Sunday, 9 December 2018

ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रातले शिवाजी व्हा


आईने संघर्ष कारायला शिकवलं, विश्‍वास टाकला, भाऊजींनी पडत्या काळात मदत केली तेंव्हा मी उभा राहू शकलो. समाजाचं देणं म्हणून बीडमध्ये प्रॅक्टीस करू लागलो, माझ्या व्यवसायातून आणि सामाजिक कार्यातुन विश्‍वास निर्माण झाला. लोक येत गेले आणि जुळत गेले त्यामुळेच क्रांती मोर्चाची मोठी जबाबदारी मिळाली. त्या जबाबदारीचं फळ अखंड मराठा समाजामुळे आरक्षणातून मिळालं. आरक्षणाचा श्रेय सरकारने घेवू नये. क्रांती मोर्चामुळे दबाव गट निर्माण झाला आणि त्या दबावामुळेच सरकारला आरक्षण द्यावं लागलं. शालेय जीवनाथ आमचे चव्हाण सर नेहमी म्हणायचे ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात टॉपवर जा. भलेही चोर झाला तर साधेसुधे चोर हेावू नका मोठे डाकू व्हा. परंतू समाज जीवनामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टीचा जान ठेवा. नकारात्मक गोष्टीपासून दूर रहा, सकारात्मक गोष्टींमध्येच शिखरावर रहा. आता मी ही म्हणतो उभ्या आयुष्यात ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रातले शिवाजी व्हा. यासह अन्य गोष्टीवर थेट भेटमध्ये आज आपल्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तथा सी.ए. बी.बी.जाधव बोलत आहेत त्यांची रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत यांनी घेतलेली ही मुलाखत 



जे जाधव सी.ए. म्हणून ओळखले जात होते. ते मराठा 
क्रांतीचे समन्वयक झाले. कसा होता अहा प्रवास?
चार्टड अकाऊंटंट झाल्यानंतर बीडमध्ये प्रॅक्टीस करायची की नाही हा माझ्यासमोर सर्वात मोठा प्रश्‍न होता. सुरूवातीला बर्‍याच जणांसोबत चर्चा केली. तेंव्हा असं निदर्शनास आलं, ठरावीक समाज या क्षेत्रामध्ये आहे आणि त्यांच्याकडून इतर समाजाच्या म्हणण्यापेक्षा बहुजन समाजाच्या लोकांनी पिळवणूक केली जाते त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. यामागे त्या लोकांची हुशारी नव्हे तर बहुजनांच्या लोकांमधलं अज्ञान होतं. त्या काळात मी एका संपादकाकडे गेलो होतो. त्यादिवशी ते बोलत असतांना प्रचंड तणावाखाली होते. मी सहज विचारलं, कसलं टेंशन तर ते म्हणाले, दोन महिन्यात अकाउंटींग करायची आहे आणि आमुक आमुक व्यक्ती माझ्याकडून होणार नाही असं म्हणतो. तेंव्हा मी म्हणालो, त्यात टेंशन कसलं? मी करून देतो किंवा अन्य कोणीही करून देईल. यातून एक विषय लक्षात आला. छोट्या-छोट्या गोष्टींचा इशु येथे केला जातो आणि आपल्याच लोकांना त्यामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न होतो. मग मी ठरवलं बीडमध्येच प्रॅक्टीस करायची. प्रॅक्टीस सुरू झाली, लोक येत गेले, समाज जोडला गेला. त्यातून हळुहळु मी सामाजिक कार्यात सहभागी होत गेलो. मला आठवत १७ ते १८ ऑगस्ट २०१६ रोजी शाहु आयटीआयमध्ये  कॉलेज येथे बैठक बोलवण्यात आली होती. मलाही त्याठिकाणी बोलवण्यात आलं होतं. बैठकीत शंभर दोनशे लोक होते. या बैठकीमध्ये क्रांती मोर्चाचा निर्णय झाला नाही. मग २२ ऑगस्टला दुसरी बैठक ही आशिर्वाद मंगल कार्यालय येथे झाली. त्या ठिकाणी ५ हजारापेक्षा जास्त समाज बांधव उपस्थित होते. मी ही त्याठिकाणी गेलो होते, सर्वात शेवटी भिंतीला पाठ लावून बसलो होतो. मला कल्पनाही नव्हती की माझ्यावर कुठली जबाबदारी येईल. या बैठकीतच मोर्चा काढायचं नक्की झालं, तारीख ठरली. आता एवढ्या मोठ्या मोर्चाचे नियोजन आणि जो पैसा उभा राहील त्याचं नियोजन कुणाकडे द्यायचं हा विषय जेंव्हा समोर आला तेंव्हा बैठकीमधून कोणी तरी एक जणाने माझं नाव दिलं. अवघ्या काही सेकंदात माझ्या नावावर शिक्का मोर्तब झालं. 
चार्टड अकाऊंटंट या क्षेत्राकडे आपण कसे वळलात?
लहानपणापासुन एक क्रेझ होती मनात. मी जेंव्हा बीड हायस्कुलमध्ये शिक्षण घेत होतो तेंव्हा चव्हाण नावाचे एक शिक्षक होते. मला ते नेहमी म्हणायचे ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात टॉपला जायचं. भलेही चोर झाला तर साधे सुधे चोर व्हायचं नाही मोठं डाकू व्हायचं. ज्या कामात जाल, जे काम कराल त्यात तुमचा दरारा असला पाहिजे. एवढं मोठं व्हायचं. शिक्षण क्षेत्रात गेलात, व्यवसायात गेलात किंवा अन्य कुठल्या क्षेत्रात गेलात तर खाली रहायचं नाही तर टॉपला रहायचं. ती एकच गोष्ट माझ्या मनावर कायम बिंबली होती. मग माझी दहावी झाली, मार्गदर्शन नसल्यामुळे नेमंक काय करायच? हे माहिती नव्हतं. आर्ट, कॉमर्स, सायन्स हे तीनही क्षेत्र निवडत बसलो, चाचपत बसलो. काहीसोबत चर्चा करत राहिलो. परंतू उत्तर काही भेटलं नाही. शेवटी सोबतच्या मित्रांनी कॉमर्स निवडले म्हणून मीही कॉमर्स घेतले. या क्षेत्रात तेंव्हा ज्ञान नव्हतं. सी.ए.व्हायचं हेही ध्येय नव्हतं. कुटुंबातही कोणी सी.ए. नव्हता तरी मी वाणिज्य शाखेला प्रवेश घेला. आकरावी, बारावी फर्स्ट इयर करत असतांना मी ज्या वाड्यात रहायचो त्या ठिकाणी बी.कॉम केलेले विद्यार्थी एमपीएससीचा अभ्यास करायचे. मी त्यांना नेहमी विचारायचो, कॉमर्समध्ये सर्वात मोठी डिग्री काय असेल तर ते म्हणायचे चार्टड अकाऊंटंट. मग मी त्यावेळी ठरवलं मला चार्टड अकाऊंटंटच व्हायचय. नियोजन नसल्यामुळे थोडी फरपड झाली. तेंव्हा तेवढ्या पात्रतेचा होतो की नव्हतो हे ही माहित नाही. परंतू मी ठरवलं होतं, व्हायच तर आता चार्टड अकाऊंटंटच आणि सर ही मला सांगायचे ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात टॉपला जा. आज मी या ठिकाणी टॉपला आहे आणि मी ही पुढच्या पिढीला कुठल्याही क्षेत्रात जा परंतू त्या क्षेत्रातले शिवाजी व्हा. ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रातले शिवाजीच व्हाल. त्यासाठी स्वप्न ही मोठे असायला हवे आणि संघर्ष करण्याची धमकही असायला हवी. 
तुमच्या या क्षेत्रात विशिष्ट समाजाची मक्तेदारी आहे असं नेहमी 
म्हटलं जातं, तरीही आपण या क्षेत्रात यशस्वी कसे झालात?
मी कुठल्या समाजाला नाव ठेवणार नाही, परंतू सुरूवातीपासुन ते लोक व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांनाच या क्षेत्रातलं महत्त्व माहित होतं. पंधरा-वीस वर्षापूर्वी आपण मागे जावून पाहिलं तर २० टक्केही बहुजनातले लोक व्यापारी वर्गात नव्हते. त्यामुळे सी.ए.पदाची कल्पना अथवा त्याचे महत्त्व त्यांना असण्याचे कारणच नाही. सी.ए. काय असो तो कशासाठी असतो हे तेंव्हा जेमतेम लोकांना माहित होतं. मी जेंव्हा याचं शिक्षण घेत होतो तेंव्हा शंभर मुलांमध्ये बहुजनांचे २-५ मुले असायची. मुस्लिम समाजाचीही स्थिती तीच होती. २ टक्केच समाज या क्षेत्रामध्ये असायचा. त्यामुळे पासिंगचे प्रमाण नेहमी बहुजनांचे कमी असायचे. २०० मुले पास झाले तर बहुजनांची ५ ते ६ त्यामध्ये असायची. म्हणून मी खर तर बीडमध्ये प्रॅक्टीस करण्याचं ठरवलं. मी जिथ होतो त्या ठिकाणी मला लाख रूपयाचा पगार होता. अन्य फॅसिलीटी देण्याचे आश्‍वासन दिले होते. तरीही ती नोकरी मी स्विकारली नाही. आपण ज्या ठिकाणावरून आलो आहोत, ज्या समाजातून आलो आहोत त्या समाजाची काही सेवा करावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी प्रॅक्टीस सुरू केली. रिस्पॉंस मिळत गेला ते वाढत गेले. काम करतांना लोकांची कुठलीही फसवणूक केली नाही. त्यातून विश्‍वास वाढला आणि आज बीडमध्ये चांगल्या सेवेमध्ये मी गणला जातो. हे जेवढं माझं श्रेय आहे तेवढच माझ्यावर प्रेम करणार्‍या लोकांचही आहे. 
आपल्याकडे म्हटलंं जातं, मराठ्यांचा मराठ्यांवर
 विश्‍वास नसतो मग समाजाने क्रांती मोर्चाचा आर्थिक 
व्यवहाराची जबाबदारी तुमच्या टाकली?
२०१६ पर्यंत लोकांनी मला माझ्या कामातून अनुभवलं होतं. सी.ए.चं काम करत असतांना जो विश्‍वास मिळाला, माझी लोकांनी जी आजपर्यंत चाचणी घेतली. मग सामाजिक कार्याच्या माध्यमातून म्हणा, रोटरीच्या माध्यमातून म्हणा, चंपावती क्रीडा मंडळाच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून काम करत असतांना मी प्रामाणिकपणे काम करतो हे लोकांच्या लक्षात आले. मी कोणाला मदत करत असतांना ती मदत फोटो काढून कधीच करत नाही. माझ्याकडे अनेक लोक येतात, अनेकांना मोफत मार्गदर्शन मी आजही करतो. एखादी सामाजिक संस्था असेल, तिचे चांगले काम असेल तर त्या संस्थेचं ऑडीटही मी मोफत केलेले आहे. अनेक मंदीरांचे ऑडीट पैसे न घेता आजपर्यंत करत आलेलो आहे. एखाद्या मंदिराच्या ऑडीटचे पैसे माझ्या एखाद्या कर्मचार्‍याने माझ्या गैरहजेरीत घेतले असतील ते माहित नाही. परंतू माझ्यावरचा विश्‍वास वाढला आणि ही जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली आणि ती निभावण्यातही मी यशस्वी झालो. 

मराठा क्रांतीमध्ये गटतट पढले आहेत, याकडे आपण कसे पाहता?
गटतट असं म्हणता येणार नाही. क्रांती मोर्चा हे एक समाजाचे सामाजिक काम आहे. मला एखादा विचार पटला नाही तर मी त्या विचारासोबत जाणार नाही. परंतू त्या विचाराला विरोधही करणार नाही. समाजासाठी एखादा काम करत असेल अन् ते आपल्याला आवडत नसेल तर ते आपण शांत बसून पहायलं हवं. मध्यंतरी जयंतीचा विषय समोर आला होता. माझं म्हणणं होतं महाराजांना, जिजाऊ मॉ साहेबांना डोक्यावर घेवू नाचण्यापेक्षा डोक्यात घेतलं तर अधिक बरं होईल. त्यामुळे तेंव्हा मी शांत राहिलो. गटतट म्हणता येणार नाही परंतू, काही लोक संघटनेशी, विविध पक्षाशी जोडले गेलेले असल्याने त्यांना त्यांचा अजेंडा क्रांती मोर्चाच्या रूपात राबवायचा असावा एवढेच काय ते. विचार जरी भिन्न असले तरी समाजाचं काम करतांना आजही एकत्रितच येतात हेही तेवढेच खरे.
राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणावर समाधानी आहात काय?
आरक्षण मिळालं यावर समाधानी असणारच. २०१६ पासून लढा सुरू आहे. तसा तो १९८४ पासून सुरूय. त्या लढ्याला आता कुठं यश मिळालं. २०१४ साली जे आरक्षण मिळालं होतं तेंव्हा ते टिकलं नाही. आता जे आरक्षण मिळालं त्याला बेस आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आला. त्यामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे वाटतं हे आरक्षण टिकेल. आता जरी समाधानी असलो तरी वाटत होतं, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं. जसं तामीळनाडू सरकारने केलं, ओबीसींना धक्का न लावता त्यातच मराठ्यांना आरक्षण द्यायला हवं होतं. आणि त्याच धर्तीवर द्यावं असं अपेक्षित होतं. 
अनेक बुद्धीजीवी,निवृत्त न्यायाधीश यांच्या मतानुसार आज दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, तुम्हाला काय वाटतं?
त्यांचा अभ्यास सहाजिकच माझ्यापेक्षा जास्त आहे. न्याय क्षेत्र हा त्यांचं विषय आहे. परंतू आतापर्यंत न्यायालयाने ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्यामध्ये मागासवर्गीय आयोगाचा अहवाल महत्त्वाचा होता आणि  तो अहवाल आता मिळाला आहे. जरी सर्वोच्च न्यायालयाच्या ५२ टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही अशा सूचना असल्या तरी संविधानामध्ये एखादा समाज मागास असेल तर त्याला आरक्षण देता येतं. हे तामीळनाडू राज्यात दिसून येतं, त्या व्यतिरीक्त कर्नाटकमध्ये मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात आलं आहे. कुणबी मराठ्यांना आरक्षण आहे. एका भावाला आहे आणि दुसर्‍याला नाही, पत्नी कुणबी म्हणून तिला आरक्षण आणि मला आरक्षण नाही हा सामाजिक असमतोल झाल्यासारखं वाटत नाही का? आपल्याला. खरतर आता शासनासह सर्वांनीच हे आरक्षण टिकेल यासाठी बाजू मांडायला पाहिजे आणि तसे प्रयत्न तुम्ही आम्ही करू. 
एका दुर्दैैवी घटनेने समाज एकवटला, क्रांती झाली, यश 
आले.आता हा समाज पुढे ही एकजुटीने राहील का?
राज्यामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तो वेगवेगळ्या पक्ष संघटनामध्ये विखुरला गेलेला आहे. एकत्र येणं ही फार अवघड गोष्ट होती. महाराष्ट्रात नाही तर देशात कोणालाही विचारलं मराठा समाज एखाद्या घटनेवरून एकत्र येईल का? तर त्याचं उत्तर नाही यायचं. पण कोपर्डीत दुर्दैवी घटना घडली, समाज एकत्र आला आणि देशात हा संदेश गेला मराठा समाज कोणत्याही क्षणी एकत्र येवू शकतो. मराठा क्रांतीमध्ये जे लोक पुढे आहेत त्या राज्यभरातील लोकांची नावे पाहिली तर ते फार सामान्य आहेत. परंतू आर्थिकदृष्ट्या स्थिर आहेत. त्यांच्या लोकांनी विश्‍वास टाकला. यातील दोन-पाच टक्के लोक राजकीय पक्ष संघटनेशी जोडले गेलेले असले तरी अन्य लोक इनामदारीने समाजाचे काम करत आहेत. आत्तापर्यंत समाज जसा एकत्रित आला तसा यापुढेही समाज एकत्रितच येईल हा विश्‍वास आहे. तसा आम्ही प्रयत्न कायम सुरू ठेवणार आहोत. समाजाचे कुठले प्रश्‍न सोडवायचे, आजपर्यंत समस्यांच्या आणि प्रश्‍नांच्या विळाख्यात असलेला मराठा समाज आता कुठं एकत्रित येवून प्रश्‍न सोडू लागला आहे. अशा स्थितीमध्ये जेवढा दबाव तंत्राचा वापर करता येईल तेवढा एकीमधून होत आला आहे. आम्ही कोणावर अन्याय करणार नाही आणि आमच्या बांधवांवरचा अन्यायही सहन करणार नाही. आता मध्यंतरी पोखरी येथे मराठा समाजावर अन्याय झाला होता. त्याठिकाणी मराठा क्रांतीने ठोस भूमिका घेतली होती. त्यामुळे तेथिल लोकांचे प्रश्‍न सुटले त्यावेळीही गटतटाची चर्चा होतीच परंतू तरीही एकजुट झालीच आणि ती उभ्या महाराष्ट्राने पाहिली. 
या आरक्षणाचं श्रेय फडणवीस सरकारला द्यायची की मराठा आंदोलन आणि बलीदान देणार्‍या समाजातील मुलांना?
आपण पाहिलं याआधी २०१४ साली मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं होतं. त्यावर स्टे आला. या फडणवीस सरकारने २०१४ ते २०१६ या दोन वर्षाच्या काळात काहीच केलं नाही. एक-एक वर्षाने तारीख वाढवून घ्यायची त्यामुळे या सरकारने आरक्षणाचं श्रेय घेवू नये. क्रांती मोर्चाच्या रूपाने दबावगट तयार झाला. त्याचा परिणाम म्हणून शासनाला हा निर्णय घ्यावा लागला. या सरकारचा आरक्षण देण्याच अजेंडा नव्हता. आता हेच पहा, २०१६ मध्ये क्रांती मोर्चा सुरू झाले. नंतर या चळवळीला वर्ष सहा महिन्याने मरगळ आली. शासनाला वाटलं आता सर्व शांत झालं. मुंबई ९ ऑगस्ट २०१७ रोजी महामोर्चा निघाला. तेंव्हाही प्रशासनाने कुठल्याही हालचाली केल्या नाहीत, नुसतं लेखी दिलं. तारखांवर तारखा देत गेले, परंतू जेंव्हा परळीमध्ये ठोक मोर्चाला सुरूवात झाली आणि राज्यभर अगडोम उसळला तेंव्हा मुख्यमंत्री फडणवीस डीडी वाहिनीवर आले आणि मागासवर्गीय अहवाल नोव्हेंबरपर्यंत येईल अशी तारीख दिली. हे श्रेय कोणी घेवू नये कारण हा क्रांतीचा विजय आहे. यासाठी ४०-४२ मराठा तरूणांनी बलीदान दिलं आहे. 
मराठा समन्वयक पदाचा आपल्या व्यवसायाला फायदा झाला का?
मी २००२ पासून प्रॅक्टीस करत असल्यामुळे तसा कामाचा विचार केला तर माझ्याकडे ओव्हरलोड कामं आहेत. अठरा ते वीस कर्मचारी माझ्याकडे काम करत आहेत. आणि या कर्मचार्‍यांना मी पगारही तसा देत आहे. खर तर कोणी आपल्या कामात भागीदारी देत नाही. परंतू मी आपल्या समाजाचे गाडे नावाने भागीदार म्हणून घेतले. व्यावसाय वाढवावा हा ही त्यामागचा उद्देश आहे. आणि मराठा क्रांती मोर्चाचा विषय असेल तर नक्कीच मी म्हणेल याचा माझ्या व्यावसायाला फायदा झाला. 
सुरूवातीच्या काळात आपली परिस्थिती हालाकीची होती,
यावर मात कशी केली आणि आपले पाठीराखे कोण होते?
सुरूवातीपासून पहायचं म्हटलं तर बीड जिल्ह्यात आमचं कुटुंब फार प्रसिद्ध कुटुंब आहे. आजही जुन्या लोकांकडे गेलो तर आमच्या आजोबाचं नाव विचारलं जातं. भानुदासराव तुमचे कोण? असं लोक आजही विचारतात. मधल्या काळात वडिलांना तेवढ्या मोठ्या प्रमाणात करता आलं नाही. शेती शहरालगत असल्यामुळे विकल्या गेली. तेंव्हा मी दहा ते बारा वर्षाचा होतो. परिस्थिती ढासळली पण या परिस्थितीशी दोन हात माझ्या आईने केले. मला सामर्थ्य दिले, माझा पाठीराखापणा केला, मला धैर्य दिले, संघर्ष करण्याचे धडे तिनेच दिले. माझ्यावर अपार विश्‍वास ठेवला. आईमुळेच आज मी आहे, तेंव्हा माझ्या भाऊजींनीही मला मोठी आर्थिक मदत केली त्यामुळे मी उभा राहू शकलो हे ही मला विसरून चालणार नाही.
आजच्या पिढीसाठी तुमचा संदेश काय?
आत्ता आपण पाहतो आजची पिढी पाहण्यावर आणि ऐकण्यावर जास्त विश्‍वास ठेवते. वाचन संस्कृती कमी झाली आहे, अभ्यासाकडे दुर्लक्ष केले जाते. याचं जसं आहे तसं व्यावसायाचंही झालं. व्यावसायातही आपण दुसर्‍याने काय व्यवसाय केला तो पाहतो आणि तोच व्यवसाय करतो. त्यातल्या अडचणी पाहत नाही, त्याच यश येईल की नाही हे पाहत नाही. त्याने टाकला म्हणून आपण टाकला. आजची पिढी शैक्षणिकदृष्ट्या नैराश्यखाली आली आहे. भावाला, बहिणीला नोकर्‍या मिळाल्या नाहीत मग आपल्याला कुठुन मिळणार. परंतू क्षेत्र निवडतांना असं क्षेत्र निवडा त्या क्षेत्रात आपण यशस्वी होवू. आणि शक्यतो संघर्ष, जिद्द अंगी बाळगा. आज आपण पाहतो. सी.ए.साठी जाहिरात दिली तर कोणी भेटणार नाही. डॉक्टरसाठी दिली तर तिथंही कमी आहे. मग एखाद्या व्यावसायाची अथवा भविष्याची निवड करतांना संघर्ष करावाच लागेल, अभ्यास करावाच लागेल हे लक्षात ठेवा आणि त्या क्षेत्रामध्ये उतरा. 

