Wednesday, 26 October 2016

मॅराथॉन अग्रलेख भाग-3

गांडू भडवे रणछडे । छिनाल खाय पेढे ॥पतीव्रता को पडे कोडे ॥
-----------------------------------------------------------------------------

प्रक्षुब्ध मनाचा नि:शब्द हुंकार

------------------------------------


घाबरलेला मराठा नेतृत्व 


अन् कोरड पडलेलं सरकार

-------------------------------------

--------------------------------------------------------
गणेश सावंत-9422742810
--------------------------------------------------------


गेल्या कित्येक दशकातल्या खदखदीने फुरफुरलेल्या मराठ्यांच्या मोर्चाचे विवेचन जो तो आपल्या नजरेतून करतो. सकारात्मक, नकारात्मक,उपकारी, परोपकारी, सत्य, असत्य, खरं-खोटं, जो जमेल तो अर्थ लावून मराठ्यांच्या मोर्चाचे विश्‍लेषण केलं जाऊ लागलं. केवळ महाराष्ट्रात बहुसंख्य मराठे आहेत म्हणून आणि बोटावर मोजण्या इतक्या श्रीमंत मराठ्यांच्या सत्तास्थानावरून अखंड महाराष्ट्राच्या मराठ्यांची आर्थिक स्थिती बलदंड आहे अशी व्याख्या मराठ्यांबाबत लावली जात असेल तर ही व्याख्या मराठ्यांना लावणार्‍यांची किव करावीशी वाटते. मराठ्यांच्या मोर्चांकडे संशयाच्या नजरेने पाहणार्‍यांबाबत आम्ही फक्त एवढेच म्हणू ङ्गजिसकी जैशी सोच, परंतू मोर्चाकडे संशयाच्या नजरेने पाहत संशयकल्लोळ निर्माण करणार्‍यांना संत कबीरांच्या भाषेत एवढेच सांगू, गांडू भडवे रणछडे । छिनाल खाय पेढे ॥पतीव्रता को पडे कोडे ॥महाराष्ट्रातला अखंड मराठा समाज अत्यंत शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरलेला असल्याने या मोर्चामागे कुणीतरी राजकीय शक्ती आहे. हे सांगणार्‍या आणि मोर्चाच्या धास्तीने जातीयतेचे विष पेरू पाहणार्‍यांना मराठा समाज ओरडून सांगतोय, आम्ही कोणाचे नेतृत्व स्विकारणार नाही, आम्ही कोणत्या पक्ष, संघटनेशी सलग्न नाही. सरकारने चर्चा करण्यापेक्षा दिलेल्या निवेदनाचा विचार करत त्याचा रोड मॅप करावा आणि ज्या गोष्टी तात्काळ होऊ शकतात, त्या गोष्टी तात्काळ करण्यास सुरूवात करावी. परंतू मराठ्यांच्या मोर्चाने बिथरलेले सत्ताधारी आणि मराठ्यांचेच वेगवेगळ्या पक्षातील नेते मराठ्यांच्या या मोर्चाने आपले थडगे बनते की काय, या धास्तीत मनाला वाटेल तसा कयास या मोर्चाबाबत काढत अनावश्यक प्रतिक्रिया देवून मोकळे होतात आणि अखंड रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाचा जाहीर अपमान करतात. आपण ज्या मराठा समाजामध्ये जन्मलो त्या मराठा समाजाचे काही तरी देणे आहे अशी जाणीव कदीही न होणार्‍या मराठा नेत्यांना रस्त्यावर उतरलेला मराठा पाहून आपली जात आठवली आणि जो तो या मोर्चामध्ये सहभाग नोंदवत या मोर्चाचे श्रेय आपल्या उरावर कसं घेता येईल याचा प्रयत्न करू लागला. परंतु तळपायाची आग मस्तकाला गेलेल्या मराठ्यांना ना स्वत:च्या जातीतील नेतृत्वावर विश्‍वास आहे ना सरकारच्या कालच्या आणि आजच्या कार्यप्रणालीवर विश्‍वास आहे. म्हणूनच जिल्ह्या जिल्ह्यात निघणार्‍या मोर्चांमध्ये गेल्या महिन्याभरापासून मोर्चेकरी मराठ्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका अत्यंत तटस्थ ठेवली. असे असतानाही मराठ्यांच्या या मोर्चाकडे संशयी नजरेने पाहणारे नेत्यांबरोबर स्वत:ला अभ्यासू मानणारे वैचारिक किडेही वळवळ करताना दिसून येतात. आम्हाला आश्‍चर्य वाटतं, ज्या वैचारिक लोकांनी अशा मोर्चांचं विश्‍लेषण समाजातल्या शून्य गतीतल्या माणसापासून करायचं सोडून समाजातल्या शंभरीत गेलेल्या माणसावर या मोर्चाचं विश्‍लेषण केलं जात असेल तर नक्कीच
ही वैचारिक भाडखाऊ वृत्ती असेल. अशा
वैचारिक किड्यांबाबत



