प्रक्षुब्ध मनाचा नि:शब्द हुंकार
---------------
---------------
पवित्र ते कुळ पावन तो देश ॥जेथे हरिचे दास घेती जन्म ।
---------------
---------------
मराठा मोर्चा!
जातीवाचक?
-------------------
-गणेश सावंत
-गणेश सावंत
-------------------
मॅराथॉन अग्रलेख भाग-2
समाजातील अन्यायाच्या विरोधात विद्रोहाची भावना व्यक्त करणे हा महाराष्ट्राचा स्वभाव आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाकडे मराठ्यांच्याच बाधीत नेतृत्वाकडून जातबांधवाकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून, मरठ्यांमधील सर्वसामान्य, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजुर, सुशिक्षीत, बेरोजगार, महिला-मुलींमध्ये कमालीची अस्वस्थता पसरलेली असावी. आज ना उद्या नेतृत्व करणारे मराठे आपल्या अडचणी समजुन घेतील, मुलांच्या शिक्षणाचा आरोग्याचा प्रश्न सोडवतील. अडचणीत सापडलेल्या व्यवसायाला उभारी देण्यासाठी काही तरी नवे तंत्रज्ञान आणतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महाराजांचेच नाव घेवून बेल भंडार उधळणारे, गुलाल उधळणारे, महाराजांच्या नखातला मळ तरी होण्याचा प्रयत्न करतील, असं महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांना वाटायचं. महाराष्ट्राची शासन व्यवस्था-प्रशासन व्यवस्था ही कधी तरी सर्वसामान्य मराठ्यांचे प्रश्न समजून घेईल. अठरा विश्व दारिद्रयात खितपत पडलेल्या मराठ्यांना उभारी आणणण्यासाठी प्रयत्नांची परीकाष्टा करील. न्यूनगंडतेत अडकून आत्महत्या करणार्या शेतकर्यांच्या मनामनामध्ये आत्मविश्वास निर्माण करीन. परंतू अखंड महाराष्ट्रातील मराठ्यांचा आत्मविश्वास गमावला गेला आणि कोपडर्ीच्या प्रकरणातून शासन-प्रशासन व्यवस्थेसह मराठा नेतृत्वाविरूध्दची खदखद बाहेर पडू लागली. महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात लाखा-लाखाचे मोर्चे निघाले. या मोर्चांमध्ये प्रमुख मागणी कोपर्डीतील बलात्कार्यांना फाशी द्या आणि त्यानंतरच्या मागण्या या सर्व मराठ्यांच्या मागासलेपणाला दूर करणार्या, मराठ्यांच्या भावी पिढीला आत्मसन्मानीत होवून जगण्यासाठी चेव देणार्या आहेत. आणि या मागणीमध्ये ऍट्रासिटी कायद्याचा होत असलेला गैरवापर थांबवण्यासाठी कायद्यात काही तरी बदल करण्याची मागणीची ओळ होती. महाराष्ट्राची माती ही जात-पात, धर्म-पंथांच्या पलीकडची, सत्याला सत्य आणि असत्याला असत्य मानणारी आणि याच महाराष्ट्रात कर्मकांडासह शिवाशिवीची अंमलबजावणी करणारी माणसेही होती. त्यामुळे एकीकडे मराठे रस्त्यावर उतरले. मराठा नेतृत्वासह शासन- प्रशासन व्यवस्थेच्या उरात धडकी भरली. हे मोर्चे रोखायचे कसे? मराठ्यांच्या संतापाला आवर घालायचा कसा? मराठ्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली, ती विझवायची कशी? या प्रश्नाचे उत्तर जेंव्हा शासन- प्रशासन व्यवस्थेसह मराठा नेतृत्वाला मिळेना, तेंव्हा स्वत:ची चमडी बजावण्यासाठी पांढरतोंड्या इंग्रजांची ध्येय धोरणे हाती घेत, फोडा आणि तोडा, जात-धमावर्र वाद घाला, ही सडकी मानसिकता या लोकांनी समोर मांडली आणि मराठ्यांच्या क्रांती मोर्चाला जातीवाचक ठरवण्याचा उद्योग सुरू ठेवला. औरंगाबादचा मोर्चा झाला तेंव्हा कुठला विषय झाला नाही. मात्र बीड आणि इतर ठिकाणचे मोर्चे निघाले तेंव्हा विषय आपल्या आटोक्या बाहेर जातोय म्हणून ऍट्रासिटीचे प्रकरण जास्तीत जास्त पेटवण्याचे काम तथाकथित लोकांकडून होतांना दिसून येऊ लागले. जात-पात, धर्म-पंथावरचे दंगे महाराष्ट्राने अनुभवले आहे. त्या दंग्यांमध्ये सर्वसामान्य माणुसच भरडला गेला आहे. त्यामुळे जातीवादी शक्तींना ना मराठे, ना दलित थारा देतील. जर मराठा मोर्चामधून जातीयचे बीज पेरले जात असेल आणि दलित समाजही जाणिवपूवर्क मराठ्यांचा द्वेष करत असेल तर आमचा जाहिर सवाल आहे,
शिवरायांचे स्वराज्य
आणि भिमरायाची घटना