Thursday, 12 July 2018

पिटू भक्तीचा डांगोरा|कळी काळाशी दरारा॥

तुका म्हणे
-----

गणेश सावंत | रोखठोक 

मो.९४२२७४२८१०
------
महाराष्ट्राच्या मातीला रक्त पचवण नवं नाही आणि महाराष्ट्राच्या माणसालाही देशासाठी रक्त सांडण नवं नाही. शतका नु शतकापूर्वी इथं केवळ स्वाभिमान आणि स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. कित्येक देह खर्ची पडले परंतू तुम्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलेच. तुमच्या आमच्या बाबदाद्यांनी गडकोटासाठी खडे पहारे दिले. केवळ आणि केवळ तुम्हा आम्हाला स्वाभिमानाने जगता यावं, तुमच्यावर पारतंत्र्याची तलवार कोसळू नये म्हणूनच या महाराष्ट्राच्या नरवीरांनी स्वत:च्या देहाची अक्षरश: ढाल केली. आज तुम्ही आम्ही जो स्वातंत्र्याचा श्‍वास घेतोय तो कित्येक स्वाभिमानी नरदेहांच्या बलीदानामुळेच अन् आज तुम्ही आम्ही जो मुक्त संचार करतोय तो गणतंत्र आणि प्रजासत्ताकतेमुळेच हे सांगण्याची वेळ एवढ्यासाठीच येतेय. आज स्वातंत्र्यासाठी रक्तपात करण्याची गरज नाही. तलवारी उपसण्याची गरज नाही. आज गरज आहे ती मिळवलेल्या स्वातंत्र्य टिकवण्याची, आज गरज आहे जात, पात, धर्म, पंत विरहीत गणतंत्र आणि प्रजासत्ताकतेचे ध्वज खांद्यावर घेण्याची, आज गरज आहे ती करमट पणा आणि अंधश्रद्धा गाढून टाकण्याची, आज गरज आहे माणसाला माणूस म्हणून शिवकण देण्याची, आज गरज आहे शक्ती भक्तीतलं खर मर्म समोर मांडत भक्तीचा डांगोरा पिटवण्याची आणि कळीकाळाशी दरारा निर्माण करण्याची. 
जगाच्या पाठीवर महाराष्ट्र धर्म हा सर्वोच्च असला पाहिजे. इतिहास चाळून पाहिला आणि त्या इतिहासातले सोळाव्या शतकातले संदर्भ पाहिले तर महाराष्ट्राच्या मातीत निपजल्यांनीच स्वाभिमान जागवल्याचे दिसून येते. जणु काल पर्वाही देशावर संकट आलं तर महाराष्ट्रच धावून गेल्याचे पहावयास मिळते. म्हणून आणि म्हणूनच ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला’ असे मथळे तुम्हाला ज्ञात असतील. परंतु असे असतांना आता काही तथाकथित धर्म मार्तंड आपले तोंड वरी काढत आहेत. जिथं तिथं विषवल्ली पेरण्याचे काम करीत आहे. हे विषवल्ली महाराष्ट्राच्या मातीलाच नव्हे तर हिंदुस्तानच्या सर्वोभौमितेला काळवंडून टाकणारी असेल म्हणून शक्ती भक्तीला आणि वारकरी धारकर्‍यांच्या एकात्मतेला जे जळजळीत आणि कर्मट दाखवण्याचा प्रयत्न होतो. त्या प्रयत्नांना सरकारही मुक संमती देते तेंव्हा आम्हाला तुकोबांचा सहारा घेत तुकोबांची भक्ती आणि त्या भक्तीतली शक्ती आत्मसात करण्याबरोबर ती आमच्या वाचकांनाही द्यावीसी वाटते. सध्या महाराष्ट्रात जात, पात, धर्म, पंताच्या नावावर जो गोंधळ सुरू आहे. तो गोंधळ महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या एकाही संताला मान्य नसेल. ज्या मणुस्मृतीच्या आधारे हा गोंधळ घातला जातो ती मणुस्मृती जुने मढे उकरल्यागत आहे. असं म्हटलं तरी आम्हाला त्यात बर वाईट वाटणार नाही. कारण हा महाराष्ट्र जगद्गुरू संत तुकारामांच्या विचारांवर चालणारा महाराष्ट्र आहे. भक्तीचा डांगोरा पिटवणार्‍या जगद्गुरू तुकोबांच्या तणामनात कुठलीच जात नव्हती. म्हणूनच तुकोबा आपल्या एका अभंगात जातीच्या उतरंडी पाडतांना महाराष्ट्राच्या मातीत अशी कुठलीही जात ही शुद्र नाही. आणि त्या जातीतला माणुस शुद्र नाही. माणुस म्हणून जो जगतो आणि दुसर्‍याकडे माणुस म्हणुन जो पाहतो तो सर्वश्रेष्ठ आहे. जगाच्या पाठीवर महाराष्ट्र असा प्रदेश आहे ज्या प्रदेशाला भुगोलाबरोबर इतिहास आहे. साधु, संत, सुफींची मांदीयाळी याच महाराष्ट्राच पहावयास मिळते.
पवित्र ते कुळ
पवित्र ते कुळ पावन तो देश | जेथे हरिचे दास घेती जन्म ॥ 
कर्म धर्म त्याचे जाला नारायण | त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ 
वर्ण़अभिमाने कोण जाले पावन | ऐसे द्या सांगुन मजपाशी ॥ 
अंत्यजादि योनि तरल्या हरिभजने | तयाची पुराणे भाट जाली ॥ 
वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार | धागा हा चांभार रोहिदास ॥ 
कबीर मोमीन लतिब मुसलमान | सेना न्हावी जाण विष्णुदास ॥ 
कान्होपात्रा खोदु पिंजारी तो दादु | भजनी अभेदू हरिचे पायी ॥ 
चोखामेळा बंका जातीचा माहार | त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥ 
नामयाची जनी कोण तिचा भाव | जेवी पंढरीराव तियेसवे ॥ 
मैराळा जनक कोण कुळ त्याचे | महिमान तयाचे काय सांगो ॥ 
यातायातीधर्म नाही विष्णुदासा | निर्णय हा ऐसा वेदशास्त्री ॥ 
तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ | तारिले पतित नेणो किती ॥
तुकोबांचा हा अभंग आणि या अभंगात सर्व जातं, पात, धर्म, पंतातले संत पाहिले तर महाराष्ट्र जात, पात, धर्म, पंताला कधीही थारा देणारा नाही हेच स्पष्ट होते. प्रत्येक जातीमध्ये एक ना एक संत जन्माला आले आणि त्या संतांनी केवळ एकच शिकवण दिली. ती म्हणजे ईश्‍वर हा एक आहे आणि त्या ईश्‍वराला शरण जातांना सर्व मोहमाया, मत्सर, लोभ दूर ठेवून नामस्मरण करा. परंतु आज त्याच महाराष्ट्रात जात, पात, धर्म, पंताचे भुत मानगुटीवर बसवण्याचे काम तथाकथीत धर्म मार्तंडांकडून होतांना दिसून येत आहे. हे महाराष्ट्राचेच नव्हे तर महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील माणसा माणसाला त्यागाची, विश्‍वासाची, प्रेमाची शिकवण देणार्‍या संतांचे दुर्दैव नव्हे ते तुमचे आमचे दुर्दैव म्हणावं लागेल. पंढरपुरची वारी ही शेकडो शतकापासून सुरू आहे. मृदंगावर थाप, टाळांचा निनाद, मुखी विठ्ठलाचे नामस्मरण, खांद्यावर भगवी पताका म्हणजेच वारकरी. परंतू आता या वारकर्‍यातही काही तथाकथीत वार करी घुसू पाहत आहेत. यातून अशा वार करणार्‍या आणि त्याचा पुरस्कार करणार्‍या लोकांना साध्य काय करायचे हा शोधाचा विषय नक्कीच नसला तरी हा विषय गंभीरतेने घेण्याचा आहे. अशा लोकांबाबत आणि त्यांच्या कृत्यांबाबत तुकोबा म्हणत असतील 
बुडते हे जन न देखावे डोळा|
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे महाराष्ट्राचे वेद आहे. त्यांचे अभंग म्हणजे तुकोपनिषदच आहे. ज्ञानेश्‍वरी हा ग्रंथही मराठीतच आहे व ज्ञानदेवांनी तो अबालसुबोध अशा ओवी छंदात आपण लिहिल्याचे सांगितले आहे. इतके असून सुद्धा ज्ञानेश्‍वर हा ग्रंथ पुुष्कळांना मिटलेल्या मुठीसारखा वाटतो. तर तुकोबांचे अभंग हे उघडलेल्या मुठी सारखे वाटतात. तुकोबांच्या अभंगात जो सिद्धांत जे सामर्थ्य पहावयास मिळते ते स्पष्टवक्तेपणाचाच. हे उघड सत्य सर्वश्रुत असतांना शक्ती भक्तीचा नारा वारकरी धारकर्‍यात बदलोतच कसा? याचं विवेचन नक्कीच व्हायला हवं. ज्या वेळेत रक्तपाताची, ढाल, तलवारीची गरज होती त्यावेळेस नक्कीच शस्त्र हाती घ्यायला हवे. परंतू आता शास्त्र आणि शस्त्र नव्हे तर संविधान महत्त्वाचे आहे. भारतीय सर्वोभौमत्ता महत्त्वाची आहे. त्यावेळी कोणी जर असा धार्मिक गलका करू पाहत असेल आणि या गलक्यात लोक सामील होत असतील तर तुकोबा अशा व्यवस्थेला आणि माणसिकतेला आपल्या अभंगातून म्हटले असते
बुडते हे जन न देखवे डोळा | येतो कळवळा म्हणुनीया ॥
तुका म्हणे माझे देखती डोळे | भोग देते वेळ येईल कळो ॥
ज्यांना शिष्य शाखा वाढवून गुरूपणाचे अवडंबर माजवायचे आहे त्यांना त्या अवडंबरातून आजच्या परिस्थितीत जे प्रक्षोप होईल तो डोळ्याने पाहण्यासारखा नक्कीच नसेल. पुढे धर्माचे पाळण कसे करावे यावर भाष्य करतांना 
धर्माचे पाळण | करने पाषाण्डं खंडन
हेचि आम्हा करने काम | बीज वाढवावे नाम
तिष्ण उत्तरे | हाती घेवूनी बाण फिरे
नाही भिडभार | तुका म्हणे लहानथोर
वज्रास भेदण्या इतका कठीणपणा प्रसंगाने विष्णुदासांना तो स्विकारता येत असला तरी मेनाहुन मऊ आम्ही विष्णुदास हा त्यांचा खरा स्वभाव असायला हवा. तिष्ण उत्तरांचे बाण हाती घेवून फिरत असतांनाही तुकोबांनी लोकांना प्रेमाने समजावून सांगण्याचा त्या काळी तेवढाच प्रयत्न केला. मी निष्ठुर बोललो तरी ते तुमच्या हिताचे आहे. हे त्यांनी वेळोवेळी सांगितले. परंतु आपल्या कर्तव्य कर्मातून जात, पात, धर्म, पंत याला कुठेही थारा देवू नका. हे वेळोवेळी साांगितले. तुकोबांच्या या भक्तीच्या डांगोर्‍यामुळेच आज महाराष्ट्र हा देशात शक्तीपीत आहे हे ही अभिमानाने सांगावेसे वाटते. पंढरीच्या वाटेने जातांना उच, निच, कोणी नाही. लाभ, लोभ, मत्सर, माया इथे कोठेही पहावयास मिळत नाही. उलट तुकोबांनी पंढरीच्या वाटेवर जाणार्‍याबाबत आणि साक्षात पांडुरंगाबाबत विठ्ठलाला भुत म्हणून संबोधलं आहे. आपल्या पुढील अभंगात ते म्हणतात,
पंढरीचे भुत मोठे | आल्या गेल्या झडपि वाटे ॥
बहु खेचरीचे रानं | जाता वेडे होये मन ॥
तेथे जावू नका कोणी | गेले नाही आले परतुनी ॥
तुका पंढरीसी गेला | पुन्हा जन्मा नाही आला ॥
पंढरीचे भुत मोठे आहे. त्यावाटेने जो जातो त्याच्यावर हे भुत झडप घालतं. एक तर तिथं कोणी जावू नये आणि गेलच तर ते परतुन येणार नाही. कारण पंढरीचा हा मार्ग, वारीचा हा मार्ग, विठ्ठलाचं वेड लावणारं आहे. भक्ती रसात डुंबून टाकणारं आहे. विठ्ठल जसे पंढरीला गेले तसे पुन्हा ते जन्मले नाहीत. परंतु प्रत्येक वारकर्‍याच्या ह्रदयामध्ये विठ्ठलाचा निनाद, पांडुरंगाचा निनाद पहावयास आणि ऐकवयास मिळतो. तुकोबा जर जात, पात, धर्म, पंत विरहीत ईश्‍वर माणसात शोधत असतील, रस्त्यात शोधत असतील, काटेरी झुडपात शोधत असतील तर तुम्हा आम्हाला शशस्त्र धारकरी होण्याचे कारण ते काय? भक्तीचा डांगोरा पिटवण्यासाठी माणसाला माणुस म्हणून जगण्याची अभिलाषा निर्माण करण्यासाठी जो कोणी प्रयत्नाची परिकाष्टा करत असेल तो नक्कीच नथ मस्तक होण्या लायक असेल. परंतु स्वत:च्या धर्माचा गर्व करत इतरांच्या धर्माला तुछ तेने पाहत असेल तर तो धर्मही नाही आणि तो माणुसही नाही. हे उघड सत्य संत महात्म्यांनी सांगून ठेवले. तरीही महाराष्ट्राच्या मातीत 
बकरे वाचतात आणि माणसे मरतात 
ही हार नमेकी कोणाची? हा पराजय नेमका कोणाचा? आणि ही जीत कोणाची हा विजय कोणाचा? याचे आत्मचिंतन केल्यानंतर पुन्हा-पुन्हा सरकारच्या कार्य प्रणालीवर आक्षेप घ्यावासाच वाटतो. नागपुुरात जैन समाजाच्या काही लोकांनी बकरे वाचवण्यासाठी टाहो फोडला. कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेत मजूर यांचे एटीएम असलेल्या शेळ्या, मेंढ्या आखाती देशामध्ये विक्रीसाठी जाणार होत्या. परंतु बकर्‍यांचे जीव वाचवा हो म्हणत जैन समाजाच्या काही लोकांनी विरोध करताच सरकारने विमानाद्वारे दीड हजार बकरे जे आखाती देशामध्ये जाणार होते ते रद्द करण्यात आले. बकर्‍यांचा जीव येथे वाचला परंतु या बकर्‍यांचा जीव महाराष्ट्रात वाचेलच हे सांगणे कठीण आहे. परंतु सरकारने मात्र हे विमान उडान रद्द करून महाराष्ट्रामध्ये आपल्या कुठल्या निर्णयाची दिशा दाखवून दिली हे सांगणे कठीण. दुसरीकडे आफवेवरून राईनपांडा येथे पाच निष्पाप लोकांची याच महाराष्ट्रात हत्या होते. महाराष्ट्र सरकार बकरे वाचवण्यात यशस्वी होतात माणसे वाचवण्यात यशस्वी होत नाहीत. हे उदाहरण एवढ्यासाठीच या भक्तीच्या डांगोर्‍यामध्ये आम्ही घेतोय ते म्हणजे कर्मटपणा, धर्म मार्तंडपणा आणि मणुच्या सांनिध्यात वाहत चाललेल्या सरकारचे धोरण दाखवण्यासाठी. पंढरीस निघालेली वारी ही भक्तीचा डांगोरा पिटवणारी आहे आणि पंढरीचं वाळवंट हे एक एका लागती पाईरे  याची शिकवण देणारं आहे. परंतु महाराष्ट्र सरकार ज्या धर्म मार्तंडाचा पुरस्कार करू पाहतय. जात, पात, धर्म, पंताला महत्त्व देवू पाहतय ते पुरस्कार आणि ते महत्त्व 
महाराष्ट्राचं वाळवंट
केल्याशिवाय राहणार नाही. भक्ती रसात डुंगून जाणं ईश्‍वराचं नामस्मरण करणं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. परंतू स्वत:च्या धर्माचा आदर करणं आणि इतरांच्या धर्माचा अनादर करणं ही कुठल्याच धर्माची शिकवण नाही. वारकरी संप्रादाय आणि वारकरी धर्म हा तर अक्षरश: माणसातल्या माणुस पणाला जागृत करणारा आणि प्रत्येकाकडे माऊली म्हणून पाहणारा आहे. त्यामुळे वारकर्‍यांना कधी हाती तलवार घेण्याची गरज पडली नाही. त्यांना कधी भिती वाटली नाही. स्वरक्षणाची गरज पडली नाही. कारण ज्याच्या अंगी शिस्त असते त्याला कशाचीच भिती नसते. म्हणूनच विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेला वारकरी पंढरीच्या वाटेवर ऊन, पावसात निघतो तेंव्हा त्याच्या मनात कुठली जात नसते, कुठला धर्म नसतो असते ती फक्त विठुरायाच्या भेयीची ओढ. आणि त्या भेटीसाठी जेंव्हा हा वारकरी पंढरीत जातो त्यावेळी त्या ठिकाणी खेळ मांडतो.
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई | नाचती वैष्णव भाईरे ॥
क्रोध अभिमान गेला पावटणी | एक एका लागती पाईरे ॥
असं म्हणत आनंदाने नाचत गात विठ्ठलाचे नामस्मरण करतो. कसलाही अभिमान नसतो, कसलाही क्रोध नसतो, कुठलीही जात नसते, कुठलाही धर्म नसतो असतो तो फक्त माणुस धर्म, असते ती फक्त माऊली. परंतू आज या माऊलीला स्वरक्षण देण्याच्या नावाखाली जो सौराचार चालु आहे आणि महाराष्ट्रात सत्ताधार्‍यांकडून जो धर्माचा पुरस्कार करणे चालू आहे तो महाराष्ट्राला वाळवंटाच्या खाईत लोटणाराच. 