संत तुकोबांच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘नाही निर्मळ जिवन काय करील साबण, वृक्ष न धरी पुष्पफळ काय करील वसंतकाळ? वांझे न होती लेकरे काय करील भ्रतारे, नपुंसक नवर्‍याशी काय करील बाईल त्याशी असेच म्हणावे लागेल. ज्याचं अंत:करण शुद्ध नाही तो निर्मळ असूच शकत नाही. मग कुठल्याही साबणीने अंघोळ केली आणि फेस कोपरापासून ढोपरापर्यंत नेला तरी टिर्‍या दिसायच्या त्या तश्याच दिसतील. एवढा स्पष्ट आणि उघड मराठ्यांच्या मोर्चाबाबत लिहिण्याचं एवढच कारण की एक महिन्यापासून मोर्चे निघताहेत, या मोर्चामागे कोणीही नाही, स्वयंस्फूर्तीने मोर्चे निघताहेत आणि अशा स्थितीमध्ये काही नत्द्रष्ट, वैचारिक म्हणवून घेणार्‍या पैदासी सरळ-सरळ या मोर्चाला प्री-प्लॅन आणि बामनाचा मुख्यमंत्री आहे म्हणून निघत आहेत, असा कयास काढून मोकळे होत असतील तर अशा सडक्या विचारसरणीला आम्हा घरी धन शब्दाची रत्ने शब्दाची शस्त्रे यत्न करू या सिद्धांतातून उत्तर देऊच. काल -परवा एका वैचारिक बुद्धिजीवीने आर्थिक संधी नाही हे दुखने खर्‍या गरीब मराठ्यांचे आहेही परंतु राज्याची अर्थकेंद्रे इतकी वर्षे मराठा समाजाच्याच हाती होती, याकडे कशी डोळेझाक करणार? असा सवाल उपस्थित करून बोटावर माेजण्या इतक्या श्रीमंत मराठ्यांच्या बराबरीने आज रस्त्यावर उतरलेल्या मराठ्यांना बसवण्याचं कटकारस्थान करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर उतरलेला मराठा इतकी वर्षे ज्या मराठ्यांकडे अर्थकेंद्रे होते त्यांच्या विरोधातही बोंब मारतोय. त्यांना सोबत घेऊन कोणावर आक्रमण करत नाही हे या बुद्धीजीवी किड्यांना गेल्या महिन्याभरात का दिसलं नसावं? केवळ मराठे रस्त्यावर उतरले म्हणून जर मराठे मुख्यमंत्री बामनाला विरोध करतात हे दाखवून मराठ्यांना जातीयवादी ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न अशा तथाकथीत बुद्धीजीवी किड्यांकडून केला जातो. ‘बनी तो बनी,’ ही मानसिकता मोर्चाकरी मराठ्यांची नव्हे. मोर्चामुळे धास्तावलेल्या आणि सत्यापासून दुरावत जाणार्‍या कमविचारी माणसांची आहे. मराठ्यांचे मोर्चे हे जेवढ्या शिस्तीने, जेवढ्या ताकतीने, जेवढ्या आत्मविश्‍वासाने आणि जेवढ्या प्रकर्षाने निघतात तेवढ्याच आत्मविश्‍वासाने मराठ्यांच्या बापजाद्यांनी आणि त्यांना मदत करणार्‍या याच महाराष्ट्रातील अठरा पगड जातींनी गडकोट किल्ले एवढ्या चिकाटीने काबीज केले होते त्यामुळे या मोर्चामध्ये ‘बनी तो बनी,’ ही मानसिकता औषधलाही मिळणार नाही. कारण झोपलेले मराठे आता उठून बसले, उभे राहीले आणि पळते झाले त्यामुळे कुठल्याही वैचारिक किड्यांनी वैचारिक गोंधळ माजवण्याचे कारण नाही. मराठ्यांच्या मोर्चामध्ये बाहेर पडलेल्या बायाबापड्या त्या केवळ आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून बाहेर पडलेल्या आहेत. याची तरी जाणीव सत्ताकेंद्र असलेल्या मराठ्यांना दळभद्री विचारसरणीच्या विचारवंतांना, सत्ताधारी नेत्यांना आहे का हो? आम्ही लिहिलं, आम्ही विचार मांडला म्हणजे तो त्रिवार सत्य अशा भूमिकेत विचार मांडणार्‍यांना मराठ्यांच्या घरातले अठराविश्‍व दारिद्य्र दिसत नाही, पैशामुळे मराठ्यांच्या मुलांचे शिक्षण होत नाही हे दिसत नाही? दुष्काळामुळे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचं जळतं सरण दिसत नाही, पोरीच्या लग्नासाठी दोन गुंठ्यापासून दोन एकर विकणार्‍या मराठ्यांची परिस्थिती पहावत नाही? केवळ चांगल्या दवाखान्यामध्ये म्हातार्‍या आई-बापांना उपचार मिळत नाही त्यामुळे कुडामध्ये खाटेवर पडलेले वृद्ध आई-बाप उपचाराअभावी मरतात हे श्रीमंत मराठ्यांना, सत्ताधार्‍यांना आणि वैचारिक किडे वळवळ करू पाहणार्‍यांना केंव्हा दिसणार? मराठ्यांच्या मोर्चांनी श्रीमंत मराठ्यांच्या उरात, मराठ्यांच्या नेत्यांच्या उरात आणि सत्ताधार्‍यांच्या उरात जी धडकी भरली तीच धडकी वैचारिक किडे वळवळ करणार्‍यांच्याही उरात भरली की काय? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर थेट,

