या, सावित्रीबाई फुले झाल्या, कधी रमाई झाल्या हे लक्षातही आलं नाही आणि हेच आणि हेच या देशातलं सर्वात मोठं भाग्य जिथं आमची भगिनी स्वत:वरचा अन्याय पोटतिडकीने मांडण्यासाठी तेवढी धाडसी जाली. हे धाडस आलं कुठून? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात, शाहू-फुले-आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात जोही निपजेल आणि या लोकांच्या विचारांवर चालेल तो ऐक्याला महत्त्व देईल, शिक्षणाला महत्त्व देईल. हे उघड सत्य कालच्या मोर्चातून पहावयास मिळालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अठरापगड जातीला एकत्रित करण्यासाठी दिनदलित - पथदलितांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्टा केली. बाबासाहेब होते तोपर्यंत स्वाभिमानाने या देशातला दलित एकत्रित राहत होता, परंतु दुर्दैवाने बाबासाहेब बौद्धवासी झाले आणि तेथून दलितांमध्येही मोठ्या संख्येने फूट पडत गेली. अनेक पक्ष-संघटना होत गेल्या. एक नव्हे दोन नव्हे चाळीसपेक्षा जास्त नुसत्या दलितांच्या पक्ष-संघटना आहेत. कधीकाळी बामणाघरी लिवूण, कुणब्या घरी धान, महारा घरी गाणं अन् कोल्हाट्या घरी नाचणं अशी स्थिती होती. ती आंबेडकरांनी मोडीत काढली आणि सर्वांना शिक्षणाचे आणि सर्व क्षेत्रातले दारे खुले केले ते केवळ एकीच्या बळावर. दुर्दैवाने ती एकी गेल्या दोन दशकामध्ये देशातील दलितांच्या पक्ष-संघटनांमध्ये दिसून येत नाही. 

ते ऐक्य काल दिसले

इ.स. 1990, 1994, 1998, 2011 या चार वेळी दलित ऐक्य राज्यातील दलित राजकारण्यांनी प्रत्यक्षात घडवून आणले. पैकी 1998 ला लोकसभा निवडणुकीत ऍड. प्रकाश आंबेडकर, प्रा. जोगेन्द्र कवाडे, रा.सू. गवाई आणि रामदास आठवले हे निवडून आले. त्यानंतर ऐक्याचं कवित्व संपलं. दलितांच्या या नेत्यांनी आपल्या वेगवेगळ्या चुली उभ्या केल्या. आपआपले शक्तीप्रदर्शन सुरू ठेवले त्यामुळे आंबेडकरांच्या स्वप्नातला एकवटलेला माणसू दलित नेत्यांच्याच सत्तेच्या स्वार्थामुळे विघटीत होत राहिला. कुठलाही दलितांमधला नेता उठायचा, एखादं पद घ्यायचा, शे-दोनशे लोक पाठीमागं घ्यायचे आणि स्वत:ची पक्ष-संघटना स्थापन करायची यामुळे आजमितीला महाराष्ट्रात 40 पेक्षा जास्त पक्ष-संघटना आहेत. त्यामुळे आंबेडकरांच्या विचारांवर आणि तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीवर चालणारा हा दलितवर्ग कालच्या दशकामध्ये एकमेकांपासून लांब होत राहिला. याची जाणीव महाराष्ट्रात घडलेल्या दलित अत्याचाराच्या घटनेवरून दलितांना होत राहिली, परंतु दलितांचा ऐक्य पुन्हा कसं घडवून आणायचं, ते कोणी आणायचं या विचारात सर्वसामान्य दलित राहिला. 

परंतु अखेर बीडच्या आंबेडकरवाद्यांनी, तथागत गौतम बुद्धांच्या अनुयायांनी वेगवेगळ्या पक्ष-संघटनांचे झेंडे घराच्या कोपर्‍यात ठेवणे पसंत केले, आम्ही अन्याय सहन करणार नाही, आम्ही गुलाम नाहीत, आम्ही या देशाचे मालक आहोत ही चेतना पुन्हा नसा-नसांमधून उफळून निघाली आणि बीड जिल्ह्यातल्या वाडी-वस्ती, तांड्यावरून, डोंगरपट्ट्यावरून, माळरानावरून जो तो दलित ऐक्यात सामील झाला आणि बीड जिल्ह्यालाच नव्हे तर अखंड महाराष्ट्राला या मूक मोर्चाने अस्पष्ट सांगून टाकले, ‘आम्हावर अत्याचार कराल, अन्याय कराल तर ‘डेड आंबेडकर इज मोअर डेंजरस अलाईव्ह.’