सायं दैनिक बीड रिपोर्टर मधील आजच्या रोखठोक मध्ये वाचा  12 /6/2018

Thursday, 5 July 2018

कपाळमोक्ष
‘जब तुम मोक्ष प्राप्ती के लिये हवन करोंगे तो उसके बाद तुम अपने कानों में रूई और मुंह और आंख पर कपडा बांध लेना, ताकि एक दुसरे कों देख ना सकों और ना ही चीख सुन सको.. अंतिम समय में आखिरी इच्छा की पूर्ति के वक्त असमान हिलेगा, धरती कांपेगी, उस वक्त तुम घबराना मत| मंत्रों का जाप बढा देना.. जब पानी का रंग बदलेंगा तब नीचे उतर ना जाना, एक-दुसरे की नीचे उतरने में मदद करना| तुम मरेंगे नहीं, बल्कि कुछ बडा हासिल करोगे... जब तुम गले में डालकर क्रिया करोगे तो मैं तुम्हें साक्षात दर्शन दूंगा और आकर बचा लूंगा.. तुम्हारी जो आत्मा हैं ओ बाहर निकलेंगी और फिर वापस आ जाएगी.. तब तुम्हें मोक्ष की प्राप्ति हो जाएगी....
रोखठोक 
गणेश सावंत 
9422742810 
-----------

आंधळी आणि बहिरी दिल्ली तर आहेच. आता अंधश्रद्धाळु आणि कपाळ मोक्षी दिल्ली पहायला भेटली. गेल्या चार दिवसापूर्वी दिल्लीतल्या बुराडी भागात देशात सनसनी निर्माण करून टाकणारी घटना घडली. वडाच्या पारंब्या लटकाव्यात तसे एका घरात एकाच कुटुंबातले एक नव्हे दोन नव्हे अकरा सदस्य लटकलेले दिसले. मोक्ष प्राप्तीसाठी भाटिया कुटुंबातल्या सदस्यांनी हे कपाळ मोक्षी धाडस केलं. या धाडस म्हणता येणार नाही तर हे कृत्य जागतिक महासत्ताक होणार्‍या हिंदुस्तानसाठी विचार करावयास लावणारं. आत्मा बाहेर जाईल आणि पुन्हा परत येईल यासाठी घराला अकरा पाईप लावण्यात आले. या सर्व घटनाक्रमावरून एकच लक्षात येतं या देशातला ग्रामिण भाग असो या शहरी भाग असो जिथं तिथं कर्मकांड आणि अंधश्रद्धा पसरविणार्‍यांनी आपली छाप कायम ठेवली. महाराष्ट्रसह देशातल्या प्रत्येक भागात साधु, संत सुफी आणि समाज सुधारकांनी देशवासियांचे मस्तक नांगरण्यासाठी आपला देह चंदनासारखा झिजवला. परंतू वर्षामागून वर्ष गेले, दशका मागून दशके गेले, शतका मागून शतके चालली तरीही अंधश्रद्धेच्या जखड्यात अडकलेले देशवासी सुधरायला तयार नाहीत. या आत्महत्या कांडाचा सुत्रधार मोक्ष असेल तर अशा मोक्षास शासन व्यवस्था, प्रशासन व्यवस्था की समाज व्यवस्था दोषी? हे आता उमजून घ्यावच लागेल. दिल्लीतल्या भाटीया या कुटुंबाविषयी उत्तर दिल्लीतल्या संतनगर बुराडी भागातल्या गल्ली क्रमांक ४ए मध्ये शिरताच उजव्या बाजूला दोन प्लॉट सोडून एक तीन मजली घर आहे. तिथे आता एक फक्त एक पाळीव कुत्रा जिवंत आहे.त्या घरातले सर्वच्या सर्व ११ जण रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळले. त्यांची तोंडं कापडाने झाकली होती आणि काही जणांचे हात बांधलेले होते. भाटिया कुटुंबीयांचं घर म्हणून ही वास्तू ओळखली जाते. याच घरात १० लोक तावदांनाना लटकलेले दिसले. तर एक वृद्धा फरशीवर मृतावस्थेत होती. मृतांमध्ये सात महिला आणि चार पुरुष आहेत. त्यांच्यात तिघंजण अल्पवयीन होते. हे कुटुंब मूळ राजस्थानातलं आहे. गेल्या २० वर्षांपासून ते बुराडी भागात वास्तव्याला होते. अंदाजे ७५ वर्षीय महिला नारायण, त्यांची दोन मुलं भुप्पी (४६) आणि ललित (४२) त्यांच्या पत्नी सविता (४२) आणि टीना (३८) गळफास लावलेल्या अवस्थेत दिसत होत्या. भुप्पी यांच्या दोन तरुण मुली आणि एक अल्पवयीन मुलगा तसंच ललित यांचा १२ वर्षांचा मुलगाही मृतावस्थेत होते. या ११ लोकांमध्ये नारायण यांची एक विधवा मुलगी आणि तिची मुलगी (म्हणजे नारायण यांची नात) प्रियंका (३०) यांचाही समावेश आहे. प्रियंका यांचा १७ जूनला साखरपुडा झाला होता आणि ऑगस्टमध्ये त्यांचं लग्न नियोजित होतं.हे कुटुंब सुशिक्षीत असतांना धार्मिकते बरोबर सर्वात मोठं अंधश्रद्धाळू कुटुंब असल्याचा धक्कादायक खुलासा या लोकांच्या आत्महत्येनंतर तपासकामी असलेल्या पोलिसांना ज्या डायर्‍या मिळून आल्या त्यातून झाला. राजधानी असलेल्या दिल्लीसारख्या शहरात अंधश्रद्धेतून एकाच कुटुंबातले अकरा लोक गळफास घेवून लटकत असतील तर जय जवान जय किसान बरोबर दिलेल्या जय विज्ञानच्या नार्‍याला ही जबरदस्त चपराक म्हणावी लागेल. या देशात अनेक संत, महात्मे, सुफी, समाज सुधारक होवून गेले. उभं आयुष्य त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगावण्यासाठी आणि त्यांच्यातली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी चंदनासारखं झिजवलं. परंतू गल्ली ते दिल्ली बुवा, बबा आणि बयांनी अक्षरश: उच्छाद मांडला. गेल्या काही वर्षाच्या कालखंडात भंप्पक महाराजया देशाने याची देही याची डोळा पाहिले. त्यांचे नागवे कुुकर्म उघड्या डोळ्याने अनुभवले. मोहमाया आणि वासनाही या महाराजांची देशवासियांनी अनुभवली. खेड्या पाड्यात जे छोटे-मोठे महाराज, बुवा पहायला मिळाले तेच मोठं-मोठे महाराज या देशांनी अनुभवले नव्हे तर त्यांचे कुकर्म उघडे पडल्यानंतर असारामसारखेही कित्येक कामांध महाराज जेलमध्ये गेले. महाराजांची भूमिकाही केवळ लोकांना लुबाडणारी, फसवणारी आणि स्वत:चा स्वार्थ साधणारी उभ्या देशाने पाहिली तरीही या देशातला गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा माणूस सुधारला नाही हेच यातून स्पष्ट होते. गेल्या दिडशे वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंनी महाराजांची पैदास कशी होती?याचे मर्म ग्राही विवेचन शेतकर्‍यांचा आसूड या पुस्तकात केले आहे. ते लिहितात, कित्येक अक्षरशत्रु भट ब्राह्मणास पंचांगावर पोट भरण्याची अक्कल नसल्यामुळे ते आपल्यापैकी एखाद्या बेखुप ठोंब्यास ढवळ्या बुवा बनवून त्याच्या पायात खडवा व गळ्यात विना घालून अज्ञाती शेतकर्‍याकडे प्रतिष्ठीत भीक मागत फिरतात. एखाद्या देखण्या जवानास कवळे बुवा बनून टाळ मृंदागाच्या तालात मोठ्या प्रेमाने राधाकृष्ण राधा म्हणत नाच्या पोरासारखे हावभाव करून दर्शनास येणार्‍या सधन रांडमुंडीस आपल्या नादी लावतात. आपली पोटभरून मोठ्या मौजा करतात. एखाद्या अर्धवेड्या भांग्यास स्वामी बनवून लोकांना त्यांच्या नावाने नाना प्रकारच्या लोणकड्या थापा देवून स्वामीच्या दर्शनास त्यांना नेवून द्रव्य हरण करतात. फरक झालाच असेल तर एवढाच की सर्व जाती धर्मात आता असे उदंड पीक आले आहे. साठ वर्षापूर्वी किरलोस्कर म्हणतात,परमार्थ, मोक्ष, इश्‍वरप्राप्ती, साक्षात्कार इत्यादी वावड्या धर्म कल्पनांनी आपल्याला समाजाला इतके पछाडले आहे की असल्या सामाजिक शरिरावर बुवांची व महाराजांची गळवे उठली नाहीत तर आश्‍चर्य. भक्ती, पाप, पुण्य, स्वर्ग, नरक हे तर बुवांची खास हत्यारे. कोणत्याही बुवाच्या अंगी आपली रवानगी नरकात करण्याची शक्ती असणे शक्य नाही. कारण स्वर्ग आणि नरक या जागाच काल्पनिक होत त्या प्रमाणे व्यक्तीच्या पापाचे क्षालन आणि पुण्याचे संवर्धन करण्याचे सामार्थ्य कोणत्या बुवा अगर महाराजांच्या अंगी असणे शक्य नाही. ज्याच्या त्याच्या पाप पुण्याची जबाबदारी त्याच्या-त्याच्यावर आहे. त्याबाबत कोणतीही दलाली उपयोगी पडणार नाही. जो अशी दलाली करतो तो अत्यंत मुर्ख वा अट्टल डांबीस असला पाहिजे. आम्ही असे आव्हान देण्यास तयार आहोत की कोणत्या बुवा ने अगर महाराजाने आपल्या अंगी अलौकीक सामार्थ्य असल्याचे सांगावे व आम्हास त्याची परिक्षा घेवून द्यावी असले प्रकार करून कोणी महाराज आपल्या पापाचे क्षणात भस्म करून आपल्याला इश्‍वराच्या पायाशी पोहोचवील ही कल्पना अत्यंत खुळ्यापणाची आहे. वाचकांच्या उदाहरणासाठी आम्ही या ठिकाणी केवळ फुले आणि किरलोस्कर यांचे विचार दिले. परंतू दिल्लीत झालेलं हे मोक्ष प्राप्तीचं कांड अखंड देशाला हादरून टाकणारं, आत्मचिंतीत करणारं आणि माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात देशाचं मान खुजी करणारच म्हणावं लागेल. जोपर्यंत देशातला सर्वसामान्यातला सर्व सामान्य माणूस पाप, पुण्य, स्वर्ग, नरक यापासून दूर जात नाही तोपर्यंत अशा घटना घडणं बंद होणार नाही हे जेवढे त्रिवार सत्य आहे तेवढेच शतको ना शतकोपूर्वी या देशातल्या साधु, संतांनी असल्या अंधश्रद्धेवर आणि कर्मकांडावर प्रचंड आसूड ओढले आहे. महाराष्ट्रात जगद्गुरू संत तुकोबांनी सर अक्षरश: अशा भोंदू गिरीचे वाभाडे काढले आहे. तुकोबांना अभ्यासा ते म्हणतात, नवसे सायेशी होती पुत्र| का करणे लागी पती ॥ नवस सायेशी करून पोरं होत असतील तर नवरा करण्याची गरज काय? हा सवाल साडेतिनशे, चारशे वर्षापूर्वी तुकोबांनी विचारला आहे. भोंदू बाबा बद्दल बोलतांना ऐसे कैसे झाले भोंदू | कर्म करूनि म्हणति साधू ॥ अंगी लावूनिया राख डोळे झाकूनिया करती पाप ॥ असं म्हणत जावूनिया तिर्था काय तु केले | चर्म प्रक्षाळीले वरीवरी ॥ तिर्थ क्षेत्रावर जावून केवळ शरिर धुतले म्हणजे तिर्थ यात्रा सफल होत नाही. अंत:करण शुद्ध होणार नसेल तर त्या तिर्थ यात्रेला काय अर्थ? होवूनिया संन्यासी भगवी लुगडी | वासना ना सोडी विषयाची ॥ नुसते भगवे कपडे परिधान करून उपयोग नाही तर अंत:करणातून वासना सोडणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी त्यावेळी सांगितले. असे जे बुवा, भट, महाराज अंधश्रद्धा पसरवत असतील, कर्मकांडांना प्रोत्साहन देत असतल तर तुका म्हणे सांगू किती जळो तयाची संगती असे म्हणत तुकोबांनी त्याचे हाणून थोबाड फोडा असा आदेशही त्या काळी दिला. ऐसे संत झाले कै, तोंडी तंबाखूची नळी ॥ स्नान संध्या बुडविली, पुढे भांग ओढवली ॥ या अभंगातून व्यसनीबाज, दगाबाज बुवा, बाबांना त्यांनी चपराक लावली. टिळा, टोपी घालूनी माळा | म्हणती आम्ही साधू ॥ दया धर्म चित्त नाही | ते जाणावे भोंदू ॥ असं म्हणत ज्याच्या मनात दया नाही तो संत असूच शकत नाही. मुखी सांगे ब्रह्मज्ञान, जनलोकांची कापितो मान या अभंगात तर तुकोबा आक्रमक होतात आणि कर्मकांड करणार्‍या अंधश्रद्धा पसरविणार्‍या तथाकथित महाराजांवर हल्ला चढवतात. अशा गुरूंवर तुकोबा म्हणतात, जळोजळो ते गुरूपण, जळो जळो ते चेलेपण तुकोबांच्या हजारो अभंगात जेवढी भक्ती आहे तेवढीच अंधश्रद्धेवर आसूड ओढलेले आपल्याला दिसून येतात. असे असतांना या देशात संस्कार आणि संस्कृतीची गंगा वाहत असतांना शेकडो वर्षानंतरही जर कोणी मोक्ष प्राप्तीसाठी कर्मकांड करतांना डायरी लिहित असतील आणि स्वत:सह स्वत:च्या कुटुंबियांना अकरा सदस्यांना यम सदनी धाडत असतील तर काय म्हणावे? दिल्लीतल्या भाटीया कुटुंबियांनी आत्महत्या करण्याच्या दिवशी डायरीत लिहिलेल्या पानात हा भितीदाय मजकूर लिहिला. ‘जब तुम मोक्ष प्राप्ती के लिये हवन करोंगे तो उसके बाद तुम अपने कानों में रूई और मुंह और आंख पर कपडा बांध लेना, ताकि एक दुसरे कों देख ना सकों और ना ही चीख सुन सको.. अंतिम समय में आखिरी इच्छा की पूर्ति के वक्त असमान हिलेगा, धरती कांपेगी, उस वक्त तुम घबराना मत| मंत्रों का जाप बढा देना.. जब पानी का रंग बदलेंगा तब नीचे उतर ना जाना, एक-दुसरे की नीचे उतरने में मदद करना| तुम मरेंगे नहीं, बल्कि कुछ बडा हासिल करोगे... जब तुम गले में डालकर क्रिया करोगे तो मैं तुम्हें साक्षात दर्शन दूंगा और आकर बचा लूंगा.. तुम्हारी जो आत्मा हैं ओ बाहर निकलेंगी और फिर वापस आ जाएगी.. तब तुम्हें मोक्ष की प्राप्ति हो जाएगी....तुमसे कहा था कि आज दो जोत जलाना, मगर तुमने ऐसा किया नहीं... नीतू और प्रभजोत अगले दो दिन तक कुलर में सोएंगे... इनकी यही सजा हैं| धु्रव की पढाई पर ध्यान दो, तुम्हें पता हैं कि भगवान कभी भी हमारे घरमें आ सकते हैं... इसलिए पूरी तैयारी रखो| मंगलवार को मैं सामग्री लाऊंगा, तुम जाप करने बैठना | रावतभाया, सोनीपत से अगले दिन आएंगे | भगवान आएंगे तो मेहमान चले जाएंगे|’ अशा प्रकारचं हादरून सोडणारं लिखान आम्हाला वाचायला भेटलं तेंव्हा कर्मकांड आणि अंधश्रद्धा देशवासियांच्या नसानसात कशी भिनलेली आहे हे उघड चित्र दिसून आले. शेकडो वर्षापासून लोकांची मस्तके नांगरली गेली. परंतू मस्तक नांगरणार्‍यांपेक्षा कर्मकांड आणि अंधश्रद्धेची दहशत पसरवणारे जेंव्हा यशस्वी होतात तेंव्हा खरच भारत देश हा हिंदुस्तान जागतिक महासत्ताक होईल हा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही आणि अशा घटना घडल्यानंतर या घटनांची जबाबदारी शासन प्रशासन व्यवस्थेची की समाज व्यवस्थेची? या प्रश्‍नात अडकल्याशिवाय आम्ही राहत नाही. परंतू सरशेवटी न देखावा डोळा ऐसा हा अकांत असे म्हणून शांत तर नक्कीच बसात येणार नाही. परंतू भाटीया कुटुंबियांची ही मोक्षप्राप्ती नाही तर कपाळ करंटेपणातला कपाळमोक्षच म्हणावा लागेल.