‘मला पदावरून काढण्याचा कट

या मोर्चामागे शिजत आहे,’ असं सूचक वक्तव्य करतात. मला जर मुख्यमंत्रीपदावरून काढलं तर सर्वांचे प्रश्‍न सुटणार आहेत का? असा सवालही करतात. म्हणजेच मराठा मोर्चा आपल्याला मुख्यमंत्रीपदावरून काढण्याचा कट आहे, असं जर मुख्यमंत्री म्हणत असतील तर रांगड्या महाराष्ट्राला असा दुबळा मुख्यमंत्री मिळालाच कसा? छत्रपती शिवरायांचे, तुकोबांचे, शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेऊन मुख्यमंत्री नसताना देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये हाबूक ठोकून जेंव्हा बोलत होते मग मराठ्याच्या मागण्या, मराठ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी फडणवीस कामाला का लागत नाहीत? आणि त्यांना या मोर्चामुळे असुरक्षिततेची भावना का वाटावी. मुळात ज्याच्या डोक्यामध्ये जातीयतेचे बीज असते, ज्याचा मेंदू जातीयतेच्या विषवल्लीने सडका झालेला असतो त्याला सातत्याने सत्य काय आणि असत्य काय? याची जाणीव होण्यापेक्षा आणि निर्भय राहण्यापेक्षा भयभीत राहणे पसंत असते आणि त्यातूनच अशा प्रकारच्या प्रतिक्रिया बाहेर पडतात. मराठ्यांच्या मोर्चांनी कोणाचं नुकसान केलं? कोणाचं वाटोळं केलं? ते बापडे आपल्या हक्कासाठी गेल्या कित्येक दशकांपासून समाज दुर्लक्षित होत असल्याने आपला गळा मूक मोर्चाच्या माध्यमातून फाडत असतील तर या मोर्चाला जातीय वळण किंवा या मोर्चाचे विश्‍लेषण श्रीमंत मराठ्यांच्या बरोबरीने केले जात असेल तर ते दुर्दैव. महाराष्ट्राचे जाणते राजे शरद पवार यांनीही या मोर्चामध्ये हलकासा पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला, मराठ्यांनी त्यांनाही थारा दिला नाही, छत्रपती संभाजी राजे असतो, मेटे असतो किंवा अन्य नेते असोत, भैय्यू महाराजांसारखा (म्हणे) राष्ट्रीय संत असोत यांनाही मराठा समाजाने थारा दिला नाही. मग मराठ्यांची मानसिकता स्वत:च्या मागण्या मंजूर करण्यासाठी रस्त्यावर उतरणे आहे हे मराठ्यांच्या नेत्यांनी, सरकारने आणि तथाकथीत वैचारिक किडे वळवळ करू पाहणार्‍या बुद्धिजीवींनी लक्षात ठेवावे. 

   मराठ्यांच्या मोर्चांनी मराठा नेतृत्वाच्या उरात नक्कीच धडकी भरलेली आहे, मराठा नेतृत्व घाबरलेलं आहे. तेवढच सरकारच्याही तोंडाला कोरड पडलेली आहे. शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि पक्ष, संघटनेचे मराठा नेतृत्व नेमकं भविष्यात काय होईल याचा जेवढा विचार करत आहेत तेवढाच या मराठ्यांच्या मोर्चाला विस्कळीत कसा आणता येईल याचंही धोरण काही जण आखत आहेत. याची जाणीव मराठ्यांच्या मोर्चेकर्‍यांना आणि सर्वसामान्य मराठ्यांना असायलाच हवी. 

No comments:

Post a Comment