मराठा आणि दलित विसरतायत का? छत्रपती शिवाजी महाराजांनी जात-पात, धर्म-पंथांपेक्षा स्वाभिमान आणि स्वातंत्र्याला महत्त्व दिले. महाराष्ट्रातल्या अठरापगड जातींना सोबत घेवून मोठमोठ्या सत्तास्थळाला हलवून ठेवलं. बलात्कार्यांचे हात-पाय तोडले, शेतकर्याच्या भाजीच्या देटालाहा हात लावता कामा नये, असे प्रशासन ठेवले. त्यापुढे जात कर्मकांडात अडकलेला हिंदू समाज आणि महाराष्ट्रातला बहुतांश मराठा समाज जेंव्हा दिन-दलितांवर अन्याय-अत्याचार करायचा, तेंव्हा या समाजाला माणूस म्हणून जगवण्यासाठी याच महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला आणि तथाकथित धर्ममार्तंडांविरोधात एल्गार पुकारला. हा एल्गार पुकारताना बाबासाहेब म्हणतायत, ‘ ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे, तो धर्म नसून शिरजोरांची सजावट आहे. ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो, तो धर्म नसून रोग आहे. ज्या धर्मात अमंगल पशुचा स्पर्श झाला असता चालतो, पण माणसाचा स्पर्श चालत नाही, तो धर्म नसून वेडगळपणा आहे. जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये, धनसंचय करू नये, शस्त्रधारण करू नये असे सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जिवनाचे विडंबन आहे. जो धर्म अशिक्षितांना अशिक्षीत रहा, निर्धनांना निर्धन रहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून शिक्षा आहे.’ बाबासाहेबांच्या या विचारातून आजपर्यंत मराठ्यांच्या खांद्यावर कर्मकांडाच्या बंदुका ठेवून तथाकथीत धर्ममार्तंडांनी जी जात व्यवस्था प्रकर्षाने राबवली, राबवत आहे आणि भविष्यात राबवण्यासाठी खटाटोप करत आहे. त्याच धर्ममार्तंडांना मराठ्यांच्या मोर्चांची आणि दलितांच्या सर्वोच्च स्वातंत्र्याची भिती वाटतेय की काय? आणि त्या भितीतूनच मराठ्यांच्या मोर्चाला जातीवाचक वळण लावण्याचा प्रयत्न केला जातोय की काय? हे शिवराय आणि भिमरायांच्या विचारांवर चालणार्या लोकांनी लक्षात ठेवावे. कारण याच महाराष्ट्रात मराठ्यांनो 16 व्या शतकात जगदगुरु संत तुकोबांनी आपल्या घराचं, कुळाचं, गावाचं, राज्याचं वर्णन करतानापवित्र ते कुळपावन तो देश
असं म्हटलं होतं. तुकोबांचा हा अभंग आपण वाचला आणि त्या अभंगातील मर्म समजून घेतले. तर शिवराय आणि भिमराय यांच्यात कटूता आणण्याचा प्रयत्न करणार्यांचे नक्कीच मुस्काट फुटेल. तर ऐकापवित्र ते कुळ पावन तो देश ॥जेथे हरिचे दास घेती जन्म ।
कर्म-धर्म त्याचे झाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥
वर्ण अभिमाने कोण झाले पावन । ऐसी त्या सांगुनि मज पाशी ॥
अंत्यजादी योनी तरल्या हरीभजने । तयाची पुराणे भाट झाली ॥
वैष्ण तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥
कबीर, मोमीन, लतीब मुसलमान । सेना नाही जान विष्णुदास ॥
कानोपात्र खोदू पिंजारी तो दादू । भजनी अभेदू हरीचे पाय ॥
चोखोमेळा बंका जातीचा महार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥
नामीयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियसवी ॥
मैराळ जनक कोण कुळ त्याचे । महेंमान तयाचे काय सांगू ॥
सर्व जात-पात, धर्म- पंथाचे संत या महाराष्ट्रात होवून गेले. आणि त्या संताचा लेखाजोखा तुकोबांनी एका अभंगातून मांडला. आणि त्या अभंगातून ज्या ठिकाणी जात-पात, धर्म-पंथाला महत्त्व नसते, ते कुळ, ते गाव, ते राज्य आणि तो देश पवित्र असतो, असे तुकोबांना म्हणायचे. म्हणून मराठ्यांनी मराठ्यांच्या प्रश्नांसाठी पुकारलेला एल्गार हा चांगल्या नजरेतला ठेवावा आणि दलितांनीही या एल्गाराला आक्रमण किंवा आक्रस्ताळ ठरवण्यापेक्षा जातीयवादी शक्तींचा पुरेपूर समाचार घेवूनच प्रतिक्रिया द्यावी. म्हणजे महाराष्ट्रात शिवरायांचे स्वराज्य आणि भिमरायांच्या घटनेने जो-तो प्रगतशील झाल्याशिवाय राहणार नाही. प्रगतशील होण्याचा अर्थ म्हणजे आर्थिकदृष्ट्या आणि भौतिक सुखाचा लालची नव्हे. तर शिवराय आणि भिमरायांच्या विचारांवर प्रगतशील होणारा माणूस हा माणसाने माणसासाठी माणुसकीने कसं वागायचं हे सांगणरा ठरेल. आज महाराष्ट्राच्या कान्याकोपर्यातून मराठे हाताची घडी तोंडावर बोट ठेवत मूकमोर्चा काढत आहेत. आपल्या मागण्या जगासमोर आणत आहेत. मराठ्यांच्या मागण्या या त्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोर्चे निघाले नाहीत त्यामुळे मराठ्यांनी असे मोर्चे काढले असल्यामुळे जात्यांध शक्ती या मोर्चांना वेगळे वळण देण्याच्या तयारीत असेल परंतु महाराष्ट्रातल्या सर्व जात-पात-धर्म-पंथातील लोकांनी जातीयवाद्यांचे हे षडयंत्र हाणून पाडणे म्हणजेच महाराष्ट्राच्या विचारसरणीला मुजरा घालणे होय.
उद्याच्या अंकात ‘घाबरलेलं मराठा नेतृत्व अन् तोंडाला कोरड पडलेलं सरकार’
No comments:
Post a Comment