कसलं प्रोफेशनअन् कसलं ‘सक्सेस’‘भो’ करतात ‘साले’

ही स्टेप का येवू देता?

रोखठोक गणेश सावंत -9422742810


स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांची गोळ्या घालून करण्यात आलेल्या हत्येने महाराष्ट्राच्या पटलावर अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. ज्ञानदानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललाय काय? ज्ञानदान हा धंदा बनलाय काय? गुरू, शिक्षक हे अर्थकारणासाठी कामांध होत आहेत काय? शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात लोभ, माया, मत्सर वाढत चाललाय काय? जिथं शिक्षणासाठी कैईकांनी आपलं उभं आयुष्य चंदनासारखं झिजवलं तिथं स्वत:च आयुष्य भौतिक सुखात रमवण्यासाठी शिक्षण क्षेत्राचे पाईक केवळ अर्थकारणालाच महत्त्व देत आहेत काय? खाजगी कोचिंग क्लासेसकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा हा सरकारी शिक्षण क्षेत्राला आव्हान देतोय काय? खाजगी कोचिंग क्लासेसद्वारा सरकारी यंत्रणेला आव्हान देणारी यंत्रणा उभी राहतेय का? सरकार या खाजगी कोचिंग क्लासेसकडे दुुर्लक्ष का करतय? त्यांना नियम अटी का लावल्या जात नाहीत? ही शिक्षणाची खाजगी यंत्रणा खरच गुणवत्ता घडवतेय काय? ही यंत्रणा समाजा समाजातील विद्यार्थ्यांचे मस्तक खरच नांगरतेय काय? यासह खाजगी शिक्षण यंत्रणा ‘प्रोफेशनल’ झालीय काय? यामध्ये विद्यार्थी ‘सक्सेस‘ होतात की यंत्रणा चालवणारे? एवढे होवूनही ‘भो’ करतात ‘साले’ याचचं ज्वलंत उदाहरण अविनाश चव्हाणची हत्या. हे उघड सत्य नाकारता येत नाही म्हणूनच आम्ही म्हणतोय ही ‘स्टेप’ का येवू देता? 
स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांची तीन दिवसापूर्वी लातूरात भरवस्तीत गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. चव्हाण यांच्या हत्येने एक नरदेह नष्ट झाला असला तरी ही हत्या अविनाश चव्हाणांची नसून पवित्र शिक्षण क्षेत्राची म्हणावी लागेल. महाराष्ट्र हा साधु, संत, सुफी आणि समाज सुधारकांचा प्रदेश आहे. इथेच सर्वसामान्यातील सर्व सामान्य माणसाला शिकता यावं, अन्य समाजाशी खांद्याला खांदा लावून चालता यावं म्हणून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला सर्वांगीण करण्याच्या उदाक्त हेतूने फुलेंपासून भाऊराव पाटलांपर्यंत अनेकांनी शिक्षणासाठी, ज्ञानदानासाठी आपलं उभं आयुष्य चंदनासारखं झिजवलं. लेखी बाळीपासून पोरा, सोरापर्यंत ज्ञानार्जन करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला. रात्रीचा दिवस केला आपले डोळे फोडले. परंतू इतरांच्या डोळ्यात प्रकाश दिला. त्याच महाराष्ट्रात शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राचे बाजारीकरण झाले. सावित्रीबाई फुलेंपासून भाऊराव पाटलापर्यंतच्या समाज सुधारकांचा शिक्षणाकडे पाहिला जाणारा दृष्टीकोन आज मितीला डोळ्यासमोर आणला तर आजच्या शिक्षण व्यवस्थेेवर आसूड ओढावे वाटतील. मग ती शिक्षण व्यवस्था सरकारी असो वा खाजगी एखादा कामांध झालेला व्यक्ती जशी आपली काम वासना भागवण्यासाठी लाज, लज्जा सोडतो. श्वान जसं भाद्रपद महिना आल्यागद जिथं तिथं वर तंगडी करत राहतं त्यास्थितीत आजची शिक्षण प्रणाली असल्याचे उघडपणे म्हटले तरी त्याबाबत आम्हाला काहीच वाटणार नाही. सरकारी यंत्रणा असो, खाजगी संस्था असोत अथवा नव्याने उभी राहत चाललेली आणि सरकारलाच आव्हान देवू पाहणारी खाजगी कोचिंग क्लासेसची यंत्रणा असो ही यंत्रणा केवळ आणि केवळ अर्थकरणाच्या लोभापाई ज्ञानार्जनाकडे पूर्णत: दुर्लक्ष करत आहे. आणि हेच दुर्लक्ष सरकारी यंत्रणेकडूनही होत असल्याने 
शिक्षण क्षेत्राचीच हत्या 
जिथं तिथं या ना त्या मार्गाने पहावयास मिळते. लातूरमध्ये अविनाश चव्हाणची हत्या ही शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला रक्तरंजित आणि रक्ताळलेली करून टाकणारी आहे. अविनाश चव्हाण यांचे स्टेप बाय स्टेप ही खाजगी कोचिंग क्लास लातूरमध्ये नव्हे तर मराठवाड्यामध्ये बहुचर्चित क्लास राहिली. अवघ्या काही वर्षात खाजगी कोचिंगमध्ये अविनाश चव्हाण यांनी नावलौकीक मिळून घेतलं. पैसा सर्वस्व नाही हे जेवढं सत्य तेवढच अविनाश चव्हाण यांनी ज्या पद्धतीने स्टेप बाय स्टेपमध्ये गुंतवणूक करून विद्यार्थ्यांना आकर्षित केलं नव्हे तर त्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देता यावं यासाठी चांगले प्राध्यापक, प्राचार्य त्यांनी आपल्या क्लासमध्ये शिकवणीसाठी ठेवले. यातून स्टेप बाय स्टेपचा निकाल चांगला लागत गेला, गुणवत्ता वाढत केली आणि त्या गुणवत्तेतून विद्यार्थी घडत गेला. स्टेप बाय स्टेपची शिक्षण प्रणाली तेवढीच पॉझीटीव्ह पहावयास मिळाली. परंतू अविनाश चव्हाण यांनीही या ठिकाणी या क्षेत्राला प्रोफेशनल (व्यवसाय) म्हणून पाहिलं. या क्षेत्रात यश येत गेल्याने अविनाश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांची मानसिकता, तरूण वर्गाची मानसिकता पाहत लातूरात अद्यावत जीम स्थापन केली. त्याच्या उद्घाटनासाठी लातूरात सर्व प्रथम सनी लिओनी आणून अविनाश चव्हाण पुन्हा चर्चेत राहिले. एक मातब्बर प्रोफेशनल व्यवसायिक आणि विद्यार्थ्यांना सक्सेस देणारा तरणा ताठा म्हणून अविनाशकडे लातूरमध्ये पाहण्यात येवू लागलं. यातून पक्ष संघटनाशी कधी दूरचा तर कधी जवळचा संबंध येत राहिला. अन् इथच अनेकांना अविनाशचं यश, अविनाशच अर्थकारण, त्याचं प्रोफेशनल, त्याच सक्सेस खटकत राहिलं आणि तिथच इतर क्लासेसवाले अविनाश ‘भो’ करत राहिले. अविनाशची हत्या जेंव्हा झाली त्यानंतर अवघ्या १२ ते १५ तासात लातूर पोलीसांनी या खूनाचा छडा लावला तेंव्हा धक्कादायक माहिती बाहेर पडली. अविनाशची हत्या ही क्लासेसच्या प्रोफेशनलपणातून सक्सेसच्या चढाओढीतून आणि‘भो’ करणार्‍या साल्यांकडून झाल्याचे उघड झाले. तेंव्हा उभ्या महाराष्ट्रात शिक्षणासारखं पवित्र क्षेत्र काळवडलं. अविनाशची हत्या ही एका नरदेहाची हत्या आहे की अखंड शिक्षण प्रणालीची? यावर नुसती चर्चा, आत्मचिंतने करून भागणार नाही तर या 
हत्यामागचं गुढ आणि सत्य 
बाहेर येणं अधिक महत्त्वाचं. या हत्येचा मास्टर माईंट अविनाश चव्हाणचा जुना भागिदार प्रा.चंदनकुमार शर्मा हा असल्याचे जेंव्हा उघड झाले आणि चंदनकुमार शर्मा हा बिहारी असल्याचे सत्य जेंव्हा समोर आले तेंव्हा खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये गुन्हेगारी शिरकाव गेल्या दशकभरापासून झाल्याचे स्पष्टपणे जाणवले. चंदनकुमार शर्मा याने अविनाश चव्हाण यांची हत्या करण्यासाठी २० लाख रूपयाची सुपारी दिली. त्याचे नगदी साडे आठ लाख रूपये करण गहिवार नावाच्या वादग्रस्त व्यक्तीला देण्यात आले. गहिवारसह अन्य चौघांनी रेखी करून अत्यंत प्रोफेशन आणि सक्सेस पद्धतीने या हत्याकांडाला अंजाम दिला. गहिवार नावाचा व्यक्ती हा सुपारीबाज असला तरी तो भाजपाचे मंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांचा कधी काळचा अंगरक्षक असल्याचा बोलबाला उघड होत गेला. परंतू यावर निलंगेकरांनी तो माझा अंगरक्षक कधीच नव्हता, कधी काळचा तो कार्यकर्ता होता. असे कार्यकर्ता येतात आणि जातात अशी प्रतिक्रिया देवून या गंभीर प्रकरणातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला खरा. परंतू सोशल नेटवर्कींग मिडियासह विरोधक संभाजी निलंगेकरांसोबत सफारी सूटमध्ये असलेला करण गहिवार याचे फोटो वेळोवेळी दाखवून निलंगेकरांचा तो अंगरक्षकच होता हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. खर पाहिलं तर निलंगेकरांनीही या प्रकरणात प्रामुख्याने लक्ष घालून या हत्येमागचं गुढ आणि सत्य बाहेर काढण्यासाठी पोलिसांना नुसती मदतच नव्हे तर पोलिसांकडून हे सत्य बाहेर काढावं कारण शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात झालेली ही हत्या एकट्या अविनाश चव्हाणची नसून ती अखंड शिक्षण क्षेत्राची आणि शिक्षण क्षेत्राला बाजारीकरण करू पाहणार्‍या हत्यारांना जगासमोर आणणारी आहे. खाजगी कोचिंग क्लासेस हा 
स्वार्थ साधून पोट भरण्याचा धंदा
काही काळापर्यंत मर्यादीत होता. परंतू आता नुसत पोटच भरण्याचा नसून आर्थिक बाबीसोबत थेट शय्यासोबत करण्याचा धंदा होवून बसला. लातूरमध्ये सर्वात जास्त क्लासेस आहेत. प्रत्येक वर्षी २५ हजारापेक्षा जास्त विद्यार्थी लातूरमध्ये केवळ शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. आपल्या मुलीचे, मुलाचे भविष्य घडले जावे, भविष्यात ते यशोशिखरावर जावेत या प्रांजळ मताने प्रत्येक पालक पैशाची तमा न बाळगता स्वत:हून खाजगी क्लासेसपर्यंत जातात. आज लातूरात ज्या भागात क्लासेस आहेत तो भाग पाहिला तर जेवढे विद्यार्थी-विद्यार्थीनी त्या ठिकाणी वावरतांना दिसतात तेवढेच ‘बाऊंसर’ही पहायला मिळतात. बाऊंसर त्याठिकाणी हवेत कशाला? याचा अर्थ खाजगी कोचिंगने प्रोफेशनलपणा अंगीकारलाय. सक्सेसचा नारा देत पालकांच्या आयचा घो करत ‘भो’ करणारे साले जिथं तिथं वावरतांना दिसतात. आज एकट्या लातूरात अविनाश चव्हाणची हत्या होवूनही शिक्षण क्षेत्राला रक्तरंजित करणारा इतिहास २१ व्या शतकात पहायला मिळाला, तो गंभीरच. लातूरसह आता जिल्ह्या- जिल्ह्यात अर्थकारणाच्या ललनेवर फिदा होणारे प्रोफेशनल आणि सक्सेसशी कोचिंग क्लासेसवाले शिक्षणाला धंदा बनू पाहत आहेत. यावर ना सराकरचं नियंत्रण ना पालकांचं. त्यामुळे आम्हाला वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये 
सरकारी यंत्रणेला आव्हान देणारी 
यंत्रणा उभी राहतेच कशी? 
हा जाहीर सवाल थेट सरकारला विचारावासा वाटतो. वेळीच खाजगी कोचिंग क्लासेसच्या या धंदेवाईक पणावर आळा घातला नाही. या लोकांना वेसन टोचल्या नाही तर हे खाजगी कोचिंग क्लासेसवाले वळुगत वर शेपूट करतील आणि उधळत राहतील. त्यासाठी अविनाश चव्हाणची हत्या हा रक्ताळलेला इतिहास न ठरवता. यापुढ शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात रक्तरंजित घटना घडणार नाहीत. त्यासाठी खाजगी कोचिंग क्लासेस चालकांना विशिष्ट घटनेमध्ये बांधून ठेवायला हवे. या लोकांकडे एका वर्गात किती विद्यार्थी असायला हवेत? शिक्षक, प्राध्यापक हे दर्जेेदार आहेत का? त्यांचे शिक्षण योग्यतेच आहे का? विद्यार्थ्यांना शिकवू शकतात का? शिकवणी चालकांनी विद्यार्थ्यांकडून किती फिस घ्यावी, विद्यार्थ्यासाठी आसन व्यवस्था आहे का? शुद्ध पाणी पिण्यासाठी आहे का? बाथरूम, टॉयलेट याची व्यवस्था आहे का? पार्कींग आहे का? संबंधित क्लासचे संचालक महिन्या, तीन महिन्याला विद्यार्थ्यांच्या पालकांशी बोलतात का? विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची हमी संबंधित क्लासेस देतय का? हमी देत नसेल आणि क्लासेस विद्यार्थ्यांना योग्य गुणवत्ता देत नसेल तर अशा क्लासेसवर दंड आकरता येईल का? कायदेशीर कारवाई करता येईल? मोबदला घेवून शिक्षण दिलं जातं याचा अर्थ पालक हे ग्राहक आहे आणि क्लासेस ही दुकान आहे त्यामुळे त्या दुकानातून दिला जाणार माल तेवढाच दर्जदार असायला हवा. याकडेही सरकार लक्ष देईल का? मुळात आजचे कोचिंग क्लासेस म्हणजे कसले प्रोफेशन आणि कसले सक्सेस यास्थितीत असल्याने सरकारी यंत्रणेसह पालकांनी सगज राहिलं, जाब विचारले तरच ही यंत्रणा अटोक्यात राहिल नसता नाक्या-नाक्यावर खाजगी कोचिंग क्लासेसचा रक्तरंजित इतिहास पुन्हा-पुन्हा लिहिला जाईल हे महाराष्ट्राच्या वैचारिकतेला ज्ञान दानाच्या व्यक्तीला मानहाणीकारक असेल.
सायं दैनिक बीड रिपोर्टर मधील आज दि. १ जुलै रविवार अग्रलेख

आणीबाणीचा शंख निनाद
इंदिराद्वेषाचं विष

-गणेश सावंत-9422742810


पंतप्रधान नरेंद मोदींनी आणीबाणीचा शंख निनाद केला. आणीबाणीचं साल आणि तारीख काळा दिवस म्हणून भाजपाने साजराही केला. यावर आम्ही भाष्य करावं की नाही याच्या विचारात होतो. कारण तेंव्हा आम्ही जन्मालाही आलो नव्हतो. २५ जून १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली. ही आणीबाणी अक्षरश: जीवघेणी होती. असं भाजपातल्या नेत्यांचं म्हणणं आहे, संघ परिवाराचं म्हणणं आहे. जो संघ कधी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी नव्हता. परंतू आणीबाणीच्या लढ्यात त्या संघातले काही जण दृष्टीक्षेपात पडायचे. त्यांच्या मते २५ जून हा काळा दिवस! नक्कीच आम्हीही आणीबाणीचे पुरस्कर्ते नाहीत की आजच्या मोदी सरकारचे विरोधक काळा दिवस आला काय आणि गेला काय त्यात फरक पडण्यासारखं काहीच नाही. कारण गेल्या चार वर्षाच्या कालखंडात भाजप सरकारने जी मुस्कटदाबी केली, सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाच्या उरावर नाचून सत्ता केंद्राला जे महत्त्व दिलं ते तरी आम्ही याची देही याची डोळा पाहतो. त्यामुळे आणीबाणी एवढी बिकट असेल तर आजचे दिवसही आणीबाणीपेक्षा कमी नाहीत. हे उघड आणि स्पष्टपणे सांगायला आम्ही मागे पुढे पाहणार नाहीत. कारण भाजप सरकारला जेंव्हा केंव्हा आपली पडती कळा दिसून येते तेंव्हा-तेंव्हा सरकार जात, पात, धर्म, पंत अथवा इतिहासातल्या त्रुटी समोर आणून सर्वसामान्यातील सर्व सामान्य माणसाचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेतृत्वाकडूनच केला जातो. आम्ही तर उघडपणे लिहितांनाच म्हटलयं, आणीबाणीच्या काळात आमचा जन्मही झाला नव्हता परंतू, आणीबाणीचे आजपर्यंत सर्वसमावेशक वाचन केल्यानंतर आणीबाणीवर लिहितांना, चिंतन करतांना आणीबाणीचे सर्व पैलू डोळ्यासमोर येतात. परंतू भाजप केवळ सत्ता केंद्र आपलंस करण्यासाठी स्वार्थ हेतूने विषय हाताळतो. आणि या विषयांचे संदर्भ जेंव्हा १९७५ साली जन्मलेले आणि पाळण्यात असलेले बाळुत्यात सू-सू करणारे बोलायला लागतात. तेंव्हा मात्र अशांची किव करण्यापेक्षा त्यांना आणीबाणीतला आजच्या परिस्थितीतला हा सूर्य आणि हा जयद्रथ आम्हाला दाखवावासा वाटतो.
इंदिराजींची आणीबाणी
२५ जून १९७५ च्या मध्यरात्री तत्कालीन दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली. तो काळ तसा भयावह होता. नुकत्याच १९७१ चे बांगलादेशाबरोबरचे युद्ध संपलेले होते. देशात भयंकर दुष्काळ पडलेला होता. अन्न धान्यापासून पिण्याच्या पाण्यापर्यंत सर्वत्र हाहा माजलेला होता. देशाची लोकसंख्या स्वातंत्र्य काळापासून २५ ते २७ वर्षाच्या कालखंडात दुप्पटीने या अडीच पटीने झाली होती. अशा वेळी विरोधकही आक्रमक झाले होते. जयप्रकाश नारायण सारखे नेते अक्षरश: सरकारला नुसतं कोंडीत पकडत नव्हते तर सरकारचे आदेश पाळू नका म्हणून लष्काराला आणि पोलीस दलाला आवाहन करत होते. अनेक आजचे सत्तेतले नेतेही गांधींविरोधात तुटून पडत होते. अशा स्थितीत इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. आपल्याकडे अमर्याद अधिकार घेतले, नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणली. सरकारच्या निर्णयाविरूद्ध वागेल त्याला कारागृहात टाकण्याची मोहिम त्यांनी चालू ठेवली. जो सरकार विरोधात बोलेल तो जणू देशाचा दुश्मन या स्थितीमध्ये आणीबाणीचे एक वाक्यात विवेंचन करावे लागेल. आणीबाणीला जो प्रत्यक्ष विरोध करेल, जो अप्रत्यक्ष विरोध करेल, आणीबाणीच्या विरोधात, सरकारच्या विरोधात जो बोलेल जो लिहिल त्याची धरपकड केली. हे सर्व इंदिरा गांधींनी सरकारवर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी अथवा स्वत:च सरकार वाचवण्यासाठी त्यांनी केलेला हा
घटनात्मक अधिकार
इंदिराजींनी देशावर लादलेली आणीबाणी हा घटनात्मक अधिकार म्हणावा लागेल. कारण भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून त्यांनी आणीबाणी लादली. या कार्यकाळामध्ये नक्कीच देशातील सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाला प्रचंड यातना झल्या. देशवासियांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मोठ्या प्रमाणात गदा आली. त्यांचे हक्क हिरावून घेण्यात आले. परंतू हे सर्व इंदिरा गांधींनी अत्यंत घटनेच्या चौकटीत राहून केले हे ही विसरता येणार नाही. आणीबाणी म्हणजे हिटलरशाही नव्हे किंवा रोमचा राजा न्युरोसारखा लहरीपणा नव्हे. आणीबाणी ही लोकांनी लोकांसाठी लोकांकरीता चालवलेल्या लोकशाहीच्या राज्यातल्या संविधानामधला एक अधिकार म्हणावा लागेल. परंतू हा अधिकार वापरायचा की नाही? आणि या अधिकारातून लोकहित जपायचं की स्वत:च सत्ता केंद्र जपायचं हा ज्याच्या त्याचा भाग. म्हणूनच आणीबाणी लादल्यानंतर इंदिराजींनी स्वत:च सत्ता केंद्र जपलं. लोकहित जपण्यापेक्षा सरकारवरचा धोका त्यांना महत्त्वाचा वाटला. घटनेच्या अधिकारातून आणीबाणी लादल्यानंतर लोकात जो संताप उसळला. त्या संतापाला इंदिरा गांधींना सामोरे जावे लागले. पुढच्या निवडणूकीमध्ये इंदिरा गांधींचा दारून पराभव झाला. प्रथमच देशात कॉंग्रेस व्यतिरीक्त सरकार स्थापन झाले. इंदिरा गांधींना त्यांची चुक उमजून आली. त्यांनी चुक कबुल केली. देशवासियांची माफीही मागितली. त्यानंतर पुन्हा या देशावर इंदिरा गांधींचं सरकार आलं. देशवासियांनी इंदिरा गांधींना जवळ केलं. २५ जून जर काळा दिवस असेल तर त्यानंतर लोकांनी इंदिराजींना स्विकारलेल्या दिवसाला सोनेरी दिवस म्हणायचे की काळा दिवस? हा प्रश्‍न आणीबाणीत न जन्मलेल्या माझ्यासारख्याला पडणार म्हणजे पडणार. कारण भारताचं संविधान हे सर्व श्रेष्ठ आहे. सत्ता केंद्राने संविधानाचा अधिकार पॉझिटीव्ह वापरायचा की निगेटीव्ह हा त्याचा भाग आहे. लोकहिताचा वापरायचा की सत्ता केंद्रापूरता मर्यादीत हा त्याचा भाग आहे. इंदिराजींनी स्वहितासाठी तो वापरला म्हणावा तर जनतेेने इंदिराजींना नाकारलं हेही त्रिवार सत्य आहे. आता तब्बल ४३ वर्षानंतर भाजपाचे पंतप्रधान नरेंद मोदी आणि संघ परिवाराला २५ जून हा काळा दिवस वाटतो. अन्
आणीबाणीचा शंख निनाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून होतो. हे आश्‍चर्य नव्हे काय? आणीबाणीला विरोध करणारे ४३ वर्षापासून विरोध करतायत. आमच्यासारखे नवखे ही आणीबाणीचा कार्यकाळ वाचून तो कालखंड शापीत होता, अधिकारशाहीचा होता, हुकूमशाहीचा होता असंही आम्ही उघडपणे म्हणत इंदिराजींच्या त्या निर्णयाचा धिक्कार करतोय. परंतू ४३ वर्षानंतर आणीबाणीचा विषय समोर करून संघ परिवाराला आणि भाजपाला आज केवळ आणि केवळ सत्ता केंद्र शाबूत ठेवण्याची मनिषा असेल आणि त्या इराद्यातून या काळ्या दिवसाचा जन्म झाला असेल तर सेम-सेम म्हणावंच लागेल. कारण भाजप सरकार सत्तेत येवून चार वर्ष झाली. गेल्या तीन वर्षाच्या कालखंडातही या देशाला आणि या देशातील भाजप सरकारला २५ जून १७, १६, १५ साल आठवल नाही. त्या सालामध्ये २५ जून आला नाही. या तीन वर्षामध्ये २५ जून हा काळा दिवस म्हणून साजरा करावा असही भाजपाला वाटलं नाही. केवळ २०१९ च्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने पुन्हा आपलं निष्क्रीय हत्यार बाहेर काढलं. जातीपातीचं शस्त्र समोर आणलं अन् पुन्हा शिळ्या कढीला उत देत २५ जूनचा काळा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साजरा केला. आम्हाला आश्‍चर्य वाटतं. जर आणीबाणी लादून इंदिराजींनी देशाचं वाटोळ केलं तर मग याच देशाने इंदिराजींना पुन्हा डोक्यावर का घेतलं? हा प्रश्‍न आणीबाणीचा दिवस काळा म्हणून साजरा करणार्‍यांना नक्कीच पडायला हवा. आणीबाणीचा कलखंड जर जहरीला होता तर भाजपाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात आज देशात जी अस्थिरता आहे
ती आणीबाणी नव्हे काय?
नोटबंदीच्या कार्यकाळामध्ये देशभरात जो हल्लाकल्लोळ उडाला. सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाला ज्या यातना झाल्या, जी पिढा झाली. बँकेच्या लाईनमध्ये उभा राहिलेल्या सर्वसामान्य माणसाचा जो मृत्यू झाला तो काय आणीबाणीपेक्षा कमी म्हणायचा काय? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी जाहीरपणे सरकारचे वाभाडे काढले. ही आणीबाणी नव्हती काय? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळातल्या स्मृती इराणी यांनी वृत्तपत्राची मुस्कटदाबी करत फेक न्यूजचा आधार घेत वृत्तपत्रांवर गुन्हे दाखल करणे आणि त्या पत्रकाराला, संपादकाला जेलमध्ये डांबण्याची तरतूद करणे ही मुस्कटदाबी नव्हती काय? सरकारने गेल्या काही महिन्यापूर्वी साडे तिनशेपेक्षा जास्त वृत्तपत्रांच्या जाहिराती बंद केल्या. सातशेपेक्षा जास्त वृत्तपत्र ब वर्गातून कमी करण्याच्या हालचाली केल्या. हा आणीबाणीचा काळ नव्हे काय? ही वृत्तपत्राची मुस्कटदाबी म्हणजे सरकारची हुकूमशाही नव्हे काय? असे एक ना अनेक प्रश्‍न याठिकाणी उपस्थित करता येतील. एकीकडे नोटबंदी होते आणि अवघ्या तीन दिवसामध्ये भाजपाचे अध्यक्ष अमित शहा ज्या बँकेचे संचालक आहेत त्या बँकेत ५७५ कोटी रूपये जुन्या नोटा जमा होतात. हे आणीबाणीचे लक्षण नव्हे काय? शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बेरोजगारांचे लोंढे आणि भाजपाचे मुर्ख बनवण्याचे धंदे ही आणीबाणी नाही काय? भारतीय जनता पार्टी आणि दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देश फेकू म्हणून पाहतो असं आम्ही म्हणत नाही तर देशातली जनता सोशल नेटवर्कींग मिडियावर आक्रमकपणे भाष्य करते. मग २५ जून आत्ताच काळा दिवस साजरा करण्यामागं
इंदिराद्वेषाचं विष
म्हणायच का? निवडणुक लढवतांना दाखवलेले मुंगरीलाल के हसीन सपने भाजपाला प्रत्यक्षात उतरा आले नाहीत आणि ते येणारही नव्हते. गेल्या चार वर्षाच्या कालखंडात भावनिक मुद्याला हात घालायचा, वर्षानु वर्षे चालत आलेल्या धार्मिक मुद्याला समोर करायचे. कधी म्हणायचे मंदिर वही बनायेंगे परंतू तारीख नही बतायेंगे, कधी म्हणायचे सर्वांच्या खात्यात पंधरा-पंधरा लाख जमा होतील परंतू हक्काचे पैसे घेण्यासाठीच लोकांना रांगेत उभा करायचे. असे एक ना एक जुमले करत पुन्हा एखाद्या विषयी द्वेष मनात ठेवून राजकारण करायचं. आज भाजपाने इंदिराद्वेषाचं राजकारण समोर केलं. आणीबाणीचं विष समोर आणत कॉंग्रेसला मुर्छीत करण्याचा प्रयास केला गेला. इंंदिरा गांधींनी आणीबाणी लादून देशाला होरपाळलं हे जरी सत्य असलं तरी इंदिरा गांधींचं कर्तृत्व स्विकारावच लागेल. पारंपारिक, प्रतिस्पर्धी आणि कट्टर दुश्मन असलेल्या पाकिस्तानच्या उरात धडकी भरवणारी, बांगलादेशाला धुळ चारणारी मर्दानी इंदिरा गांधी आठवावी लागले. आणीबाणीचा कालखंड सोडला तर इंदिरा गांधींचं सरकार हे मोदी सरकारपेक्षा उच्चीत होतं असं म्हणण्याचं धाडस आम्ही नक्की करू. आजच्या पद्धतीने आणीबाणी देशासमोर मांडली जातेय तो अनुभव तर आज अखंड देश आणि देशातल्या सर्व क्षेत्रातले लोक घेतायत हेही तेवढच खरं. भाजपाने सत्ता केंद्र समोर ठेवून जो उद्योग सुरू केला आहे. तो उद्योग देशात माणसा माणसात विष कालवणारा आहे. कधी जात, पात, धर्म, पंताच्या नावावर कधी सावरकर-जीनाच्या तर कधी महात्मा गांधी-नथुराम गोडसेंच्या विषयावर. कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मनुस्मृतीच्या तर कधी इंदिरा गांधींसारख्या पंतप्रधानांच्या विषयावर भाष्य करायचं, देशवासियांच्या भावना उचंबळून आणायच्या आणि आपली स्वार्थाची पोळी भाजायची. परंतू भाजपाचं हे धोरण माणसाला माणूस म्हणून ठेवणारं नाही हे आता गृहीत धरायला हवं. कारण आपल्या बाप दादांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रक्तरंजित लढाय्या कराव्या लागल्या. परंतू आता स्वातंत्र्य टिकवण्यासाठी माणूस म्हणून रहावं लागेल आणि माणूस म्हणून राहतांना सत्य काय आणि असत्य काय याची जाणीव प्रत्येकांना ठेवावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भूमिकेचे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्रातून चांगलेच उत्तर दिले आहे. आपल्या व्यंगचित्रामध्ये मोदी देशवासियांच्या उरावर उभे राहून मोदी वृत्तपत्र, टेलिव्हिजन चॅनल, उद्योगपती, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय यांना वेठीस धरून कसे काम करतात हे दाखवताना राज ठाकरेंनी ‘लोका सांगे...’ हे सचित्र दिलं. याचं आत्मचिंतन भाजपाला करावा लागेल.

Wednesday, 11 April 2018

‘राम’ नावाचा ‘भिम’ जप ॥ हे राम ॥

 विशेष लेख:गणेश सावंत -9422742810

शेक्सपेअर म्हणायचे नावात काय आहे? आता आम्ही म्हणतोय भाजपात राम नाही. म्हणूनच हे राम म्हणण्याची वेळ आलेल्या भाजपाने आता भाजपात राम आणण्यासाठी देशाचेच नव्हे तर जगाचे आयकॉन असणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपलंस करत दलितांना मोहुन टाकण्याच्या इराद्याने राम नामाचा जप डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावातच जपायला सुरूवात केलीय. उत्तर प्रदेशातले रामभक्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तथा जगभर ओळखले जाणारे बी.आर.आंबेडकर यांच्या नावाचे नामांतरण करत आता डॉ.भिमराव रामजी आंबेडकर या नावाने उत्तर प्रदेशात बाबासाहेबांना ओळखले
जाईल असा फतवा काढला. दुसरीकडे याच राज्यात बदायु जिल्ह्यात नव्याने उभा केलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला भगवा रंग देवून भाजपाने बाबासाहेबांच्या नावासह आपल्या पक्षात राम आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु भाजपाच्या राम नावाच्या भिम जपाला देशातील दलित बांधव, आंबेडकर अनुयायी आणि सर्वसामान्य जनता भुलेल काय?
रामायण 
अखंड भारतीय समाज रामायणाकडे आजही सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतो. रामायणातले प्रभु राम मर्यादा पुरूषोत्तम आहेत. त्यागाची मुर्ती आहे. त्या रामायणामध्ये त्याग करणारी सिता आहे, लढणारी सिता आहे. सुख आहे, दु:ख आहे, मित्र आहे, दगाफटका आहे, युद्ध आहे, सर्रशी आहे, पिच्छेहाट आहे, अमृत आहे, विष आहे, हनुमानासारखा स्वामी भक्त आहे या उलट रावणाचा सख्खा भाऊ बिभीषण रामाला मिळाल्याने रामाचा विजय सुकर आहे. घरभेदी लंका ढाये हे उदाहरण येथेच पहायला मिळंत. रामायणातच रामावर टिका आहे. रामायण हे संपूर्ण जस विचार स्वातंत्र्य आहे तसच प्रभु रामावर याच रामायणात वालीची रोख ठोक टिका आहेे. संतप्त शेतीची तिष्ण व तिव्र टिका आहे. लक्ष्मण इतका प्रक्षुब्ध होतो की, दशरथाला लक्ष्मण थेट कामलंपट म्हतारा म्हणतो. त्याला तात्काळ राजे पदावरून पदोचुत्त करू या असं ही रामाला सांगतो. रामायण हिंदु धर्मातील विचाराचा पाया रचणारा ग्रंथ आहे. रामायणात सुखं दु:खाचे प्रसंग आहेत. तसे रामायणात बुद्धीभेद नाहीये. इथं केवळ आईच्या सांगण्यावरून सत्तेला लाथ मारून वनवासाला जाणारा मुलगा पहावयास मिळतो. इथेच शबरीचे उष्टे बोरं खाणारा उदारमतवादी राजा परंतु वनवासी असलेला युवराज आम्हाला भेटतो. परंतू खरच त्या रामायणातून आणि त्या प्रभु रामातून त्यागाची शिकवण आज कोणी घेतय का? जर त्यागाची शिकवण घेत असतील तर मग जो राम आईच्या शब्दाखातर सत्तेला लाथ मारून राजगादीला लाथ मारून चौदा वर्ष वनवासाला जावू शकतो मग आज वनवासी भगवे वस्त्र परिधान करून सत्तेची अभिलाषा का बाळगतात? मुख्यमंत्री का होतात? रामभक्त आहात मग कधी शबरीचे उष्टी बोरं खाण्याचा प्रयत्न केलाय का? ते सर्व सांगण्याचा खटाटोप एवढ्यासाठीच आज देशभरात जय श्रीरामचे नारे लगावले जातायत आणि रामाच्या नावावर लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवल्या लोकशाहीच्या राज्यात हिंदु राष्ट्राची निर्मिती करण्याचा अट्टाहास धरला जातोय. अठरा पगड जाती ज्या ठिकाणी गुन्यागोविंदाने राहत असतांना आपआपल्या संस्कार आणि संस्कृतींना जोपासत असतांना देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची घटना असतांना राम राज्याच्या नावाखाली 
भगव्या राज्याचे धोरण 
का आणि कशामुळे आखले जाते. २०१४ च्या निवडणूकीमध्ये भाजपाला देशात मोठे यश मिळाले. संघ परिवाराला पितृत्व माणणार्‍या भाजपाची विचारश्रेणी काल आणि आजही हिंदुवादी आहे. नक्कीच स्वत:च्या धर्माचा प्रत्येकाने गर्व करायला हवा, परंतू दुसर्‍याच्या धर्माचा अनादर करण्याचा अधिकार कोणालाच नाही. परंतू भारतीय जनता पार्टी आणि त्या पक्षातील मंत्री, खासदार, नेते हिंदुत्वाच्या नावाखाली जय श्रीरामचा गजर करत दुसर्‍याच्या धर्माचा अनादर करत आहेत हे त्रिवार सत्य. देशभरात सुरू असलेल्या भगव्या राजनितीतून दिसून येते. अच्छे दिनची गुहार लावत सत्तेत आलेल्या भाजपाला गेल्या साडेतीन वर्षाच्या कालखंडात देशामध्ये कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळ्यांसह सर्वसामान्य दीनदलित, पतदलितांना न्याय देता आला नाही. काल शेटजी-भटजीचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा आज देशात राज्य करतोय. देशातल्या किमान २२ राज्यामध्ये सत्तेत आहे. अशास्थितीतही जनता समाधानी नसल्याने २०१९ च्या निवडणूकीत भगव्या धोरणाचे पानिपत होईल हे उमजून आल्याने भाजपाने आता आयकॉन शोधण्याची सुरूवात केली आहे. भाजपाकडे आणि संघ परिवाराकडे देशासाठी बलिदान देणार्‍यांची संख्या नगन्य असल्याने आता दुसर्‍याचे आयकॉन आपले कसे होतील यासाठी भाजपाकडून सरळ-सरळ प्रयत्नांची परिकष्टा केली जाते. त्या प्रयत्नातूनच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबावर हिंदु धर्माचा कसा प्रभाव होता आणि त्या प्रभावातूनच बाबासाहेबांच्या वडिलांचं नाव रामजी कसं ठेवण्यात आलं हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात असल्याचे उत्तर प्रदेशातील रामभक्त मुख्यमंत्री योगीनाथ यांनी दाखवून दिले आणि बाबासाहेबांच्या नावापुढे रामजी आंबेडकर असं लिहिण्यास सुरूवात केली. हा खटाटोप बाबासाहेबांच्या प्रेमापोटी म्हणता येईल का? आणि तसं म्हणता येत असेल तर उत्तर प्रदेश सरकारने बाबासाहेबांचे नामांतर करण्याची वेळ आताच का ठेवली? असे एक ना अनेक प्रश्‍न यातून उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. भगव्या धोरणाने बाधित झालेल्या भाजपाने आपल्या भगवीकरणाची चाचपणी सुरू ठेवली आणि ती चाचपणी उत्तर प्रदेशात
राम नावाचा जयघोष
करत देशाची प्रतिक्रिया काय येते याकडे लक्ष केंद्रीत केले. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाचे खा.राघव लखनपाल यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढली. या जयंतीमध्ये उत्तर प्रदेश में रहेना होंगा तो योगी..योगी कहना होंगा, जय श्रीराम अशा घोषणा आंबेडकर जयंतीत दिल्या आणि इथुनच उत्तर प्रदेशातला दलित भाजपाच्या काव्याला ओळखत राहिला. बघता-बघता भाजपाचा हा कावा अवघ्या देशाला कळून चुकला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या मुळ प्रतवर डॉ.भिमराव रामजी आंबेडकर असं नाव लिहलं आहे. त्या नावाचा आधार घेत राम नाईक यांच्या सुचनेवरून उत्तर प्रदेशात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावा पुुढं त्यांच्या वडिलांचे नाव रामजी लिहिण्याचा फतवा काढला आणि तो फतवा राज्यात अंमलातही आणला. खरं पाहिलं तर तात्वीकदृष्ट्या हे जरी योग्य वाटत असलं, महाराष्ट्रसह देशातल्या काही राज्यात स्वत:च्या नावापुढे पित्याचं नाव लिहणं हे अभिमानास्पद वाटलं जातं. परंतू तसं लिहिलं जावं ही सक्ती नाही. परंतू निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजप ज्या वृत्तीने वागतयं ती वृत्ती जातं, पात, धर्म, पंताला बाधित करणारी नव्हे काय? एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावा पुढं रामजी लिहित आम्ही रामभक्त आणि अखंड दलित समाजाचे उद्धारकर्ते बाबासाहेबही रामभक्त हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपाच्या या वृत्तीत दिसून येतो. म्हणून आणि म्हणूनच भाजपाच्या या वृत्तीला देशभरातून विरोध होतो. असं होत असतांना उत्तर प्रदेश सरकार मात्र आपल्या भगवीकरणाच्या आणि जात्यांध भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही. डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या नावाचे नामांतरण केल्यानंतर आता बाबासाहेबांच्या पुतळ्याचा कलर बदलत 
बाबासाहेबांचा कोट भगवा 
करण्याचा घाट उत्तर प्रदेश सरकारने घेतला. देशामध्ये दलित असुरक्षित असल्याच्या अनेक घटना उघड होत आहेत. राज्या-राज्यामध्ये जात, पात, धर्म, पंतावरील दंगली होत आहेत. देशातला दलित रस्त्यावर उतरला आहे. आंबेडकर जयंतीतल्या जय श्रीरामाच्या जयघोषाने भाजपाची वृत्ती समोर आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावापुढे रामजी नाव लिहिण्यामागचा कुटील हेतू जनतेसमोर आला आहे. त्या पाठोपाठ आता उत्तर प्रदेशातच बदायु जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे भगवीकरण करण्यात आले. निळ्या कोटात राहिलेले बाबासाहेबांचे पुतळे आता उत्तर प्रदेशातल्या बदायु जिल्ह्यामध्ये भगव्या कोटामध्ये दिसून येवू लागले. या घटनेनेही उत्तर प्रदेशातला आणि देशातला दलित नक्कीच चवताळला. परंतु भाजपाचा जो हेतू आहे तो दलितांनी ओळखून घ्यायला हवा. जसा दलितांनी हेतू ओळखावा तसा तो हिंदूंनी ओळखायला हवा. जसा हिंदुंनी ओळखावा तसा तो मुस्लिमांसह इतर अठरापगड जातींनी ओळखायला हवा. जात, पात, धर्म, पंताच्या नावावर मताची उत्पत्ती करण्याचा प्रयास भारतीय जनता पार्टीचा यातून लक्षात येतो. परंतू ही उत्पत्ती दंगल सदृश्य होत असेल, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करत असेल, धर्मा-धर्मामध्ये भावना बिघडवत असेल तर बाबासाहेबांच्या विचारावर चालणार्‍या या देशाने सत्ताधार्‍यांचा हा हेतू लक्षात घ्यावा. बाबासाहेबांवर किंवा त्यांच्या कुटुंबियावर हिंदु धर्माचा पगडा होता.
ते रामभक्त होते तर मग बाबासाहेबांना 
काळाराम मंदिरात प्रवेश का नाही? 

हा सवाल आज आम्ही करतोय. तेंव्हा बाबासाहेब आंबेडकर तथाकथित मनुवाद्यांसह धर्म मार्तंडांना करत होते. काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एक दिवस नव्हे, दोन दिवस नव्हे, महिना नव्हे दोन महिने नव्हे पाच ते सहा वर्षे सत्याग्रह करावा लागला. मंदिरात प्रवेश करण्यासाठी अरे जगाला दिशा देणार्‍या व्यक्तीला झगडावे लागत असेल आणि त्या काळचे तथाकथित धर्म मार्तंड बाबासाहेबांच्या पित्याचे नाव रामजी असतांना त्यांना प्रवेश देत नसतील तर आज त्याच रामजी नावाचा फतवा काढून या देशातल्या जनतेला आंबेडकरवादी अनुयायांना भाजप फसवू शकत नाही हेही तेवढच खरं. जात, पात, धर्म, पंत या विषयाला महत्त्व देत जागतिक महासत्ताकडे निघणार्‍या या देशातल्या जनतेचे मुलभुत प्रश्‍न दुर्लक्षित करणारे सरकार देशाला महासत्तेकडे घेवून जाईल काय? माहिती तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या अविष्काराने प्रफुल्लीत झालेल्या आजच्या युगात धर्मा-धर्मात, जाती-जातीत वाद निर्माण करणे हा जर हेतू सत्ताधार्‍यांचा असेल तर तो हेतू इंग्रजांचा ही होता. इंग्रज त्या हेतूमध्ये यशस्वी झाले आणि या देशामध्ये ते २०० वर्षे राज्य करत राहिले. धर्माबाबत, जातीबाबत भूमिका काय असावी या पेक्षा राज्यकर्त्यांची भूमिका सर्वसामान्य, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळ्यांबाबत कशी असेल याकडे लक्ष देणे राज्यकर्त्यांचं आद्यकर्तव्य आहे. भलेही एखाद्या वेळेस शत्रुच्या डोळ्या आश्रू आणता आले नाही तरी चालेल परंतू रयतेच्या डोळ्यात आलेल्या आश्रूने कुठल्या राज्यकर्त्याचा पराभव झाला तर तो पराभव त्या राज्यकर्त्याचा नपुुंसक धर्म दाखवणारा मानला जाईल. आणि आज तेच होयत. धर्माची व्याख्या, जातीची व्याख्या, सत्तेची व्याख्या होतेय. 
बाबासाहेब धर्माबद्दल बोलतात
ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे तो धर्म नसून शिरजोरीची सजावट आहे. ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो तो धर्म नसून रोग आहे. ज्या धर्मात अमंगल पशुचा स्पर्श झाला असता चालतो पण माणसाचा स्पर्श चालत नाही. तो धर्म नसून वेडगळपणा आहे. जो धर्म एक वर्गाने विद्या शिकू नये, घनसंचय करू नये, शस्त्रधारणा करू नये असे सांगतो तो धर्म नसून माणसाचे जीवनाचे विडंबन आहे. जो धर्म अशिक्षितांना अशिक्षत रहा, निर्धनांना निर्धन रहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून शिक्षा आहे. ही साधी व्याख्या बाबासाहेबांची आहे. या पुढं जात बुद्धीभेद करणार्‍या लोकांपेक्षा असे बुद्धीभेद करणार्‍यांच्या काव्यात अडकणार्‍यांबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘तुमची तुमच्या ध्येयाच्या पावित्र्यावर अठळ निष्ठा असली पाहिजे, ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांची सेवा करण्यासाठी कर्तव्य पुरते हेतूने जे लोक आत्मप्रेरित होतात ते धन्य होत तुमचे ध्येय उच्च उदाक्त आणि महान आहे. आणि तुमचे मिशन तेजस्वी आणि गौरवशाली आहे. जे आपला वेळ आणि बुद्धी व आपले सर्वस्व गुलामीच्या निदर्शनासाठी पणाला लावतात ते धन्य होत. जे गुलामगिरीत जखडलेल्यांना स्वतंत्र करण्यासाठी महान संकटे ह्रदविदारक मानहानी, वादळे आणि धोक्याची परवा न करता जोपर्यंत पददलित जनतेला आपले मानव अधिकार प्राप्त होत नाहीत तोपर्यंत संघर्ष करीत राहतात त्यांचा विजय असो. आता आम्हाला प्रश्‍न एवढाच विचारायचा आहे. धर्माच्या व्याख्येबाबत बाबासाहेबांची भूमिका आणि पत दलितेच्या सेवेबाबत डॉ.भिमराव आंबेडकरांची भूमिका भाजप खरच साकारतय? तर या ठिकाणी नाही हे उत्तर येईल. केवळ २०१९ च्या मतांसाठी राम नावाचा भिम जप करत कधी जनतेवर हे राम म्हणण्याची वेळ तर कधी स्वत:वर हे राम म्हणण्याची वेळ भाजप आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच डॉ.बी.आर.आंबेडकरांच्या नावाचे नामांतर व त्यांच्या कोटाचे भगवीकरण हे देशवासियांना पचेलच हे सांगणे कठीण. ===============================
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अग्रलेख
इ.स.१९२७ साली १२ ऑगस्ट रोजी बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतमध्ये लिहिलेला हा अग्रलेख आजच्या राजकीय सामाजिक घडामोडीवर तंतोतंत लागू होत आहे. सरकारची भूमिका आणि जनतेची ससेहेलपाट कशी होते आणि त्यावर सडेतोड बाबासाहेबांचं भाष्य काय होतं ते इथं वाचा.

शुक्रवार ता.१२ ऑगस्ट १९२७

ढोंगीपणा,माथेफिरूपणा व गैरमुत्सद्दीपणा
हिंदु समाजातील कित्येक लोकांनी संघटन व शुद्धी या चळवळी सुरू केल्या असून या चळवळीमध्ये शिकलेल्या लोकांचाच भरणा आहे. साधारण बहुजन समाज या चळवळीपासून साधारणत: अलीप्त आहे असे म्हणावयास हरकत नाही. त्याच प्रमाणे समाजसुधारकांचेही या चळवळीमध्ये फारसे अंग नाही. एकंदरित अर्धवट विचाराच्या लोकांचेच या चळवळीमध्ये प्राबल्य आहे. जुन्या मताच्या लोकांना शुद्धीची कल्पना पकरी वाटते आणि समाज सुधारणेकडे ज्यांचा ओढा आह त्यांना समाजसुधारणेच्या द्वारेच खरे संघटन हिंदूसमाजामध्ये उत्पन्न होईल आणि शुद्धीचे कारण फारसे न उरतां हिंदूसमाजाचे संख्याबल कायम राहून वाढेल असे वाटते, त्यामुळे ते दोन्ही पक्ष या चळवळीपासून अलग राहिले आहे. शुद्धिसंघटनाच्या चळवळीमध्ये अर्धवट लोकांची भरताड झाल्यामुळे त्या चळवळीचा व्हावा तसा उपयोग होत नाही. इतकेच नव्हे तर ढोंगीपणा व माथेफिरूपणा यांना उत येवू लागला आहे. सध्या हिंदूमुसलमानांमध्ये भयंतर तेढ उत्पन्न झाले आहे. तिचा फायदा काही लबाड लोक घेत आहेत. आधीच धार्मिक कलह म्हणजे मुर्खपणाचा बाजार जेंव्हा खर्‍या धर्माची पायमल्ली होते तेंव्हाच धार्मिक कलह माजतात. जे हिंदू व जे मुसलमान सध्या धर्माच्या नावावर एकमेकांशी भांडत आहेत. त्यांच्यामध्ये खर्‍या धार्मिक वृत्तीचे माणसे चार दोन तरी सापडतील किंवा नाही याची आम्हाला शंका आहे. धर्माला पदोपदी लाथाळणारे लोकच धर्माचा आवेश दाखवून दुसर्‍या धर्माच्या लोकांचे प्राण घेवू पाहतात. धर्माने माणसाला देवदूत बनवले पाहिजे. परंतू तसे न होता धार्मिक कलाहामुळे धर्माच्या युगाने माणसाचे माणूसपण जावून त्याला पशुपणा येत आहे. अशास्थितीत अशिक्षित गुंड मारामार्‍या करितात. एकमेकांचे टाळे सडकतात व खून करतात आणि सुशिक्षीत गुंड अल्पायासाने आपआपल्या समाजात लोकप्रिय होण्याची परवनी साधून घेतात. अशिक्षीत गुंडांच्या दुष्ट कृत्यांची खरी जबाबदारी खरे म्हटले असता सुशिक्षीत गुुंडांवरच आहे. कारण त्यांच्या चितावणीमुळेच अशिक्षीत लोक अत्याचार करावयाला प्रवृत्त होतात. सुशिक्षीत गुंड जसे हिंदुत आहेत तसे मुसलमानात आहेत. पंडितात आहे तसे मौलानामध्ये आहेत. खरे पाहिल्यास धर्माचा सुक्ष्म विचार कोणीच करत नाही, धर्माच्या आद्यतत्वांची कोणालाच परवा नाही. दुराग्रह व दुरभिमान यांचेच उभय समाजांमध्ये प्राबल्य झालेले आहे. ग्रंथप्रामाण्य, अंधश्रद्धा व अज्ञ समजुती, यांनी प्रत्येक धर्माला ग्रासून टाकलेले असल्यामुळे धर्म व सारासार विचार यांच्यात घटस्फोट झालेला आहे

Tuesday, 27 February 2018

मंत्रालयाच्या दारात मराठी भिकारीण

अग्रलेख - गणेश सावंत

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 
जहालो खरे धन्य ऐकतो मराठी 
धर्म-पंथ-जात एक तो जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी 
मराठी भाषेचा गुणगौरव करणारे सुरेश भटांची ही कविता वाचली किंवा कानावर पडली की आईच्या कुशीत विसावल्यागत वाटतं. माय मराठी आज मात्र मंत्रालयाच्या दारात भिकारीन म्हणून उभी आहे की काय, असा परखड सवाल करावासा वाटतो. तसा हा सवाल गेल्या ऐंशी-नव्वद वर्षांपूर्वीच माधव ज्यूलीअन या कवीने आपल्या कवितेतून केला आहे. एकीकडे मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा दावा करायचा आणि दुसरीकडे मात्र याच मराठी भाषेला दुर्लक्षित करायचे. याची अनुभती भाजप सरकारने उभ्या महाराष्ट्राला दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान राज्यपाल सी. विद्यासागर यांचे इंग्रजीमधील भाषणाचा मराठीत अनुवाद न करता भाजप सरकारने आपले मराठी बेगडे प्रेम दाखवून तर दिलेच, आज त्यात कहर म्हणून की काय मराठी भाषेचा गुणगौरव करणार्‍या ‘लाभले आम्हास बोलतो मराठी’ या सुरेश भटांच्या कवितेतलं सातवं कडवं गाळून मराठी भाषीक आणि त्यांच्या प्रेमाबाबत सरकारने आपले खायचे दात दाखवून दिले. देव-देश आणि धर्मासाठी प्राण आपुले लावू या तोर्‍यात भाजपाचं सरकार आपलं संस्कार, संस्कृतीबाबतचं बेगडं प्रेम मराठी भाषा दिनी उघडं करतं आणि सरकार कसं नागवं आहे हे दाखवून देतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल माफी मागितली आणि आज पुन्हा मराठी भाषा दिनी गुणगौरव करणार्‍या कवितेतलं कडवं गाळून आपण लोकांना मुर्ख बनवण्यात किती कडवे आहोत हेच सरकारच्या व्यवस्थापनाने दाखवून दिलं. मराठी भाषा म्हणजे काय, 
मराठीचं महत्त्व काय, 
आईचं दुध हा जिवनाचा पाया आहे आणि आईची भाषा हा शिक्षणाचा पाया आहे, मराठी ही आमची आईची भाषा, अर्थात मातृ भाषा आहे. मातृ भाषेतून शिक्षण हा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या जुल्माविरुद्ध बंड पुकारले आणि स्वराज्य स्थापन केले. संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानाचा खजिना कडीकुलुपात ठेवलेल्या देववाणी संस्कृतला आव्हान दिले आणि ‘अमृतातही पैजा जिंके,’ ऐसे अक्षर मिळविन हे ध्येय मराठी भाषिकांसमोर ठेवत मर्दाच्या मरणाचे मार्ग दाखवणारा श्रीकृष्णाच्या भगवद्गितेला मराठीत अनुवादित करून ज्ञानेश्‍वरी जगासमोर आणली. कित्येक वर्षाची संस्कृतच्या मक्तेदारीचा किल्ला ज्ञानेश्‍वरांनी उद्ध्वस्त केला आणि सोजवळ मराठी भाषा खळखळ वाहणार्‍या निखल पाण्यासारखी उभ्या जगाला दाखवून दिली. आज आपण आईचं दुध हे मुलासाठी कसं अमृत असतं आणि जन्मल्याबरोबर दोन तासात आईचं स्तनपान मुलाला करावं, असं सांगतो तसं मातृभाषाही शिक्षणाचा पाया असणारा आहे. त्यामुळे या भाषेचा गुणगौरव झालाच पाहिजे. आज मराठी भाषा दिन म्हणून दिवस साजरा करत असलो तरी मराठी भाषेबाबत आपण तेवढ्याच तळमळीने या भाषेकडे पाहतो काय, हेही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. संत ज्ञानेश्‍वर म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा चमत्कार, ज्या संस्कृत भाषेची मक्तेदारी एक हजार वर्षांहून अधिक काळ सुरू होती त्या संस्कृतची मक्तेदारी अवघ्या १८ वर्षांच्या ज्ञानेश्‍वरांनी मोडली आणि मराठी भाषेत श्रीकृष्णाची भागवद्गिता सांगितली. ते सांगताना मराठी 
भाषेतलं सोजवळपण
जसं माझा मराठीची बोलू कौतुके | परी अमृतातेही पैजा जिंकेल ऐसे अक्षर मिळवील | एक हजारहून अधिक वर्षे ज्या संस्कृतने चोहुबाजुने नाकाबंदी केली त्या संस्कृतची मिरासदारी मराठी भाषेने मोडून काढली. मग इंग्रजीचे काय घेऊन बसलात. मराठी भाषेत एक म्हणती मराठी काय, हे तो भल्याशी ऐकू नये, ती मुर्खे नेनती सोय अर्थान्वयाची जसे आहे तसेच तुकोबांच्या भाषेत मराठी भाषेतलं सोजवळपणाबरोबरच आक्रमकता आपल्याला त्यांच्या अभंगातून पहावयास मिळते. महाराष्ट्राच्या मना-मनावर अधिराज्य करणार्‍या संत तुकोबांनी मराठी भाषेचा जहालपण 
भले तरी देव काशीची लंगोटी 
नाठाळाच्या काठी हाणू माथी 
माय-बापाहुनी बहु मायावंत 
करू घातपात शत्रूहुनी 
या अभंगापाठोपाठ याच अभंगात ते पुढे म्हणतात, 
‘मऊ मेनाहुनी आम्हा विष्णुदास कठीण वज्रास भेदू’ मराठी भाषेतला सोजवळपणा आणि आक्रमकपणा जेवढा मनाला भावतो, तो उमजून येतो तेवढा अन्य भाषेत उमजून येत नाही. विख्यात नाटककार श्रीपाद कोहेटकर यांनी मायभूमीबद्दल उत्कट केलेल्या प्रेमाचं दर्शन या ओळीत आपल्याला खास पाहता येईल. 
बहु असोत सुंदर संपन्न की महा 
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा 
दुसरीकडे फादर स्टिफन्स यांनी ख्रिस्त पुरानात मराठी भाषेबाबत जे गौरवोद्गार काढले ते आश्‍चर्यकारकच. स्टिफन्स म्हणतात,
पखियामध्ये मयरु | वृखियामध्ये कल्पतरु| 
भासांमध्ये मानु थेरू | मराठीयेशी |
असे किती उदाहरण द्यायचे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीनंतर जेव्हा दलितांच्या व्यथा व वेदना साहित्यिक बोलू लागले तेव्हा मराठी भाषेचं महात्म्ये सर्वांनाच समजलं आणि उमजलं. कवि यशवंत मनोहर हे साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये दलितांच्या वेदना तेंव्हा मांडायचे. त्यांनी म्हटलं,
काल पडलेला पाऊस माझ्या शेतात पडलाच नाही
सदरहु पिक आम्ही आमच्या आसवावर काढले
या पंक्तीतून मराठी भाषेचं प्रेम आणि मराठी भाषेतले शब्दांचे शस्त्र अनुभवयास येते. आज महाराष्ट्रात १२ कोटींपेक्षा जास्त लोक राहतात. या लोकांच्या घरामध्ये खरच मराठी भाषेचं प्रेम आहे का? हा सवाल एवढ्यासाठीच करावासा वाटतो, कारण आजकाल आमच्या घराघरांमध्ये हाय-बाय आणि टाटाचे जणू वर्गच सुरू झाले आहे. असल्या हाय बाय टाटा करणार्‍या इंग्रजी मॅडमला घरामध्ये घुसू द्यायचे काय? या प्रश्‍नावर आम्ही तर नामदेव ढसाळांच्या भाषेत उत्तर देऊ. नामदेव ढसाळ म्हणायचे, हाय बाय करणार्‍या, ढुंगण हलवित चलणार्‍या इंग्रजी मॅडमला आम्ही आमच्या घरात घुसू देणार नाही, एकीकडे मराठी भाषेवर भाष्य करताना 
इंग्रजी भाषेचा सहारा 
आज घेतलेला नाही. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मराठी भाषेबाबत बोलताना म्हटलं होतं, आतंर प्रांती व्यवहारासाठी केंद्र सरकार कोणती भाषा ठरवतेय याची राज्य सरकारांनी वाट पाहण्याची गरज नाही त्यामुळे सुधारणा लांबणीवर पडणार आहे. कारण फक्त वाद-विवाद होईल या वादविवादातून दुसरे काहीही निष्पन्न होणार नसून इंग्रजांना मागच्या दरवाज्याने प्रवेश मिळणार आहे, तसे झाल्यास तो भारताला कायमचा कलंक ठरेल. तेव्हा पहिले पाऊल म्हणजे सरकारी कचेरीतून प्रादेशिक भाषेचे पुनरुज्जिवन करण्यात यावे. पंडित जवाहरलला नेहरू यांनी तुरुंगातून आपली कन्या हिला हे पत्र लिहिले होते. त्यावर पंडित नेहरू म्हणतात, मी हे पत्र तुला इंग्रजीतून लिहित आहे, हे किती हास्यास्पद! स्वातंत्र्यानंतर आपले सर्व व्यवहार लवकरात लवकर आपआपल्या भाषेत केले पाहिजे. (वरील अनुवाद खांडीलकरांच्या पुस्तकातून) जसं, पंडित जवाहरलाल नेहरुंना भाषेबाबत दुरदृष्टीने पाहता येत होतं तसं महात्मा गांधींनी महाराष्ट्रात मराठी भाषेतच सर्व कारभार आणि व्यवहार झाला म्हणजे मराठी माणूस राज्याच्या विकासाच्या वाटचालीत ‘जला माजी मासा तैसा वावरे’ तसं यशवंतराव यांनीही ७ सप्टेंबर १९६७ रोजी के.जे. सोमय्या आर्टस् व कॉमर्स कॉलेजची पाया भरणी करताना शिक्षणाच्या माध्यमाबाबत जे विचार मांडले ते मराठी भाषेचा उद्धार करणारेच होते. अनेक लेखक, साहित्यिक यांनी मराठी भाषेचा नुसता गुणगौरवच केला नाही तर या भाषेमुळे आईच्या दुधाचे महत्त्व दिले आहे. परंतु आजमितीला या भाषेचं काय होतय आणि महाराष्ट्राच्या मंत्रालयात ही भाषा कशी लटकवली जातेय, हे दिसून येते. 
आईच्या दुधात रोग प्रतिकारक शक्ती 
जशी आहे तशीच मराठी भाषेतही प्रतिकारक शक्तीच म्हणावी लागेल. धैर्य, संघर्ष आणि यशाची पताका याच भाषेतून फडकवता येईल हेही तेवढेच खरे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके नंतर मिळते भाकर. हे जे सत्य वचन मराठीतूनच सांगता येतं ते अन्य भाषेतून सांगता येणार नाही. ‘गड आला पण सिंह गेला’ अथवा ‘स्वराज्य व्हावे ही तर श्रींचीच इच्छा’ हे जे पराकोटीचे ध्येय-वचन आहेत हे इंग्रजी भाषेत ऐकतानाही रोमांच येणार नाही. अंगातलं रक्त सळसळणार नाही. धैर्य तर नाहीच येणार ते फक्त मराठी भाषेतच सांगितलं तर आमच्या मुलांना कळणार. कारण आईचं दुध ते आईचं दुधच आणि बाटलीतलं दुध ते बाटलीतलं दुधच. शब्दाचा महिमा हा मराठी भाषेत जेवढा दखलपात्र आणि रत्नासारखा व शस्त्रासारखा धारदार तो अन्य भाषेमध्ये दिसून येत नाही. तुकोबांनी यावरही ‘आम्हा घरी धन शब्दाची रत्ने शब्दाची शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमच्या जिवाची जिवन  शब्द वाटू जनधन लोका’ यातून मराठी भाषेतल्या शब्दातले रत्न आणि शब्दातले शस्त्रं उघड केले. परंतु त्याच मराठी भाषेला आजही मंत्रालयाच्या दारात आणि घराघरात भिकारीन म्हणून वावरावे लागत असेल तर ते दुर्दैव नव्हे काय?

Sunday, 28 January 2018


वैतागवाडी ते तक्रारवाडी एक प्रवास 

-गणेश सावंत
रोज सकाळी उठायचं दिनचर्या आटोपयाची, ऑफिसला यायचं, ऑफीस झालं की रात्री घरी जायचं, सकाळी पुन्हा तेच...तेच. अक्षरश: वैताग, जिव कंटाळला. जे काम मी करतो त्या कामात समाजकार्य मोठं दिसत असलं तरी हे करत असताना खून, दरोडे, बलात्कार यासारखे रक्तरंजित बातम्यांशिवाय काहीच सापडत नाही. नाविन्यपूर्ण काही द्यायचं म्हटलं तर ते शोधावं लागतं. सकारात्मक दृष्टीकोन ठेवला तर लोक स्वीकारतील का? असाही प्रश्‍न पडतो. अशा एक ना अनेक प्रश्‍नातून वैतागलेला माणूस एकतर न्यूनगंडतेत जातो, नसता आपल्या कामामध्ये टोपले टाकण्याचे काम करतो. त्या कामामध्ये गोडी नसते, रस नसतो. काम करायचय म्हणून तो काम करत असतो, असच काहीसं झालं. वैतागलेला मी तसा सुपरिचीत पिंपळनेर (गणपतीचे) या गावचा. परंतु जसं वर आपण शिर्षक वाचलं ‘वैतागवाडी ते तक्रारवाडी’ त्याचं स्पष्टीकरण द्यायचं म्हणून सांगतो. माझ्या गावात वैतागवाडी आहे. म्हणून शिर्षकाची सुरुवात आणि अंत हा शेवटी कळेलच. जसा मी वैतागलेला तसा पॉझिटिव्ह दृष्टीकोन ठेवणाराही. परंतु हे पॉझिटिव्ह स्पिरीट कुठे मिळेल?
ते टॉनिक कुठे असेल? हा प्रश्‍न मला पडायला नको. परंतु तरीही पडला आणि आपसुक ते स्पिरिट, ते..ते...ते टॉनिक, स्पिरिट इथेच, याच मातीत, सह्याद्रीच्या पर्वतरांगात नक्की सापडेल. कारण तिथलं टॉनिक मिळालं, तिथल्या मातीतलं सुगंध, तिथली हवा अंगाला झोंबली की झोपलेला माणूस जागा होतो, जागा झालेला माणूस उठून बसतो. उठून बसलेला माणूस पळता होतो आणि तोच पळणारा माणूस आपल्या यशाचा ध्वज फडकवतो. ते टॉनिक कुठलं 
माझ्या शिवाजीराजांचं 
राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबांनी जे स्वराज्याचं स्वप्न पाहितलं, ते स्वप्न शून्यातून प्रत्यक्षात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज आठवले की, उर भरून येतो. छाती छप्पन इंचाची होते. परंतु ही छाती त्या थापाड्या छप्पन इंचाची नाही तर मराठमोळ्या, रांगड्या मराठ्यांची छाती असते. आणि तो मराठा म्हणजेच महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला, कुठल्याही कुळातला, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्मातला तो मराठाच. म्हणून म्हटलं, चला आपण रायगडावर जावं, सदरेवर महाराजांना मुजरा करावा. रायरेश्‍वराच्या मंदिरात जाताना आधी शंभू महादेवांचं दर्शन घेण्यापेक्षा थेट माझ्या राजाच्या समाधीशी नतमस्तक व्हावं. ठरलं, ठरलं, अन् प्रजासत्ताकदिन एकतर महाडच्या चवदार तळ्यावर ध्वजारोहण करून रायगड सर करायचा नाहीतर रायगडावर जावून तिरंग्याला सलामी देत छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा. त्यामुळे २५ जानेवारीच्या रात्री ९ वाजता आम्ही पिंपळनेरहून निघालो. सोबत चालक, बाळू वरपे, मित्र सुशिल क्षीरसागर हे तर होतेच परंतु पंचेचाळीशी ते पन्नाशी ओलांडलेले, कधीही गड न चढलेले माझ्या
पतसंस्थेचे सचिव अशोक भुजबळ आणि व्यवस्थापक एकनाथ नरवडे उर्फ मामा हेही महाराजांच्या समाधीशी नतमस्तक होण्यासाठी माझ्यासोबत आले. रात्रीचा प्रवास केला. पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास आम्ही महाडला पोहचलो. त्याठिकाणी एका लॉजवर फ्रेश होण्यासाठी थांबलो. एक-दीड तासाची झोप घेतली. भल्या सकाळी उठलो, फ्रेश होऊन थेट तिरंग्याला सलामी देण्यासाठी बाहेर पडलो. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना रायगडावर जाण्याचे मनसुबे आखले. खरे तर बाकीचे सर्व रोपवेने येतील, असा मी ठरवलं होतं. परंतु त्यांनीही रायगड पायी चालायचं ठरवलं. सुट्‌ट्यांचे दिवस असल्याने रायगडावर तुफान गर्दी होती. किमान लाखभर लोक २६ जानेवारी रोजी तिथे असतील. आम्ही सकाळी साडेनऊला गड सर करायला सुरुवात केली अन् 



पावलोपावली महाराजांची आणि महाराजांसोबत असलेल्या अठरा पगड जातीतील माळ्यांची आठवण त्यावेळी येत होती. आमच्यातला अशोक भुजबळ हा अर्ध्यावरती थकला. तो तेथूनच परतला. मात्र आम्ही चढाई कायम ठेवली. गेल्या दहा वर्षांपासून वर्षातून दोन वेळेस मी रायगडाशी नतमस्तक होण्यासाठी जातोच. आजही जात असताना एक विशेष वाटलं, ते म्हणजे महिलांची आणि लहान मुलांची संख्या गडावर वाढताना दिसली. आज आणखी एक नवं दिसलं ते म्हणजे हळदीच्या अंगाने एक जोडपं करवले-करवल्यांसह गड सर करत होतं. बिचार्‍या नव्या नवरीची दमछाक होत होती. नरदेव मात्र हाडामांसाचा शिवभक्त वाटला. तसं नवी नवरीही कमी नव्हती. चालताना दम भरायचा, त्रास व्हायचा परंतु काल - परवाच डोक्यावर अक्षता पडलेल्या आणि हातात हात दिलेल्या त्या नवर्‍यावर तिचा प्रचंड
विश्‍वास दिसून येत होता. तो तिला प्रोत्साहीत करायचा, आणखी पाच-पंचेवीस पायर्‍या चढायच्या, मग महाराजांची समाधी आलीच, असं म्हणायचा तर कधी जिजाऊ मॉ साहेबांच्या कथा सांगून शिवाजी जन्माला येईल कसा? असेही म्हणायचा. ती नवरी नवर्‍याच्या हाकेला साद देत त्याच्या पावलावर पाऊल देऊन पुढे चलायची, परंतु करवले-करवल्या मात्र बोट मोडत होते. मुडद्या म्हणून मागं बोलतही होते. मी तब्बल एक तास या जोडप्याच्या मागे-पुढे होतो. रायगडाचा पहिला दरवाजा म्हणजे चित्ते दरवाज्यापर्यंत आलो त्यावेळी दोन गोंडस लेकरं गड चढत होते. पाच ते सात वर्षे वयोगट असेल त्या मुला-मुलींचं, दोन पायर्‍या चढायचे, बोबड्या बोलाने ‘शिवाची मालाच की जय...’ असा शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडायचा. त्यांची ती ललकारी ऐकून मीही प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की... म्हटलं त्याबरोबर या दोन्ही लेकरांनी एवढ्या जोरात ‘जय’ म्हणून आवाज दिला. त्या आवाजाबरोबर अन्य आवाजांनी चित्ते दरवाजा दणाणून गेला, जणू सह्याद्रीच्या पर्वत रांगातच हा आवाज निनादत होता. असं जाणवलं. आम्ही गडावर गेलो, माझ्या सोबत जे नवखे आले होते, त्यांना सोबत घेतले. गडाची शक्य तो पूर्ण माहिती दिली. महाराजांच्या सदरेवर जाऊन महाराजांना मुजरा केला. समाधीशी नतमस्तक होऊन टकमक टोकापासून हिरकणी बुरुज यासह अन्य महत्त्वाचे पॉईंट त्यांना दाखविले आणि परतीचा प्रवास पुन्हा पायीच गेला. येताना अवघ्या ४५ मिनिटात येणार आम्ही या वेळेस मात्र सव्वातास गड उतरताना लागला. खाली आलो आणि रायगडवरच मुक्काम करायचा ठरवलं. पायथ्याशी असलेल्या रायगडवाडीत मुक्काम केला आणि ठरलं, जावळीचं खोरं पहायचं, प्रताप गडाचा प्रताप पहायचा, अफजल खानाचा कोथळा पहायचा, शिवनिती, शिवतंत्र, शिवमंत्र तेथूनच घ्यायचा. २७ जानेारीला सकाळी आम्ही निघालो, प्रताप गडाच्या 

जाज्वल्य प्रताप 
 याची देही याची डोळा अनुभण्याचा रायगडवरून महाड पंचेवीस किलोमीटर आणि तेथून २७ ते २८ किलोमीटरवर प्रतापगड. तब्बल वीस-तीस किलोमीटरचा घाट आणि या घाटातून दिसणारं जावळीचं खोरं आजही तेवढच किर्र जंगलाचं, आताही त्या जंगलामध्ये कुठं कुठं सुर्यकिरण पोहचत नसत मग आम्हाला कोडं पडलं, त्या वेळेसचं जंगल कसं असेल. जसा जसा प्रतापगड जवळ येत गेला तशी तशी शिवभक्तांची मांदियाळी वाढती दिसून येऊ लागली. महाबळेश्‍वरवरून येणारे पर्यटक वेगळे आणि आम्ही रायगडाकडून जाणारे वेगळे. प्रताप गडाच्या जवळ रस्ते वाहनांनी खचाखच भरलेले होते. गेल्या काही तासांपासून ट्रॅफिक जॅम होती, मात्र अशा स्थितीतूनही थोडा अडेलतट्टुपणा करत माझ्या
गाडीच्या ड्रायव्हरने गाडी बरीचशी पुढे नेली. परंतु एक ठिकाण असं होतं, एका पर्यटकाने स्वत:ची व्हॅगनर रस्त्यावर पार्क केली होती. त्यामुळे गडावर येणारी एस.टी. बस आणि गड चढणारी एसटी बस यांच्यासाठी जागाच नव्हती. तब्बल एक ते दीड तासापासून ते लोक त्याठिकाणी थांबले होते. काय करायचं, यापेक्षा गाडी उभी केलेल्या माणसाला शिव्या शाप देत होते, आमची गाडी बरीचशी पाठीमागे होती. नेमके काय झाले म्हणून पाहण्यासाठी आम्ही खाली उतरलो, पुढे आलो तर 
व्हॅगनरा अडथळा 
आम्हाला दिसला. आम्हालाही काहीच कळेना. मात्र एवढ्या गर्दीमधला एक पर्यटक सहज म्हणून गेला. उचलाना ती गाडी,
मी मागचा पुढचा विचार केला नाही, चला रे हात लावा म्हटलं, सुरुवातीला पाच-सहा जण आणि माझ्यासोबत असलेला सुशिल हा त्याठिकाणी आला मात्र गाडी पाच सहा जणांना पाठीमागून उचलली नाही. त्याचक्षणी आमच्या सुशीलने छत्रपती शिवाजी महाराज की... अशी ललकारी दिली त्यावेळी दहा-पंधरा जण त्याठिकाणी जमा झाले. ‘जय’ म्हणत अवघ्या तीन सेकंदात गाडी किमान दोन फुट रस्त्याच्या बाजुला केली. दुसर्‍यांदा पुन्हा तीच घोषणा आणि तिसर्‍यांदा तर छत्रपती शिवाजी महाराज की जय व हर हर महादेवच्या निनादात व्हॅगनरला सोळा - सतरा जणांनी अक्षरश: उचलून बाजू ठेवले. काय त्या नावात ताकत, त्या घोषणेमध्ये काय ती ताकत. मी सुरुवातीला म्हटलं ना तुम्हाला स्पिरीट आणि टॉनिक तिथेच मिळते. कारण शिवाजी हे नाव उलटं वाचलं की, 
जीवाशी 
असा शब्द तयार होतो. आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज जिवशी खेळले म्हणून ते सामर्थ्यशाली होत जगातले
नित्यांमधले सर्वोत्तम जगज्जेते ठरले. सर्वत्र पारतंत्र्याचा अंधार असताना मातेने स्वातंत्र्यचं स्वप्न पाहितलं म्हणून ते स्वातंत्र्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारा व्यक्ती फक्त शिवाजी महाराजच हे उघड सत्य सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे. प्रतापगडावर आम्ही गेलो, प्रतापगड तसा इतर गडांपेक्षा बरा होता, कारण आजही हा खासदार उदयनराजे भोसले यांच्या मालकीचा गड आहे. प्रतापगडाचा प्रताप आठवल्यावर आजही अंगावर शहारे येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य वाढवताना आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही आणि मोगलांना पळताभुई थोडी करून सोडली होती. दिल्लीत बडी बेगम चीड चीड करत होती. अपने सल्तनत मे ऐसा कोई माई का लाल नही जो शिवा को पकडके ला सके, ऐसा कोई मर्द नही, जो मराठो को जेरबंद कर सके, छि..थू करत बडी बेगम आपल्या सरदारांना कोसत
होती. त्याच वेळी सरदारांच्या सर्वशेवटी रांगेत उभा राहीलेला एक सरदार म्हणाला, मै लाऊंगा शिवा को जिंदा या मुडदा पकडके, तो कोण? तो तोच एका बसनीला बोकड फस्त करायचा. तो तोच लोखंडी पहारीचा चौव्वा करायचा, तो तोच ज्याने शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे पिताजी शहाजी महाराजांना जेरबंद केलेला, तो तोच शहाजी महाराजांचे धाकटे बंधू संभाजी महाराजांची हत्या केलेला, तो तोच अफजल खान. अफजल खान पुढं आला, बडी बेगमच्या समोर असलेल्या ताटातला पानाचा विडा उचलला, तोंडात टाकला. तो कचाकचा खालला. मै लाऊंगा ऊस पहाडी चुहे को पकडके, जिंदा या मुडदा. इकडे रायगडावर ही बातमी कळाली. अफजल खान स्वराज्यावर चालून येतो, शिवाजी महाराजही प्रश्‍नचिन्हात अडकले. आलेल्या या संकटाचा सामना कसा करायचा? राजमाता जिजाऊही या संकटाने व्याकुळ होत जगदंबेसमोर बसून राहिल्या. तेवढ्याच धिराने राजमातांनी शिवाजी राजांना या संकटाचा सामना करण्यासाठी मानसिक बळ

दिले आणि ठरलं, बलाढ्य अफजल खानाशी ताकतीने नव्हे तर डोक्याने लढायचं. अफजल खान पन्नास हजाराची फौज घेऊन जावळीच्या खोर्‍यापर्यंत आला होता. येताना त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना डिवचण्यासाठी हिंदूंची अनेक मंदिरे पाडली होती. शेतकर्‍यांची शेती लूटली होती, बाया-पोरी बाटवल्या होत्या. स्वराज्यात अक्षरश: काहुर माजवून सोडला होत. अफजल खानाच्या टोलधाडीने जो तो दहशतीखाली होता. राजांनी ठरवलं प्रताप गडावर अफजल खानाचा सामना करायचा, मग त्यांनी अफजल खानाच्या मानसिकतेचा अभ्यास केला. अफजल खानाचा पत्र शिवाजी राजांना जेव्हा आलं तेव्हा शिवाजी राजांनी त्यांना उत्तर देताना ‘ आप तो हमारे पिता समान, शहाजी राजे और आप एकही जहागिरी मे रहेते थे, आपही हमारे पास आओ और हमे ले जाओ,’ असे एक-दोन पत्र व्यवहार झाले. मानसिक मनोबल अफजल खानाचं खचवून राजेंनी प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियाना उभारला आणि तेथेच अफजल खानाचा कोथळाही बाहेर काढला. आज अफजल खानाच्या कबरेला सुरक्षा पाहून हसावं की रडावं, असा प्रश्‍न पडतो. खान संपला, वैर संपलं म्हणत दिवाबत्तीची सोय करणार्‍या जिजाऊ मॉ साहेब आठवल्या की, आजच्या राडेखोरांबद्दल काय बोलावं, कोणाला तिथे कबर नकोय तर कोणला हवीय, हे वादाचे विषय का आणि कशासाठी? नाही कळले. मीही हा विषय इथेच सोडून देतो. प्रतापगड पूर्णत: आत्मसात केल्यानंतर आम्ही रायगड जशी स्वराज्याची राजधानी होती तसा 

रायगडचा कारागृह 
असलेला लिंगाणा किल्ला सर करण्याच्या इराद्याने निघालो, समुद्र सपाटीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर असलेला हा


किल्ला कमालीचा अवघड. जाण्यासाठी कुठलीही सोय नाही. परंतु तरीही मला तर हा किल्ला सर करायचा होता. ते मनसुबे आखूनच मी निघालो होतो, परंतु मला माहित होतं मी हा किल्ला पहिल्या टप्प्यात सर करू शकणार नाही. तरही किल्ल्याच्या पायथ्यापासून माछीपर्यंत जाण्याचा माझा अट्टाहास होताच. मी लिंगाण्याजवळ आलो. लिंगाण्याची थोडक्यात माहिती रायगडापासून २५ किलोमीटर अंतरावर हा लिंगाणा किल्ला आहे. गुन्हेगारांसाठी या किल्ल्यामध्ये पहिलं कारागृह होतं. किल्ल्याच्या उंचावर सुमारे दीड ते दोन हजार फुटावर पन्नास ते साठ माणसे बसतील एवढे डोंगरी कपार आहेत. पाण्याचा स्त्रोत शंभर-दीडशे फुटावर पहायला मिळेल. पुण्यावरून आपण सिंगापूर नावाचं एक खेडेगाव आहे, त्याठिकाणी आल्यानंतर आपण लिंगाण्यावर जाऊ शकतो. मात्र आम्ही उलट दिशेने आलो होतो. त्या गावातला एक व्यक्ती आम्हाला पायथ्यापर्यंत नेण्यासाठी तयार झाला. शेंडगे नावाचा तो व्यक्ती होता. आम्ही भर उन्हात लिंगाणा किल्ला सर करण्यासाठी निघालो खरं, आम्ही पाच जण पाण्याच्या पाच बाटल्या, नदी - नाले, दगड-धोंडे पार करत घणदाट जंगलातून आम्ही लिंगाण्याचा डोंगर चढत होतो. पायवाट जरी असली तरी वाळलेला गवत आणि निसटती माती असल्याने पाय घसरत होते. पाऊल न पाऊल सावधतेने टाकावा लागत होता. एक तासाची चढाई झाल्यानंतर आमच्या जवळचा पाणी पूर्णत: संपला त्यापूर्वी दोघे जण २० टक्क्यातच कंटाळले होते. चालक बाळु वरपे, पन्नास वर्षांचा आमचा एकनाथ नरवडे ऊर्फ मामा जणू आज शेलार मामाच झाला होता. त्याच्यातली स्फूर्ती पाहून मी आचंबीत तर होतोच परंतु मलाही बळ मिळत होतं. मी आमच्या वाटाड्याला विचारले, पुढे पाणी मिळेल का? त्याने नाही म्हटलं, मी घामाघूम झालो होतो, माझ्या शरीरातलं पाणी कमी झाल्याची जाणीव मला होत होती. तोंडाला कोरडही पडली होती. एकनाथ मामाही घामाघूम होता आणि तो शुगर-बीपीचा पेशंट असल्याने माझी काळजी वाढली होती. मी तसं बोलून दाखवलं नाही, त्याचा उत्साह मात्र जाम होता. परंतु चढाई करताना शरीरातलं पाणी संपू न देणं गरजेचं
असतं, त्यामुळे मीच थोडं पायथ्यापर्यंत गेल्यानंतर आता आपण इथेच थांबू आणि परत डोंगर उतरायला सुरुवात केली. तब्बल दोन तास आम्ही चलत होतो. त्या खेड्या गावात आल्यानंतर आम्ही विसावा घेतला. गावात दोन-चार माणसं होती. सातवीपर्यंत शाळा असणार्‍या त्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत तीन शिक्षक आणि अवघी १२ विद्यार्थी शिक्षण घेत होती. तिथलं खाणंपिणं, रहाणं, पिकपाणी या नेहमीच्या गोष्टींवर चर्चा केली. साळ हे प्रमुख उत्पन्न असलेल्या त्या गावात आम्ही सहज म्हणालो, तुम्ही जो तांदुळ खाताय तो मिळेल का, तर एकाने दुसर्‍याला, दुसर्‍याने तिसर्‍याला ‘तू भरड आणलीस का?’ म्हणत आम्हाला एक चुंगडं तांदुळ दिला. आम्ही किती पैशे द्यायचे म्हटल्यावर, द्या काय द्यायचे ते असे म्हणल्याने आम्ही पंधरा-वीस किलो तांदळाचे चारशे रुपये त्या व्यक्तीला दिले. त्यानेही समाधानाने स्वीकारले. तेथून वाटाड्याला आम्ही स्वखुशीने दोनशे रुपये दिले. बस का, म्हटल्यावर त्यानेही मान डोलावून हसत बस म्हटलं. परंतु मी नंतर पुन्हा त्याच्या हातावर शंभर रुपये टेकवले. ते शंभर रुपये याचे होते, तो जाताना सोबतच चालत होता. माझ्या जवळची एक लिटरची पाण्याची बाटली संपली, आम्हा सर्वांकडले पाणी संपले, त्याने जाताना आणि येताना घोटभरही पाणी प्याला नाही हे आम्हाला विशेष वाटले. परतीच्या प्रवासाला लागलो, तसं महाबळेश्वर हिल स्टेशन पहायचं होतं परंतु तिथेही भिडे गुरुजींचा कडेलोट आणि मुक्कामी असलेले समर्थक पाहून दुसरा दिवस किटकिटीचा, वैतागवाडीचा आणि तक्रारवाडीचा जाऊ नये म्हणून मी म्हटलं, आपण परत जावं. जेवढा वैतागून निघालो होतो तेवढा स्पिरीट घेऊन मी आलो. परंतु पुणे-नगर या दोन जिल्ह्यांच्या बॉंड्रीवर असलेल्या एका खेडे गावात मी चहा पिण्यासाठी रात्री अडीच वाजता उतरलो, चहा घेतला आणि सहज पाठीमागे असलेल्या बसस्थानकाच्या बोर्डकडे लक्ष गेलं तर ‘तक्रारवाडी’ असं त्या गावचं नाव वाचायला मिळालं. म्हटलं वैतागवाडीतून निघाले आणि परत जातानाही तक्रारवाडीचं दर्शन झालं. परंतु या मधल्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो ज्वलंत इतिहास याची देही याची डोळा पहावयास मिळाला आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय! चा निनाद करता आला तो शिवबासारखी दृष्टी, युक्ती आणि शक्ती देणारा नक्कीच आहे.
   

    गणेश सावंत ९४२२७४२८१०